Submitted by अज्ञातवासी on 15 June, 2019 - 03:04
ते प्रेम खरं होतं,
पण जवळी तुला घेताना,
दिसायचा अविश्वास डोळ्यात!
तो अविश्वास खरा होता?
न सांगता समजायचं सगळं,
कुशीत मिळायचं सुख वेगळं,
जग होतं तुझ्या बाहुपाशात,
ते जग खरं होतं?
संवादात तुझ्याशी,
देह काळाचे नव्हते भान,
त्या संवादाचीच तहान,
ती तहान खरी होती?
नव्हतं जुनं, नव्हतं नवं,
होती त्याला वेगळीच चव,
पहिल वहील, सुखात न्हालेलं,
ते प्रेम खरं होतं?
खरं की खोटं माहीत नाही,
एक क्षण जाता जात नाही,
प्रत्येक क्षणात जीवघेणी कळ,
हृदयाला घोर, प्रेमाग्नीत जळ!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
आवडली कविता.. खुप सुंदर..
आवडली कविता..
आवडेश
आवडेश
Chan
Chan
अज्ञातवासी आवडली रे!
अज्ञातवासी आवडली रे!
(
बादवे कुणासाठी लिहिलंयछानच!
छानच!
अरे व्वा!
अरे व्वा!
मस्तच लिहिलीये कविता .. पु.क.शु.
कविता छानच आहे.
कविता छानच आहे.