[१] सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! : राष्ट्रपतींचा खास अधिकार
लोकसत्ता: १ जून १२ : पान ९ वरील वार्ता :
राष्ट्रपतिंनी आपल्या अधिकारात दया दाखवून ज्यांची फाशी जन्मठेपेत रुपांतरीत केली त्या सत्पुरुषांची [?] बघा ही सत्कृत्ये :
पहिला: पाच वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून नंतर तिला ठार मारणारा!
दुसरा व तिसरा: एकाच कुटुंबातील पाच जणांना सद्गति देणारे दोन सत्पुरुष.
चवथा : निवृत्त ब्रिगेडियरची व त्याच्या कुटुंबियांची हत्त्या करणारा त्यांचाच नोकर !
आता राष्ट्रपतींना दयेचा पाझर फोडण्यात यशस्वी झालेल्यांना या जन्मठेपेतील सत्पुरुषांना दयेचा आणखी पाझर फोडून कैद्यांना मिळणाऱ्या सर्व सुटी मिळवून सहीसलामत बाहेर येणे काही फारसे कठीण नसावे!.
ज्याअर्थी ही प्रकरणे राष्ट्रपतींकडे गेली त्याअर्थी ही सत्कृत्ये (?) त्यांनी केली होती हे सत्य आहे. आणि त्यासाठी फाशी [ जी अगदी अपवादात्मक परिस्थितीतच दिली जाते ] होणे हाच सत्त्याचा खरा विजय आहे.
जोवर या सत्त्याला तपासाकरिता शासनाने व न्यायाकरिता न्यायव्यवस्थेने पाठबळ दिले तोवर ते जिंकत राहिले; पण सत्याच्या विरुद्ध बाजूला अधिक शक्तिशाली पाठबळ उभे राहाताच सत्य पराभूत झाले.
फाशीची शिक्षा झालेल्यांनी आता अगदी निर्धास्त राहावे, जे जे हवे ते ते मिळवावे.
आणि आमीर जी! ’सत्यमेव जयते’ चा व्यवहारातील अर्थ सर्वांनी मिळून तपासायचा का?
>>अश्या फाशीच्या शिक्षा रद्द
>>अश्या फाशीच्या शिक्षा रद्द करणे हे नक्कीच निषेर्धार्थ आहे.मुख्यतः ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. याचा निषेध हा झालाच हवा पण त्याच बरोबर त्या निर्णयाची दुसरी बाजु जाणुन सुध्दा घ्यायला हवी.>>
एकटाच जी,
दुसरी बाजू राष्ट्रपतींनी जाहीर केलेली मला तरी वाचायला मिळाली नाही. पण ती नेमकी माहिती तुम्हाला वा आणखी कोणाला मिळाली असेल तर लिहा कि इथे! काल्पनिक केसेस नको.
>>दामोदरसुत या लेखात काही चुकल्या सारखे झाले. काही तरी मिसिंग वाटत होते.
ते मिसिंग शोधण्यासाठी का होईना, तुम्ही लेख स्वतःच संपूर्ण वाचला असावा. कीप इट अप!
>>किरण मा. दामोदर सुतांच्या मते दोनच स्वातंत्रसैनिक.
१) __________________
२)___________________
बाकीचे माहीतीच नाहीत त्यांना <<
हे मात्र खरे नाही. याशिवायही एक असल्याचे आताच माहित झाले आणि ते आहेत :
अभूतपूर्व, अद्वितीय आणि अतुलनीय असे माननीय, आदरणीय व श्रेष्टतम श्री. एकटाच जी!
@गामा पैलवानजी,
आपण दिलेल्या बहुमोल माहितीबद्द्ल मी आपला ऋणी आहे.
अभूतपूर्व, अद्वितीय आणि
अभूतपूर्व, अद्वितीय आणि अतुलनीय असे माननीय, आदरणीय व श्रेष्टतम श्री. एकटाच जी! >>>>> आता या दिलेल्या उपाधीचा आदर सुध्दा करायला शिका.............की शिकवु ?
गामा आमच्या मते त्या वेळी असणारे प्रत्येक लोक स्वातंत्र्य सेनानी होते. तुमच्यासारखे मुठ भर लोक मानत नाही आम्ही. व्यापक दृष्टीकोन बाळगावा. संकुचित वृत्तीचे लोकांमुळेच इतर लोकांची कुचंबना होते.
स्वातंत्र्यपुर्वकाळात गांधी
स्वातंत्र्यपुर्वकाळात गांधी आणि नेहरुंना मानणारे सर्वजण स्वातंत्र्यसेनानीच म्हणायला हवे, कारण राष्ट्र या एका संकल्पनेसाठी सर्वजण लढत होते. त्याचकाळी काहिंना धर्मराष्ट्राची वांझोटी स्वप्न पडत होती .त्यांचे अनुयायी राष्ट्राऐवजी व्यक्तीपुजा , धार्मिक कर्मकांडे आणि निष्क्रिय क्रांतिकारकांचा(?) अनुनय करण्यात गुंग होते.
सहमत
सहमत
गेला वधस्तंभाकडे कैदी सुखाने
गेला वधस्तंभाकडे कैदी सुखाने शेवटी
ज्याने दिली होती सजा तो आवडाया लागला
( - सुरेश भट यांच्या डंका या गझलेतील एक शेर)
या शेरातील कैदी म्हणजे आम जनता आहे..
>>दामोदरसुत काका नागनाथ
>>दामोदरसुत काका
नागनाथ नायकवडी हे स्वातंत्र्यसैनिक नव्हते हे तुम्ही त्या आयडीस ठणकावून सांगायला हवे होते.<<
किरणजी, हा तुमचा वरील प्रतिसाद वाचला.
नागनाथ नायकवडी हे मला असलेल्या माहितीप्रमाणे एक थोर स्वातंत्र्यसैनिक तर होतेच पण ते एक निष्कलंक समाजसेवकही होते . त्या आयडीनेही तसेच कांही लिहिले होते आणि आम्ही त्या आयडीशी याबाबतीत संपूर्ण सहमतीही नोंदविली होती. आम्हाला जे सांगायचे होते ते आम्ही योग्य शब्दात व्यक्त केले होते. कोणी कोणाला ठणकावून सांगण्याची आवश्यकता नव्हती.
जे मी त्या आय डीस ठणकावून सांगायला हवे होते असे तुम्ही म्हणता आहात ते तुमचे स्वतःचे मत असेल आणि तुम्ही त्या आय डीच्या संपर्कात असाल तर तसला कृतघ्नपणा तुमचा तुम्ही करावा हे आम्ही तुम्हांस ठणकावून सांगत आहोत.
आपल्या प्रतिसादाच्या उतरार्धात आपण ज्या स्कीमच्या [ अपेक्षेप्रमाणे तिचा विपर्यास करून तुम्ही ती मांडली आहे.] प्रगतीबद्दल विचारले आहे तीत तसूभरही प्रगति झाली नाही . त्याचे कारण असे झाले -
देहूक्षेत्री गेलो होतो. जातांना प्रवासात एक हिंदीतील लेख वाचला त्यात हा मजकूर होता :
कबीर ने कहा था:-
“निंदक नियरे राखिए , आँगन कुटीर छ्वाय,
बिन साबुन पानी बिना , निर्मल होय सुहाय “
देहूमध्ये एक भव्य आणि सुंदर गाथामंदिर बांधले आहे. तीत संपूर्ण गाथा संगमरवरावर कोरलेली आहे.
तेथे मंदीर पाहातांना कोणीतरी खालील ओळी मोठ्याने म्हणतांना ऐकले. -
तुम्ही आम्ही काय
बापुडे धरुया थोडी सबुरी
तुका सांगुन गेला
निंदकाचे घर असावे शेजारी.
या योगायोगावर विचार करून मी ती स्कीम सोडून दिली आहे.
काय लिहिलेले आहे ते न वाचताच चर्चा कोठेतरी भरकटत जावी या हेतूने , आय डी चे नाव पाहून दिलेल्या प्रतिसादांची दखल न घेणे माझ्या हाती आहेच.
तेव्हां रामराम!
निंदकाचे घर असावे शेजारी. हे
निंदकाचे घर असावे शेजारी.
हे अॅडमिनना माहीत नसावे बहुदा.. अन्यथा तुम्ही गांधीजींवर टीका करणारे धागे काढले की ते उडाले नसते.
नागनाथ नायकवडी हे मला
नागनाथ नायकवडी हे मला असलेल्या माहितीप्रमाणे एक थोर स्वातंत्र्यसैनिक तर होतेच
अरेच्चा ! मग त्या आयडीने काय चूक केली नायकवडींबद्दल विचारून हे कळेना आता. सिलेक्टिव्ह हुतात्म्यांची लिस्ट आहे असं डिक्लेरेशन असतं तर हा घोटाळा झाला नसता.

@ रच्याकने ज्याअर्थी हा लेख आपण लिहीला आहे त्या अर्थी आपण राष्ट्रपतींचे शेजारी असणार असं वाटतंय
- किरण निंदाफासळी
काय लिहिलेले आहे ते न वाचताच
काय लिहिलेले आहे ते न वाचताच चर्चा कोठेतरी भरकटत जावी या हेतूने , आय डी चे नाव पाहून दिलेल्या प्रतिसादांची दखल न घेणे माझ्या हाती आहेच.
मागे मी हुतात्मा दिनानिमित्त एक लेख (२३ मार्च १२ ला असावा. नंतर तो का डिलीट झाला ते माहीत नाही. ) लिहिला होता त्यावर कोणी 'युरी गागारिन' नामक आय्डीने विचारले ' तुम्हाला अण्णा नायकवडी का नाही आठवले?' कार त्यांनी आण्णांना श्रद्धांजली वाहणारा स्वतंत्र लेख टाकायला हवा होता.त्यांना तसे सुचवले पण त्यांनी तसदी घेतली नाही. असो.ण ते आदल्या रात्री निवर्तले होते असे त्यांना आमच्या आधी कळले होते. आता युरी गागारीन यांना अण्णांबद्दल खुप माहिति होती तर
या लेखाचा आणि या प्रतिसादाचा संबंध जोडणारे एखादे सुभाषित माहीत असेल तर ते ही मज पामरास सांगावे. हा प्रतिसाद कुणी लिहीलाय बरं .. अं अं अं.. आठवतंय का कुणाला

स्वतःचा उल्लेख आदरार्थी
स्वतःचा उल्लेख आदरार्थी बहुवचनी (की नुसताच बहुवचनी - समूह=गट=कंपूवाचक?) करायची कल्पना छान आहे.
युरी गागारिन म्हणजे किरणच
युरी गागारिन म्हणजे किरणच ना?
- युरिनन गागाभट्ट
हाका मारल्या म्हणून तर आलो ना
हाका मारल्या म्हणून तर आलो ना
छान लेख
छान लेख
आत तर " बोंगाली" बाबा आला
आत तर " बोंगाली" बाबा आला आहे राष्ट्रपती म्हणुन
सगळ्याना माफी
कसे पण वागा......
जय हो भारत मात की
आताच esakal मध्ये बातमी
आताच esakal मध्ये बातमी वाचली
प्रतिभा म्यडम नि जावयि शोध लवलाय
http://online2.esakal.com/esakal/20120725/5235673086159788067.htm
"महिलांवरील अत्याचारांची
"महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे अतिशय अस्वस्थ करणारी आहेत. हे अस्वीकारार्ह असून, याला विरोध करायला हवा. सरकार, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्था, यासाठी एकत्रितपणे काम करावे. याप्रकरणी कायदे संमत केले जावेत आणि त्यांचे पुनरावलोकनही व्हायला हवे." ...... हे आजच कसे काय सुचले ?? .. तुम्ही दया दाखवलेल्या आरोपींमध्ये बलात्कार आणि खून करणारे हि आहेत. कायद्याने त्यांना शिक्षा केली होती , तुम्ही ती रद्द केलीत ..... जय हो
उत्तम चर्चा सुरु आहे. मा
उत्तम चर्चा सुरु आहे. मा राष्ट्रपतींच्या अधिकाराच्या संदर्भात दोम महत्वाच्या घटना स्मरतात त्याही मा अब्दुल कलाम यांच्या कारकिर्दीतल्या.
एकदा भाजपाचे ? उ.प्रदेशातले शासन बरखास्त केल्यानंतर ( बहुदा अब्दुल कलामांच्याच काळात ) तेव्हा मा राष्ट्रपतींनी पुनर्विचारचा सल्ला मंत्रिमंडळाला दिला व त्यानंतर ते सरकार पुन्हा बहाल करण्यात आले.
दुसर्या घटनेत सोनीया गांधी यांना घटनेच्या तरतुदीत पंतप्रधान होता येणार नाही हे २००४ साली मा. अब्दुल कलाम सांगायला कचरले नाहीत.
हे तेव्हाच शक्य होते जेव्हा कोणत्याही पक्षाचा जेष्ठ कार्यकर्ता राष्ट्रपती होत नाही. पण हे घडणे अशक्यप्राय आहे. राष्ट्रपतींची निवडणुक जर थेट जनतेतुन झाली तर हे शक्य आहे. अर्थातच रोज सरकार आणि राष्ट्रपती यांचा संघर्ष होणार हा तोटा संभवतो.
सबब सध्याच्या घटनेनुसार जेव्हा पेच प्रसंग असतो तेव्हा राष्ट्रपतींनी ठोस निर्णय घेणे अपेक्षीत आहे.
दिल्लीतील आजची बातमी- "दोन
दिल्लीतील आजची बातमी-
"दोन वर्षांच्या बालिकेवर अत्त्याचार होऊन वर्ष उलटले तरी अत्त्याचार करणार्या तरुणाविरुद्ध काहीच कारवाई झाली नाही म्हणून मुलीच्या पित्याने जाहीर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला."
आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा आहे की नाही त्याची कल्पना नाही. पण असेल तर त्याच्यावर मात्र खटला लगेच भरला जाईल.
त्या बिचार्याला कल्पना नसेल की त्याच्या मुलीवर अत्त्याचार करणार्याने तिला ठार मारले नाही हेच तिचे नशीब (?) म्हणायचे!. त्याने ठार मारूनही त्याला मात्र आपल्या व्यवस्थेच्या दयाबुद्धीमुळे आणि महिलावर्गाच्या एकूण उदासीनतेमुळे नैसर्गिक मरण लाभले असते.
@ नितीनचन्द्र, दोन्ही उदाहरणे
@ नितीनचन्द्र,
दोन्ही उदाहरणे चुकिची....सॉरी.
सहमत @ पलस. नितीनचंद्र,
सहमत @ पलस.
नितीनचंद्र, कमीतकमी पेपर वाचत जा हो...
नीतिनचंद्र अहो इथे
नीतिनचंद्र अहो इथे अंगठेबहाद्दर लोक मायबोली वाचीत नाहीत हो... तुम्हाला राजकारणच करायचे असेल तर इतर बीबी आहेतच की. किंवा'माझी मळमळ' हा स्वतंत्र बीबी काढा....
येथे येण्याचे कारण आहेत :
येथे येण्याचे कारण आहेत : केजरीवाल
राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या आधीपासून केजरीवाल नवनिर्वाचित राष्ट्रपतींवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आले आहेत आणि आताही करीत आहेत. आरोपांच्या चौकशीची मागणी करीत आहेत. शासनाने एकतर चौकशी सुरु करावी वा केजरीवालांवर कारवाई सुरु करावी. पण कांहीच होत नाही.
पुरावे गोळा करायला लागणाऱ्या सर्व सक्षम यंत्रणा शासनाच्या ताब्यात असतांना परिस्थितिजन्य पुराव्याआधारे आरोप करणाऱ्यांना ठोस पुरावे मागणे योग्य आहे का?
हे पहा कांही नवीन चिंतनीय ’फंडा’ज!
(१) निवडणुकीत निवडून आले की ’जनतेने आरोपातून मुक्त केले आहे’ हे वाक्य सर्व नेत्यांकडून आजकाल सरसकट तोंडावर मारले जाते.
हे तत्व जर मान्य केले तर सर्व गोष्टी सोप्या होतील. आरोप कोणताही असो. निवडणूक लढवायला सांगायचे. जिंकला तर दोषमुक्त. हारला तर दोषी. कशाला हवी तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था?
मूळ लेख व त्यावरील प्रतिक्रीया वाचल्या. त्यात खालील सूर दिसून आला. तोही चिंतनीय आहे.
(२) " राष्ट्रपति, पदावर असताना त्यांच्या कृत्याबाबत मतप्रदर्शन करणे, तितकेसे योग्य नाही."
घटनेने अशी कवच कुंडले दिलेली असतात का? हे ’बडिवार माजवणे’ तर नाही ना?
(३) " ज्या पदाचा नुसता उल्लेखही 'महामहिम' म्हटल्याशिवाय होऊ शकत नाही."
हे पाळले जाते असे दिसत नाही. त्याअर्थी असा कांही नियम नसावा.
@बाळू जोशी. >>नीतिनचंद्र अहो
@बाळू जोशी.
>>नीतिनचंद्र अहो इथे अंगठेबहाद्दर लोक मायबोली वाचीत नाहीत हो... तुम्हाला राजकारणच करायचे असेल तर इतर बीबी आहेतच की. किंवा'माझी मळमळ' हा स्वतंत्र बीबी काढा....<<
अगदी यथायोग्य लिहिलेत. आणखी थोडी माहिती देणार?
१. मग वाचायला अंगठेबहाद्दर कोठे जातात?
२. बी बी वरून राजकारण करता येते? अशा बी बींची नावे द्याल का?
३. 'माझी मळमळ' हा स्वतंत्र बीबी राजकारण करणार्यांना लाभतो असा आपला स्वनुभव आहे का?
मायबोलीवर राजकारण करण्याची इच्छा असलेले बरेच जण दिसून येतात. अशांनी मायबोलीला खूप योगदान दिले आहे असा त्यांचा समज आहे. अशांना वरील माहितीचा खूप उपयोग होईल आणि ते लोक आपोआप तिकडे वळतील याकरिता तसदी देत आहे. क्षमस्व!
भाजपा संघप्रेमीनो.... हे
भाजपा संघप्रेमीनो.... हे पहा तुमच्या कारकिर्दीत काय होत आहे ...
गर्भवती पत्नी आणि मुलाला जिवंत जाळून ठार मारणाऱ्या एका इसमाला फाशीची शिक्षा ठोठावण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. फाशीची शिक्षा न्यायपालिकेच्या सुधारणा सिद्धांताच्या विरोधात असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात फाशी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे फाशीच्या शिक्षेविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला न्यायालयाच्या या निर्णयानं बळ मिळालं आहे.
हे प्रकरण रेअरेस्ट रेअर प्रकरणात मोडते. तरीही न्यायालयाने या प्रकरणात वेगळा निर्णय दिला आहे, हे विशेष. शुक्रवारी न्यायाधीश पी.सी. घोष आणि आर.एफ. नरीमन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. देशात मृत्युची शिक्षा ही सर्वात मोठी शिक्षा असल्याचं दिसून आलं आहे आणि ही शिक्षा सुधारणा सिद्धांताच्या विरोधात आहे. पुरावे आणि परिस्थिती पाहता या खटल्यात देहदंडाची शिक्षा ठोठावणे अशक्य असल्याचं मतही न्यायालयानं नोंदवलं आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/sc-spares-noose-for-ma...
कुठे गेले हो ?
कुठे गेले हो ?
भाजपाच्या राज्यात फाशीच्या शिक्षा कोर्टातच रद्द होऊ लागल्या, बिचार्या राष्ट्रपतींना त्रास नको.
वर्ष 2012 मध्ये पुण्याच्या स्वारगेट डेपोची एक बस पळवून तिच्याखाली चिरडून नऊ निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या संतोष मारुती माने या महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाच्या बडतर्फ ड्रायव्हरची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कमी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने संतोष मानेला दिलासा देताना त्याची फाशीची शिक्षा रद्द करताना त्याचं रुपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत केलं आहे.
https://www.loksatta.com/pune-news/pune-santosh-mane-bus-driver-killed-n...
पुरुषोत्तम बोराटे व त्याचा
पुरुषोत्तम बोराटे व त्याचा साथीदार प्रदीप कोकाटे यांनी कार निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर ओढणीने तिची गळा आवळून हत्या करतानाच ओळख पटू नये म्हणून तिचा चेहराही विद्रुप केला होता. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने मार्च-२०१२मध्ये या दोघांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. शिवाय राज्यपाल व राष्ट्रपतींनी त्यांच्या दया याचिकाही फेटाळल्या होत्या. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने यावर्षी १० एप्रिल रोजी वॉरंट काढून २४ जून ही फाशीची तारीख निश्चित केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्याच आधारे आरोपींनी शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठानं या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावरील राखून ठेवलेला निकाल आज जाहीर करण्यात आला. न्यायालयानं दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून तिचे जन्मठेपेत रूपांतर केले. या दोघांना आता ३५ वर्षांची जन्मठेप भोगावी लागणार आहे.
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/pune-bpo-gangrape...
फाशी देण्यास उशीर केला म्हणून फाशी रद्द केली, दामोदरसुतजी आहात का अजून ?
आमच्या काँग्रेसने नथुराम ते कसाब सगळ्यांना लटकावले,
आतंकवाद
आतंकवाद
बेअंत सिंह के हत्यारे बलवंत सिंह राजोआना को आज रिहा किया जा रहा है।
इस आतंकी को आज से बारह साल पहले, पंजाब के मुख्यमंत्री बेअंत सिंह की हत्या के आरोप में फांसी की सज़ा सुनाई गयी थी। बेअंत सिंह और केपीएस गिल के सख्त प्रयासों से पंजाब में आतंकवाद पर काबू पाया गया था। बलवंत सिंह को फांसी की सज़ा 1 अगस्त 2007 को चंडीगढ़ की विशेष सीबीआई अदालत द्वारा फांसी सुनाई थी। वह 22 साल से पटियाला जेल में है। बलवंत सिंह राजोआना की सजा माफ करने के लिए शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी ने राष्ट्रपति के यहां दया याचिका लगाई थी जिसे स्वीकार कर लिया गया।यह उस सरकार का निर्णय है कि, जो आतंकवाद के खिलाफ ज़ीरो टॉलरेंस की बात करती है।
https://www.tv9marathi.com
https://www.tv9marathi.com/national/2012-delhi-gang-rape-case-a-delhi-co...
निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती, पटियाला कोर्टाचा निर्णय
देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी पुन्हा टळली (nirbhaya rape case) आहे. पटियाला कोर्टाकडून फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे.
विनोद राठोड, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली
January 31, 2020 at 5:47 pm
4042 Views
nirbhaya rape case, निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती, पटियाला कोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी पुन्हा टळली (nirbhaya rape case) आहे. दिल्ली कोर्टाने या फाशीवर स्थगिती दिली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. पुढच्या आदेशापर्यंत ही फाशी रद्द करण्यात आली आहे, असे दिल्ली कोर्टाने म्हटलं आहे. दुसऱ्यांदा अशाप्रकारे निर्भया बलात्कारांच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे.
जामसंडेकर यांची २००७ मध्ये
जामसंडेकर यांची २००७ मध्ये त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गवळी, घाटे यांच्यासह अन्य आरोपी शिक्षा भोगत आहेत. ऑगस्ट २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने या सगळयांना जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. घाटे याला १० वर्षांंच्या कारावासाची शिक्षा झाली होती, तर गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
घाटे याने उर्वरित शिक्षेत माफी देण्याच्या मागणीसाठी अॅड्. एन. एन. गवाणकर यांच्यामार्फत याचिका केली आहे. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त २०१८ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने एक विशेष आदेश काढला होता. त्याद्वारे आरोपींची उर्वरित शिक्षा माफ करण्याचे म्हटले होते. घाटे यानेही याच आदेशाचा आधार घेत उर्वरित शिक्षा माफ करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
https://www.loksatta.com/mumbai-news/sunil-ghate-high-court-kamlakar-jam...
अरेरे, ज्या गांधी नावाला विरोध करून हे सत्तेत आले, त्यांचेच नाव घेऊन हे गुन्हेगारांना सोडणार ?
Pages