" मी तुला भाऊ मानते " ...... ह्या वाक्याने प्रेमाचा शेवट झालेल्या सर्व भावांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा
मित्रहो ! हां अनुभव बहुतांश तरुणांनी आपल्या कॉलेज तसेच शालेय जीवनात अनुभवलेला असतो (अस्मादिकांनी ह्यास अपवाद मानण्याचा प्रश्न उद्भवणार नाही हे खात्रीपूर्वक सांगतो )आणि त्या क्षणी मात्र आपल्या मनाचा प्रचंड हिरमोड झाल्याने आपला देवदास नाही तर किमान उदास नक्कीच झालेला असतो.
अश्या काही ठळक आठवणी पुढे काही काळानंतर / वर्षा नंतर स्वत:लांच खूप हसु आणतात. आणि आपण आपल्या (प्रेम)वेडेपणावर तसेच झालेल्या फजीतीवरसुद्धा जीवनात फार गंभीर नसतो; कारण हां त्या विविक्षित वयोमर्यादेचा अनाहूत आकर्षणाचा फ़ार्स असतो हे आता ह्या वयात कळू लागलेले असते...
असे कळून गेलेल्या आणि अनुभव शेअर करु इच्छिणाऱ्या मुलांनी (आता प्रौढ़ किंवा तारुण्याच्या उतरणीस लागलेले तेव्हा boys ह्या केटेगरीत असणार आणि आज पुन्हा त्या आठवणींना उजाळा देताना तेव्हढेच young होणार ह्या अर्थाने मुलांनी संबोधले ) आपले अनाहूत पणे घडलेले रक्षाबंधनाचे किस्से ईथे सांगितले तर !!
तळ टिप एवं संवैधानिक ईशारा -
कृपया यह धागा जले पे नमक छिड़कने वाला साबित हो सके ऐसे व्यक्तियोंसे अनुरोध है की इस विषय एवं धागेसे दूर रहे ।
(थोडक्यात म्हणजे ताज्या अनुभव असणाऱ्यांसाठी लेखक दिलगीर आहे तरी बाकीच्यांनी शेअर करावे ह्याकरिता हां धागा )
धागा धमाल आहे.
धागा धमाल आहे.
Pages