चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डॉ. जितेंद्र अव्हाड ... तो इशरतचा भाऊ का ?
Submitted by उनाडटप्पू on 4 April, 2019 - 15:13 >> बघा.. विचारतंय कोण.. नथुराम गोडश्याचा नातु..!! Biggrin

त्या पेक्षा तुमच्या नजरेने थापा मारत असलेला नेता कणखर आहे हवी तशी सत्ता चालवून स्थिर सरकार देवू शकतो.
मग कशाला मत वाया जावून द्यायचे अस्थिर सरकार साठी
नवीन Submitted by Rajesh188 on 5 April, 2019 - 12:35
<<

रा'फूल' गांधी उर्फ पप्पूच्या भाटांना असले काही सांगून त्यांच्यावर काहिच फरक पडणार नाही कारण त्यांची आकलन क्षमता रा'फूल' गांधी उर्फ पप्पूच्या गांधीच्या आकलन क्षमते ऐवढीच आहे. Proud

अख्खा देश अस्थिर करून टाकला यांच्या स्थिर सरकारने.
Submitted by भरत. on 5 April, 2019 - 12:53

<<

२०१४ पासून तुमचा व तुमच्या ठेवणीतील गॅंगचा जो थयथयाट इथे सुरु आहे त्यावरुन कोण अस्थिर झालेय ते सर्वांना कळून चुकले आहे. Lol
--

दात काढणाऱ्या ने कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबद्दल सांगितलेल्या गोष्टींच्या लिंका अजूनही दिलेल्या नाहीत.
<<

कश्याला लिंका द्यायच्या ?
त्या रा'फूल' उर्फ पप्पू गांधीच्या जाहिरनाम्याची लायकी काय आहे ?

तो जाहीरनामा आल्यापासून मोदींंपासून तुमच्यापर्यंत सगळ्यांचा जो थयथयाट चालू आहे, त्यावरूनच कळतेय की त्याची लायकी.

जाहीरनाम्यात अशा अशा गोष्टी आहेत , हे सांगताना त्याची लायकी वेगळी होती का?

श्या! यांच्याकडे धड वाद घालायलापण लोक नाहीत.

खरंय, ह्या मंदारांना (मंद चौकीदार) आपण काय बोलतोय हेच कळत नाहीये. Foot in mouth चा रोग जडलाय.

खरंय, ह्या मंदारांना (मंद चौकीदार) आपण काय बोलतोय हेच कळत नाहीये. Foot in mouth चा रोग जडलाय.
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 5 April, 2019 - 13:59
<<

तुमचा तो फोक अजून "ओला" आहे सुकला ? Lol

रा'फुल' उर्फ पप्पू गांधीच्या कॉंग्रेसने त्यांच्या दहा वर्षाच्या सत्ताकाळात लाखो-करोडोचे घोटाळे व भ्रष्टाचार करुन सर्वसामन्य भारतीय जनतेचे पैसे लुटून स्विस बॅंकेत ठेवले होते त्याचे व्याज बहुतेक आता रा'फुल' उर्फ पप्पू गांधीला मिळू लागले आहे. म्हणूनच बांग्लादेशी व रोहिंग्या घूसखोरांना त्यांने ७२००० दरवर्षी मिळतील अशी घोषणा केली आहे.

राजीव गांधी सारख्या सभ्य व्यक्तीला चुकीचा सल्ला देणारे इरसाल कॉंग्रेस चे नेतेच होते .
आता राहुल गांधीना मनापासून मदत नाही करणार जुनी खोड
त्या पेक्षा त्यानी विरोधी पक्षा चीच भूमिका उत्तम पार पाडवी

थोडक्यात शांतताप्रियांची चाटून पोट भरलेले नाही....अजून चाटणार.

फुकट्यांना ७२००० हजाराचे गाजर दाखवले.

अमेठीतून थोबाड फुटण्याची शक्यता दिसल्यावर ५६% मुस्लिम+ख्रिश्चन असलेल्या मतदारसंघात उभे राहण्याचा "प्रामाणिकपणा" फारच थोड्या लोकांना जमेल.

गोचीडी सारख्या NGO ला संरक्षण दिले.

धर्मप्रसाराचे उघड उघड बाहेरून येणारा पैसा कोडगेपणाने स्वीकारला......कारण ??
सोनियाला मुळातच हिंदूंचा तिटकारा आहे.....व्हेटिकन च्या प्रभावाखाली निर्णय घेतले.

आपल्या इथले निष्ठावंत तिचे आणि तिच्या पोराचे-पोरीचे पाय
धुवून पाणी पिण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता मानणार.

कॉंग्रेस मध्ये दुसरे नेते नाहीत का ?? मंदबुद्धी पप्या स्वतःचा नेता वाटावा हे बौद्धिक दिवाळखोरी चे लक्षण.

युवा युवा च्या बोंबा ठणका लागल्यासारख्या हाणत असतो,

मध्य प्रदेशात आणि राजस्थानात expire date ही उलटून गेलेल्या कमलनाथ आणि गेलहोतांना आणले.

ज्योतिरादित्य शिंदे आणि साचिन पायलट यांना जाणूनबुजून मुख्यमंत्रीपद दिले नाही.
कारण ?? त्यांनी काहीतरी काम केले तर याची उरलीसुरली अब्रुही कॉंग्रेस चे कार्यकर्तेच लुटून नेणार.

खाजगीत कॉंग्रेस कार्यकर्ते काय बोलतात ते ही सांगणे हे "प्रामाणिकपणाचे" लक्षण ठरते.

हे पण सांगणे योग्य ठरेल की २००४ ते २०१४ पर्यंत याचा किती प्रछन्न वापर कॉंग्रेस नेच केला.
एकदा तर एकाच वेळी जवळपास ९००० जणांवर हे चार्जेस लावले.......कारण ?? काँग्रेसी सरकार विरुद्ध आंदोलन केले.

https://www.sundayguardianlive.com/news/congress-grossly-misused-seditio...

आता १२४ अ मागे घेण्याचे आश्वासन म्हणजे आख्ख्या गावाला शरीराची उब दिल्यावर एखाद्या बाजारबसवीने गरत्या बाईचा आव आणण्यासारखे आहे.

पप्याची नियत तशीच आहे.....पण स्वतःचा काहीतरी कणा आहे असे वाटणाऱ्यांनी या बाजारबसवेपणाला विरोध करावा.

@ अनिरुद्ध

कॉंग्रेस मध्ये राहून पप्या ला विरोध करणे म्हणजे उरलेसुरली राजकीय कारकिर्द धोक्यात घालणे.

म्हणून पप्या जो म्हणतो त्याला नंदीबैलासारखी मान डोलवावीच लागते.

हे असे विचार पक्षनिष्ठे वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

त्यामुळे नको रे बाबा असले विचार !!

कॉंग्रेस मध्ये हे असले विचार जाहीर करणे म्हणजे चर्च ने गॕलिलिओची जी अवस्था केली ती करुन घेण्यासारखे!!

त्यापेक्षा सुर्य पुर्थीभोवती फिरतो.....म्हणजेच राहुल गांधी आमचा नेता आहे हे म्हणने हुशारीचे लक्षण !!

त्यामुळे इथले रुग्ण बरे होतील अशी अशा करणेच हातात आहे आपल्या

Are godshya. Tu swatha jaun Modi la vichar na. Ithe kashalya barlat baslayes.

पचास करोड की गर्लफ्रे़ड , कॉंग्रेस की विधवा पासून ते हा वरचा प्रतिसाद, बलात्काराच्या धमक्या देणारे पाठीराखे, असल्या माणसाला आणि पक्षाला स्त्री आयडी कशा काय पाठिंबा देतात, ते त्याच जाणोत.

गुरुजी , तुमच्या मांडीवर तर नाही बसलो ना? अजुन खाजवून खरू काढायची सवय गेली नाही वाटतं?

पचास करोड की गर्लफ्रे़ड , कॉंग्रेस की विधवा पासून ते हा वरचा प्रतिसाद, बलात्काराच्या धमक्या देणारे पाठीराखे, असल्या माणसाला आणि पक्षाला स्त्री आयडी कशा काय पाठिंबा देतात, ते त्याच जाणोत.>>>>>> भरत , काँग्रेस पक्षाने राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या व्यतीरीक्त माणुस आपला नेता , म्हणजे पंत प्रधान पदासाठीचा उमेदवार म्हणून जाहीर करावा. त्या व्यक्तीला निवडण्यासाठी जी प्रक्रिया असेल त्यात या गांधी घराण्याचा कोणताही हात नसावा, त्यांना त्यात ढवळाढवळ करण्याचाही कोणताही अधिकार नसावा. असा माणुस आम्ही उमेदवार म्हणून जाहीर करत आहोत हे ज्या क्षणी काँग्रेस जाहीर करेल त्या दुसर्‍या क्षणाला माझा व घरच्यांचा त्याला पाठिंबा असेल.

कॉग्रेस मध्ये गुणवंतांची कमी नाहीये, तर उलट त्यांना पुढे येऊच दिले जात नाहीये ही बोंब आहे आणी ती खरी आहे. सचीन पायलट, ज्योतिरादीत्य शिंदे, मिलिंद देवरा असे अनेक गुणवान तरुण आहेत. त्यांचा अभ्यास उत्तम आहे, ते मनमोकळे आहेत. उलट तुमच्या राहुललाच काही येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आजचा पेपर व टिव्हीवर बघीतले की ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मिशेलने जी नावे घेतलीत ती या माय लेकराशी मिळतीजुळती आहेत. आता कृपया काही झाकु नका. मी स्पष्ट म्हणेन की भाजपा असो वा काँग्रेस, ज्या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहीजे. उलट राष्ट्रवादीच्या मानाने काँग्रेस आणी भाजपात कमी गुन्हेगार आहेत.

महाराष्ट्रात राष्टवादी निवडुन आली तर त्यांचे सगळे घोटाळे ते दाबुन टाकतील. मग ते इरीगेशन असो वा आणखीन काही जमिन मामले.

मी मागे विचारले होते की अमेठी व रायबरेलीचा किती विकास झाला, त्यावर कोणी काहीच उत्तर दिले नाही. आणी तुमचा राहुल गेले १० वर्षापासुनचा तिथला खासदार आहे, पण अजून त्याने स्वतः त्याच्या निधीतुन काही केलेच नाही आणी फुकट केंद्र सरकारच्या नावाने ठणाणा करतोय. तरी बरे २०१४ पूर्वी याच्याच मम्माचे राज्य होते.

५००

{उलट तुमच्या राहुललाच काही येत नाही ही वस्तुस्थिती आहे. }

हे आणि नोटाबंदीचा उद्देश चांगला होता, अंमलबजावणी फसली ही दोन्ही वाक्य सारखीच आहेत.

वर कंसात लिहिलंय ते तुमचं मत .

माझा प्रश्न स्त्री आयडीज्नना या गोष्टी, वरचा एक प्रतिसाद का खटकत नाहीत?

काँग्रेस पक्षाने राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या व्यतीरीक्त माणुस आपला नेता , म्हणजे पंत प्रधान पदासाठीचा उमेदवार म्हणून जाहीर करावा. >> भारतात लोकशाही आहे. पंतप्रधान कोण करायचा हे बहुमताने निवडुन आलेल्या पक्षाच्या खासदारांनी ठरवयचे असते. नागरीकशास्त्रात असेच लिहिले आहे. Proud

त्या व्यक्तीला निवडण्यासाठी जी प्रक्रिया असेल त्यात या गांधी घराण्याचा कोणताही हात नसावा, त्यांना त्यात ढवळाढवळ करण्याचाही कोणताही अधिकार नसावा. असा माणुस आम्ही उमेदवार म्हणून जाहीर करत आहोत हे ज्या क्षणी काँग्रेस जाहीर करेल त्या दुसर्‍या क्षणाला माझा व घरच्यांचा त्याला पाठिंबा असेल.>> पक्षाचा अध्यक्ष, लोकसभा नेता ठरवण्याचा हक्क त्या-त्या पक्षातील सदस्यांना आहे कुणा एकाच्या घराला/व्यक्तीला नाही. Proud

कॉग्रेस मध्ये गुणवंतांची कमी नाहीये, तर उलट त्यांना पुढे येऊच दिले जात नाहीये ही बोंब आहे आणी ती खरी आहे. >> मला आवडतो म्हणुन अडवाणीला भाजप पुढे येऊ देत नाही असे म्हणण्यासारखेच आहे हे..! Proud

सचीन पायलट, ज्योतिरादीत्य शिंदे, मिलिंद देवरा असे अनेक गुणवान तरुण आहेत. त्यांचा अभ्यास उत्तम आहे, ते मनमोकळे आहेत. उलट तुमच्या राहुललाच काही येत नाही ही वस्तुस्थिती आहे.>> अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, सुब्रमणियम स्वामी, सुषमा स्वराज, नितिन गडकरी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा ई.ई. कितीतरी अभ्यासु गुणवान नेत्यांना संधी देण्याऐवजी मोदीला काहीच येत नाही ही वस्तुस्थिती नव्हे काय..?? Proud

आजचा पेपर व टिव्हीवर बघीतले की ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मिशेलने जी नावे घेतलीत ती या माय लेकराशी मिळतीजुळती आहेत.>> शाखेतुन आलेली नावे वाचुन मिळती-जुळती आहे की नाही ठरवण्यापेक्षा न्यायालयात जाऊन न्यायदेवतेच्या शब्दांवर विश्वास ठेवणेच श्रेयस्कर नव्हे काय..?? Proud

आता कृपया काही झाकु नका. मी स्पष्ट म्हणेन की भाजपा असो वा काँग्रेस, ज्या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहीजे. >> या लोकसभा ईलेक्षन मधे मोदीला शिक्षा द्यायला सांगताय का..?? Proud

उलट राष्ट्रवादीच्या मानाने काँग्रेस आणी भाजपात कमी गुन्हेगार आहेत.>> बापरे.. पुन्हा एकदा भाजपाची यादी पडताळुन बघाल का..?? Proud

महाराष्ट्रात राष्टवादी निवडुन आली तर त्यांचे सगळे घोटाळे ते दाबुन टाकतील. मग ते इरीगेशन असो वा आणखीन काही जमिन मामले.>> टरबुज्याने या सर्व भ्रष्टाचारींना का नाही आत टाकले बुवा...? Proud

मी मागे विचारले होते की अमेठी व रायबरेलीचा किती विकास झाला, त्यावर कोणी काहीच उत्तर दिले नाही. आणी तुमचा राहुल गेले १० वर्षापासुनचा तिथला खासदार आहे, पण अजून त्याने स्वतः त्याच्या निधीतुन काही केलेच नाही आणी फुकट केंद्र सरकारच्या नावाने ठणाणा करतोय. तरी बरे २०१४ पूर्वी याच्याच मम्माचे राज्य होते.>> वाराणशीत काय विकास झाला बाबा..? काही नाही निदान गटारगंगा स्वच्छ झाली का..? Proud

पचास करोड की गर्लफ्रे़ड , कॉंग्रेस की विधवा पासून ते हा वरचा प्रतिसाद, बलात्काराच्या धमक्या देणारे पाठीराखे, >>>>> सिरीयसली हे गर्ल्फ्रेंड प्रकरण काय आहे ते मी खरच वाचलेले नाहीये. कॉम्ग्रेसची विधवा हे सोनिया गांधींना उद्देशुन आहे का? कोण बोललेय? जर मोदी बोलले असतील तर ते खरच निषेध करण्याजोगेच आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा असे काहीसे बोलले होते सोनिया गांधींबद्दल ते चूकीचेच होते.

बलात्काराच्या धमक्यांबद्दल मी वाचले होते. खरे तर अशांना सक्त मजूरीच दिली पाहीजे. आणी त्याचे राजकीय असो वा आर्थिक करीयर, हे संपवले पाहीजे. कारण या गोष्टींना वेळीच आळा नाही बसला तर पुढे ते सोकावतात.

जाऊद्या रश्मी वैनी, जो माणुस आपल्या लग्नाच्या बायकोला न्याय देऊ शकत नाही त्याच्या तोंडच्या हीन वाक्यांनी व्यथीत व्हायचे काहीच कारण नाही.

पचास करोड की गर्लफ्रे़ड , कॉंग्रेस की विधवा पासून ते हा वरचा प्रतिसाद, बलात्काराच्या धमक्या देणारे पाठीराखे, असल्या माणसाला आणि पक्षाला स्त्री आयडी कशा काय पाठिंबा देतात, ते त्याच जाणोत.>>>>>> भरत , काँग्रेस पक्षाने राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या व्यतीरीक्त माणुस आपला नेता , म्हणजे पंत प्रधान पदासाठीचा उमेदवार म्हणून जाहीर करावा. त्या व्यक्तीला निवडण्यासाठी जी प्रक्रिया असेल त्यात या गांधी घराण्याचा कोणताही हात नसावा, त्यांना त्यात ढवळाढवळ करण्याचाही कोणताही अधिकार नसावा. असा माणुस आम्ही उमेदवार म्हणून जाहीर करत आहोत हे ज्या क्षणी काँग्रेस जाहीर करेल त्या दुसर्‍या क्षणाला माझा व घरच्यांचा त्याला पाठिंबा असेल.

कोणत्या विधानांना उचलून आपण काय प्रतिक्रिया देत आहोत ह्याचे ताळतंत्र सुटले कि काय? भरत काय विचारतात आणि रश्मी काय उत्तर देतात? फक्त पाठींबा हाच शब्द वाचला का? आधीचे काही वाचले नाही कि समजले नाही कि समजून घ्यायचे नाही की सोनियाप्रियंका एक स्त्री आहेत परंतु त्या काँग्रेसवाल्या असल्याने त्यांच्या स्त्रीत्वाचा अपमान हा स्त्रीत्वाचा अपमान समजायच नस्तो? आणि हे लोक राहुल गांधीला पप्पू म्हणून हिणवतात. Rofl

भलेभले लोक कशे हिंस्र आणी रानटी टोळीबाज बनतात ह्याचे हा प्रतिसाद एक उत्तम उदाहरण आहे.

पचास करोड की गर्लफ्रेंड आणि कॉंग्रेस की विधवा कोणी म्हटले ते माहीत नाही पण राहुलला काही येत नाही ही वस्तुस्थिती ( राहुलची परीक्षा घेतली त्यांनी) माहीत आहे.
पाच वर्षांत राहुल, सोंनिया, वाड्रा, अजित पवार यांना खडी फोडायला पाठवलं नाही. निवडणुकांंच्या तोंडावर वावड्या तेवढ्या उडवल्या.
विरोधकांची कुंडली माझ्याकडे आहे असं मोदी फडणवीस दोघेही म्हणालेले. पण ती उघडायला त्यांना मुहूर्त मिळत नसावा.

पण राहुलला काही येत नाही ही वस्तुस्थिती ( राहुलची परीक्षा घेतली त्यांनी) माहीत आहे.>>>>> राहुलला काय येते हे तुम्हीच जाहीर करा की. राफेलच्या किंमतीबद्दलच हे महाशय ठाम नाहीत. कधी ५२६, तर कधी ५४० अशी वेगवेगळी किंमत हे प्रत्येक सभेत सांगत असतात. बरं, राफेल जाऊ दे युरोफायटर विषयी काँग्रेस व राहुल यांचे काय मत आहे?

https://www.loksatta.com/elections-news/rahul-gandhi-interavts-with-stud... आता राजकारणात निवृत्तीचे वय हे ६० असावे असे हेच स्वतः म्हणतात, मग सोनिया गांधी यांचे वय काय आहे? सुधारणा करावी तर निदान आपल्या घरापासुन तरी करावी.

Pages