एक गोळी आणि तिनं बळी,

Submitted by ashokkabade67@g... on 8 November, 2018 - 09:26

अवनि आम्हाला शक्य झालं तर क्षमा कर.क्षमा मागण्याची आमची लायकीच नाही.पण तुझंही चकली तु माणसं मारायला लागलीस आणि सरकारला कारण मिळवून दिलस.. मान्य आहे की आम्ही वनावर अतिक्रमण करून तुझ्या सारख्या अनेक वनवासी प्राण्यांना बेघर केलं अवनि तुलाच नाही तर आम्ही आमच्याच बांधवांनाही वनातुन हाकलून दिले तिथे तुझी काय गत.चुक आमचिच होती आम्ही भाडऺवलंदाराऺचे रक्षण करणार्यांना लोकांना सत्ता दिली तुला ते बेशुद्ध करु शकत होते पण त्यांना तुला ठारच मारायचं होत कारण तुझ्या मुळे खान माफियांच् हीतच धोक्यात आलं होतं.आता वनमंत्री म्हणतात खान मागिल सरकारच्या काळात दिली पणं अवनिचि हत्या तर आता झाली ना, तुला मारताना तुझ्या बाळांचा विचारही त्यांच्या मनात आला नाही .आज आम्ही तुझि बाळं अनाथ केली. अवनि आम्ही तुझे गुन्हेगार आहोत जर तुला शक्य असेल तर आम्हाला क्षमा कर.देव न्याय करेलच.

Group content visibility: 
Use group defaults

हे सत्यघटनेशी संबंधित आहे का? अवनी कोण?
अवनी म्हणजे पृथ्वी आणि माणसे माणसांना मारून, जंगले तोडून तिचा र्‍हास करीत आहेत असे वाटले. अर्थात ते चुकीचेही असू शकेल.
अतिशय मार्मिक लिहिले आहे.

हो बरोबर आहे च्रप्स.
आपली पृथ्वीही वाघीणीसारखीच आहे.. तिला जास्त डिवचले त्रास दिला की ती चवताळून ऊठते आणि मग भूकंप, वादळ, कॅलिफोर्नियातला वाईल्ड फायर सारख्या आपत्ती येतात. स्वार्थी माणसं (राजकारणी, भांडवलदार वगैरे) वाघीण असो वा पृथ्वी त्यातून फक्त आपला मतलब साधायला बघतात.
लेखातली कळकळ पोचते आहे.