शिवाजी पार्क, मुम्बई

Submitted by Yogesh_B on 11 August, 2008 - 06:45

शिवाजी पार्क परिसरातील मण्डळीसाठी नवीन गप्पान्चे पान!!

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार
मी माझा नविन व्यवसाय काही महिन्यापुर्वी चालु केला आहे.
माझे सलोन चे नाव ओम्ब्रे द सलोन असे आहे ..
शिवाजि पार्क मधे च आहे ..
लवकरच फेस्टिव ओफर चालु होतील.मी पोस्ट टाकेलच ..
धन्यवाद ..

नमस्कार
मी माझा नविन व्यवसाय काही महिन्यापुर्वी चालु केला आहे.
माझे सलोन चे नाव ओम्ब्रे द सलोन असे आहे ..
शिवाजि पार्क मधे च आहे ..
लवकरच फेस्टिव ओफर चालु होतील.मी पोस्ट टाकेलच ..
धन्यवाद ..

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg

शिवाजी पार्क जवळ रहाणार्‍या लोकांना एक विनंती -
जर कुणाला जमले तर बोले रोडला जाऊन ४२ नंबरच्या घराचे काम पूर्ण झाले आहे का ते सांगाल का? तिथे अजूनहि अर्धवट बांधलेली चाळ आहे की सगळे काम पूर्ण झाले आहे?
अनेक धन्यवाद!

मामी, धन्यवाद.
रानडे रोड वरून दादर स्टेशनकडे जाताना काळे गुरुजी नि राम मारुती मार्ग गेले (वामन हरी पेठे ज्वेलर्स) की अशोक मार्ग लागतो, तिथे उजवीकडे वळावे. तो रस्ता बोले रोडला संपतो. बोले रोडला डावीकडे वळावे. तिथे आशिष हार्डवेअर, राज ग्लास ट्रेडर. नि अ‍ॅड्स्टाईल ईंटेरिअर ही दुकाने जिथे आहेत ते ४२. तिथे आत बांधकाम चालू आहे संपूर्ण झाले हे बघायचे आहे. माझ्या पीसीवर गूगल अर्थमधे नीट दिसत नाही.
वामन हरी पेठे ज्वेलर्स पासून गाडीने २ मिनिटात म्हणतात, पण पायी कदाचित जास्त वेळ लागेल.

मामी निरोप व फोटो पोचले.
अनेक धन्यवाद.
हीच ती जागा - माझे सासरे तिथे रहात असत. गेली निदान २० वर्षे बांधकाम चालू आहे, पूर्ण झाल्यावर तिथे माझ्या सौ. च्या बहिणीचा एक फ्लॅट होईल. तो विकल्यावर त्यांना मोप पैका मिळेल म्हणे! पूर्ण झाला तर एकदा माझी नातवंडे (किंवा त्यांची मुले) जाणार आहेत असा बेत आहे.

बापरे इतकं रखडलंय ते बांधकाम? आता लवकरात लवकर पूर्ण होऊन फ्लॅट ताब्यात येवो. हल्ली शिवाजी पार्क एरीयात सुगी नावाच्या बिल्डरच्या अनेक इमारती धडाधड उभ्या राहतायत. अनेक प्रोजेक्ट्स सुरू आहेत त्यांचे. इमारतीही छान दिसतायत त्यांच्या.

१९९० मधे सासरेबुवांकडून नि इतर भाडेकरूंकडून प्रत्येकी १०,००० रु. घेऊन सांगण्यात आले की की जुनी चाळ पाडून तिथे नविन फ्लॅट्स करू. पण चाळ पडण्यात अनेक अडचणी. कारण पूर्वी तिथे एकत्र कुटुंबात रहाणारे बरेचसे जण दुसरीकडे गेले होते. पण आता नविन फ्लॅट्स झाले तर त्यावर त्यांचा हक्क पोचतो. मग सध्या तिथे रहाणार्‍या भावाला ते सगळे वाटून द्यावे लागले असते, म्हणून तो जायलाच तयार होईना. त्यामुळे २००२ पर्यंत तरी ती चाळ इतक्या मोडकळीला आलेली होती की तिथे रहाणेच काय जाणे पण कठिण. शेवटी ती चाळ थोडी थोडी पाडण्यात आली. बिचारे माझे सासरेबुवा २००२ मधेच स्वर्गवासी झाले, त्यामुळे त्यांच्या रहाण्याचा प्रश्न सुटला. आता फ्लॅट बांधून झाले की लगेच कोट्यवधी रुपयाला विकायचे नि चैनीत रहायचे असा वेत आहे.
माझ्या नातवांच्या नातवांना त्यातले चार दोन रुपये मिळतील.

हल्ली शिवाजी पार्क एरीयात सुगी नावाच्या बिल्डरच्या अनेक इमारती धडाधड उभ्या राहतायत.### आता त्यांचे सुगीचे दिवस संपतील. सरकार बदलले आहे

<<<सरकार बदलले आहे>>>
सरकारचा काय संबंध? कित्येक सरकारे आली नि गेली.
बाकी सरकार म्हणजे काय, पैसे चारले की सगळे आपलेच कुत्रे, आपल्यावर भुंकत नाहीत, हा सर्व जगातल्या सरकारांना लागू पडणारा नियम आहे, भारताचे त्यात काही विशेष नाही.

ते प्रकरण असे आहे - ज्या मालकाने १०००० रु. घेऊन फ्लॅट बांधायचे आश्वासन दिले त्याने एक अडवाणी नावाच्या बाईकडून पैसे कर्जाऊ घेतले. पण भाडेकरू सोडून जायलाच एवढा वेळ लागला की तोपर्यंत चाळ पाडलीहि नाही नि म्हणून नवीन बांधली नाही. मग तो मालक कर्जाउ पैसे परत कसे करणार? मग अडवाणी बाईने कोर्टात फिर्याद केली. कोर्टाने अडवाणी बाईला सांगितले की तुम्ही ती चाळ बांधा, विका नि तुमचे पैसे घ्या. मग जुन्या भाडेकरूंचे काय? त्यांना फुकट फ्लॅट मिळणार होते, त्याचे काय? तर अडवाणी बाई म्हणते जुन्या भाडेकरूंचा नि माझा काय संबंध?
मग भाडेकरूंनीहि प्रकरण कोर्टात नेले.
तर आता अडवाणी बाई म्हणते, बसा बोंबलत, माझ्या मनासारखे होत नसेल तर मी बांधकाम करतच नाही! म्हणजे थोडक्यात भाडेकरूंना पूर्ण चुना लावला. तेहि कायदेशीरपणे कोर्टात जाऊ शकतात -
पण भारतात काय नि अमेरिकेत काय, हा प्रश्न कायद्याचा नसून कोण किती पैसे वकील जज इ. वर खर्च करू शकतात यावर निर्णय होतो. तर भिजत घोंगडे पडले आहे.
अमेरिकेत मी माझ्या वकील मित्राला एक कायद्याबाबत शंका विचारली तो म्हणाला या बाबतीत कायदा नक्की काय हे तू वकीलाला नि न्यायाधीशीला किती पैसे देऊ शकतोस त्यावर अवलंबून आहे. जितके जास्त पैसे देशील, तितका तुला हवा असेल असा कायद्याचा अर्थ लावून देण्याची शक्यता जास्त.

अमेरिकेत असाच एक माणूस आहे - तो लोकांकडून काम करून घेतो. नि पैसे देतच नाही. कोर्टात जा म्हणतो. कोर्टात गेल्यावर त्याचे वकील इतके दिवस खटला चालू ठेवतात की तो पर्यंत बिचारे लोक ज्यांचे पैसे अडकले आहेत ते डॉलरला १० सेंट दराने पैसे घेतात, दिवाळे काढतात. त्याच माणसाने कॅसिनो बांधले, बर्‍याच कंत्राडदारांकडून हजारो लखो डॉलरचे काम करून घेतले नि मग पैसे दिलेच नाहीत. दिवाळे काढून मोकळा झाला. त्याबद्दल लोक म्हणाले काय पण माणूस, कॅसिनो धंदा पण चालवता आला नाही!! तो म्हणाला मला स्वतःला त्याचा फायदा झाला, कॅसिनो कंपनी बुडाली!! तोच माणूस नंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला.
तर कायदा महत्वाचा नाही - पैसे जगात सर्वात महत्वाचे. अमेरिकेत या - बक्कळ पैसे जमवा नि भारतातच काय, कुठेहि जाऊन हवे ते करा.

अनेक हिंदी सिनेमांतून हेच सत्य वारंवार संगितले आहे - सबसे बडा रुपय्या!
लक्ष्मी पूजनाच्या वेळी लक्ष्मीचा प्रभाव सांगणारी गोष्ट सांगतात, त्यात या गोष्टी समाविष्ट करायला पाहिजेत.