मला मुलगीच हवी ..
......
सन २००८ !
एक काळ होता जेव्हा मला वाटायचे की मला मुलगाच झाला पाहिजे.
हो, त्याकाळी जेव्हा मला एक साधी गर्लफ्रेंडही नव्हती, (वा किमान होत्या त्या मैत्रीणींबाबत सिरीअस तरी नव्हतो) तेव्हाही कॉलेजमधील मित्रांशी चर्चा करताना, वा एकांतात बसून स्वत:च्या भविष्याचा विचार करताना मला असेच वाटायचे की येस्स, मला मुलगाच झाला पाहिजे.
......
एक काळ होता, (अर्थात आजही जिथे सुशिक्षितपणा किंबहुना त्यापेक्षाही सुसंस्कृतपणा आला नाही तिथे तो काळ अजूनही आहेच)
असो, तर एक काळ होता जेव्हा प्रत्येक मातापित्यांची अशी इच्छा असायची, आपले होणारे संतान, हि दुसर्याचे घर प्रकाशाने उजळवणारी ज्योती नसून एखादा आपल्याच अंगणात टिमटिमणारा दिपक असावा, आपल्या वंशाचा दिवा असावा. आणि या विचारामागे प्रामुख्याने आणि ढोबळमानाने खालील कारणे असायची :-
१) मुलगा म्हातारपणाची काठी असतो.
२) मुलगी लग्न करून सासरी जाते.
३) मुलगा हुंडा घेऊन येतो, तर मुलीला हुंडा द्यावा लागतो.
४) मुलगा घराण्याचा वारस असतो, तर आपला जमीन-जुमला जावयाला देण्याऐवजी मुलाकडेच जावा.
५) मुलगा आपला वंश आणि आपले नाव पुढच्या पिढीत नेतो.
६) मुलीची अब्रू जपणे हि एक जबाबदारी असते.
वगैरे वगैरे
.......
तर या कारणांची आजच्या जमान्यात साधारण अश्या प्रकारे वाट लागली आहे.
१) मुलगा म्हातारपणाची काठी मानले तरी तोच कधी लाठी मारून वृद्धाश्रमात हाकलवेल किंवा जबाबदारी घेण्यास नकार देईल हे सांगता येत नाही. जिथे दोन किंवा अधिक मुले असतात तिथे प्रॉपर्टीचे वाटे पडताना आपला हक्क कोणीही सोडत नाही, मात्र म्हातारपणी आईवडीलांचा सांभाळ करण्याचा कर्तव्य निभावायची वेळ आली की मात्र टाळाटाळ करण्याची शक्यता असते. (आठवा चित्रपट बागबान) किंवा हल्ली पेंन्शन प्लॅन आणि त्याच्या ‘ना सर झुका है कभी, ना सर झुकायेंगे कभी" वगैरे जाहीराती यामुळेच बघायला मिळतात. थोडक्यात आपल्या म्हातारपणाची सोय आपली आपणच करायची आहे हा विचार रुजतोय.
२) मुलगी लग्न करून सासरी गेली तरी हल्लीच्या काळात ती कमावती आणि स्वतंत्र विचारांची असल्याने लग्नानंतरही ती आपल्या मातापित्यांच्या प्रती आपली जबाबदारी उचलू शकते. एकवेळ तिचा नवरा त्याच्या आईवडिलांना म्हणजे तिच्या सासू-सासर्यांना सोडून स्वतंत्र राहत असेल, पण मुलगी मात्र माहेरच्यांशी असलेली आपली नाळ कधीच तोडत नाही.
३) हुंडा वगैरे प्रकार हल्ली फारसे उरले नाहीयेत. लग्नाचा खर्चही बरेच ठिकाणी अर्धा अर्धा उचलला जातो. प्रेमविवाहांचे वाढते प्रमाण हे याला पोषकच आहे.
४) आपल्यापाठी आपली प्रॉपर्टी मुलगा आणि सून उपभोगतेय की मुलगी आणि जावई याचा आता कोणी फारसा विचार करत नाही, कारण मुळात प्रॉपर्टी अशी काही सोडूनच जायची नसते. आपण उभारलेला उद्योगधंदा कोणाच्या हाती सोपवून जायचा असेल तर तो आजच्या जमान्यात मुलीही सुशिक्षित असल्याने त्यांच्याही हाती सोपवून जाता येतो. तसेच मुलगा नालायक निघाला तर नाईलाज होण्यापेक्षा कर्तबगार जावई शोधण्याचा पर्याय तरी आपल्या हातात उपलब्ध राहतो.
५) आपले नाव पुढच्या पिढीत जावे, आणि आपला वंश वाढावा या मरणोत्तर खुळचट आणि मनाला खोटा खोटा दिलासा देणार्या कल्पनांमधून बहुतांश समाज बाहेर आलाय. आपण मेल्यानंतरही आपले फेसबूक अकाऊंट या जगात तसेच राहणार आणि आपले नाव गूगलसर्च केल्यास ते सापडणार हे आजच्या पिढीला पुरेसे आहे.
६) या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाच्या जोडीनेच, याच समाजाच्या एका हिश्श्यात वाढीस लागलेली विकृत मानसिकता पाहता दुर्दैवाने शिशू वयात मुलांचा सांभाळ हे सुद्धा मुलींइतकेच जबाबदारीचे काम झाले आहे.
वगैरे वगैरे
.......
असो, तर मी देखील या बदललेल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाचा भाग आणि तश्याच आधुनिक विचारांचा असलो, तरीही मला मात्र मुलगाच हवा होता. यामागे कुठलेही संकुचित विचार नसून मला माझ्या मुलामध्ये स्वत:ला बघायचे होते. आयुष्यात मला जे आजवर बनता आले नाही, वा पुढेही बनता येणार नाही, ते माझ्या मुलाने बनावे अशी माझी सुप्त इच्छा होती. अर्थात, कोणतीही जबरदस्ती नाही, तर त्याच्या मर्जीनेच. मला आयुष्यात जी मौजमजा करता आली नाही ती त्याने करावी आणि मी त्यात मला बघावे. अगदी डिडीएलजेमधील अनुपम खेर सारखे मला माझ्या मुलाला सांगायचे होते, "मैने तो अपनी सारी जिंदगी ऐसेही यहा वहा टुक्कार पोस्ट डालने मे बिता दी बेटा, लेकीन तू जी ले अपने मर्जी की झिंदगी, मै समझूंगा मैने अपनी जिंदगी जी ली" .. आणि एवढेच नव्हे तर मला माझ्या मुलाचे नाव ‘आर्यन’ ठेवायचे आहे, असेही मी त्यावेळीच फायनल केले होते. मला माझा मुलगा माझा बेस्ट बडी म्हणून तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला होता..
वगैरे वगैरे
.......
पण आज ३० ऑक्टोबर २०१४ उजाडता उजाडता ... मला पुन्हा एकदा मुलगीच हवी झाली आहे.. ते सुद्धा एक नाही तर दोन-दोन मुलीच!
आता याची कारणे काही अश्याप्रकारे,
१) आजवर मला माझ्या आईने मोठ्या लाडात वाढवले. मला काहीही काम करू न देता सारे काही आयते दिले. अगदी च् म्हटले की चहाचा कप हातात. जिथे आई कमी पडली तिथे ती कसर ताई माई अक्कांनी पुर्ण केली. बाहेर आता माझे हे आरामाचे लाड माझी गर्लफ्रेंड पुरवते. पुढे जाऊन बायको हे करेन. अर्थात याच कारणासाठी मी माझ्या गर्लफ्रेंडशी कधीही ब्रेकअप होऊ न देता तिच्याशीच लग्न करणार. मॉरल ऑफ द स्टोरी - ज्या घरात स्त्रियांची संख्या जास्त असते त्या घराला घरपण येते आणि पुरुषांची ऐश मौज मजा सारे काही होते. खास करून माझ्यासारख्या आळशी पुरुषांची जरा जास्तच.
२) स्वत: मुलगा असल्याने आणि आसपासचे मुलांचे जग पाहिल्याच्या अनुभवावरून सांगू शकतो, मुलगा एका ठराविक वयाचा झाला की तो त्याच्या समवयीन मित्रमंडळींमध्येच जास्त रमतो आणि एका वयानंतर तर जेवायला आणि झोपायलाच घरी येतो. मुलीसाठी मात्र तिचे कुटुंब हे सुद्धा तिचे एक मित्रमंडळच असते, किंबहुना सर्वात आवडीचे असे. साधी पिकनिक काढायची म्हटले तरी मुलगा आपल्या मित्रांबरोबर जाणे पसंद करेन, पण मुलगी मात्र फॅमिली पिकनिकलाच पहिले प्राधान्य देईल. फेसबूकावरही मुलांपेक्षा मुलींचेच सहकुटुंब पिकनिकला गेलेल्याचे फोटो जास्त अपलोड होताना दिसतात हा याचा पुरावाही म्हणू शकता.
३) मला स्वत:ला नटण्याची, नीटनेटके राहण्याची आणि छान छान फोटो काढण्याची, काढून घेण्याची जरा जास्तच आवड आहे. हि आवड मुलापेक्षा मुलीबरोबर जास्त चांगल्या प्रकारे जपता येईल असे मला वाटते कारण मुलांच्या तुलनेत मुलीला विविध प्रकारचे ड्रेसेस आणि अलंकारांनी छानपैकी नटवता येते.
४) वडील आणि मुलाचे नाते हे जरासे कॉम्प्लिकेटेड असते. ते योग्य प्रकारे जमले तर ठिक अन्यथा समजे उलगडेपर्यंय आयुष्यातील एक काळ निघून जातो. पण मुलगी हि लहानपणापासूनच अगदी शेवटपर्यंत, सहजगत्या आणि नैसर्गिकरीत्या, वडिलांशी भावनिकरीत्या खूप चांगली जोडली जाते, वडिलांची लाडकी लेक होते.
वगैरे वगैरे
.........
अर्थात हि माझे मते आहेत. माझ्या अनुभवांवरून आणि त्या अनुभवांच्या आकलनावरून बनवली आहे. बहुतांश बाबतीत, बहुतांश जणांनी, एकमत व्हायला हरकत नसावी. तरीही न पटल्यास, धागा चर्चेला खुला आहे. चॉईस इझ युअर्स, पण मला मात्र बाबा मुलगीच हवी
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
ok बक्ष दिया तुम्हे
बक्ष दिया तुम्हे
बरेच चुकीचे जरा बरोबर बोलू
बरेच चुकीचे जरा बरोबर बोलू काही..
चला दोस्तहो धाग्यावर धागे काढू काही...
(खरेसाहेब माफ करा!)
अरे वा आधी आई, मग बायको आणि
अरे वा आधी आई, मग बायको आणि पुढे मुलगी , कामासाठी तेही लाडाने करायला (लाडाने/प्रेमाने म्हटल की सगळे माफ
) तुम्हाला कोणी तरी मिळतेय. लकी आहात.
पुरुषांचे कोड कौतुक करत त्यांची आरामाची सोय करण्यासाठी का होईना 'मला मुलगी हवी' अस ते म्हणायला लागकेव, इतके उपकार करताहेत आणि तरीही ह्या बायका अस उलाट सुलट झोडुन काढताहेत. काहीही हा
बायकांनो
दिवे घ्याच
अदिती, येस्स लकी आहे. आणि या
अदिती, येस्स लकी आहे. आणि या लक वर माझ्या ऑफिसमधील सारे मित्र-मैत्रीणी, खास करून विवाहीत मंडळी फार जळतात. मला खमकी बायको मिळावी अशी माझ्या तोंडावरच प्रार्थना करतात. पण त्यांच्या दुर्दैवाने मी योग्य मुलगी शोधली आहे.
स्पार्टाकस,
माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात हा पण एक ड्यू आयडी आरोप असेल तर नो प्रॉब्लेम !
देवा!
देवा!
माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात
माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात हा पण एक ड्यू आयडी आरोप असेल तर नो प्रॉब्लेम ! >>>
ग्रो अप ऋन्मेष... तुम्हाला संदीप खरे नामक कवी माहीत नसतील तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे.
ऋन्मेषच्या या धाग्यावर पण ते
ऋन्मेषच्या या धाग्यावर पण ते फेसबुकसारखे लाईक्स-अन्लाईक्स ठेवायची सोय हवी होती. लय मज्जा आली असती.:फिदी:
माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात
माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात हा पण एक ड्यू आयडी आरोप असेल तर नो प्रॉब्लेम !>>>
<< ऋन्मेषच्या या धाग्यावर पण
<< ऋन्मेषच्या या धाग्यावर पण ते फेसबुकसारखे लाईक्स-अन्लाईक्स ठेवायची सोय हवी होती. लय मज्जा आली असती. >>
तीस लाईक्स आणि तीनशे अनलाईक्स मिळाल्यावर यू कॅन लाईक माय थ्रेड ऑर अनलाईक माय थ्रेड बट् यू कान्ट जस्ट ईग्नोअर माय थ्रेड आणि ३० लाईक्स + ३०० अनलाइक्स = ३३० अशी आपल्या धाग्याची त्रिशतकी त्रैलोक्याद्वितीय लोकप्रियता असल्याचा निष्कर्ष वाचावयास मिळाला असता.
माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात
माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात हा पण एक ड्यू आयडी आरोप असेल तर नो प्रॉब्लेम !
अरे देवा !!!
<< माझे आडनाव खरे नाहीये.
<< माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात हा पण एक ड्यू आयडी आरोप असेल तर नो प्रॉब्लेम !
अरे देवा !!! >>
असे लिहू नका हो... नाहीतर पुन्हा नवा प्रतिसाद यायचा -
माझे आडनाव देव नाहीये. अर्थात हा पण एक ड्यू आयडी आरोप असेल तर नो प्रॉब्लेम!
कुमार ऋन्मेष धाग्याचा टिआरपी
कुमार ऋन्मेष धाग्याचा टिआरपी कमी व्हायला लागलाय...:स्मित:
लोक दुसर्याच विषयांवर बोलायला लागलेत आता पाणी घालुन वाढवायला तुझ्याकडे पण काय नाहीये.:स्मित:
तु नवीन धागा काढ बर आता...:हाहा:
<<तु नवीन धागा काढ बर
<<तु नवीन धागा काढ बर आता...>>
तुम्ही पाहिला नाही का? त्यांनी आधीच काढलाय.. मुलगी हवी नंतर आता चिऊ काऊचा नंबर लागलाय.
http://www.maayboli.com/node/51407
माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात
माझे आडनाव खरे नाहीये. अर्थात हा पण एक ड्यू आयडी आरोप असेल तर नो प्रॉब्लेम !>>>


कित्ती तो निरागसपणा
टडोपा झालं अगदी
चेतन
मुलगी हवी नंतर आता चिऊ काऊचा
मुलगी हवी नंतर आता चिऊ काऊचा नंबर लागलाय.
>>>
ती गोष्ट वाटतेय्...आणि मला नाहि वाटत आता कोणी कुमार ऋन्मेष च्या सत्यकथांवर पण विश्वास ठेवेल...
एक प्रश्न विचारावासा वाटतो सगळ्या विलक्षण व्य्क्ती,प्रसंग बाळ ऋन्मेष च्या आयुष्यात का येतात बरे??
स्पार्टाकस, संदीप खरे मला
स्पार्टाकस,
पेटला नाही कारण कवितांच्या जगात मी नाही रमत, मला नाही फारशी आवड ..
संदीप खरे मला माहीत आहेत पण लगेच
सीमा,
ती विलक्षण घटना माझ्या मावसकाकांच्या आयुष्यात घडलीय, मी फक्त माध्यम आहे. जसे उद्या आपल्या आयुष्यात काही विलक्षण घडले आणि आपण माझ्याशी ते शेअर केले तर ते मी आणखी कोणालातरी माझी एक मायबोली मैत्रीण सीमा यांच्या आयुष्यातील सत्यघटना म्हणत शेअर करेन तसेच हे.. उलट मी बोअर झालोय रूटीन आयुष्य जगून!
उलट मी बोअर झालोय रूटीन
उलट मी बोअर झालोय रूटीन आयुष्य जगून!
एवढे विलक्षण आयुष्य बोअर वाटतेय मग आमच लाईफ तर ओएमजी..रोज उठा,आवरा ऑफीसला या घरी जा जेवण बनवा आणि जेवा बास...
>>>
फारच विलक्षण आहात बाबा तुंम्ही...
मान गये आपको ,आपकी पारखी नजर ओर...
गूड न्यूज मित्रांनो
गूड न्यूज मित्रांनो !!!!!
आत्ताच हाती लागलेल्या माहितीनुसार आपल्या या धाग्यावरून प्रेरीत होऊन, "श्री आणि जान्हू" यांना देखील मुलगीच हवी आहे.
याचे श्रेय इथे चर्चेत सहभाग घेतलेल्या सर्वांनाच, सर्वांचेच, अभिनंदन !!!
चीअर्स !!!!!!
Pages