आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही काय प्रेतात बसलेले वेताळ आहात का प्रश्न विचारायला ?
आधुवादी
गोलमेज
>>>>>>>>>
Rofl धमाल टाईमपास आहे Lol

भारतात पूर्वी अनेक वैज्ञानिक होऊन गेले. कण्व ऋषींनी अणूचं अंतरंग सांगितलेलं आहे. हे सर्व विस्मृतीत गेलं आणि आपण रुदरफर्ड आणि बोरला सर्व श्रेय देत बसलो.
------ सन्त तुकारामान्नी `अणुरेणुया थोकडा तुका आकाशा.... ` असा सुन्दर अभन्ग रचलेला आहे याचा अर्थ त्यान्ना (आज आपल्याला अभिप्रेत असलेले) अणु आणि रेणु याबाबत ज्ञान होते असे होत नाही. त्याकाळात त्यान्ना (मानवाला) ज्ञात असलेला सुक्ष्मतम भाग म्हणजे अणुरेणु असा मी घेतो. कालान्तराने मानवाने प्रगती केली आणि शोध लावत आपण atom पर्यन्त पोहोचलो व पुढे Electron, Proton, Neutron... अजुन पुढे यान्चे पण छोटे भाग शोधले.

Modern Atomic Theory सर्वप्रथम जॉन डाल्टन यान्नी मान्डली. पुढे त्यात थॉम्सन, रुदर्फोर्ड, भोर आणि अनेकान्नी अनमोल भर टाकली. आता Atom हा शब्द अनेक शतके आधी डिमॉक्रिटस (370 BC) यान्नी सर्वप्रथम `वापरला` आहे.

कृपया त्या सर्वान्चे श्रेय तिसर्‍या कुणालाही देऊ नका.

आधुनिक विज्ञानाचा भरपूर फायदा घेत त्या सर्व शास्त्रज्ञांचे श्रेय अव्हेरण्याचा प्रयत्न करून उगीच न देखल्या देवा दंडवत घालायला लावू नका लोकांना.
----- सहमत...

अहो वीणा ताई ,पाच उदाहरणे देण्याचा प्रश्न माझा नव्हता हो देवा शप्पथ निट बघा.
भाकडकथा म्हणत पुरावे पण मी मागितले नाहित .अरे देवा.

रामदेव बाबा बद्द्ल तुम्ही खुप चांगले लिहले म्ह्णुन एक चांगला प्रश्न विचारला.

सगळ्या प्रतिक्रीया निट वाचा त्रागा करु नका..

Modern Atomic Theory सर्वप्रथम जॉन डाल्टन यान्नी मान्डली. पुढे त्यात थॉम्सन, रुदर्फोर्ड, भोर आणि अनेकान्नी अनमोल भर टाकली. आता Atom हा शब्द अनेक शतके आधी डिमॉक्रिटस (370 BC) यान्नी सर्वप्रथम `वापरला` आहे.
>>कृपया त्या सर्वान्चे श्रेय तिसर्‍या कुणालाही देऊ नका.

अगदी बरोबर तिसर्‍या कुणालाही देऊ नका, आपल्या महर्षि कणादांनाच द्या, काळ इसवी सनापुर्वी ६ वे किंवा ८ वे शतक. Happy

संकृत ऐच्छ्क आहच की.ज्ञ्ज्याना संस्कृत शिक्षणाच कंडु आहे त संस्कृत शिकु शकतातच .. इतराना संस्कृतची सक्ती कशाला?

इतराना शिकवण्यापेक्षा स्वतः शिकुन अगाध ज्ञानाचा उपयोग करावा

अहो वीणा ताई ,पाच उदाहरणे देण्याचा प्रश्न माझा नव्हता हो देवा शप्पथ निट बघा.
-------- तो प्रश्न माझा होता...

बापरे काय चालुये इथे?
तुम्ही काय प्रेतात बसलेले वेताळ आहात का प्रश्न विचारायला ?
आधुवादी
गोलमेज
>>>>>>>>>:हहगलो: धमाल

संकृत ऐच्छ्क आहच की.ज्ञ्ज्याना संस्कृत शिक्षणाच कंडु आहे त संस्कृत शिकु शकतातच .. इतराना संस्कृतची सक्ती कशाला?

इतराना शिकवण्यापेक्षा स्वतः शिकुन अगाध ज्ञानाचा उपयोग करावा
----- संस्कृत भाषेमधे हे सर्व ज्ञान होते आहे हे मानले तर त्याचे मराठी किव्वा इन्ग्रजी मधे भाषान्तर करता येते ना. हे ज्ञानाचे कण वेचण्यासाठी भाषा सक्ती होत असेल ते अनाकलनिय आहे.

तेच ना ! आणि शाळेतल्या संस्कृतात शिकवतात काय ? पंचतंत्राच्या कुत्र्यामांजराच्या गोष्टी , नाटकातला उतारा , घटं भिंद्यात पटं छिंद्यात असली अडाणी चार सुभाषिते .....

हे शिकुन ना संस्कृत भाषा येते ना त्यातल्या ज्ञानाचा परिचय होतो.

उगाच टेंभा मिरवायचा कशाला ?

संस्कृतचा कल हा सोपेपणापेक्षा अवघडपणाकडे आहे.. ही खरोखरच लोकभाषा होती का स्वार्थी लोकानी ज्ञान झाकण्यासाठी कोड लँन्ग्वेज केली होतasअyaavar संशोधन व्हायला हवे.

तुम्ही श्रेय देतानाही कणादांऐवजी कण्व (शकुंतलेचे पालनकर्ते पप्पा) ऋषींना देत आहात, मग इतरांना का बोलताय बरं? कण्व आणि कणाद वेगवेगळे हे आमच्या कियारालासुद्धा माहीत आहे.

>>> मला दुर्लक्ष करणंच आवडलं असतं, पण इतकं अवांतर कसं बरं लिहवतं लोकांना ? काय फरक राहीला मग फेसबुक आणि इथे ? <<<<
फेसबुक अन इथला फरक मला नाही माहित, पण इतके नक्कि माहिती आहे, की लोक जसे आपल्या अंगणातील कचरा शेजारच्याचा दारासमोर ढकलून देतात, तसेच, कित्येक लोक, त्यांच्या डोक्यातील विचारांची कोळीष्टकं-जळमटं मायबोली वा तत्सम मिडियामधिल धाग्यांवर येऊन शब्दषः ओकल्याप्रमाणे टाकून देतात. त्याला तुम्ही छानपणे "अवांतर" असे संबोधताय. माझ्या दृष्टीने असले अवांतर म्हणजे वैचारीक गरळ, बाकी काही नाही, बादलीभर पाणी ओतावे अन वाहवून टाकावे. Proud

धाग्याच्या विषया वर बोलायला मला खरेच वेळ नाहीये.

संस्कृत भाषे मधुन मराठीत भाषान्तर केलेले वि. का. राजवाडे यांचे भारतिय विवाहसंस्थेचा इतिहास हा ग्रंथ मी वाचला आहे.खरोखरच खुप महान संस्कृती होती आपली.

सर्व धागे शेवटी ऋन्मेष ह्यांच्या अमानुष ताकद असलेल्या पंज्यात लुप्त होत आहेत.

>>>>>>

बेफिकीर यांच्या या प्रतिसादानंतर मुद्दाम मी या धाग्यावरून बाहेर पडलो,
हेच दाखवून द्यायला की मुद्दाम माझ्या बदनामीचा कट रचला जातोय,
आणि बघा त्यानंतर धागा कुठे गेला....

संस्कृत भाषे मधुन मराठीत भाषान्तर केलेले वि. का. राजवाडे यांचे भारतिय विवाहसंस्थेचा इतिहास हा ग्रंथ मी वाचला आहे.>>>

हे पुस्तक संस्कृतातून मराठीत भाषांतर केलेले आहे? Lol
काहीही फेकतो हा आयडी.

त्या कण्व ऋषींना शाकुंतलामधून डायरेक्ट अणुरेणु शोधायच्या कामाला लावलेले पाहून धन्य धन्य झालेय!!

अजून अशी उदाहरने येऊ द्यात ना प्लीज!!!

Pages