तुम्ही दमा कसा कंट्रोल केलात ?

Submitted by दिपक_१० on 20 September, 2019 - 01:06

तुम्ही स्वतः ज्या गोष्टी केल्यात आणि ज्याचा फायदा झाला अशा गोष्टी share कराल का

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दमा नाहीए पण श्वास लागतो बर्याचदा. डायफ्रॅमिक ब्रिदींग करतो,श्वास खोल आत घेण्याबरोबरच उच्छ्वासही पुर्ण करतो total expulsion of air out of lungs. श्वास लागल्यानंतर बसावे ,झोपू नये. इनहेलर जवळ बाळगावा,ॲलर्जीक ट्रिगर्स टाळावेत ,थंडीत विशेष काळजी घ्या कारण फुफ्फूसाच्या नळ्या गार हवेने आकुंचन पावतात व दम्याचा ॲटॅक सिव्हीयर येतो.

हो, मी केला होता प्राणायाम. सलग 3 ते 4 महिने अनुलोम विलोम 15 मिनिटे आणि दीर्घ श्वसन 15 मिनिटे केलं तर दम लागणे हा प्रकार कमी होतो. पंप दिवसातून 2 वेला असेल तर फक्त एकदा घेतला तरी बास होतो. पहाटे त्रास होत असेल तर तो होत नाही. पण हे सगळं रोज अर्धा तास प्राणायाम निष्ठेने केला तरच फायदा होतो तो ही काही महिन्यानंतर. एकदा त्रास कमी झाला की आपण पण आळशी होतो आणि प्राणायाम कमी करत हळूहळू बंद पडतो. परत ये रे माझ्या मागल्या.

मिपावरील डॉक्टर श्रीहास हे दमा आजाराचे स्पेशालिस्ट आहेत. त्यांची माझ्या रुग्णांविषयी अशी काहीतरी लेखमालिका आहे. खूप रुग्ण त्यांना देवासारखे मानतात.

सर्वांना धन्यवाद !

सर्वांना धन्यवाद !

अमर - मी तो लेख वाचला , दम्यावर दोनच लेख आहेत , बाकीची मालिका हि त्यांना भेटलेले रुग्ण ह्यावर आहे
आवर्जून लिंक पाठवल्या बद्दल धन्यवाद !

ह्या धाग्यावर अजून काही टिप्स येतील आणि बाकीच्या लोकांना पण फायदा होईल अशी अपेक्षा करतो

उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे आभार !
ह्या प्रश्नाला अजून खूप रिस्पॉन्स येईल असे वाटले होते कारण प्रदूषण मुले हल्ली हा त्रास वाढला आहे पण त्या मानाने कमी रिस्पॉन्स आले , ह्याचे काय कारण असू शकेल ?

दम्याचे माहीत नाही पण क्रॉनिक खोकला सर्दीवर नेती हा रामबाण उपाय आहे. माझ्या ओळखीतील एक व्यक्ती अनेक वर्षे आजारग्रस्त होती. पण नेतीमुळे बरी झाली.
पण नेती करताना पाणी खळखळा उकळून, गार करुन मगच करा. किंवा एक सोल्युशन मिळते. कारण दूषित पाण्याने मेंदूला सूज येऊ शकते.

काही सामान्य उपाय असतात यावर लोक विश्वास ठेवू लागलेत ही एक चांगली गोष्ट झाली.
-–--------
दमा आणि दम लागणे श्वासाचे रोग आहेत असं दिसतं. म्हणजे श्वासावरचा परिणाम. काही दमा लागणारे लोक सांगतात की आमच्या घरात/घराण्यात दमा आहे. एक औषध भरलेला पंप जवळ ठेवतात. दमा वाढतोय वाटलं की पंपाने ते औषध घशात फवारतात. पाचसहा तास बरं वाटतं.

एकदा शाळेत असताना नववी/दहावीत वगैरे अचानक दमा सुरू झाला. (अगोदर खोकला होता व त्यासाठी डॉक्टरचे औषध घेत होतो.) मग त्यांनी कसले इंजेक्शन दिल्यावर दम थांबला. दुसरे दिवशी पुन्हा सुरू.
आयुर्वेदिक दवाखाना जवळच होता. तिकडे गेलो. त्यांनी त्रिकटु चूर्ण मधात चाटायला सांगितले. गुण आला. त्यांना विचारले "असे का झाले?"
"कफ बाहेर पडणारा खोकला दाबून टाकणारी औषधे घेतली की दमा होतो. कफ प्रथम बाहेर पडावा लागतो. "
------
नंतर वाचन केल्यावर समजले की अशुद्ध हवेने छातीत गेलेली धूळ बाहेर पडावी यासाठी सुटणारा कफ ही शरीराची योजना आहे. किंवा त्या हवेने छातीत त्रास होऊ नये म्हणून चिकट पदार्थाने झाकले जाते. त्या ठिकाणाहून दूर जाणे अपेक्षित असताना शहरी रुग्ण तिथेच राहतो. रोगात फरक पडत नाही.
---------
परंतू स्वस्त उपायांवर विश्वास न ठेवणे आणि त्वरित फरक दाखवणारे औषध घेणे ही आता चाल आहे.
-----------
शरीरशास्त्रानुसार डाइफ्राम नावाचा जो पडदा छाती आणि पोटाच्या मध्ये असतो तो व्यवस्थितपणे न हालण्यानेही दीर्घ श्वास घेता येत नाही. त्या पडद्याच्या वर खाली होण्यास विरोध करण्यास पोटातील ग्यासेसही कारण असतात.
------------------------
उंचावर थंड हवेच्या ठिकाणी दम लागतो तो कमी आक्सीजन असलेल्या विरळ हवेने. नेपाळच्या डोंगरांत वगैरे. पण त्याचे औषध तिथेच उगवणाऱ्या एका गवताच्या पानांत असते. पाने हातावर चोळून रस येतो तो चाटतात. त्यात थोडेसे अट्रोपिन द्रव्य असते त्याने काही तास { वायूनलिका प्रसरण पावून जास्ती हवा घेतली जाण्याने} बरे वाटते. तिकडचे खत्री लोक इथे मुंबईत आहेत ते सांगतात. पण इथे त्याची गरज पडत नाही.
-----------
((सूचना : प्रतिसादातील लिहिलेले उपाय/मते शिफारस नसून वैद्यकीय सल्ला आणि औषधे घेणे.))

डॉक्टर नसेल तिथे# या नावाच्या पुस्तकांत बरीच माहिती आहे. खोकला झाल्यावर कोमट पाण्याच्या गुळण्या, वाफारा अवश्य घेत राहावा.

#- सध्या हे पुस्तक फक्त वाचनालयात असते.

दादर पश्चिम येथे नवनीत पब्लिकेशन आहे शारदाश्रम विद्यामंदिर च्या समोर. त्यांच्याकडे दम्यासाठी औषधी वनस्पतीची पाने मिळतात. तीन दिवस प्रत्येकी एक अशी मात्रा आहे. सकाळी रिकाम्या पोटी चावून खायची असतात. 10 दिवस तेलकट , आंबट अजिबात खायचे नाही. शक्यतो मऊ भात, वरण भात, फोडणीविना भाज्या, सलाड असे पथ्य आहे. हि पाने घेतल्यावर जर छातीत कफ असेल तर त्या तीन दिवसात उलट्या होऊन कफ पूर्णपणे पडून जातो वर छाती मोकळी होते. महिन्यातून एकदा असे सलग तीन महिने आणि असे वर्षातून एकदा अशी 3-4 वर्षे माझ्या आईने ही पाने घेतली आणि तिचा 20 वर्ष जुना दमा 80% बरा झालाय. तिला कोरेक्स सिरप आणि asthalin inhaler लागायचा तोही बंद झालाय. गेली 7-8 वर्ष कुठलाही त्रास नाही. खाण्यापिण्याचे पथ्य ती नीट पाळते. आंबट शक्यतो वर्ज्य आहे. बाकी सगळे खाते. माझ्या भावाला ही जन्मापासून दमा होता. त्याला आम्ही ही पाने 12 व्या वर्षी सलग तीन महिने दिली. त्यानंतर त्याला कधीही त्रास झाला नाही. लहान वयात जास्त चांगला उपयोग झाला.

तळ टिप -

हि जाहिरात नाही. वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे.

ह्या प्रश्नाला अजून खूप रिस्पॉन्स येईल असे वाटले होते कारण प्रदूषण मुले हल्ली हा त्रास वाढला आहे पण त्या मानाने कमी रिस्पॉन्स आले , ह्याचे काय कारण असू शकेल ? >>+++१११११