गावाकडचे दिवस ....भावार्थ रामायण

Submitted by अजातशत्रू on 13 June, 2016 - 06:01

भावार्थ रामायण......

गावात भावार्थ रामायणाचे पारायण सुरु असले की फोटोत दाखवल्याप्रमाणे दृश्य हमखास नजरेस पडतेच..
गावातले वातावरण या काळात संपूर्णतः भारलेले असे असते… रोज संध्याकाळी शेतातली कामे करून थकून भागून आल्यानंतर वेशीतल्या मारुतीरायाच्या देवळात रामायण ऐकायला जाणे हे एक स्वर्गस्थ सुखच…
बत्तीच्या उजेडात थोड्याशा उशीरपर्यंत चालणारया या श्रवण सोहळ्याचे अनेक क्षण मनावर कोरलेले अगदी जसेच्या तसे आहेत…

रामाचा जन्म झाल्यावर आया बायांना आपल्याच घरात पाळणा हलल्यागत वाटायचे. राम लक्ष्मण जसजसे मोठे होत जायचे तसतसे याना स्फुरण चढायचे…

दशरथाकडून श्रावण बाळाला बाण लागून तो घायाळ झाल्यावर यांच्याच डोळ्याला अश्रूच्या धारा लागायच्या, तो अध्याय सुरु व्हायच्या वेळेस एखादी भाबडी म्हातारी सांगायची 'महाराज,तेव्हढे दशरथ राजाला बाण नीट चालवायला सांगा आपल्या श्रावण बाळाला बाण लागून तो जखमी होईल !"
कैकेयीला वर देताना बाया पुटपुटायच्या, "बाईने शब्द मागितला तर त्येचा वापर नीट कराबा अन गड्याने अशा शिंदळकीला कशाला शब्द द्यावा बाई ?"

सीतेच्या जन्माची कहाणी ऐकताना बळीराजा भान हरपून जात असे, त्याला वाटायचे न जाणो आपल्या जमिनीत नांगरताना आपल्या नांगराच्या फाळाला अशीच एखादी सोनेरी पेटी थडकेल ! तो त्या काळात नांगर जपूनच चालवायचा!
'जनक राजा लई भाग्यवान त्याला मातीने पोरगी दिली'… अशी चर्चा म्हातारे कोतारे तोंडात तंबाखूचा बार भरत पारावर बसून करत.

"कौशल्या अन सुमित्रा कशा भणीवाणी राहत्येत, सवती सवती असून एक्काच घरात एका ताटात सोन्याचा घास खाऊन गुण्या गोविदाने राहत्येत, अन तुमी जावा-जावा असून देकील कस जल्माचं दुश्मन असल्यागत राह्ताव, अग बायानू जरा सुदरा की ! रामायण काय म्हणतय ध्येन दिऊन ऐका !" असा उपदेश घराघरातल्या सासवा आपल्या सुनांना करायच्या … त्यांना वाटायचे की कौशल्या अन सुमित्रा या सवती असूनही एकाच ताटात जेवतात मग आपल्या सुना का भांडतात ? त्या काळी एका एका घरात तीन ते सात आठ सुना असायच्या त्यावरून या उपदेशकर्त्या सासूची मानसिकता लक्षात कशी होती ते कळते ....

सीता स्वयंवर काळात गावातल्या तरण्या पोराना उधाण आलेलें असायचे, गावातली जाणती माणसे पोराना म्हणायची, 'अरे तुमच्या का बरगड्या मोजून घ्यायच्या का ? जरा दुध दुभते खात जावा, पोटाला बघा, थोडी तालीम लावा ! नाय तर असल्या मरतुकड्याला कोण जावई करून घेणार ? " विशेष म्हणजे हा सल्ला धडधाकट पोरानाही दिला जायचा अन बरयाचवेळा सल्ला देणारे काबाडकष्ट करून पार थकून माकून गेलेले अस्थिपंजर देहाचे असत.

मंथरेने कैकेयीचे कान भरायला सुरुवात केल्यावर बायांच्या तोंडाचा पट्टा चालू व्ह्यायचा मग कळायचं की, आपल्या गावातल्या बाया दिकून भारी श्या देत्यात…
कैकेयीला दिलेला वर पूर्ण करताना सगळा गाव असा विचारमग्न वाटायचा… त्यानंतर यायचा तो रामाला वनवासाला जाण्याचा दिवस !

रामवनवास जेंव्हा चालू व्हायचा तेंव्हा गावातली काही जाणती मंडळी अन पोरे अंगावर पोत्याचे कपडे घालून अन पायाला पायताण न घालता किंवा पायाला पोत्याचे तुकडे गुंडाळून गावाबाहेर जायची, 'वनवासाला जायची! होय अगदी वनवासालाच!

रामाला वनवासाला जावे लागले त्याचे प्रतीकात्मक प्रायश्चित्त म्हणून गावातील भाविक वृत्तीची साधी भोळी निरलस माणसे चौदा दिवसाच्या वनवासाला जायची. 'रामाला १४ वर्षे वनवासाला जावे लागले म्हणून आपणही १४ दिवस वनवासाला जायचे' ही कल्पनाच अभूतपूर्व अशा सौहार्दतेची अन सृजनशिलतेची आहे…

ज्या ज्या घरातली माणसे वनवासाला जायची त्या घरातलीच नव्हे तर सगळा गाव वेशीजवळ येऊन त्याना निरोप द्यायचा… एक विणेकरी अन बाकीचे सर्व टाळकरी असा हा रामभक्तांचा जथ्था मुखाने जय जय राम कृष्ण हरी चा घोष करत निघायचे…. चौदा दिवसाच्या यांच्या या वनवासात वाटेत लागणारी वाड्या, वस्त्या अन गावे इथले लोक त्यांचे पाय धुवायचे अन त्याना हारफुले अर्पण करायचे…

इकडे गावात दशरथ राजाचा मृत्यू ऐकताना म्हातारे कोतारे कासावीस झालेले असत. नंतर मात्र ज्याच्या त्याच्या मुखात भरताचे नाव झालेले. म्हातारे जाणत्या माणसाना बोलायचे. "अरे एक एकरापायी भावाच्या जीवावर उठू नगासा, बांधाला बांध लागला म्हणून जीव घ्येयाला मरू नका ! भरतराजाने कसं आपलं समद राज्य रामाच्या पादुका ठेवून केलं ! जरा शिका त्येच्याकडनं !"

पुढचे दिवस अगदी गतीने जायचे, अन लक्ष्मण शक्तीचा दिवस यायचा. बहुतांशी हे वनवासाला गेलेले गावकरी तेंव्हा गावात यायचे. गावाला उधाण आलेले असायचे. एक मोठी काहिली भरून खीर केलेली असायचे. सगळ्या गावाला जेवण असायचे. त्या रात्री गाव जागा असायचा.
मारुती राया संजीवनी 'आणण्यासाठी जाऊन अख्खा पर्वतच आणायचा हे ऐकताना अंगावर रोमांच यायचे. लहान पोरे तर उड्या मारायची अन 'बजरंगबली की जय'चा घोष अधून मधून होत रहायचा….

दिवस जात रहायचे अन एके दिवशी रावणाचा वध करून राम अयोध्येत परत आले की गावाला पुन्हा नवा हुरूप यायचा.…
सीतामाई अयोध्या सोडून जाताना बायका रडायच्या अन म्हणायच्या, ' बाईच्या जल्माचा वनवास कधीच संपत नाही गं बायानो ! जल्माचे भोग आहेत हे समदे, ते आपल्यालाबी भोगलेच पाहिजेत !"

पुढे लवकुशाची कहाणी ऐकताना लेकुरवाळया बायका हरखून जायच्या… 'आपल्या गावात बी कंदीतरी वाल्मिकीरुषि यील पर पोरांनू तुमी अब्यास नीट मन लावून करा' हे बोल ऐकताना खरेच वाल्मिकी ऋषिच्या आश्रमात शिकत असल्यागत वाटायचे…
लवकुश अयोध्येत परत आले की लोक खुश व्हायचे…
आता सगळ सुखात होणार असं नेहमी वाटायचे पण सीतामाई जमिनीत परत जाताना ऐकताना अख्ख्या गावाच्या जीवाला हुरहूर लागायची, बायका तर हुंदके देत डोळ्याला पदर लावूनच बसलेल्या असायच्या….

रामायणाचे पारायण पूर्ण झाल्यावर गाव खूप उदास वाटायचे, देवळाजवळून जाताना तर आपले काही तरी हरवले आहे असा भास व्हायचा. गावात रोज सकाळी निघणारी रामटाळी बंद झाल्यावर तर सकाळी सकाळी अवसान गेल्यासारखे वाटायचे....

दिवस, महिने निघून जायचे पण देवळाच्या पांढऱ्या भिंतीवरची ओबड धोबड अक्षरे डोक्यात घर करून असत. ऊन पावसाने मुळच्या ठळक अक्षरातली ती सूचना नंतर फिकट होऊन गेलेली असे मात्र स्मृतीच्या मोह्ळातले रामायणाचे मधुबिंदू त्यामुळे तरतरीत होत असत. देवळाच्या भिंतीवर लिहिलेले असे -
"गावात भावार्थ रामायण चालू आहे, वेशीजवळ आणि देवळाजवळ पायात वाहणे घालू नयेत. जय श्रीराम " !

आज जरी अशी सूचना कुठल्याही गावातल्या देवळातल्या भिंतीवर वाचायला मिळाली की मनात एकच हवाहवासा वाटणारा स्मृतींचा कल्लोळ हो,ज्यात मी नखशिखांत चिंब होऊन जातो ……

रामायण हा गावाकडच्या माणसांचा जगण्याचा आधार होता आणि आहे, म्हणूनच ग्रामीण भागातली कौटुंबिक आणि सामाजिक जडणघडण अजूनपर्यंत टिकून आहे असे आजही वाटते.

- समीर गायकवाड .

http://sameerbapu.blogspot.in/2015/05/blog-post_14.html
RAMAYAN.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन्याबापू धन्यवाद
मी त्या मंडळिनां वाचलेल नाही पण मी नास्तिक आहे.एवढे खरे

बरेच काही लिहावे वाटतय पण ११ वाजलेत तेंव्हा झोपलेलच बरे.
शुभरात्री.

सकुरा, अपघात झाला हे वाईटच आहे. तुम्हाला जरी ते काही करत होते ते पटले नाही तरी.

सायो, चैत्यभुमीवर येणारे लोक चेंगराचेंगरीत मरावे अशी कल्पना करणे हे दु:खदायक व निंदणिय आहे. दलित असले म्हणुन काय झाले त्यांनाही जगण्याचा हक्क आहे, संसार, मुलेबाळे आहेत.

पण मी नास्तिक आहे एवढे खरे >>>> नास्तीक या शब्दाचा नेमका अर्थ मला आजवर कळालेला नाही. सकुरा तुम्ही वाटता तेवढे उथळ नाही आहात असा माझा अंदाज आहे. आपण काय आहोत हे ज्याला नेमके कळते अशी फार
मोज्की माणसे असतात. मला नास्तीक असणे म्हणजे नेमके काय असणे याविषयी नवा धागा काढून मार्गदर्शन कराल काय? किन्वा इथे माबोवर तसा धागा आहे का?

>>सायो, चैत्यभुमीवर येणारे लोक चेंगराचेंगरीत मरावे अशी कल्पना करणे हे दु:खदायक व निंदणिय आहे. दलित असले म्हणुन काय झाले त्यांनाही जगण्याचा हक्क आहे, संसार, मुलेबाळे आहेत.>> काहीच्या काही स्वतःचं डोकं चालवून अर्थाचा अनर्थ करायचा असं ठरवलं असल्यास त्यावर काही उपाय असत नाही, नाही का? Happy

मग त्या पोस्टचा काय अर्थ होता. सकुरांची पोस्ट आवडली नाही तुमची त्यावर वरताण होती.

धागा प्रभु रामचंद्र ह्यांचा भारतिय जनमानसावर असणारा प्रभाव ह्यावर सुंदर भाष्य असणाराआहे. पण सकुरा, सायो, नगरकर ह्यांनी त्याला दोन धर्मातील द्वेषाचे स्वरुप देउन कुरुप केलेय.

छान लिहिलंय.
सप्ताह पाहिला आहे.
पण हे श्रवण महिनाभर नक्कीच चालत असणार.
ग्रामिण संस्कृतीचा नवाच पैलु कळला.

अध्येमध्ये येणारे गावातल्या बायाबापड्यांचे संवाद रोचक आहेत.
आपल्या घरांत टिव्ही पहात असतानाही अश्या कमेंटस चालत असतात.
खास करून सूनांनी कसे रहावे/राहू नये याबाबत!
Wink

सकुरा यांचा मायबोलीवरचा इतिहास पाहिल असता त्याना (की तो कुणास ठाऊक) अपघातावर प्रति क्रिया द्यायचीच नव्हती. लेखात वर्णन केलेल्या संस्कृतीलाच उद्देशून त्या म्हटलेल्या आहेत आता सारवासारव करीत आहेत. आणि आता अंगलट येते असे पाहून त्यांची झोपायची वेळही झालेली आहे. तिकडे देखील असे काही झाले की त्या कामानिमित्त काही तास बाहेर जातात.
विजय टी पहिली काडी कोणी टाकली ते जरा कृपया पहा. ही प्रवृत्ती स्पष्टपणे वेळीच छाटली नाही तर हे हिंदु चालीरीतीवर असलेल्या प्रत्येक बीबी वर जाऊन असेच घाण करतात. अड्ड्यवर कितीही भुंकले तरी आपण लक्ष देत नाही कारण तो धागाच मुळी त्यासाठी काढलेला आहे, पण इतरांच्या चांगल्या चाललेल्या बीबीवर जाऊन मुद्दम हे कृत्य केले जात आहे. ते थांबवलेच पाहिजे.
मलाही रामायण फारसे पटत नाही पण गावात एक महोल तयार होतो तोही अनुभवण्याचा प्रकार असतो हे मला आवडते.

३अ, तुम्हाला काय समजयचे ते समजयला तुम्ही स्वतंत्र आहात..

>>>> नास्तीक या शब्दाचा नेमका अर्थ मला आजवर कळालेला नाही. सकुरा तुम्ही वाटता तेवढे उथळ नाही आहात असा माझा अंदाज आहे. आपण काय आहोत हे ज्याला नेमके कळते अशी फार
मोज्की माणसे असतात. मला नास्तीक असणे म्हणजे नेमके काय असणे याविषयी नवा धागा काढून मार्गदर्शन कराल काय? किन्वा इथे माबोवर तसा धागा आहे का?>>>>>

असा कुठला धागा मला माहित नाही असु ही शकतो मला नविन धागा काढुन लिहिन्यात कही एक रुची नाही आहे तुम्हाला काढायचा असेल तर काढु शकता.

नास्तिक असणे म्हणजे नेमके काय? हे माझ्यापुरते मला नक्किच माहिती आहे ..

अजय अभय अहमदनगरकर...........व्वा मस्तच...

छान लिहिलं आहे समीर.

की तुमच्या धर्मात शहाणीच निपजली आहेत लोकं?>>>>>>>>>>>सायो, सकुराचं ठीक आहे पण तुम्ही असं लिहावं ह्याचं खरंच आश्चर्य वाटलं. गैरसमज नसावा.

सस्मित, सकुरांच्या
>>यंदाच्या वर्षी आमच्या गावाच्या पुढे असणाऱ्या मोहोळ या तालुक्याच्या गावा जवळ अशा वनवासी लोकांना एका बेफाम वेगात जाणाऱ्या ट्रकने चिरडले होते, काही जण जागीच ठार झाले होते तर बरेचसे जखमी झाले...>>>>>>>हे वाचुन मुर्ख हा शब्द सुचला.

जे मला वाट्ले ते लिहिले लोक अश्या मुर्खपणाच्या पायात जिवानिशी जातात तेव्हां त्याना मदत करायला त्यांचा देव का नाही येत?>>

ह्या पोस्टकरता म्हटलं आहे तसं. कोणत्याही धर्मात का असेना, पण लोकांच्या श्रद्धेत शहाणपणा, वेडेपणा असत नाही. दरवर्षी यात्रेत वगैरे गर्दीत कितीतरी माणसं चेंगरून गेल्याच्या बातम्या येत असतात पण म्हणून लोकं जाणं थांबवतात का?

सकुरांना त्यांचा धर्म बाकी धर्मांपेक्षा (जास्त करून हिंदू धर्मापेक्षा) शहाणा वाटतो म्हणून त्यांना विचारावंसं वाटलं.

ओ हुडिबाबा,
तुमचे आणि सकुरातैंचे जे काय जुने स्कोर असतील ते आपापसातच सेटल करा.
उगाच आमच्या अड्ड्याचं नाव घ्यायचं नाही हां, सांगून ठेवते!
Wink

सकुरांना त्यांचा धर्म बाकी धर्मांपेक्षा (जास्त करून हिंदू धर्मापेक्षा) शहाणा वाटतो म्हणून त्यांना विचारावंसं वाटलं.<<<<<< सायो तुमच्या कुठच्याही बोलण्याचे मला काही वाटले नाही मुळात आमचा धर्म आणि त्यांचा धर्म याच्या पलिकडे जाऊन बघायला आणि स्विकारायला शिकले आहे मी.

कुठलाही धर्म हा आचरण करण्याने सार्थक ठरतो रामायण ची कथा ऐकायची आणि भावा भावाने एक मेकाचे गळे पकडायचे त्या ऐकण्यात आणि आचरण करण्यात काही सुसंगती असते का? तेच बुध्दाच्या बाबातित आणि आंबेडकरांच्या बाबतित
कथा सांगणारे सांगतात भर भक्कम दक्षिणा कमवुन दुसर्‍या गावी निघुन जातात.आणि लोकं पोत्याचे कपडे घालुन वनवासाला जातात हे सगळे हास्यास्प्द वाटत नाही का? बहुजन समाजच या गोष्टित जास्त सक्रिय असतो ..असो मला आता या धाग्यावर जास्त चर्चा करायची नाही तेंव्हा माझा उल्लेख टाळुन चर्चा करावी.
धाग्या कर्त्याची इच्छा असेल तर माझे प्रतिसाद मी संपादित करते

Wow समीर सर...मला अगदी स्वदेस movie ची आठवण झाली . त्यात पण त्यांनी रामलीला चा प्रसंग किती छान दाखवलाय.
मला ती movie बघतांना नेहमी वाटायचं, खरंच असं अजूनही होत असेल का आपल्या गावामध्ये…तुमच्या लेखाने उत्तर दिलं Happy

{{{ उगाच आमच्या अड्ड्याचं नाव घ्यायचं नाही हां, सांगून ठेवते! }}}

अड्ड्यावरच्या सदस्यांना कुणाचंही नाव घ्यायचं लायसेन्स आहे. इतरांना ते नाहीये.

रामायण आम्हा नाशिककराचा जिव्हाळ्याचा विषय. प्रभु रामचंद्र आणि सिता ह्यांचे पाय आमच्या भुमिला लागलेत.खरतर रामनवमीला प्रत्येक भारतियाने चौदा दिवस वनवासाला जाउन प्रथा बळकट केली पाहिजे.

मी विचार करतोय लोक जसे मायबोलीवर संवाद साधतायत तसा प्रत्यक्षात साधत असतील का म्हणजे आता हेच पाहा ना -

{{{ बिपिनजी,
डोळा मारा }}

हे असं मला कधी माझ्या निम्म्या वयाची महिला वास्तवात म्हणेल काय?

(अर्थात न म्हंटलेलच न उत्त्म! नाहीतर माझ्या बायकोच्या लाटण्यानं माझ्या टकलावर अजून एक टेंगूळ उमटेल.)

सही आहे !
सुंदर लेख नेहमीप्रमाणेच.
मलाही स्वदेश आठवला.
कसले अफलातून गाणे आहे ते..

राम बस भक्तो के ना शत्रू के भी चिंतन मे है
राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है,
मन से रावण जो निकाले राम उसके मन मे है

या ओळी सिरीअसली घेतल्या तर ईथलेच काय बरेच ठिकाणचे बरेच वाद थांबतील Happy

Pages