पुण्यात राहिल्यावर व ट्रॅफिक स्थिती पाहिल्यावर असे दिसून येते की पुण्याला एका चांगल्या, सुलभ आणि वेळेवर प्रवाशांनी ने-आण करणार्या सोयीची खूप गरज आहे. त्यासाठी डीएमआरसी ( दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) ने पुण्याच्या विविध विभागाचा अभ्यास करून खालील पर्याय दिले.
फेज १ ( २०१३ पर्यंत पूर्णत्वास)
लाईन १. वनाज ते रामवाडी. ( नळस्टॉप, डेक्कन, कोर्ट, पुणे स्टेशन ते रामवाडी)
लाईन २. चिंचवड ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज
फेज २ ( २०२१ पर्यंत पूर्णत्वास)
लाईन ३ डेक्कन ते बंड गार्डन
लाईन ४ हिंजवडी ते पुणे विद्यापीठ
हा प्लान २०१० मध्ये पुणे मनपाने तत्वतः मान्य केला. दोन महिन्यांपूर्वी जून २०१२ मध्ये राज्य सरकारने देखील हिरवा कंदील दाखविला
त्यामुळे आता मेट्रो प्रकल्प सुरू होण्यास वाव आहे. पण सध्या मेट्रो वरून की भुयारी हा प्रश्न ऐरणीवर आहे.
मेट्रो साठी २००८ च्या अंदाजानुसार २०० करोड रू प्रति किमी खर्च येईल पण हा खर्च मुख्यतः खालून की वरून ह्यावर जास्त अवलंबून असतो. जर भुयारी मार्ग अवलंबला तर अर्थातच जास्त खर्च येतो पण त्याचे फायदे खूप असतील. राष्ट्रवादी असे म्हणत आहेत की मेट्रो वरून करू. अर्थातच कमी खर्च हे कारण त्यात असेल पण विचार करू जाता मला खालील मुद्दे मांडावे वाटतात.
मेट्रो - रस्त्यावरून फायदे.
१. नागरी सुविधा फायदे फारसे नाहीत. आर्थिक फायदे मात्र भरपूर कारण जाहिरात.
तोटे
१. मेट्रो होईपर्यंत वनाज ते रामवाडी ( ह्यामध्ये वनाज, पूर्ण कर्वे रस्ता - डेक्कन - पुणे स्टे. बंड गार्डन - खराडी ते रामवाडी ह्या पूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक जाम होणार. म्हणजे आधीच रस्ता पुरत नाही, त्यात ही कामाची भर. वर दिलेले सर्वच मार्ग ट्रॅफिक जामचे शिकार होणार. (अर्थात आत्ताही आहेच पण त्यात अजून भर पडेल) म्हणजे पुढची ५ वर्षे ह्या भागात राहणारे लोक वैतागणार. शिवाय हा रस्ता म्हणजे पुण्याची धमनीच म्हणावे लागेल.
२. मेट्रो एकदा आणली की यु आर कमिटेड. मग पुढे एखादा फ्लाय-ओव्हर जरी ह्या रस्त्यावर बांधायचा झाला तरी अशक्य.
३. पार्किंग व्यवस्था. ( पार्क अॅण्ड राईड) अजिबात वाव नाही.
४. मेट्रो स्टेशन पण रोडवरच उभी करावी लागल्यामुळे मुंबईत सध्या जसे दिसते, एका निवासी इमारतीला खेटूनच मेट्रो स्टेशन तसे दिसेल.
५. शहराचा एकुण सौंदर्यात भर पडेल असे वाटत नाही.
मेट्रो - भुयारी
खूप खोल विचार करता असे दिसते की मेट्रो हवीच असेल तर भुयारी मेट्रो हा पर्याय सर्वात चांगला आहे असे वाटते.
१. सध्याच्या ट्रॅफिकला कुठेही धक्का बसत नाही, सर्व काम खूप खोलवर होत राहते.
२. स्टेशन बांधताना कुठल्याही इमारती शेजारी बांधले जात नाही.
३. क्रॉस रोड असले तरी तळमजला -१ वर एक लाईन व तळमजला -२ वर दुसरी लाईन आखणे खूप सोयीचे होईल.
४. अनेक प्रगत देशातील मोठ्या शहरात भुयारी रेल्वेचे जाळे आहे व ते शहर फिरण्यासाठी मारक न ठरता पुरक ठरते.
२००८ मध्ये जी पाहाणी झाली होती ती आज २०१२ मध्ये फारच फोल ठरते. मेट्रो तर हवीच पण ती भुयारी व DMRC ने सुचवलेल्या पेक्षा वेगळ्या मार्गावर असे मला वाटते. २००८ मधील पुणे व आजचे पुणे ह्यात खूप
फरक पडला आहे.
उद्याचे पुणे :
इस्ट पुणे
हडपसर, उंद्री ते पार फुरसुंगी अन डाव्याबाजूला मगरपट्टा, खराडी, धानोरी ते विमानतळ आणि आणखी थोड्या डाव्या बाजूला येरवडा चंदन नगर ते वाघोली असे पुणे वाढले आहे.
वेस्ट पुणे
१०० एकरापेक्षा अधिक प्रोजेक्ट असेल तर त्याचे वर्गीकरण टाऊनशीप मध्ये होते. आता हिंजवडी फेस १ ते ३ मध्ये मोठमोठ्या टाऊनशीप आल्या आहेत. फेज ३ च्या पूर्वेला पुढे जो सध्याच्या २० फुटी रस्ता जातो तिथे
नवा रिंग रोड येणार असल्यामुळे पार रिहे पर्यंत वाढ होणार. रिह्यात आत्ताच जागा ( नॉन एन ए) ३५० ते ४५५ अशी आहे. त्यातच ह्या जागा ४-४०० एकरच्या टाऊनशीप मध्ये असल्यामुळे रिंग रोड अस्तित्वात आल्यावर पुणे तिथपर्यंत वाढणार. हिंजवडीच्या पुढे मुंबईच्या बायपास रस्त्यावर रावेत पर्यंतच्या सर्व स्किम मध्ये गुंतवणूक आहे तर बाय पास ते म्हारुंजी ह्या मधल्या पट्यात लाईफ रिपब्लिक, व्हिलेज, एक्सारबिया अशा २००-२०० एकर्सच्या स्किमस आहेत. तिथून पुढे चांदवड पर्यंत पूर्ण शेत जमीन विकली गेली आहे. नवीन रिंग रोड चांदवड ते पिरंगुट असा असणार आहे. चांदनी चौक - भुगाव - पिरंगुट ह्या पट्यात खूप मोठ्या स्किम्स येत आहेत. व लोक येत्या १० वर्षात तिथे राहायला जाणार. त्यामुळे चांदनी चौक ही जागा खूपच महत्त्वाची (जी आजही आहेच) ठरणार.
चांदखेड-रावेतच्या बाजूला गहुंजे पर्यंत मुंबईचे मोठे बिल्डर्स उदा हिरानंदानी, लोधा, रामा ग्रुप इत्यादींच्या टाऊनशीप होत आहेत. मधल्या पट्यातील हिंजवडी, वाकड, ताथवडे, इथे नव-नवीन स्किम्स रोज येत आहेत. त्यामुळे वेस्ट पुणे ( ग्रेटर पुणे ) हे आता PMRDA मध्ये रुपांतरीत होणार. कालच्या पुण्यापेक्षा ह्या पुण्यात राहणारी लोक तुलनेने थोडी उच्च मध्यमवर्गीयात मोडत असल्यामुळे ट्रॅफिकचा बोजा नव-नवीन कार्स मुळे वाढणार. रोड व नागरी सुविधा ह्यांची योग्य आखणी ही काळाची गरज आहे.
आज रोजी २ ते अडिच लाख वाहनांची भर प्रतिवर्षी पुण्यात पडते. हे सर्व जर टाळायचे असेल तर मेट्रो रूट पण असा हवा की ज्यामुळे वाहनांच्या वापरात घट व्हावी.
मेट्रो संदर्भात ह्या विषयी जनजागृती करणार्या श्री प्रशांत इनामदारांचे म्हणणे पण मला पटते (अर्थात काही अंशी - वरून नको ह्या मताशी सहमत आहे. पण मेट्रो नको हे पटत नाही. ती हवीच.
मेट्रो रूट रामवाडी ते वनाझ : डीएमआरसी ने जो रूट दिला आहे तो देखील मला (व्यक्ती / नागरिक ) म्हणून योग्य वाटत नाही. कारण मेट्रोचा खर्च त्यातून निघणार तर नाही उलट वरून मेट्रो मुळे असून अडचण नसून
खोळंबा होईल असे वाटते. सध्या मुख्य ट्रॅफिक ही कार्सची आहे. हळूहळू घरटी एक कार होणार त्यामुळे चपुढच्या पाच वर्षात ट्रॅफिक आणखीच बिकट होईल, वाढेल.
ह्यासाठी खालील रूटस असावेत असे वाटते.
१. हिंजवडी ते वारजे माळवाडी ( लाईन १ ) (चांदनी चौकात दोन लाईन्स, एक स्टॉप सध्याच्या ओव्हरब्रिज जवळ इथे परत जंक्शन औंधकडे वळणार्या गाड्यांसाठी.)
२. चांदनी चौक ते जुने विमानतळ ( भुसारी - पौड फाटा - कर्वे रोड - डेक्कन, मनपा - पुणे स्टे - मगरपट्टा विमानतळ )
३. मनपा ते सध्याच्या हिंजवडी ओव्हरब्रिज ) मॉडेल कॉलनी, विद्यापीठ, औंध - काळेवाडी फाटा ते ओव्हरब्रीज)
४. स्वारगेट ते कात्रज.
ह्या मेट्रो लाईन्स मुळे होईल काय की सर्व कार ट्रॅफिक कमी होऊन लोक इस्ट ( मगरपट्टा- खराडी) ते वेस्ट (हिंजवडी) असे जोडले जातील त्यामुळे अगदी औंध मध्ये राहणारा व्यक्ती ही मनपा मार्गे परत मगरपट्या पर्यंत रेल्वेने जाऊ शकतो. ते देखील आरामात. शिवाय इस्ट वेस्ट असल्यामुळे ( वनाझ ते रामवाडी हा पण इस्ट वेस्ट मार्ग होता) दिल्ली मेट्रो ने जी सुचना केली ती पण योग्य प्रकारे हाताळता येईल.
मेट्रो सोबतच आणखी एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे सध्या असलेल्या पुणे स्टेशन ते चिंचवड लोकल्सची संख्या वाढवणे. (त्यामुळे ह्या मार्गावर मेट्रोची गरज आहे असे वाटत नाही. कारण लोकल्सचे योग्य नियोजन केले तर खूप मोठा भार हलका होऊ शकतो. )
ह्या शिवाय एक मोठी गरज आहे ती म्हणजे पार्क अॅण्ड राईड योजना अवलंबण्याची व रेल्वेच्या वेळांनुसार बसेसच्या वेळेच्या नियोजनाची. हे सर्व जर झटपट झाले तर आपण पुढच्या काही वर्षात परत एकदा कर्वे रोड ते डेक्कन १० मिनिटात जाऊ शकू. किंवा कोथरूड ते मगरपट्टा हा प्रवास फास्ट मेट्रो ने २० मिनिटांच्या आत होऊ शकेल. ज्याला आज रस्त्याने १ तास सहज लागतो.
फेज १ २०१३ मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे असे दिल्ली मेट्रो म्हणते पण २०१३ उंबरठ्यावर आहे आणि आपण आत्तापर्यंत फक्त होकारा मध्येच अडकलो होतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर एका स्पेशल पर्पज व्हेईकलची निर्मिती करून एक मंडळ लगेच स्थापन केले जावे व त्या मंडळावर मेट्रो लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी द्यावी.
मुंबईच्या वाढीला पूर्व-पश्चिम
मुंबईच्या वाढीला पूर्व-पश्चिम समुद्राची मर्यादा आहे तशी पुण्याला नाही. त्यामुळे जुने पुणे (सिटी पोस्ट, डेक्कन्,स्वार गेट, फर्ग्सन कॉलेज इ.) हा केंद्रप्रदेश धरला तर त्याच्या भोवती चारी बाजूंनी पुणे वर्तुळाकार वाढते आहे. तेव्हा सर्व नव्या उपनगरांतून जाणारा असा एक रिंग रूट व त्याला केंद्रापासून काटकोनात निघणारे परिघस्पर्शी पूरक जोडमार्ग अशी व्यवस्था आदर्श होईल. पुढच्या पन्नास वर्षांचा विचार केला तर सध्याच्या पुण्याला कवेत घेणारा एक व्यापक रिंग रूट बांधणे व्यवहार्य ठरेल. वस्ती सेंट्रीफ्युगल बाहेरच्या बाजूला वाढते आहे या सत्याचा वेळीच विचार व्हायला हवा. रिंग रूटची त्रिज्या लहान ठेवू नये. ती बाणेर, पाषाण-सूस, औंध, वाकड, मगरपट्टा अशा अनेक नव्या वसाहतींना कवेत घेणारी असावी.
कपोचे पण त्यासाठीही
कपोचे
पण त्यासाठीही फ्लायओव्हर बांधणे आवश्यक आहे. मग त्याच फ्लाय ओव्हर वरून मेट्रो का नको?
पुण्याला मेट्रो आवश्यक आहे. पिरिएड. आणि ती ही मुख्यतः कार / दुचाकी वाहनं वापरणार्यांच्या गरजा बघून. नाहीतर पुढच्या ५ वर्षातच पुण्यात दिवसाही प्रदुषनाचं धुकं असेल. पेक्षा पहिली मेट्रो शिवाजीनगर - हिंजवडी दुसरी कोथरुड हिंजवडी अशी हवी. त्यामुळे पुण्याची कार्बन फुटप्रिंट खूप कमी होऊ शकते.
ढच्या पन्नास वर्षांचा विचार केला तर सध्याच्या पुण्याला कवेत घेणारा एक व्यापक रिंग रूट बांधणे व्यवहार्य ठरेल. >>
तो प्लान ऑलरेडी आहे. सध्या पुण्याच्या बाहेरून जाणारा ( मुंबई महामार्ग - फेज ३ - पिरंगुट वगैरे) पण येत्या २० वर्षातच तो पुण्यात येईल.
हा बाफ मी सप्टे २०१२ ला काढला. अजूनही मेट्रो खालून का वरून मध्येच पुणे अडकले आहे. तीन वर्षे झाली. १० वर्षे लागतील बहुदा. तो पर्यंत उशीर होतोय हे कोण लक्षात घेणार?
(No subject)
आजच्या लोकसत्तेतून
आजच्या लोकसत्तेतून
देशातील बहुतांश मेट्रो मार्ग आजही तोटय़ात आहेत. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ साधू न शकलेल्या मेट्रोच्या सद्य:स्थितीचा हा वेध.
1) स्वतचं रस्ता बांधायचा आणि
1) स्वतचं रस्ता बांधायचा आणि स्वतः च बस विकत घेवून प्रवासी वाहतूक चालू करायची ..
कधी तरी हा व्यवसाय फायद्यात येईल का?
२)जेव्हा नवीन टेलिकॉम कंपन्या नी भारतात व्यवसाय चालू केला तेव्हा त्यांनी mtnl, BSNL , ह्यांचे नेटवर्क वापरले, सरकारी उपग्रह वापरले.
स्वतःचेच नेटवर्क तयार केले असते,स्वतचं उपग्रह सोडला असतात तर मला नाही वाटत त्यांना व्यवसायात फायदा झाला असता.
३) पुणे किंवा मुंबई सारख्या शहरात मध्यभागी करोडो ची जागा खरेदी करून किराणा व्यवसाय चालू केला तर तो पहिल्या वर्ष पासून फायद्यात कधीच असणार नाही ..दहा बारा वर्ष जावे लागतील ..त्या पेक्षा भाड्याची जागा घेवून व्यवसाय केला तर लवकर फायदा मिळायला सुरुवात होईल.
मेट्रो च तेच झाले आहे.
स्वतःच मार्ग बनवत आहेत,स्वतचं मेट्रो रेल विकत घेत आहेत आणि स्वतःच चालवत आहेत.
व्यवसाय काय तर प्रवासी वाहतूक .
कसा फायद्यात येईल हा उपक्रम..बस मालक रस्ते स्वतः बनवत नाहीत. त्या मुळे बस शी मेट्रो स्पर्धा च करू शकणार नाही.
ज्या अंतरसाठी बस मालकाला दहा रुपये तिकीट दर परवडेल तो तितक्याच अंतरासाठी मेट्रो व्यवसायाला परवडणार नाही.
स्वतः च ट्रॅक बांधून rail सेवा चालू करणे पण कोणाला परवडणार नाही.
जो पर्यंत त्याची एकधिकर शाही नसेल.
देशातील बहुतांश मेट्रो मार्ग
देशातील बहुतांश मेट्रो मार्ग आजही तोटय़ात आहेत
>>
इतर देशांमधे मेट्रो फायद्यात यायला किती वर्ष लागली होती?
त्या मेट्रो बनवताना मेट्रो प्राधिकरणाला टॉप अथॉरिटी होती का? (दिल्ली मधे होती, मेट्रो च्या ठरलेल्या मार्गात मधे येणारी बांधकामे सरळसोट पाडायचे आदेश अन् त्याची अंमलबजावणी मेट्रो प्राधिकरण करू शकत होतं. तसे अधिकार शीला दीक्षित अन् सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मिळाले होते. निदान बंगलोर मधे तरी अशी परिस्थिती नाही.)
लोकांसाठी एखादी सुविधा सरकार
लोकांसाठी एखादी सुविधा सरकार निर्माण करतं तेव्हा फायदा हे उद्दिष्ट असूच शकत नाही. लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य असतं. पण राजकीय पुढारी त्यांच्या कौशल्यानं कुठलीही सेवा मग ती BEST असो, साखर कारखाने असो , सहकारी बॅंका असो तोट्यात ढकलतात.
लिंकवर क्लिक करून लेख उघडून
लिंकवर क्लिक करून लेख उघडून वाचला का?
प्रकल्प पूर्ण करण्यास लागणारा जास्त वेळ, आणि याशिवाय अन्य कारणाने वाढलेला निर्माण खर्च ही एक बाब झाली. पण अपेक्षित प्रवासी संख्या न मिळणे हेही एक कारण आहे.
दत्तात्रय साळुंके+१.
दत्तात्रय साळुंके+१.
जगात कुठली सा.वा. सेवा फायद्यात आहे का?
Pandemic नंतर तर लोक अजूनही इथे आठवड्यातील बरेच दिवस घरूनच काम करीत आहेत. आमच्या गावातील सावासे अजूनही ५०-५५% लोड वरच चालू आहे.
नव्यासवेमुळे लोक तिकडे येतात, नवे उद्योग येतात, रोजगार येतात, त्यामुळे एकूणच तिथल्या लोकल नगरपालिकेला कर जास्त मिळतो इ. इ. अनेक गोष्टी हे प्रत्यक्ष फायद्यात दिसत नसले तरी अशा अभ्यासात येणे जरुरी आहे. नुसता जमा खर्चाचा ताळेबंद (दिल्ली चं उदाहरण बघता) कधीही फायद्यात येईल कसा?
अर्थात प्रोजेक्तेड क्षमतेपेक्षा लोक इतके कमी कसे आणि का? मार्ग तयार करताना राजकीय अधिक्षेप इ. मुद्देही महत्त्वाचे आहेतच. फक्त ऑपेक्स फायदा असताना कॅपेक्स तोटा करून लेख लिहिणे (परत दिल्लीचा समावेश आहे म्हणून) तितकसं पचलं नाही. बंगलोर फायद्यात आहे लिहून त्याचे आकडे मला दिसले नाहीत, कदाचित माझी नजरचुक असेल पण ते आकडे बघायचे होते.
मेट्रो सेवा तोट्यात आहे
मेट्रो सेवा तोट्यात आहे म्हणजे काय?,
१)रोजचा ऑपरेशन खर्च रोजच्या इन्कम ..
हा हिशोब असेल तर सर्वच मेट्रो सेवा फायद्यात च असणार.
२) infra केलेला खर्च प्लस ऑपरेशन खर्च .
असा हिशोब असेल तर
ह्यांची बेरीज .
आणि
होणार रोज चा व्यवसाय.
हा हिशोब असेल तर सर्व च मेट्रो सेवा सुरवातीची काही वर्ष तोट्यात च असणार .
मेट्रो तोट्यात आहेत म्हणजे काय ह्याचे विश्लेषण मात्र लोकसत्ता नी केले नाही.. मोघम पने मेट्रो तोट्यात आहे असे लीहले आहे
बंगलोर मेट्रो२०१९-२० साठीचे
बंगलोर मेट्रो
२०१९-२० साठीचे रिपोर्ट्स
२०२१-२२
२० १८- १९-२० रेव्हेन्यु फ्रॉम ऑपरेशन्स > ऑपरेटिंग एक्स्पेन्सेस .
२०२१-२२ साठी हे जवळपास सारखे आहेत. ऑपरेटिंग एक्स्पेन्सेस वाढलेले दिसत नाहीत.
अॅक्युम्युलेटेड लॉसेस अदर इक्विटी खाली आहेत.
जगात कुठलीही सा से फायद्यात
जगात कुठलीही सा से फायद्यात नाही हा युक्तीवाद सोयीनुसार वापरला जातो.
हे खरोखर मान्य असतं तर फायद्यातल्या सार्वजनिक सेवा खासगी केल्याच नसत्या.
प्रचंड विरोधाभास.
सरकारी सेवा क्षेत्र खासगी
सरकारी सेवा क्षेत्र खासगी कंपन्या विकत घेतात ह्याचा सरळ अर्थ आहे ह्या सेवा तोट्यात नाहीत.
रघु आचार्य ह्यांनी योग्य पॉइंट मांडला आहे.
BSNL, MTNL,railway, post -courier सेवा,सरकारी.
किती उदाहरणे आहेत.
मेट्रो तोट्यात वैगेरे काही नाही .
त्यांना काही सवलती हव्या आहेत.
१) टॅक्स मध्ये.
२) वीज,पाणी ह्या मध्ये.
३) भाडे ठरवण्याचा पूर्ण हक्क.
आणि ४)आणि खूप महत्वाचं.
मेट्रो मार्गावर बस,टॅक्सी,रिक्षा सेवा न बंदी.
लोकसत्ता तर एजंट आहे .लेख लीहण्यास करोडो घेतले असतील.
मेट्रो आणण्यामागे जनहित हा
मेट्रो आणण्यामागे जनहित हा दाखवण्याचा मुद्दा आहे.
मेट्रो मधे खर्ची पडणार असलेली लाखो कोटीची रक्कम हा कळीचा मुद्दा आहे. जी महानगरे प्रगत आहेत, तिथे मेट्रो उभारणीला जागा नाही. जिथे डिमांड आहे तिथे मेट्रोचे मार्ग सोयीस्कर रित्या उभारायला भूसंपादन हा मुद्दा आहे. नियोजन चुकलेल्या शहरातून मेट्रो नेणे ही सर्व उपाय थकल्याने केलेली शस्त्रक्रिया आहे. जी तात्पुरता आराम देईल.
जिथे मेट्रोची आवश्यकता नाही अशा नागपूर,जयपूर, मथुरा,आग्रा इथे मेट्रोचा हव्यास हा निव्वळ पैसे खर्च करण्याचा शौक म्हणावा लागेल. या शहरात आज मेट्रोच्या नियोजनासाठी जागा ताब्यात घेऊन, त्या प्रमाणे याशहरांचा एकात्मिक विकास कार्यक्रम राबवायला हवा होता. त्यानंतर शहरांचा विकास झाल्यावर त्या गतीला अनुसरून मेट्रो आणायला हवी होती.
पुण्यात कोथरूड, सिंहगड रस्ता अशी उपनगरे अनियंत्रित पद्धतीने विकास पावत असताना रस्त्यासाठीच जागा नव्हती. मेट्रो कुठून बांधणार ?
आज जे उपाय होताहेत ते मलमपट्टी आहेत. म्हणजे मेट्रोचे तिकीट घेतले तर उतरल्यावर पाच किमी साठी ते चालेल इत्यादी. हे कसे करणार ? एव्हढ्या बसेस आजच उपलब्ध नाहीत. नळस्टॉपला पाय ठेवायला जागा नसते एव्हढ्या तुडूंब भरून बसेस येतात. निगडी हून नळस्टॉप वारजे अशी बस भरून येत असेल तर पिंचहून सिवील कोर्ट मागे नळस्टॉप ला उतरून ती बस पकडून वारजेला लटकून जाणे सोयीस्कर कि निगडीहून पिंपरीला बसमधे बसूनच पुढे जाणे सोयीस्कर ?
फिडर बस ही त्या मेट्रोस्थानकातून सुरू होणारी नको का ?
अशा मलमपट्टीने काही तरी करतोय इतकेच दाखवता येते, सोय होत नाही.
(No subject)
उपयुक्त माहिती दिलेली आहे.
उपयुक्त माहिती दिलेली आहे.
रोचक धागा, अतिरोचक चर्चा.
रोचक धागा, अतिरोचक चर्चा.
वाचत आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=1JT_nVDUlzM
वाहतूक कोंडीत अडकल्याने सुप्रिया सुळे यांचा दुचाकीवरून प्रवास.
Pages