आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके,
मधल्या भ्रमराक्षसांचा धांगडधिंगा या पोस्टींना कोणतेही लॉजिकल उत्तर नाही, म्हणून होतोय हे स्पष्ट दिसते.
डॉक्टरने पेशंट कसे जमवावेत हे मृत व्यक्तीचे फोटो लोकांची दिशाभूल करण्यासाठी लावणार्‍या मनोरुग्णांनी सुचवावे, व वरतून आम्ही नै बा वैयक्तिक बोलत, असेही म्हणावे, ही एक मोठ्ठी करमणूक.

या त्या पोस्टी:

>>

Rajesh K | 8 January, 2015 - 00:05

नालंदा विद्यापीठ जळाले हे कदचीत खरे असेलही. पण केवळ त्या विद्यापीठातच फक्त विमानाविषयी पुस्तके होती बाकी कुठे नाही हे पटत नाही. दुसरा मुद्दा एखादी संस्कृती केवळ विमानासारख्या एखाद्या प्रचंड गुंतागुंतीच्या शास्त्रात प्रगती करू शकते पण इतर मुलभूत बाबींत नाही हे पटत नाही. विमाने होती तर जमिनीवर धावणाऱ्या गाड्या का नव्हत्या? रेदिओ टीवी का नव्हते?? सर्वात महत्वाचे, जी संस्कृती विमाने निर्माण करू शकत होती ती संस्कृती शस्त्रे निर्माण करून स्वतःचे संरक्षण का करू शकली नाही???

इब्लिस | 8 January, 2015 - 02:08

स्वतःचे संरक्षण का करू शकली नाही???
<<

श्शऽ..
असले प्रश्न विचारायचे नाहीत.

ते विद्यापीठं जाळून त्यातलं ज्ञान यवन अन म्लेंछांनी नष्ट केलं की नै? म्हणून झालं सगळं हे असं. अन त्यामुळेच आता आम्हालाही हे असलं भारी भारी सगळं सोडून इकडे म्लेंछांच्या देशात रहावं लागतं, असं ते तंबोराभाऊ म्हणतील आता.

अन ते निष्पक्ष भ्रम्मराक्षसही येतील लवकरच मदतीला.

गुड मॉर्निंग!
<<

आता समस्त ऑफिसची फुकट नेट वापरणार्‍या, व डूप्लिकेट आयडीवाल्या तंबोरा, व तंपू आयमिन कंपूने जरा उत्तर देण्याचे करावे, की इतक्या प्रगत संस्कृतीचा र्‍हास नक्की कसा काय ब्वा झाला बरें?

डॉक्टरने पेशंट कसे जमवावेत हे मृत व्यक्तीचे फोटो लोकांची दिशाभूल करण्यासाठी लावणार्‍या मनोरुग्णांनी सुचवावे, व वरतून आम्ही नै बा वैयक्तिक बोलत, असेही म्हणावे, ही एक मोठ्ठी करमणूक
............
Proud

डॉक्टरने पेशंट कसे जमवावेत हे मृत व्यक्तीचे फोटो लोकांची दिशाभूल करण्यासाठी लावणार्‍या मनोरुग्णांनी सुचवावे, व वरतून आम्ही नै बा वैयक्तिक बोलत, असेही म्हणावे, ही एक मोठ्ठी करमणूक >>>
Super Happy Dance

आता समस्त ऑफिसची फुकट नेट वापरणार्‍या, व डूप्लिकेट आयडीवाल्या तंबोरा, व तंपू आयमिन कंपूने जरा उत्तर देण्याचे करावे, की इतक्या प्रगत संस्कृतीचा र्‍हास नक्की कसा काय ब्वा झाला बरें? >>>
Woohoo

हिंदूनी चार मुलांना जल्म द्यावा ! भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचे वक्तव्य.
हे वक्तव्य आधुनिकता मधे येते की उथळपणा मधे ?

ज्यांना परवडत असेल आणि झेपत असेल त्यांनी द्यावा की..........>>
पुलंच्या कथेत कुठेतरी एक पात्र असं आहे, ज्याचा विचार असतो की जो चोच देइल तो दाणे पण देइल आणि ह्या तत्वावर अवलंबुन तो भरपुर पैदास करतो, आणि नंतर सगळ्या चोचींसाठी एकडे तिकडे दाणे मागत असतो..

ज्याचा विचार असतो की जो चोच देइल तो दाणे पण देइल आणि ह्या तत्वावर अवलंबुन तो भरपुर पैदास करतो, आणि नंतर सगळ्या चोचींसाठी एकडे तिकडे दाणे मागत असतो..>>

चोच असेल तर हवे तितके दाणे खावे. कसें

ते आधी बोल्ले की चार मुले काढा.

मग बोल्ले , दोनपेक्षा जास्त मुले हा गुन्हा आहे. गुन्हा करु नये.

घूमजाव !

ते आधी बोल्ले की चार मुले काढा.

मग बोल्ले , दोनपेक्षा जास्त मुले हा गुन्हा आहे. गुन्हा करु नये.

घूमजाव !

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे सर्व नेते यांच्या 'कथनी' आणि 'करनी' मध्ये नेहमीच अंतर असते.
त्यांनी स्वता: विवाह करुन आधी चार मुलांना जन्म द्यावा व नंतर हिंदूना तसे करण्यास सांगावे. -के सी.त्यागी

तुकाराम महाराजांकडे विमान आले तर बिचारे शिवाजी महाराज घोड्यावरुन का फिरत होते ? त्याना का नै विमान मिळाले ?>>>>>>> डोन्गर दर्‍यात विमान टाकचीक टाकचीक करु शकत नव्हते म्हणून.:फिदी:

हे चक्रम का चिडलेत ? काऊ दादा डॉक्टर आहेत का ?
माफ करा. त्यांना उद्देशून मी काहीही लिहीलेलं नाही. त्यांचे प्रतिसाद कधीच अंगावर आल्यासारखे वाटलेले नाहीत.

अश्विनी के
धन्यवाद गं. पन मी काय चुकीचं सांगितलंय ?
गावातल्या पेशंटला जर डॉक्टरची गरज असेल तर मायबोलीला का बरं आक्षेप असेल ? त्यांनाच गरज नसेल तर मग मी क्षमा मागते. अशा वेळी मायबोली सारखी सोशल नेटवर्किंग साईट खरंच वरदान आहे.

कोकणस्थ, अरे सीरीयसली सांगितलं रे, कळवळून म्हणतात ना तसं. Happy

अक्सीर इलाज चे अनुभव शेअर करावेत. >>> रुग्ण इलाज करण्यापलिकडे गेले आहेत. अब इन्हे दवा की नही दुवा की जरुरत है Rofl

अरेय काय चाललय काय ... आता हा धागा अड्मीन च्या विपु पेक्षा चांगला मनोरंजक झालाय ...

अड्मीन को जलावो मत ...

वीणा सुरू यांनी माबोवरच्या समस्त डॉक्टरांना दिलेल्या सल्ल्याने मी भारावून गेले आहे.
कालच त्याची एक प्रिंट घेऊन मग ती गोल्ड एंबॉस करून घेतली.
आता आमच्या आधुनिक देव्हार्यात ठेवून पूजा चालु केली आहे.
वीणा ताई, तुमचे कसे आणि किती आभार मानावे तेच समजत नाही.
आमच्या पोरांच्या तोंडात चार घास पडले तर अश्या तंबूतल्या प्रॅक्टीशीतूनच पडतील.
असेच वेळोवेळी मार्गदर्शन करत रहावे ही याचना.

तसेच हा सल्ला कुठेतरी जपून ठेवायला सुचविल्याबद्दल माबोडॉक्टरौद्धारक श्री बेफिकीररावजीसाहेब यांचेही अनेकानेक आभार. वारंवार ऑनलाईन विचारलेल्या मेडिकल सल्ल्यांची भरपाई म्हणून अश्या घवघवीत स्वरूपात ही दक्षिणा आपल्याकडून मिळावी यातच आपले कोमल अंतःकरण किती थोर आहे हे ही दिसून येते.

बाकी श्री रा रा कोकणस्थसाहेब तर एकूणच भारतवर्षाचे २२ व्या शतकातले तारक आहेत. त्यामुळे समस्त प्रजेबरोबर त्यांना
डॉक्टरड्यांचीही तितकीच मायेने काळजी वाटणे रास्तच आहे.

तुम्हा तिघांना एक माबोवरिल डॉक्टर म्हणून माझ्याकडून मानाचा दंडवत.
_^_

Pages