शापित गड भाग ४

Submitted by श्रीमत् on 27 December, 2014 - 04:00

आता माझ्या मनात भिती आणि काळजी अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. पंडीतच्या आठवणीने मन व्याकुळ होत होतं. साला उगाच इकडे आलो. माझ्यामुळेच बिचार्‍यावर आज ही वेळ आली. कुठे असेल तो? त्याच्या जिवाच काही बर वाईट तर झाल नसेर? माझ्या विचारांप्रमाणेच आजुबजुच वातावरण पण आता झटपट आपल रुप पालटत होतं. सुर्य अस्ताला जायच्या मार्गावर होता. आकाशात चारी बाजुंना गडद तांबड्या रंगाची झालर पसरली होती. मधुनच ऊंचावर पक्षांचा एक थवा घरट्याकडे परतत असताना दिसला आणि माझा बांध सुटला माझ्या डोळ्यात नकळत आसव जमा झाली. आज पहिल्यांदाच आईची खर्‍या अर्थाने आठवण येऊ लागली. मावशीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. जर पंडीतच काही बर वाईट झाल तर कोणत्या तोंडाने तिला सामोरा जाऊ? का माझ पण तेच होणार? नाही...नाही.., मी हे होऊ देणार नाही. माझ्या विचांराशीच माझी खलबतं चालु असताना समोरील बाजुस दुरवर गवतात कसली तरी सळसळ जाणवली. सभोवताली काळोख वाढल्यामुळे डोळे किलकिले करुन त्या दिशेने पाहीले असता कसली तरी आक्रुती वाड्याच्या दिशेने सरकताना माझ्या नजरेस पडली. घाबरुन मी माझा मोर्चा तळ्याच्या मागच्या झाडाकडे वळवला.

त्या ढोलीत लपुन मी बाहेरील आवाजाचा काणोसा घेऊ लागलो. बाहेरील सळसळीचा आवाज हळु हळु वाढत होता. कोण असेल? पंडीत तर नसेल ना? मला जोरात त्याला आवाज देऊसा वाटला. नाही. पण पंडीत असता तर एवढ्यात तिकडुणच बोंबलत आला असता. त्यात तो इतक्या लांब कशाला जाईल. मी झाडाला असलेल्या फटीतुन बाहेर काही दिसतोय का याचा मागोवा घेऊ लागलो इतक्यात हळुच कोणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवला. तसा मी दचकुण मागे वळालो आणि पुर्ण ताकदिने त्या आक्रुतीला मागे ढकललं. तसा जोरात धप्प. असा आवाज आला. काहीसा कळवळतच तो ओरडला, “अहो काय करताय? “थांबा! मी भिवा मांग” लगेचचं मी खिशातला टॉर्च काढला आणि त्याच्या तोंडावर मारला. अचानक आलेल्या प्रकाशामुळे त्याने झटकन आपला हात टॉर्च समोर धरला. तो भिवा मांगच होता. त्याने घातलेला अंगरखा संपुर्ण रक्ताने माखला होता व मी मारलेल्या धक्क्यामुळे हातातला कोयता तसाच बाजुला पडला होता. त्या कोयत्यावरही रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. माझ्यातल्या संशयाची जागा आता खात्रीने घेतली. मी त्वेषाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या छातीवर बसलो. बाजुलाच पडलेला कोयता उचलुन त्याच्या गळ्याला लावला आणि जवळ जवळ ओरडतच त्याला विचारल. “साल्या काय केलस माझ्या भावाचं? का मारलास त्याला? “सांग नाहीतर इथेच गळा चिरीन. रागाने माझे हात थरथरत होते. माझ उग्र रुप पाहुन भिवा चांगलाच चरकला. “साहेब शांत व्हा. मी कशाला मारु तुमच्या भावाला. “गप्प बस बंद कर तुझ हे साळसुद पणाच नाटक खर-खर सांग तु का मारलस त्याला? कुठे आहे तो? आणि आता मला मारायला इथपर्यंत पोहचलास. “सांग लवकर का मारलसं, अरे आम्हाला मारुन अस काय मिळणार आहे तुला. “साहेब एक मिनिट ऐकुन तर घ्या माझ. “मी खरच न्हाय मारलं त्यास्नी. माझ्या बायकोच्या पोटातल्या पोराची शपथ आणि आजुनबी तुम्हासनी तसच वाटत आसलं तर खुशाल कोयता चालवा ह्या मानवर. त्याच्या ह्या वाक्याने माझ्या हातातला कोयता तसाच गळुन खाली पडला.

भिवा पुढे बोलु लागला. साहेब तुम्हासनी आठवतय दुपारी आपण वर आलो तवा कसला तरी आवाज आला व्हता. तो दुसरा कसला नसुन मी दोन दिसापुर्वी लावलेल्या सापळ्यात जनावर घावल व्हतं. आणि मी लगेच गेलो नसतो तर यावेळचं फास बी त्यान तोडुन टाकल असतं. आधीच लोकांच्या शेताची त्यानं चागलीच नासधुस केली हाय त्यामुळे ह्या येळला त्याला सोडुन चालल नसतं म्हणुन तिथच हाणल त्याला आणि धुड येवढ मोठ हाय की माझ्या एकट्याच्यान न्हाय हालायच म्हणुन तिथच फाडुन लपवुन ठेवलय म्हंजी सकाळी वाडीतली दोन तीन पोर आणुन खाली नेता येईल. माझा विश्वास बसावा म्हणुन भिवा मला फास लावलेल्या ठिकाणी घेऊन गेला. भिवाने सांगितल्याप्रमाणे खरोखरच समोर एक डुक्कर मरुन पडला होता. त्याची मान कापुन भिवाने वर फांदीला अडकवुन ठेवली होती तर उर्वरीत धडाचे चारी पाय बांधुन त्यावर कपडा ठेवला होता. सायेब मी हित असलो तरी ह्या जागेवरन बाहेरच्या दरवाजाचा पर्यंतचा परीसर दिसतो. मला वाटलं तुम्ही याल तास दोन तासात तिथपर्यंत मग तुमच्या बरोबर मीबी निघालो असतो. पण भरपुर येळ झाला तरी तुम्ही दोघबी मला परत येताना दिसला न्हाईत. त्यात मगाशी तुम्ही ज्या हाका मारल्या त्यावरुन नक्किच काहीतरी गडबड असावी अस मला वाटल म्हणुन कोयता उचलला आणि वाड्यापाशी आलो तुम्हाला शोधत. आता मला माझ्या क्रुत्याचा पश्चाताप होऊ लागला. मी भिवाची माफी मागितली. पण आता प्रश्न हा होता की पंडीतच काय झाल असेल? माझ एक काम करशील? पंडीतचा शोध घेतल्याशिवाय मी गडाच्या खाली उतरणार नाही मग माझ्या जीवाच काहीपण होवो. मला मदत करशील? साहेब तुम्ही काळजी करु नका. जमल ते सर्व करायची माझी तयारी हाय. पण आज पित्री आमावस्या हाय त्यात त्या वाड्याबाबत कसल्या कसल्या वावटळी भी मी ऐकुन हाय. त्यामुळे रातच्याला इथ थांबुन वाट बघण म्हणजे साक्षात म्रुत्युला निमंत्रन देण्यासारखं आहे. साहेब सकाळी पंडीत साहेब बी मला त्यांना झालेल्या भासाबद्दल इचारत होते. पण म्हटल उगाच का घाबरवा म्हणुन मी उत्तर द्यायच टाळत होतो. पण खर सांगु आज माझ्या बाची जी परिस्थीती हाय ती या गडावरच्या वाईट शक्तींमुळच, मला पटकण दुपारी पाहिलेल्या फोटोंची आठवण झाली. नक्की हे काय गौड बंगाल आहे ते कळायला मार्ग नव्हता. शेवटी आम्ही त्या झाडाच्या ढोलीत लपुन वाड्यात घडणार्या घटणांचा आढावा घ्यायचा ठरवलं. आमचा प्लान सिंपल होता पहाटे पर्यंत गडावर त्या ढोलीत थांबायच आणि उजाडल की पंडीतच्या शोधात निघायचं अर्थात हे आम्ही ठरवल होतं पण नक्की पुढे काय आणि कस घडणार हे येणारी रात्रच ठरवणार होती.

ढोलीत बसुन आम्हाला आता चांगले तीन एक तास होत आले होते. पण आजुबाजुला काहीच हालचाल दिसत नव्हती. भिवा तर बसल्या जागीच डुलक्या काढायला लागला होता. मध्येच मानेवर काहीतरी वळवळ झाल्याची जाणवली तस जोरात झटकल तर एक मोठी गोम सळसळत आमच्या पायातुन पुढे निघुन गेली. गोम पर्यंत ठिक होती पण एखादा साप- बिप आत घुसला तर पंचाईत व्हायची. नुस्त्या कल्पणेनेच अंगावर काटा आला. बाहेर फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता तर मध्येच एखादी माशी किंवा डास कानाजवळुन गेला की त्याच्या पंखाची भुनभुन ऐकायला येत होती. घड्याळात ११.४५ वाजले होते. अजुनही बाहेरची परिस्थिती जैसे थे. आता हा भ्रमर वर्मा वैगरे सर्व फक्त गोष्टीं मध्येच आहे की काय अस वाटायला लागल होतं. सकाळी फोटोंचा प्रसंग आणि पंडीत गायब होण्याचा प्रसंग सोडला तर सर्व काही आलबेल होतं. पंडीतच्या आठवणीने पुन्हा मन व्याकुळ होऊ लागलं. बरा तर असेल ना? की त्याच्या जीवाच काही बर वाईट? कुठे असेल? असा एखादा माणुस कसा काय गायब होऊ शकतो. खरच मोठ कोड आहे. मी विचारांमध्ये असतानाच बाहेर जोरात वारा सुरु झाला. घड्याळात बारा वाजले होते. आज पर्यंत गरजणारे चाळीस फक्त भुगोलाच्या पुस्तकातुनच माहीत होते. पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. त्या भितीदायक आवाजाने भिवा पण तरतरीत होऊन सावध झाला. आम्ही दोघेही सावध पवित्रा घेऊन बसलो. आणि थोड्याच वेळात तो वारयाचा आवाज बंद झाला तसा दुरुन घोड्याच्या टापांचा आवाज ऐकु येऊ लागला. हळु हळु तो आवाज मोठा मोठा होत एकदम शांत झाला. आणि ढोलीत मला प्रकाशाची एक तिरिप दिसु लागली. मला वाटल चुकुन खिशातला टॉर्च ऑन झाला कि काय? पण टॉर्च तर बंद होता. तस भिवाने थरथरतच मला फटीतुन बाहेर बघण्यास सांगितले. समोरचा वाडा संपुर्ण प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. आणि त्या वाड्याच्या प्रवेश द्वाराच्या मधोमध एक तरुन राजाच्या वेषात ऊभा होता. बहु तेक हाच तो भ्रम्रर वर्मा ज्याच्या आख्यायिका मी ऐकत होतो. दुरुन त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण हळु हळु तो तरुण वाड्या समोरील शिलालेखासमोर येऊन उभा राहीला आणि त्याणे राक्षसी हास्य करत त्या शिलालेखाला नमस्कार केला व एक संपुर्ण प्रदक्षिणा मारली आणि बाजुलाच उभ्या असलेल्या अरबी घोड्याच्या पाठीवर जोरात थाप मारली तस त्याच संपुर्ण अंग थरथरुन निघाल. त्याने घोड्यावर बसण्यासाठी बैठक मारली तशी आकाशात जोरात वीज कडाडली. त्या विजेच्या प्रकाशात त्याचा संपुर्ण पेहराव आणि चेहरा झळाळुन निघाला. आणि जे पाहील ते पाहुन डोळे फक्त बाहेर यायचेच बाकी होते. कारण त्या पेहरावातला तरुण दुसरा तिसरा कोणी नसुन माझा मावस भाऊ सात्विक उर्फ पंडीत होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही कारणांस्तव हा भाग लिहायला फारच ऊशीर झाला त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.

शापित गड भाग १ http://www.maayboli.com/node/49017
शापित गड भाग २ http://www.maayboli.com/node/51000
शापित गड भाग ३ http://www.maayboli.com/node/51077

छान भाग,
पण फारच छोटा....अहो श्रीमत....इतक्या दिवसांनी भाग टाकला तर तो मोठा तर टाकायचा....Anyway आता लवकर येवु द्या पुढचे भाग पटापट....उत्सुकता आहे पुढील सर्वच भागांची

- प्रसन्न

.