जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं तर मी ही सिरियल अगदी डोळ्यासमोर सुरू असते म्हणून पाहते. त्यातल्या त्यात मला गिरिश ओक आणि सुकन्या कुलकर्णीच प्रचंड आवडतात. बाकी शून्य आहेत सगळे. नायिका तर महामूर्ख. अजून तळ्यात मळ्यात करत बसली आहे. जुन्या आदित्यला शोधत नाही, नव्याला सोडत नाही. नुसताच विचार करत बसते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधी असतं का?

नायिका तर महामूर्ख. अजून तळ्यात मळ्यात करत बसली आहे. जुन्या आदित्यला शोधत नाही, नव्याला सोडत नाही. नुसताच विचार करत बसते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधी असतं का?>> प्रचंड अनुमोदन...

जुन्या आदित्यला शोधत नाही, नव्याला सोडत नाही. नुसताच विचार करत बसते.>>>> तेच की... तो सुद्धा माठ हिच्याशी काहीच संपर्क साधत नाही.
ते दोघे व्हॅ.डे.डिनरसाठी जेवायला जातात तेव्हा तिने घातलेला ड्रेस पैठणीचा होता. पण अश्या सुंदर गोष्टींवर फोकस करतच नाहीत. नेहमीच तिचा आंबट रडा चेहरा दाखवत बसतात.

तो जुना आदित्य प्रत्यक्ष काँटॅक्ट न करता त्या बद्धकोश्ठ झालेल्या बेडकाला पाठवत असतो सतत निरोप घेऊन..फोन-बिन तरी करायचा एखादा..

जुन्या आदित्यला शोधत नाही, नव्याला सोडत नाही. नुसताच विचार करत बसते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधी असतं का?>>>> मी काल हेच म्हणत होते घरी.... "पण त्याचा फोन लागत नाही ना . तो कुठेतरी लांब आहे ..." असे उत्तर मिळाले ..डोक बाजुला ठेवुन बघाय्चे तर बघावे हेच खरे Happy

फाईनली नाना-माईला, आदित्य-मेघनात काईतरी गडबड आहे हे जोरात जाणवलय ते बरं झालं..अगदी समर्पक शब्द वापरला, 'उसने अवसान आणल्यासार्खे फिरतात दोघेही घरात"

"पण त्याचा फोन लागत नाही ना . तो कुठेतरी लांब आहे .
मग त्या मित्राला कसे मिळतात याचे निरोप..? हिचा फोन लागत नाही तर त्याचाही नाही लागला पाहिजे.

श्रध्दाळू पब्लिक>> Proud
बाबाजी आठवले आपसूक... ह्या सिरीयलचं टायटल चालू झालं की माझा मुलगा दोक्यावर हात मारून बाबाजी बाबाजी सुरू करतो Happy

देसाई साबासाबू अगदी आदर्श सहजीवन जगताहेत... खरंच यांच्याकडून धडे घ्यायला हवेत २०-२५ वर्षांनंतरचं सहजीवन कसं जगावं तेही सगळ्यांना सांभाळून घेऊन!!

बाबाजीला नाही? मेघनाच्या वडिलांना त्यांच्या बाबाजीनी संकेत दिले आहेत की मेघनाच्या घरात त्यांचा कोणी तरी शत्रू आहे. आणि त्यांना तो सतीश वाटतो आहे. मेघनाचे वडील मात्र डोक फिरवतात. उदय टिकेकर नी काम चांगल केल आहे Happy

मला वाटतय ही शिरेल ९० च्या दशकातील आहे..मोबाईल आहेत पण तेव्हासारख आउट गोईंग , इन कमिंग ला फार चार्ज पडतो...हे आउट गोईंग , इन कमिंग चार्जेस च इतके आहेत तर बाकी अ‍ॅप्स बद्दल बोलण्याचा संबधच येत नाही....म्हणुनच तो तिचा आदित्य शिमला की फिमल्याला आहे तिथुन तो एक साधा कॉल नाही करु शकत की मेसेज नाही पाठवु शकत........
मग बरोबरच आहे न....ते दोघ एकमेकांना संपर्क कशे करतील १९९७ मधला काळ आहे तर....तेव्हा ईतकं सोपं का होत ते??

मग बरोबरच आहे न....ते दोघ एकमेकांना संपर्क कशे करतील १९९७ मधला काळ आहे तर....तेव्हा ईतकं सोपं का होत ते??
>>>>> नाही वाटत १९९७चा काळ .... मेघनाकडे, आदीत्यकडे स्मार्टफोन दाखवले आहेत.

काल, बाबाजींनी मजा आणली , उदय टिकेकर छान काम करतात.

उदय टिकेकर आहेत म्हणून ते बाबाजी बाबाजी कॅरेक्टर अजून सहन करतायत प्रेक्षक. काल मेघना आणि कॉफी शॉपमध्ये का भेटले होते म्हणे? उगिचच? जोक ऐकायला? नटुरे आणि फटुरे? Uhoh

काल मेघना आणि कॉफी शॉपमध्ये का भेटले होते म्हणे? >>> मी मिसला तो भाग... तिला काहीतरी सांगायच असत बहुदा, नक्की माहीत नाही.

आबासाहेब, मुग्धटली, ------^------
......मी मस्करी करत होते......अर्थातच मी उपरोधाने लिहिलय...कारण शिरेल वाले आपल्याला बावळट समजतात.....आणि काही दाखवतात......गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांशी कॉंन्टॅक्ट करत नाही ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे..... नॉन्सेन्स

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांशी कॉंन्टॅक्ट करत नाही ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे..... नॉन्सेन्स>>>> तिचे आता लग्न झाले आहे ना? आ न ने फक्त तिचे लग्न होताना पाहिले आहे, बाकी पुढचे नाटक त्याला माहिती नाहीये, तर तो कसा फोन करेल तिला?
राहता राहिला प्रश्न मेघनाचा. तर ती अगदीच कचखाऊ, आत्मविश्वास नसलेली दाखवली आहे. नुसतीच मुळूमुळू रडणारी. अशी मेघना स्वतःहून कसा फोन करेल आ न ला?

Pages