वृद्धाश्रमात अध्यात्मिकता

Submitted by डॉ रवी१ on 25 January, 2018 - 12:24

वृद्ध लोकांसाठी अध्यात्मिक उपक्रम राबवावी प्रवचने, ग्रंथाची उपलब्धता, CD player इ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिव्ही असतात आश्रमात. हिंदीमधले बरेच चानेल आहेत त्यावर अध्यात्मिक कार्यक्रम चालू असतात.मराठीत कमी आहेत.

म्हाताऱ्या लोकांनी अध्यात्मिकच पाहावे/वाचावे/ऐकावे हे बंधन का? उलट मी म्हणेन की त्यांना निखळ विनोदी सिनेमे/नाटके/पुस्तके वाचू द्या, जे आजवर करता आले नाही ते वृद्धाश्रमाच्या जागेत जसे शक्य आहे तसे करू द्या. कॅरम, बुद्धिबळ, लुडो, व्यापार, पत्ते इत्यादी फारशी शारीरिक हालचाल न लागणारे खेळ खेळू द्या.

जे आयुष्य उरलेय ते हसत खेळत मजेत जाऊ द्या. मी बरीच वृद्ध माणसे पाहिलीत जी कायम कडू किराईत खाल्ल्यासारखा चेहरा करून वावरतात. आपले संस्कार असे जालीम आहेत की कुणी वृद्ध वयाला विसरून आनंदाने हसत खेळत नाचत दिसला तर म्हातारचळ लागलं म्हणतो. वृद्धत्व म्हणजे आध्यात्म, लाम्ब चेहरा, देव देव करणे हे सगळे डोक्यातून हद्दपार करायला हवे.

म्हातारपणी अध्यात्मिक वाचून काहीही फरक पडत नाही. मरताना गीता वाचून काहीही फायदा नाही. हे सगळे आपण लहानपणापासून मुलांना शिकवले पाहिजे जेणेकरून आयुष्याची खडतर वाटचाल करताना त्यांना बळ मिळेल.

साधना ह्यांच्या प्रत्येक शब्दास अनुमोदन.

वायफाय सुविधा मात्र हवी असा मी मला अ‍ॅड्मिट करवून घेताना हट्ट धरणा र आहे. फोन वर फोरजी परव्डेल कि नाही माहीत नाही तोपरेन्त जिओ चे वृद्धा श्रम पण आलेले असतीलच. तिथे जाईन पण वायफाय मस्ट.

साधना यांच्या प्रयेक शब्दास अनुमोदन

<<आपले संस्कार असे जालीम आहेत की कुणी वृद्ध वयाला विसरून आनंदाने हसत खेळत नाचत दिसला तर म्हातारचळ लागलं म्हणतो.>> अगदी अगदी म्हातारं झाल्यावर असं आणि असच वागायला पाहिजे हे लोकांच्या डोक्यात फिट्ट बसलाय . त्याच्या पासून जरा कुठे कोणी वेगळं वागताना दिसलं कि या वयाला हे शोभत का ? म्हणून लगेच कुजबुज . का ? कशासाठी ? आणि कायम त्यांनी अध्यात्मिकच वाचावं /पाहावं/ ऐकावं हे का बंधन ? खरंच Sad

टिव्ही माध्यम अशासाठी सुचवलं की त्यामध्ये कॅापीराइटचा प्रश्न येत नाही. कुणाच्या प्रवचनाच्या ओडियो सिडी असतील तर त्यांचा संग्रह करून आश्रमातल्या रहिवाशांना ऐकायला देता येतील का शंका आहे. वैयक्तिक वापरासाठी असतात.

>>आरोग्याबद्दल काय?>>

बारा तेरा वर्षांपुर्वी ठाणे कर्जत परिसरातील आश्रम शोधायची वेळ आली एका नातेवाइकासाठी. त्यातील निरिक्षणानुसार -
१) वैद्यकीय मदत चांगली होती सर्व ठिकाणी परंतू काही ठिकाणी मनपा/सिविल हॅास्पिटलातून सेवा मिळवून देत होते तिथे खर्च वाढत नव्हता.
२) कशामध्ये /छंदामध्ये मन गुंतवल्यास आरोग्याचा अतिरेकी विचार केला जात नाही आणी आपोआपच आरोग्य सुधारते. सतत माझे हे दुखते ते दुखते याचा विसर पडणे गरजेचे आहे.
३) एका ठिकाणी हिंडत्या फिरत्या वृद्धास आश्रमाच्या बाहेर सकाळी संध्याकाळी जाऊ द्यायचे. ते जवळच्या देवळात जाऊन बसायचे. विरंगुळा मिळाल्याने आनंदी राहायचे.
४) शाळेतल्या स्काउट गाइडना स्वइच्छेने आश्रमभेटीस आणावे. अगदी स्वत:चीच नातवंडे नाही आली तरी हळहळू मन रमेल.

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे Srd, पण उद्विग्न राहत असू नये. विरंगुळा जरुर असावा. तोचतोचपणामुळे
कंटाळा येणे स्वाभाविक आहे, बदल करावासा वाटतोच माणसाला. काही उत्तम विचारांचा शोध घ्यावा.

वृद्धाश्रमात उद्विग्नपणा येण्याचे कारण १) नातेवाइक भेटायला येत नाहीत. एखाद्याकडे वारंवार कुणी येतात तर दुसय्राकडे न आल्याने ते दु:खी होतात. २) इथे आपल्याला आणून टाकलय ही भावना वाढत जाते.
३) ओफिसात विचारत होतो तेव्हा सगळे गोळा होतात. एकाने विचारले " माझा *** भेटला ना स्टेशनात? येतोय ना?" मग संचालिकेने खुण केल्यावर " हो हो तो निघालाच आहे म्हटल्यावर कोण आनंद झाला.
४) अमच्या नातेवाइकास भेटायला गेल्यावर सर्वांचीच विचारपूस करणे महत्त्वाचं असायचं.
५) दु:खी माणसास अध्यात्म मनोरंजन/सांत्वन करू शकत नाही.

मला असं म्हणायचय की ज्यांना अध्यात्माची खरंच आवड व गरज असेल फक्त त्यांच्यासाठीच थोडेसे समाधान इतकंच!बस्‍ा! पण चर्चा वाढत गेली.

हो. ज्यांना वाचायला त्रास होतो त्यांच्यासाठी ऐकायचे माध्यम सिडी लावता येतील. आणि प्रत्येकाच्या जागेपाशी हेडफोन सॅाकेट्स ठेवायची. कल्पना चांगली आहे.

आपले संपुर्ण आयुष्य श्वास व विचार या वरच आधारलेले आहे. शरिर शास्त्रा प्रमाणे आपल्या शरिराच्या पेशी बदलत असतात म्हणजेच आपण नविन पेशीने तरुणच असतो. म्हणजेच आपल्या वयाच्या कोणत्याहि साली 70, 80, 90, किवा 100 साली आपण नविन पेशीने तरुणच असतो. पर्ंतु समाजमनाने भरलेल्या म्हातारपणाच्या जाणीवेने आपण ते मान्य करत नाही व म्हातारपणाच्या जाणीवेने आपल्या पेशीना म्हातारे करुन निसर्गाने देऊ केलेले चिरतरुणपण दूर सारतो. फुफूसे पूर्ण भरुन घेतलेल्या श्वासानाने आपले शरिर शुद्ध होते व शुद्ध विचाराने मन शुद्ध होते. कारण सर्व साधारण माणसे श्वास घेताना फुफूसांचा 10% च उपयोग करतात. श्वास आधिक घेण्याचे प्रमाण कसे अचुकपणे वाढवावे व Negative विचारना बाजुला करून Positive विचार कसे रुजवावे , त्याना ध्यानाच्या सरावाने कसे शुद्ध करावे हे ब्रम्हविद्येच्या सरावने सहज साध्य होते. ब्रम्हविद्येच्या नेहमिच्या सरावाने चिरतारुण्य अपणास नक्कीच प्राप्त होईल. ब्रम्हविध्येचा प्रार्थमिक वर्ग 22 आठवड्याचा आहे. दर आठवड्याला 1 तास 30 मिनिटे असा वर्ग चालतो . 18 वर्षावरील सर्व साधक हा वर्ग करू शकतात.
गुरुकिल्ली तुमची, आरोग्य आणि यशाची, ब्रह्मविध्या शिका
आध्यात्मिक श्वसनप्रकार व ध्यानाचे दुर्मीळ योगशास्त्र
वारिल योगशास्त्र आपले शरिर आणी मन शुद्ध करण्याचा मार्ग दाखविते. हे अनुभव घेण्याचे शास्त्र आहे. जेव्हडा याचा सराव कराल तेव्हडी त्याची प्रचीती येइल.
ब्रम्हविध्या साधक संघ हा चॅरीटेबल ट्रस्ट आहे. आधिक माहितीसाठी 022 25347788/25339977 या फोन नंबर वर संपर्क करावा.
शरिर शास्त्रा प्रमाणे आपल्या शरिराच्या पेशी कशा बदलत असतात त्यासाठी Goole Surch मधील उतारा खाली दिला आहे
The Short Answer: Recent research has confirmed that different tissues in the body replace cells at different rates, and some tissues never replace cells. Using a revolutionary new technique (described below), researchers have shown that:
1. Neurons in the cerebral cortex are never replaced. There are no neurons added to your cerebral cortex after birth. Any cerebral cortex neurons that die are not replaced.
2. Fat cells are replaced at the rate of about 10% per year in adults. So you could say that on average, human beings replace all their fat cells about every ten years.
3. Cardiomyocyte heart cells are replaced at a reducing rate as we age. At age 25, about 1% of cells are replaced every year. Replacement slows gradually to about 0.5% at age 70. Even in people who have lived a very long life, less than half of the cardiomyocyte cells have been replaced. Those that aren’t replaced have been there since birth.