तडका - अंधश्रध्दा

Submitted by vishal maske on 4 June, 2015 - 13:38

अंधश्रध्दा

जिथे श्रध्दा जोपासली जाते
तिथे अंधश्रध्दा पोसत असते
अन् नको-नको त्या समस्यांनी
जनता इथली ग्रासत असते

कितीही प्रबोधन करा कुणीही
जनतेला फरक ना पडतो आहे
अन् दिवसें-दिवस अंधश्रध्देचा
कळस वर-वरतीच चढतो आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिथे गजल जोपासली जाते
तिथे आठोळी पोसत असते
अन् नको-नको त्या समस्यांनी
जनता इथली ग्रासत असते

कितीही प्रबोधन करा कुणीही
नवकवीला फरक ना पडतो आहे
अन् दिवसें-दिवस आठोळीचा
कळस वर-वरतीच चढतो आहे,.!

.... खुशाल ठुस्के
झुमरी तलैय्या
००७८३३२३४३५६७११९९६५५

हरिनाम सप्ताहामध्ये घराचे काम काढल्याने कोकणातील कासईकावळे तालुक्यातील भाऊ नारायण कदम यांच्यासह दोन कुटुंबांना गावकीने वाळीत टाकले आहे. कदम हे भांडुप येथे राहतात. वाळीत टाकण्यात आलेले कुटुंबातील प्रमुख हे पोलिस दलातून निवृत्त झालेले आहेत, त्यांनाही गावकीतील हे पंच बधत नाहीत. सप्ताहामध्ये घराचे काम काढल्याने १० हजार रुपये दंडाची रक्कम न भरल्यामुळे कदम यांचा गावाशी असलेला संपर्क मागील दोन वर्षांपासून तोडून टाकण्यात आला आहे. गावकीच्या दंडेलशाहीविरोधात न्याय मागण्यासाठी कदम यांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

वडिलोपार्जित घर दुरुस्त करण्यासाठी भाऊ कदम यांनी बेळगाव येथून कामगार आणले. गावातल्या व्यक्तींनाही रोजगार मिळावा यासाठी त्यांनाही घरबांधणीच्या कामामध्ये सहभागी केले. याच काळात गावातील मारुतीच्या देवळामध्ये सप्ताह सुरू होता, या दहा दिवसांमध्ये गावात 'मोडा' घालण्याची म्हणजेच कोणतेही नवीन काम न काढण्याची पद्धत आहे, मात्र कदम यांनी याच दिवसांमध्ये घराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्याने गावकीने त्यांना शिक्षा म्हणून १० हजार रुपये दंड ठोठावला. यासंदर्भात कदम यांनी सरपंचासह अन्य सदस्यांना वारंवार विनवणी करूनही उपयोग झाला नाही. कदम यांच्या घराशी संबध ठेवणाऱ्यांना वाळीत टाकण्यात येते, मोठ्या कष्टाने पाणी वाहून लावलेल्या आंबा, पोफळीच्या बागा उध्वस्त करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कदम कुटुंबाला करू दिला जात नाही.