२००५ आधीच्या चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्यावे..!!

Submitted by उदयन.. on 22 January, 2014 - 09:16

रिझर्व बँकेने प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की ३१ मार्च २०१४ पुर्वी २००५ पुर्वीच्या सर्व चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्याव्यात... ५ , १० , २०, ५०, १०० , ५०० , १००० या सर्व किंमतींच्या नोटा बँकेतुन बदलुन मिळतील

या बाबत अधिक माहीती साठी

http://rbi.org.in/scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=30458

Banknotes issued prior to 2005 to be withdrawn: RBI Advisory
The Reserve Bank of India has today advised that after March 31, 2014, it will
completely withdraw from circulation all banknotes issued prior to 2005. From April 1,
2014, the public will be required to approach banks for exchanging these notes.
Banks will provide exchange facility for these notes until further communication. The
Reserve Bank further stated that public can easily identify the notes to be withdrawn
as the notes issued before 2005 do not have on them the year of printing on the
reverse side. (Please see illustration below)
The Reserve Bank has also clarified that the notes issued before 2005 will
continue to be legal tender. This would mean that banks are required to exchange
the notes for their customers as well as for non-customers. From July 01, 2014,
however, to exchange more than 10 pieces of `500 and `1000 notes, non-customers
will have to furnish proof of identity and residence to the bank branch in which she/he
wants to exchange the notes.
The Reserve Bank has appealed to the public not to panic. They are
requested to actively co-operate in the withdrawal process.

जुलै १ २०१४ नंतर जर तुम्ही २००५ आधीची नोट बदलायला गेलात तर आपल्याला आपले आयडेंटीफिकेशन द्यावे लागेल....

जर नोटे वर मागिल बाजुस साल लिहिलेले नसेल तर ती नोट २००५ आधीची समजण्यात यावी......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती छान संयमित आयडींचा संयमित चर्चा बीबी आहे?! हे आयडी आहेत का अजून मायबोलीवर? असतील तर त्यांचे आत्ताच आयडी काय आहेत? मला त्यांच्या पोस्ट्स वाचायला आवडतील. काय आहे की हा बीबी ऑलमोस्ट ३ वर्षांपूर्वीचा आहे तेव्हा स्वभावात फरक पडलेला असू शकतो. Happy

>>फक्त मोडस ऑपरंडी गंडलेली आहे.. उद्यापासून ५०० आणी १००० च्या नोटा बंद केल्या जातील असे जेव्हा करतील तेव्हा काळा पैसा दडवून ठेवलेल्यांचे धाबे दणाणतील...>> हिम्सकूल, हे वाचून तुम्ही स्वतःचीच पाठ थोपटून घेतलीत की नाही? काही मंडळी आम्हांला कसं सगळं घडायच्या आधीच कळतं म्हणून मिरवत असतात इथे. तिकडे तुमच्याकडे दुर्लक्षच झालंय.

Only an opthalmologist?

--------

आपल्याकडच्या नोटा बदलायला लोक दुसर्‍याला पकडतील हेही तेव्हाच लिहिलेलं.

आपली बचत वर्षानुवर्षं नोटांमध्येच ठेवणारी असंख्य लोक असतात्, त्यात महिला जास्त प्रमाणात असतात, हे तेव्हा माझ्या ध्यानात नव्हतं, हे कबूल करायला कसलाही अनमान नाही.

पण फक्त २००५ च्या आधीच्या नोटा बदलल्या तरी केवढी तरी पॅनिक निर्माण होणार आहे, हा पब्लिकला हॅरॅस करण्याचा प्रकार आहे म्हणणारे आता काय म्हणताहेत?

>>>> >>फक्त मोडस ऑपरंडी गंडलेली आहे.. उद्यापासून ५०० आणी १००० च्या नोटा बंद केल्या जातील असे जेव्हा करतील तेव्हा काळा पैसा दडवून ठेवलेल्यांचे धाबे दणाणतील...>> हिम्सकूल, हे वाचून तुम्ही स्वतःचीच पाठ थोपटून घेतलीत की नाही? काही मंडळी आम्हांला कसं सगळं घडायच्या आधीच कळतं म्हणून मिरवत असतात इथे. तिकडे तुमच्याकडे दुर्लक्षच झालंय. <<<<<<

सायो, अगदी अगदी, व्हिजन व्हिजन म्हणतात ती हीच बरे...... याच करता तर मोदींना निवडुन दिले ना मी ! Proud

limbutimbu | 23 January, 2014 - 09:55

>>>> मी त्या बँकेत बदलायला घेऊन गेलो की आपसूक त्याची नोंद होण्याची शक्यता आहे <<<<<
३१ मार्च पर्यन्त अशी नोन्द होणे अवघड दिसते. त्यामुले काळा पैसा फ्रीझ करण्याकरताचा उद्देश असेल असे वाटत नाही.
पब्लिकला कुठल्या ना कुठल्या इश्युमधे प्यानिक व्हायला लावण्याचाच हा प्रकार जास्त वाटतो.

अन्यथा, आजवर ब्यान्का, खराब नोटा/चलनी नाणी वगैरे व्यवहारातून काढुन घेतच अस तात. तेव्हा इतका गाजावाजा करुन नेमके काय साध्य करावया चे आहे ते निश्चित होत नसल्याने प्यानिक बनविण्याचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो जसे ग्यास सिलिन्डरच्या अनुदानाबाबत केले गेले आहे.
पब्लिक झुकती है, झुकानेवाला चाहिये बस्स, इतकाच याचा अर्थ.


यात सगळ्यात प्रॉब्लेम होणारे तो ज्यान्नी जीव जीव करुन दहा वीस पन्न्नास रुपड्या साठवल्या असतील, त्या सामान्यान्चाच.
ज्यान्च्याकडे पाचशे/हजारामधला बक्कल पैका आहे, ते कसेही करुन जास्त रकमेच्या अस्लयाने बदलुन घेतिलच, मात्र तीळतीळ करत साठवलेली जीवाची पुन्जी पण रक्कम कमी अशा आडबाजुच्या सामान्य लोकान्चे काय?

limbutimbu | 23 January, 2014 - 12:57

>>>> हल्ली बँकेत खाते उघडणे अतिशय सोप्पे झालेय, आपले पैसे बँकेतुन काढणे हा व्यवहार तर दिवसाच्या २४ तासात कधीही दोन मिनिटात करुन होतो. नाक्यानाक्यावर बँका आणि त्यांच्या एटिएम्स आहेत. घरात पैसे ठेवणे आधीच्यापेक्षा आता जास्त धोकादायक झालेय. अशा वेळी जीव जीव करुन कोण घरात पैसे साठवतोय?? <<<<

तुम्ही माझ्या पोस्ट मधील "आडबाजुच्या" हा शब्द नजरेआड केलेला दिसतोय. व पुणेमुम्बै व निवडक शहरे सोडली, तर महाराष्ट्र/देशात शहरे सोडून बाकी सर्व "आडबाजू" असेच समजले जात असावे असा माझा समज आहे.

शहरी अनुभवान्च्या शहाणपणातून बाहेर पडून खरोखरीची बाह्य परिस्थिती बघितली असता तुमच्या वरील प्रश्नान्ची उत्तरे मिळू शकतील. असो.

माझ्या दृष्टीने पब्लिकला "कामाला" लावण्याकरताचा अजुन एक उद्योग या पेक्षा जास्त महत्व या निर्णयामागे आहे असे वाटत नाही

limbutimbu | 23 January, 2014 - 13:14

>>>>>> आडबाजूला पोस्ट हापिसे असतात. ज्यांची अकाउंट उघडण्याची ऐपत नसते त्यांच्याकडे सेव्हिंग तरी किती कसणार? <<<<<
हो असतात पोस्ट हापिसे, पण दुर्दैवाने, तिथे केलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते, साधे पत्र पाठवले तरी, तेव्हा पोस्टात सेव्हिन्ग करणे हे गावाकडे शक्य नसते, करूही नये, उगाच एखाद दोन अकाऊण्ट्स, त्या एजन्टच्या समाधानाकरता उघडतातही, पण मुख्य बचत रोखीतच असते, रोख किन्वा सोनेनाणे वा जमिन. त्यातिल रोखीची बचत करणारेच जास्त.

>>>>> अशा कितीशा नोटा असतीलं त्या बदलून घ्यायला फार त्रास पडणार नाही. <<<<<< ज्या काही कितीशा अस्तील त्या तुमच्या शहरी वार्षीक लाखो रुपये पगाराच्या आकड्यान्पुढे किस झाडकी पत्ती असल्या तरी त्या त्या परिस्थितीतल्या लोकान्ना ती ती सन्ख्या फार जास्त असते. दुर्दैवाने भारतात परिस्थिती अशी आहे की सचिवालयातल्या एअरकन्डिशन्ड रुममधे बसुन, वर्षाला लाखोन्चे प्याकेज व वरकमाई मिळवित असलेले सरकारी बाबू गरीबीची रेषा ठरविताना मात्र दैनिक २८ रुपड्यान्वर रेषा नेऊन पोहोचवतात, तीच मानसिकता जागोजागी दृगोच्चर होते आहे.

limbutimbu | 23 January, 2014 - 16:37

>>>> असे खरेच वाटते का? <<<<
अगदी बरोबर, पण मग पुढील ४ महिन्यान्ची बदलण्याकरताची विनानोन्दीची मुदत देऊन नेमके काय साध्य करायचे आहे हा प्रश्न आहे. अन त्रास झालाच तर तो त्या अपवादान्नाच होणार आहे असे माझे म्हणणे. म्हणजेच थोडक्यात काय तर गेल्या साली "आधार" झाला, मग ग्यास सिलिन्डर झाले, आता हे नोटान्चे प्रकरण, लक्ष दूसरीकडे वेधण्याच्या प्रकारापलिकडे काहीही नाही असे वाटते.

Proud

लिंब्याचा १५ वा अध्याय झालाय.. ते कुठलेसे झाड असते , त्याची उलटी छाया पडलेली असते म्हणे ... झाड कोण्चे अन बिंब कोण्चे हे साक्षात भगवंतालाही समजेना , तसं लिंब्याला त्याचे २०१४ चे अन १६ चे प्रतिसाद यातले खरे कोणते अन खोटे कोणते समजेना झालय

उर्ध्वमूलं अध शाखं लिंबूवृक्षं प्राहुरव्ययम

>>> उर्ध्वमूलं अध शाखं लिंबूवृक्षं प्राहुरव्ययम <<<< Lol
तुला काय म्हणायचे ते म्हण, पण मी ठाम आहे माझ्या मुद्द्यावर.
तेव्हा ५०० च्या २००५ सालच्या नोटा चलनातुन काढून घेता आल्या असत्या, त्या करता वेगळी मुदत दिली गेली, ती केवळ "काळा पैसा धारकांना" तो पांढरा करुन घेता यावा म्हणूनच या माझ्या तेव्हांच्या मतामध्ये आजही बदल नाही. तसे नसते, तर "बदललेल्या ५०० च्या नोटा, कुणी किती बदलुन घेतल्या यावर चाप लावला असताच, शिवाय राजकारण्यांची कुरणे असलेल्या जिल्हा सहकारि ब्यांकान्ना तेव्हाही आडकाठी केली असती. तसे तेव्हा काहीच झाले नाही.

अन तेव्हाच आमच्यासारख्या काहींना सुचत होते की ५००/१००० पूर्णपणे रद्द व्हाव्यात.
पण काय करणार? तेव्हा मोदी नव्हते ना आलेले निवडून ! Wink
मग आणले त्यांनाच निवडून.....
अन करुन घेतल्या त्यांचेकडून ५००/१००० च्या नोटा रद्द Proud
तुम्ही बसा उर्ध्वमूलः करीत.....

अन तेव्हाच आमच्यासारख्या काहींना सुचत होते की ५००/१००० पूर्णपणे रद्द व्हाव्यात.
<<

गिरे तोभी तंगडी उप्पर.

"आमच्यासारख्या" म्हणे!

“When the president decides something on Monday, he still believes it on Wednesday — no matter what happened Tuesday.”

- Stephen Colbert

ठराविक एक ब्यान्का शुद्ध अन जिल्हा ब्यान्का अशुद्ध असे काही नाही, हे या नोटाबंदीत सिद्ध झालेले आहे.

सध्या घडलेले नव्या नोटांचे सर्वच्या सर्व भ्रष्टाचार हे मोठ्या , नॅशनल लेवल ब्यान्केतूनच झालेले आहेत .. अगदी डायरेक्ट रिजर्व ब्यान्कही काही ठिकाणी आहे.

तरी जिल्हा ब्यान्का, राष्ट्रवादी हे लिंब्याचं बिगुल काही बंद होईना.

>>> तरी जिल्हा ब्यान्का, राष्ट्रवादी हे लिंब्याचं बिगुल काही बंद होईना. <<<
जिल्हा ब्यांकान्ना परवानगी दिली अस्ती, तर मोठ्या , नॅशनल लेवल ब्यान्केच्या गैरव्यवहाराच्या सहस्रपटीने गैरव्यवहार झाले असते! Happy

Pages