१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
असं म्हणत म्हणत तुमचेच झाले
असं म्हणत म्हणत तुमचेच झाले असतील दोनेकशे..
वीकेण्ड एण्जॉय करा !
आज साती तैं नी तीन जणांना मिळून त्रिमूर्ती म्हटल्याबद्दल त्यांचे आभार.
तंतरलेल्या चैत्रबनात दोनच मोजत होते .
धन्य वाद वीना तै
धन्य वाद वीना तै
तू झोप मी जागा आहे. तू मोदी
तू झोप मी जागा आहे.
तू मोदी मी रागा आहे
वीना राग
वीना राग
वीणा सुरू | 9 January, 2015 -
वीणा सुरू | 9 January, 2015 - 13:53
असं म्हणत म्हणत तुमचेच झाले असतील दोनेकशे.. हाहा
--->
१०००० मधे खरिच वाता
vijaykulkarni टिप्स छान
vijaykulkarni टिप्स छान आहेत.अजुन येऊ देत.
वर तंतरलेल्या चैत्रबनात
वर तंतरलेल्या चैत्रबनात उल्लेख आला म्ह्णुन हे एक बन आठवले
आंब्याची आमराई असते आणि वेळूचे बन असते, ही साधी गोष्टही पुलला माहिती नव्हती. म्हणून त्याने लिहून टाकले, नाच रे मोरा आंब्याच्या बनात! बाबारे बन वेळूचे असते, हे पूलला सांगायचे धाडस त्याच्या हयातीत अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही झाले नाही.
बन बांबूचे पिवळ्या गाते
आभाळातील अधोरेखिते
"पूल"चे +नाच रे मोरा आंब्याच्या बनात+ हे गाणे गेली कित्येक दशके महाराष्ट्रात वाजतच आहे. तेही लहान मुलांचे बडबडगीत म्हणून पूलची बुद्धी लहान मुलांएवढीच होती, असा अर्थ त्यातून घ्यायचा का? आपण काय शिकवतोय हा लहान मुलांना ? उद्या एखाद्या मुलाने विचारलेच मला आंब्याचे बन दाखव, तर कसे दाखविणार? ...पुन्हा 'काळा- काळा कापूस पिंजला रे ! ' उद्या एखाद्या पोराने काळा कापूस कुठे असतो ? असे विचारले तर काय दाखवायचे ? मग हें गाणे मोरा साठी आहे की चोरा साठी ? द्रोणाचार्यांनी ज्या प्रमाणे अश्वथाम्याला तांदळाच्या पिठात पाणी कालवून तेच दुध म्हणून पाजले आणि तो देखील ( दुधाची चवच माहिती नसल्या मुळे) त्या पीठ पाण्याला दुध समजत राहिला. मराठी माणूसही तसाच आंब्याचे बन आणि काळा काळा कापूस म्हणतच राहिला.
कदाचित, पुलंच्या काळी
कदाचित, पुलंच्या काळी आपल्यासारखे सर्वज्ञ मार्गदर्शनासाठी उपलब्ध नसावेत..
बाबारे बन वेळूचे असते, हे
बाबारे बन वेळूचे असते, हे पूलला सांगायचे धाडस त्याच्या हयातीत अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही झाले नाही.
>>
फारच पुचाट न घाबरट हो महाराष्ट्री माणस … बरे झाले पू. ल. गेल्यावर आपल्याला हे सगळे उमगले अन आपण तरी तोंड उघडले.
एवढे काय सामर्थ्य होते कि मराठी माणसाला एका यकिश्चित लेखकाची भीती पडावी अन ते वर जाई पर्यंत दातखीळ बसावी?
आंब्याची आमराई असते आणि
आंब्याची आमराई असते आणि वेळूचे बन असते, ही साधी गोष्टही पुलला माहिती नव्हती. म्हणून त्याने लिहून टाकले, नाच रे मोरा आंब्याच्या बनात! बाबारे बन वेळूचे असते, हे पूलला सांगायचे धाडस त्याच्या हयातीत अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही झाले नाही.
>>>
पुलंसारख्या माणसाबद्दल काय भाषा आहे वा!
अर ये समद अक्षर वाकड वाकड का
अर ये समद अक्षर वाकड वाकड का दिसु र्हायल मले? ह्ये कस झाल रे बाप्पा! माह्या कम्प्युटरच डोक फिरलय का?
डोक फिरलया कप्युटरच डोक फिरलया
वाकड दिसतया, अक्षर झोकान्ड्या खातया.
रश्मी मॉनिटर नाचतोय का?
रश्मी मॉनिटर नाचतोय का?
अर ये समद अक्षर वाकड वाकड का
अर ये समद अक्षर वाकड वाकड का दिसु र्हायल मले? ह्ये कस झाल रे बाप्पा! माह्या कम्प्युटरच डोक फिरलय का?
>>
आधुनिक उथळपणाचा परिणाम दिसतोय.
इतक्यात काही आधुनिक/ पुरातन घोळ घातलेलं काही वाचलंय किंवा मोनिटरवर दिसलेलं असल्यास तात्काळ संगणक / हुश्शार भ्रमणघ्वनीयंत्र बंद करून पुन्हा सुरु करावे. तरीही तेच लक्षण असेल तर पूज्य रामदेवजी महाराजांन्ना दाखवावे.
मॉनीटर नाय नाचत, त्यावरची
मॉनीटर नाय नाचत, त्यावरची अक्षरे खालीवर दिसतायत.:अओ::फिदी:
तो पुलंबद्दलचा लेख इथे
तो पुलंबद्दलचा लेख इथे आहे.
http://anita-patil.blogspot.in/2012/03/blog-post_21.html?m=1
सुरेखताई, नका हो त्या भयानक
सुरेखताई,
नका हो त्या भयानक ब्लॉगवरच्या गोष्टी इथे लिहू.
पुलंविषयी त्या ब्लॉगवर इतकं एकेरी लिहिणार्याने पुलंचे विचार, विचारांतला मोकळेपणा, काळाच्या पुढची आधुनिकता असलं काही समजूनच घेतलेलं नाहीये.
प्रत्येक गोष्टीत, गाण्यात आणि अगदी बडबडगीतातही जातीयवाद कशाला आणतात त्या ब्लॉगवरचे लोक हे अनाकलनीय आहे.
आमराईला बन म्हटल्याने नेमकं काय बिघडलं.
उद्या हे विद्वान ' 'राई' च का? राई वगैरे फोडणीला घालतात, अशी फोडणी वगैरे घालून पदार्थं करणं उच्चं जातींनाच परवडतं.
आमराई म्हणणं हा इतरांचा अपमान आहे,' असं म्हणून राईचा पर्वत करायलाही कमी नाही करणार.
सुरेखतैंना तंतरलेल्या
सुरेखतैंना तंतरलेल्या चैत्रबनावरून सुचलंय म्हणे हे इथे देण्याचं !
त्या लवकरच ब-या होवोत या शुभेच्छा !
(No subject)
हे काय हो काउ,तुम्ही त्या
हे काय हो काउ,तुम्ही त्या लेखाची लिंक का दिली साती तै चिडल्याना माझ्यावर.
मला फक्त दोन-चार चांगल्या गोष्टीच टायपाच्या होत्या. जौदे पु.ल माझे आवडते लेखक आहेत त्या तंतरलेल्या चैत्रबना मुळे मला हा बन आठवला एवढेच.
बादवे कुठे गायबलेत तंतरलेले
बादवे
कुठे गायबलेत तंतरलेले चैत्रबन ? बिझी बिजी झालेकी काय ?
(इथून पुढे फक्त चै एव्हढंच )
ओ चिडले नै हो
ओ चिडले नै हो सुरेखताई,
कुठलाही एक्स्ट्रिमिझम नको इतकच.
तं तै thank's
तं तै thank's
अरेच्चा! शिकागोतला तंबू जागाच
अरेच्चा! शिकागोतला तंबू जागाच कसा काय म्हणे अजूनी?
कथा लिहित असतील
कथा लिहित असतील
आंब्याचेही वन / बन
आंब्याचेही वन / बन असते.
गीतरामायणात पहिल्या गाण्यात आहे.
ते प्रतिभेच्या आम्रवनातील ..
आयला, आंब्याच्या बनात मोर
आयला, आंब्याच्या बनात मोर नाचतो त्या गाण्यात? मी वनात समजत होतो.
-गा.पै.
(No subject)
नाच रे मोरा गदिमांचं गाणं
नाच रे मोरा गदिमांचं गाणं आहे. पुलंचं संगीत आहे त्याला.
वावे, बरोबर, गीत गदिमांचे
वावे, बरोबर, गीत गदिमांचे आहे, संगीत पुलंचे आहे.
आमराई = आंब्याचे वन / बन
कापसावर बराचसा बुक्का ओतलात तर कापूस काळा होऊ शकेल,
अगदीच कोणाला दाखवायचाच असला तर.
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर... केतकी च्या बनी तिथे. हे लता मन्गेश् कर की सुमन कल्याणपूराच्या आवजातले खूप गोड गाणे आहे.
Pages