Submitted by राजेंद्र देवी on 6 June, 2019 - 22:53
मुक्ती
चंदनापरी झिजलो मी
सुगन्ध कधी दरवळला नाही
खूप वेडे वाकडे चाललो मी
परी, रस्ता कधी वळला नाही
ध्येय उचित होते,
पुण्य पण संचित होते,
प्रारब्धाला कळले नाही
वांछिल ते लाभले पण
वेगळे काहि मिळले नाही
सुख चोहोबाजूंनी धावून आले
दुःखाला वाट मिळाली नाही
मुक्ती साठी तळमळे आत्मा
परमात्मा अजुन भेटत नाही
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच...
मस्तच...
धन्यवाद
धन्यवाद
सुख
सुख
चोहोबाजुंनी
धावून आले
पण
दुखःला वाट
मिळाली
नाही>>> सुरेख!
धन्यवाद
धन्यवाद