पुढे चालू
" हा ss हा sss "
एक क्रूर हास्याचा आवाज सर्वत्र घुमला .
त्या कातळ काळोखाच्या अघोर समुद्रामध्ये लाटा उसळल्या. कर्णकर्कश्य ध्वनी आसमंतात घुमू लागला .
" माग , माफी माग . कारण थोड्याच वेळात माफी मागायला तुही नसशील आणि ज्यांना माफी मागायची आहे तेही नसतील . "
आणि लाटा अधिकच जोमाने उसळू लागल्या .लाटा उसळत होत्या . उंच उसळून कड्यावरती आपटत होत्या. त्या कड्यावरचा , त्या बेटावरचा एक एक आत्मा गायब होत होता . त्या अघोरी समुद्रामध्ये त्यांचा बळी दिला जात होता .
त्या अघोराने त्यांना वेळच दिला नाही . सारे आत्मे त्या अघोरामध्ये विलीन झाले . त्यांना आता कोणी वेगळं करू शकत नव्हतं . पाण्यात विरघळलेल्या साखरेप्रमाणे त्यांचं अस्तित्व संपलं होतं . आता फक्त गण्या राहिला होता .आणि समुद्र शांत झाला . गण्याच्या मनावर मोहिनी पडली . तो चालत जाऊ लागला कडाच्या टोकाकडे उडी घेण्यासाठी...
पण त्याच्या मनाच्या एकदम आतल्या पातळीवर संघर्ष अजूनही चालू होता . तो विरोध करत होता . पण तो विरोध तोकडा होता . शेवटी त्याने पराभव स्वीकार केला व मृत्यूच्या झोक्यावर बसून तो आठवणींच्या गावी गेला . आयुष्य त्याच्या नजरेसमोरून सरकून गेलं . मात्र एक दृश्य त्याच्या नजरेसमोर पुन्हा पुन्हा तरळत राहिलं
त्याचं लहानपण . त्याची अंजली .दोघेही वेगळे नव्हतेच. एकच होते दोघे. झाडावरती चढले होते कशासाठीतरी ?
पण कधी नव्हे ते गण्याचा पाय घसरला तेव्हा अंजलीनेच त्याला हात दिला व वर खेचले....
त्याच्या मनावरची मोहनी विरघळून गेली . ते दृश्य विरघळून गेलं . तो कड्यावरून खाली कोसळत होता आणि अंजलीने त्याचा हात पकडला होता . त्याला पुन्हा एकदा वर खेचला होता . आणि त्याचवेळी दिव्य तेजस्वी पांढरा प्रकाश सर्वत्र भरून उरला . त्याला काहीच दिसेना हळूहळू दिसू लागलं . तेव्हा त्याला जाणवलं . तो तिच्या मांडीवर डोके ठेवून पहुडला होता . ती त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होती .
" कोण तू...?
" इतक्यात विसरला...
" अंजली तू मला वाचवलं ....?
" नाही तू स्वतः स्वतःला वाचवलं ....?
" आणि बाकीचे
" ते अघोरात विलीन झाले .
" आघोराचा नाश झाला का ..?
" ते आपल्यासारख्या सामान्यला शक्य नाही . आपण फक्त त्याला चुकवून येथे आहोत ....
" आता मी कुठे आहे ?
" स्वप्नात .
" तू कुठे आहे...?
तिने काहीच उत्तर दिले नाही . ती शांत राहिली . तोसुद्धा शांतपणे तिच्या मांडीवर पडून राहिला . तिचे हात त्याच्या डोक्यावरती फिरत राहिले .
अचानक त्याला पाण्यात बुडाल्यासारखा झालं . त्याने डोळे उघडले.
" साहेब तो शुद्धीवर आला.."
" हवालदार त्याला इकडे आणा.
" बोल रे इथे काय करत होता ?
" काल रात्री इथे कोण कोण होतं ?
" काल रात्री इथे काय काय झालं ?
" सांग पटकन...
तो समुद्रात एका बेटावर होता . काल रात्री बेटावर स्फोट झाला होता . संपूर्ण बेट जळालं होतं . नंतर अचानकच आग विझली . ज्यांनी किनाऱ्यावरून सारं पाहिलं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं...
जत्रे नंतर
शेवंता , पाद्री किंवा जॉन , राम्या ,मन्या आणि तो प्रताप सारे अघोरासाठी बळी गेले होते . ते बेट म्हणजे अघोराचं प्रार्थनास्थळ असावं . सारे बळी गेले . पण तो वाचला . त्याला वाचवलं . अंजलीने कि कुण्या दिव्य शक्तीने . अंजली त्याची लहानपणाची मैत्रीण होती . पण लहानपणा नंतर गण्याने तिला कधी पाहिलेच नव्हते . अचानक ती त्याच्या मदतीसाठी कशी आली ? नंतर गण्याचे काय झाले.....? अचानकच ही अंजली मधून कोठे आली ? हे प्रश्न पडले असतीलच....!
याच प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूया पुढच्या कथेत जिचे नाव आहे फार्महाऊस
जत्रा इथेच संपली ......
तुम्ही जत्रा शेवटपर्यंत वाचलीत त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे .
मस्त
मस्त
धन्यवाद
धन्यवाद
मस्त !!!! सर्व भाग एकदम
मस्त !!!! सर्व भाग एकदम वाचुन काडली !!!!!
वा वा वा
वा वा वा
मजा आली.
वाट बघतोय फार्महाऊस ची.
लवकर येउ देत
धन्यवाद. .... पन्तश्री ji
धन्यवाद. .... पन्तश्री ji
धन्यवाद अमोल१९७९ ji
धन्यवाद अमोल१९७९ ji
Khupch mast aahe katha
Khupch mast aahe katha
Farmhouse kadhi yenar hay
Farmhouse kadhi yenar hay puna vaat baghavi lagnar bhau kadddak story
भेंड्या
--
भगवद्गीतेत सांगितलंय की
भगवद्गीतेत सांगितलंय की आत्म्याचं अस्तित्त्व कधीच संपत नाही.
(भ. गी. २.२०)
आणि आत्मा कशातच विरघळू शकत नाही!
(भ. गी. २.२३ & २.२४)
धन्यवाद Haddi ji
धन्यवाद Haddi ji
लवकरच sandipkarke618@..... Ji
लवकरच sandipkarke618@..... Ji
भगवद्गीतेत सांगितलंय की
भगवद्गीतेत सांगितलंय की आत्म्याचं अस्तित्त्व कधीच संपत नाही.
(भ. गी. २.२०)
आणि आत्मा कशातच विरघळू शकत नाही!
(भ. गी. २.२३ & २.२४)
पद्म ....।
इथे कुणी (मी) वाचलीय भगवत गीता.... (हसण्याची इमोजी)
छान लिहीलत
छान लिहीलत
रच्चाकने.....ते कथेच्या शीर्षकात संपूर्ण लिहीलय ते काढा. भाग १, २ असे करा.
छान.
छान.