आजची विशेष बातमी

Submitted by नितीनचंद्र on 7 September, 2014 - 23:11

राजकारणावर चर्चा करायला, सिनेमावर चर्चा करायला स्वतंत्र धागे आहेत. काही घटना अश्या असतात ज्या विशेष असतात जसे की एखाद्या औषधाचा लागलेला शोध ज्यामुळे खुप मोठ्या शारिरीक त्रासा पासुन सुटका होणार आहे किंवा कुणीतरी असा लावलेला शोध ज्यामुळे मानवी जीवनात काहीतरी सुखावह घडणार आहे.

काही वेळा काही अतर्क्य अश्या गोष्टी घडतात. ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते किंवा काही गोष्टी अंधश्र्ध्दा समजल्या जातात. एक दिवस असा येतो की या घडनांच्या मागचे शास्त्र जगाच्या समोर येते.

आजचीच बातमी पहा जी दैनीक सकाळच्या पान ७ वर आहे.

ही बातमी आहे " टेलीपथीचा पहिला प्रयोग यशस्वी " . हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा अमेरीकेच्या हावर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेला आहे. या प्रयोगात मुंबईतल्या एका व्यक्तीच्या मनातले विचार ४००० मैलावर फ्रान्स ची राजधानी असलेल्या पॅरिस मधे दुसर्‍या माणसाला समजले. हे सिध्द करण्यासाठी अर्थातच अत्याधुनीक उपकरणांचा वापर केला गेला.

लोक म्हणतील आज फोन आहेत, इंटरनेट आहे किंवा अन्य साधने आहेत. पण ही साधने मनातले विचार पोचवत नाहीत. जे ओठावर येते तेच फोन पोचवतो आणि बोटावर येते ते कॉप्युटर इंटरनेट पोचवतो. मनातले जाणणे हे केवळ अशक्य किंवा अंधश्रध्दा समजले जाईल असे होते.

अजुन वेळ आहे जेव्हा मानव हे सहज करु शकेल.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदींचा दणका जबरदस्त आहे. आधी भूतान, जपान, वगैरेचे दौरे करुन चीनची कोंडी केली. आता एका शब्दाने बोलल्यावर चीनी सैन्य मागे. जबराट माणूस आहे मोदी. मोदींना मानलं बुवा.

हो. मोदींबद्दल चीनी सैनिकांनाही भलतंच आकर्षण आहे. मोदींच्या राज्यातला भारत आहे तरी कसा ते पाहायला आतापर्यंत आले नव्हते इतक्या संख्येने चीनी सैनिक प्रथमच भारतात आले.

पाकिस्तानी सैनिकांनाही त्यासाठीच यायचे होते. १९७१ कधी झाला नाही इतका गोळीबार मोदींचे सरकार आल्यावर झाला.

तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. आधी येत होते पण मोदींनी एकदा सांगितल्यावर फरक पडला हे दिसतंच आहे. पण चांगलं बोलायचंच नसतं तुम्हाला त्याला कोण काय करणार.

Proud

मोदींनी काय सांगितलं आणि काय फरक पडला? मोदींचं राज्य असताना ५६ इंची छाती असताना त्यांची यायची हिंमत झालीच कशी? परत येणारच नाहीत का?
चीनचे सर्वेसर्वा म्हणाले भारत-चीन सीमारेषा नक्की केली पाहिजे. त्याला मोदींनी मम म्हटलं.
म्हणजे ते सैनिक चुकून भारताच्या हद्दीत आले असंच ना? भारताचे सैनिक का नाही जात चुकून चीनच्या हद्दीत?

मला कळत नाही आपण नेहमीच defensive का असतो. म्हणजे पाकिस्तान ने गोळीबार केला तरच आपणही करायचा तोही जपूनच. चीन चे सैन्य आपल्या हद्दीत आले तरच निषेध करायचा व मागे जायवयास सांगायचे. कधीतरी आपणही हि 'चूक' मुद्दामून केलीच पाहिजे त्याशिवाय अक्कल येणार नाही त्यांना. सर्वच नाग विषारी नसले तरी वेळ आल्यास फणा काढतातच. नाहीतर लहान मुलेही ठेचून मारू शकतात हे केंवा कळणार आपल्याला?

चिनी सैनिक आले

मग मोदीनी चिन सरकारला गुजरातेत उद्योग काढायला हो म्हटले.

चिनी सैनिक मागे गेले !

Proud

http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=2918269

Xu Jinping मध्ये दम आहे म्हणताय ना? असेल असेल.>>>
ते Xu नहिये Xi आहे. Wink
दुरदर्शन्च्या निवेदेकिला चांगलच महाग पडलय हे नाव, तिने "Xi Jinping" हे नाव 'eleven Jinping' असं वाचलं.
Wink

आजच्या ठळक बातम्या

१) भारतीय यानाचा प्रथम प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश
२) भाजप - सेना महायुतीचे जागावाटप १२ व्या चर्चेच्या फेरीनंतर अद्याप अनिश्चीत
३) काँग्रेस - राष्ट्रवादीचे चर्चेचे गुर्‍हाळ सुरुच

युती तुटली. आता चौरन्गी सामने रन्गतील. काका-पुतण्याने निश्वास सोडला असेल.

शिवसेना एकटी ( बहुतेक ) आणी भाजपा+ स्वाभीमानी शे. सन्घटना असे दिसतेय.

कुणी येऊ द्या, तसेही ते स्वतःच्या २८ पिढ्यान्ची बेगमी करुन ठेवतील हे निश्चीत आहे.

मासेवाला परत मुख्यमन्त्री न होवो म्हणजे झाले रे बाप्पा.

युती तोडताना जितकी चर्चा केली तेवढीच निकालानंतर परत करतील. दोघांना मिळून बहुमत मिळेलच. मुख्यमंत्री ठरवायला एक वर्ष लागेल. मंत्री ठरवायला चार वर्षे. मज्जाच मज्जा.