तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहण्याची माहिती

Submitted by आरती. on 30 December, 2013 - 04:24

तिर्थक्षेत्रांसाठी एक धागा असावा अस वाटल म्हणून हा धागा उघडला आहे. मी एक महिना सर्च करून खालील माहिती /फोन नंबर्स गोळा केले. पंढरपूर राहण्यासाठी चांगल नाही हेच प्रत्येकजण सांगत होत पण ते चुकीच ठरल.

आम्ही तिर्थयात्रेला गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर व पंढरपूरला गेलो होतो.

गांणगापूर रेल्वे स्टेशनला सकाळी ८ वाजता पोहचलो. तिथे ६ सीटर री़क्षा मिळाली. त्यांनी ३०० रु. घेतले मंदिरापर्यंत सोडायचे. सीटवर गेल तर प्रत्येकी ३० रु. सांगितले आणि १२ माणस एका रीक्षात कोंबतात. दत्त मंदिराकडे पोहचायला आम्हाला १ तास लागला. रस्ते खूपच खराब होते.
मंदिरातील दत्त स्वामी ह्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या धर्मशाळेत सोय करून दिली. एका दिवसाचे भाड २०० रु. आहे आणि गरम पाण्याची एक बादली प्रत्येकी २०रु.ला रुमवर आणून देतात. रुम्स स्वच्छ नव्हत्या पण आम्हाला फक्त काही तासांसाठी रूम हवी होती आणि मंदिराजवळ म्हणून घेतली. मंदिरात दर्शन करुन संगमावर गेलो तिथे जाण्यासाठी ६ सिटर रीक्षा मिळाली त्यांनी १००रु. घेतले जाऊन परत मंदिराकडे सोडायचे.
दत्त स्वामींना जेवण कुठे चांगल मिळेल विचारल असता मंदिरात जेवणाची सोय आहे पण १ वाजेपर्यंत चालू होत. आम्हाला वेळ कमी असल्यामूळे त्यांनी मंदिराकडे जाताना मेडीकल स्टोअरच्या समोर एक हॉटेल आहे तिथे जेवून घ्या. घरगुती जेवण मिळेल. कानडी पद्धतीच जेवण होत त्यामूळे आम्ही पोटभर जेवून घेतल. Happy
थोडावेळ रूमवर आराम करून ३ वाजता परत ६ सीटर री़क्षाने गाणगापूर स्टेशनला आलो. तिथून चेन्नई मेलने अक्कलकोटला गेलो.

अक्कलकोट स्टेशनवरून बसने अक्कल कोट डेपो आणि तिथून परत ३ सीटर रीक्षाने मंदिराजवळ गेलो. जायच्या एक दिवस अगोदर तेथील यात्री निवासचा नंबर मिळाला जे अन्नछत्रच्या बाजूला आहे. खूप दमलो होतो म्हणून त्या दिवशी बाहेरच जेवण केल. अन्नछत्रजवळच होत पण खूप लाईन होती म्हणून दुसर्‍या दिवशी प्रसाद घ्यायचा अस ठरवल.

अक्कलकोटच्या यात्रीनिवासमध्ये एसी आणि नॉन एसी रुम्स उपलब्ध आहेत. एसी रुम्सच भाड ८५०रु आणि नॉन एसी रुम्सच भाड ५०० रु. आहे. यात्रीनिवासच्या रुम्स स्वच्छ आहेत तसेच प्रत्येक रूममध्ये गरम पाण्याची सोय आहे. सकाळी ४.३० ते ७ पर्यंत गरम पाणी असत. आणि बरोबर पहाटे ४.३० ला प्रत्येक रूमचा दरवाजा दोन - तीन वेळा येऊन ठोठावून सांगतात गरम पाणी चालू झाल चेक करा. पहाटे ५.०० वाजता काकड आरती असते पण आम्ही नाही गेलो. खूप दमल्यामूळे आम्ही उशीराच उठलो. १०.०० वाजता दर्शन करून अन्नछत्रमध्ये प्रसाद घेतला. मंदिरात जातानाच ओमनी बुक केली. त्यांनी तुळजापूर आणि पंढरपूरला ड्रॉपचे २००० रु घेतले. दुपारी ३ वाजता कारने स्वामींच्या समाधीकडे गेलो आणि तिथून तुळजापूरला रवाना झालो. तुळजापूरला दर्शन करून पंढरपूरकडे गाडी वळली. वाटेत सोलापूर पूणे हायवेला जंगली हॉटेल लागत तेथून रात्रीच्या जेवणाच पार्सल घेतल. धन्यवाद मा.बो. सोलापूरकर्स Happy

इस्कॉर्न मंदिरात रुम बुक करताना त्यांनी किती वाजता येणार विचारल होत तेव्हा मी संध्याकाळचे ६.३० वाजतील अस सांगितल पण आम्ही ६.३० ला पोहचलो नाही तेव्हा त्यांनी बरोबर ६.३० ला फोन करून विचारल किती वाजेपर्यंत येणार आणि मी त्यांना सांगितल की ८- ८.३० होतील त्यांनी सांगितल काही काळजी करु नका आम्ही वाट पाहू. त्यांची सेवा पाहून खूपच छान वाटल.पंढरपूरला इस्कॉन मंदिरात रात्री ८ वाजता पोहचलो. इथे एका दिवसाच भाड ५००रु. आहे. इस्कॉन मंदिर चन्द्रभागा नदीकिनारी आहे. मंदिरात राहायची व्यवस्था खूप छान आहे. आजूबाजूचा परीसर पण खूप सुंदर आहे. भरपूर नारळाची झाड आहेत. खूप क्लिन रुम्स आहेत. गरम पाणीसाठी मजल्यावर एक नळ दिला होता.तिथून घ्याव लागल. मंदिरात सकाळी ९ आणि दुपारी ४ वाजता प्रसाद देतात. पण कुणी अवेळी आल तर त्यांना प्रसाद दिला जातो, आग्रहाने प्रसादासाठी विचारल जात. पहाटे ४.३० ला हरे कॄष्णाची आरती सुरु होते. दुसर्‍या दिवशी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेलो. आणि दुपारी पंढरपूरवरुन सोलापूरकडे रवाना झालो. सर्वात जास्त आम्हाला इस्कॉन मंदिरात खूप आवडल. तिथे आम्ही परत जायच ठरवल. मस्त ३-४ दिवस फक्त तिकडे राहायला सही आहे.

त्यांचे गो प्रॉडक्टसपण खूप चांगले आहेत. वेळे अभावी काही घेता नाही आल. गाईच तूप ८००रु किलो आहे पण खूपच चांगल आहे. बंगलोरातील आमच्या गाईची आठवण झाली तेथील गो शाळा पाहून. Sad

साई दत्त स्वामी : ०९९१६४६३६४७ ह्यांनी दत्त मंदिराच्या समोर असलेल्या धर्मशाळेत व्यवस्था केली.
बुकिंगसाठी इस्कॉन मंदिराचा नंबर - ०२१८६ - २६७२४२ / ०९१७५०४१४६२
बुकिंगसाठी अक्कलकोट यात्री निवास नंबर - ०२१८१ - २२२५८७
अक्कलकोट ड्रायव्हर पवार ह्यांचा नंबर - ९१५८८४३६४५

http://www.vitthalrukminimandir.org ह्या साईटचा बोर्ड विठठल रुक्मिणी मंदिराबाहेर पाहिला. खूप उपयोगी साईट आहे.
http://www.ganagapurdatta.com
http://srikshetraganagapur.com
गाणगापूरला जर तुम्हाला एक - दोन दिवस राहायच असेल तर वरील दोन साईटचा उपयोग होईल.

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर
http://www.mahalaxmikolhapur.com आणि प्रकाश लॉजिंग आणि बोर्डींग महालक्ष्मी मंदिराच्या समोरच आहे. रुमच्या बाल्कनीतून मंदिर दिसत खूप छान वाटत.
प्रकाश लॉजिंग आणि बोर्डींग - + 91 - 231 - 2547494

अन्जू
अंबेजोगाई येथे हॉटेल 'कृष्णाई' परळी रोडवर आहे. फोन नं. ०२४४६- २४५२६६, २४७६०६. त्यांची वेबसाईट आहे.www.hotelkrushnai.com

Srd
१. गोंदवलेत राहाण्याची (+जेवण्याची) नि:शुल्क व्यवस्था संस्थानाचीच आहे .भरपूर खोल्या आहेत .तीन दिवस राहाता येते .(बाफ http://www.maayboli.com/node/46258 )

२. ओंकारेश्वर -खांडवा(५५०किमी मुंबई) येथे उतरून नैरोगेज रेल्वे अथवा बसने पन्नास किमी .
पुढे इंदुरचे महांकाळेश्वर
व्हाया माहेश्वर.(४०+८०किमी)
उजैन आणखी चाळीस किमी आहे .उजैन सप्तपुरींपैकी एक आहे .पन्नास रुपयात उजैन दर्शन सहल असते .क्षिप्रा नदी भात्र आता 'तीर्थ' राहिली नाही .मंगळाचे देऊळ खास आहे .
या ८०किमी च्या परिसरांत खूप हॉटेल्स आणि धर्मशाळा आहेत .पुण्य गोळा करण्यास भरपूर वाव आहे .नर्मदा दर्शन .

३. गोकर्ण -
कोकण रेल्वेने .रम्य ठिकाण
समुद्रकिनारा .

४. अंबाजी -
राजस्थान सहलीत माउंट
अबू शेवटचे ठिकाण असेल तर अंबाजीला जाऊन संध्याकाळची पाचची अवंतिका इक्सप्रेस आरामात मिळते .एसी तिकीट असल्यास अबूरोड स्टेशनची मडक्यातली रबडी आणता येते .

इंद्रधनुष्य

नृसिंहवाडीला एस्टी डेपो समोर हॉटेल गुरुदत्त मधे AC, Non AC, Dormitory ची चांगली सोय आहे.

पंढरपुरला गजानन महाराज संस्थानात रहाण्याची चांगली सोय होते.

तिरुपती बालाजी
http://www.tirumala.org/acco_tpt.htm

श्रीशैलमला पाताळेश्वर आणि चंदेश्वर सदन मंदिरा जवळ आहेत.
http://srisailamtemple.com/Srisaila_devasthanam/accommodation.html

गमभन
शिर्डी संस्थानाच्या भक्तनिवासातील खोल्या ऑनलाईन देखील बुक करता येतात.

https://online.sai.org.in/landingPage.do

माबोकरानो बाकिच्या तिर्थ़क्षेत्रांच्या ठिकाणी राहण्याच्या व्यवस्थेबद्द्ल तुम्हाला काही माहिती असेल तर इथे नक्की शेअर करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान माहिती आरती , धन्यवाद. तिर्थयात्रेला जाणे होतेच, वरील माहिती उपयुक्त आहे.

मध्यंतरी आम्ही कोल्हापूरला देवीला अभिषेक करायला पण HOTELS किंवा राहण्याची सोय माहित नाही त्यामुळे खूप हाल झाले.

कोल्हापूरच्या महलक्ष्मी च्या दर्शनासाठी आणि अभिषेकासाठी माहिती असेल तर द्यावी.

अंबेजोगाईला आम्ही 'कृष्णाई' हॉटेलमध्ये राहिलो होतो, रूम्स आणि जेवण दोन्ही छान होते. देवळाजवळ भक्त निवास आहे तिथेही चांगली सोय होते असे परिचितांनी सांगितले. आमचे हॉटेल थोडे लांब होते आणि आम्ही डोंबिवलीहून travellsतर्फे बुकींग केल्याने आम्हाला नॉन एसीचे पर रूम भाडे ७०० पडले पण प्रत्यक्षात ५५०रु. भाडे होते. आमच्याबरोबर जेष्ठ नागरिक आणि लहान मुले असल्याने आम्ही इथेच हॉटेल बुकिंग करून जायचे ठरवले. आम्ही १२-१३ नोव्हेंबरला जाऊन आलो. zylo गाडीने गेलो त्यामुळे प्रवास सुखकर झाला आणि देऊळ आणि हॉटेल ह्यात अंतर असले तरी त्रास काही झाला नाही.

धन्यवाद dmugdha, गुलमोहोर, अन्जू. अन्जू हॉटेलचा फोन नंबर असेल तर द्याल का??
गुलमोहोर, http://www.mahalaxmikolhapur.com आणि प्रकाश लॉजिंग आणि बोर्डींग महालक्ष्मी मंदिराच्या समोरच आहे. रुमच्या बाल्कनीतून मंदिर दिसत खूप छान वाटत.
प्रकाश लॉजिंग आणि बोर्डींग - + 91 - 231 - 2547494

गाणगापुर ऐवजी अक्कलकोट ला मुक्काम केल्यास जास्त सोईस्कर पडले असते.

अक्कलकोट ला रहाण्याची सोय गाणगापुर पेक्षा चांगली आहे. आमचा ग्रूप दरवर्षी जातो तेव्हा आम्ही जाताना सुमो ने किंवा जास्त लोक असतील तर टेम्पो-ट्रॅव्हलर बुक करुन जातो. जाताना निरा-नृसिंहपुर - तुळजापुर - करुन संध्याकाळ पर्यंत अक्कलकोट ला भक्तनिवासात मुक्कामी थांबतो. दुसर्‍या दिवशी गाणगापुर करून परत अक्कलकोट मार्गे पुणे

अक्कलकोट चे भक्तनिवास मला यात्रानिवास पेक्षा चांगले वाटले. आजिबात गडबड गोंधळ नसतो तिथे.मठापासून गाणगापुर रोडवर फक्त १ किमी वर आहे

स_सा, आमच्या ईकडच्या ट्रेन्स अक्कलकोटला थांबत नाहीत आणि गाणगापूर ते अक्कलकोट रोड प्रवास करायचा नव्हता. तेथील रस्ते खराब आहेत.

यात्रीनिवासमध्ये अगोदर बुकिंग करता येते पण भक्त निवासमध्ये अगोदर बुकिंग ही फक्त मोठ्या देणगीदारांसाठीच असते. तिथे गेल्यावर भक्तनिवासच्या रुम्स रिकाम्या असतील तरच इतरांना देण्यात येतात. यात्रीनिवासमध्ये आम्हाला कुठेही गडबड गोंधळ आढळला नाही. यात्रीनिवास ही सर्वात शेवटची बिल्डिंग आहे आहे अन्नछत्रच्या इकडून.

मठापासून गाणगापुर रोडवर फक्त १ किमी वर आहे <<< ???

तिथे दोन भक्त निवास आहेत
१. यात्री निवास - अन्नछत्राच्या पुढे (अन्नछत्र मंडळाचे)
२. भक्त निवास -मठापासून गाणगापुर रोडवर फक्त १ किमी वर

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आगोदर बुकिंग किंवा फोनवर भक्तनिवासात बुकिंग होत नाही
http://wikimapia.org/#lang=en&lat=17.518889&lon=76.209465&z=18&m=b&permp...

यात्रीनिवासमध्ये फोनवर बुकिंग होत आणि आम्ही फोनवर बुकिंग करूनच सर्व ठिकाणी गेलो होतो. Happy
यात्रीनिवासचा फोन नंबर वर दिला आहे त्या नंबरवर बुकिंग केल होत. तुम्हीसुध्दा फोन करुन पहा.

अंबेजोगाई येथे हॉटेल 'कृष्णाई' परळी रोडवर आहे. फोन नं. ०२४४६- २४५२६६, २४७६०६. त्यांची वेबसाईट आहे.www.hotelkrushnai.com

अंबेजोगाई येथे यात्रीनिवास(भक्तनिवास) आहे तिथेपण चांगली सोय होते असे ऐकले, ते देवळाच्या अगदी जवळ आहे, कोणाला माहिती असेल तर इथे लिहा.

इस्कॉन चंद्रभागेच्या तिरावर स्टेशनच्या बाजूला का गोपाळपूर कडे आहे ?
.दर्शन झाल्यावर गोंदवले गाठले .

आरती ,बाकी माहिती प्रत्यक्ष जाऊन आल्यावर रूम भाडे ,रिक्षा भाड्यासह दिलीत हे फार छान केलेत .धन्यवाद .

अक्कलकोट ,गाणगापुर सारख्या तिर्थक्षेत्री सातशे आठशे रुमभाडे जास्ती वाटते .(नवीन इमारती असतील तर साहजिकच आहे).
अंजू धन्यवाद .

आन्जू , मी वर यात्री निवासचा नंबर दिला आहे जे स्वामींच्या मंदिराजवळ आहे. भक्तनिवासमध्ये फक्त देणगीदारांच बुकिंग घेतल जात.

Srd, विठ्ठ्ल रुक्मिणी मंदिराच्या बाजूने चंद्रभागा नदि आहे बरोबर त्याच्या पलिकडच्या साईडला इस्कॉन मंदिर आहे. .गोंदवले येथे राहण्याबद्द्ल माहिती द्याल का?

धन्यवाद नंदिनी, आन्जू, Srd.

अक्कलकोटला अन्नछत्रच्या पुढे यात्रीनिवास आहे तो बांधायच्या आधी आम्ही वटवृक्षमठाच्या समोरील मुरलीधरमंदिरातही राहिलो आहोत २-३ वेळा.

आम्ही अशी ट्रिप केली होती -
शुक्रवारी हुसेनसागर एक्स्प्रेसने (आता ही गाडी आहे की नाही माहित नाही) सकाळी गाणगापूर रोड. तिथून एस.टी.ने गाणगापूर स्टँड, स्टँडजवळच गुरुजींकडे खोली घेतली. तिथून रिक्षाने मंदिर, अमरजा संगम, भस्माचा डोंगर वगैरे करुन जेवून दुपारच्या २.३०-३.०० च्या एस.टी. ने अक्कलकोट. रात्री अक्कलकोटला यात्री निवासमध्ये मुक्काम. ह्या मुक्कामी अन्नछत्रात प्रसादाचे जेवण, वटवृक्षमठ्/चोळाप्पा मठ दर्शन आणि राजवाडा. रात्री शेजारती. सकाळी यात्री निवासच्या परिसरातून सुटणार्‍या पंढरपूर एस.टी.ने पंढरपूर गाठले. तिथे चंद्रभागा ओलांडल्यावर एस.टी. स्टँडला न जाता वाटेत उतरुन मधल्या गल्लीमधून विठ्ठल मंदिर. वाटेत एका दुकानात सामान सांभाळायला ठेवले. त्याच दुकानातून उदबत्त्या, कुंकू, अष्टगंध वगैरे खरेदी. मनसोक्त दर्शन झाल्यावर देवळातली प्रसादाच्या जेवणाचं बुकिंग संपल्याने लाडवांचा प्रसाद घेऊन बाहेर हॉटेलमध्ये जेवून थोडावेळ चंद्रभागेच्या वाळवंटातली देवळे बघत परत त्या दुकानात सामान घेण्यासाठी आलो. रिक्षा पकडून पंढरपूर एस.टी. स्टँड. तिथून तुळजापूर एस.टी. पकडून तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सोलापुर एस.टी. पकडली. सोलापुरात आल्यावरही रात्रीच्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला वेळ होता त्यामुळे सिद्धेश्वर मंदिर बघून घेतले वर रेल्वे स्टेशनसमोरच्या हॉटेलमध्ये जेवून घेतले.

पुर्ण एस.टी आणि रेल्वेने प्रवास केला तरी सगळं कनेक्टिंग मिळाल्यामुळे अजिबात धावपळ न होता दोन दिवसांत मस्त ट्रिप झाली.

गोंदवलेत राहाण्याची (+जेवण्याची) नि:शुल्क व्यवस्था संस्थानाचीच आहे .भरपूर खोल्या आहेत .तीन दिवस राहाता येते .(बाफ http://www.maayboli.com/node/46258 )

चंद्रभागेपलीकडे (जुने गाव )स्वच्छ असणार .गर्दी या बाजूला असते .

गुजरातमधिल अंबाजी तीर्थक्षेत्र(अबू रोड स्टे पासून अकरा किमी ) येथे धर्मशाळा चोवीस तासाचे ३५रु (२००३साली) होते ज्यावेळी रेल्वेचे क्लोकरूम एका बैगेचे सात रु होते .तरीही एक भाविक आम्हाला सांगत होता की हे धर्मशाळावाले 'लुटतात' सात रुपयेवाला लॉकर देत नाहित !

आरती, मी अंबेजोगाई येथे जो यात्रीनिवास आहे त्याबद्दल विचारलं आहे (वरती अंबेजोगाई असे लिहायला विसरले, आता बदल केला), तिथेपण चांगल्या रूम्स आणि चांगली रहायची सोय आहे असे ऐकून आहे.

छान धागा उपयुक्त माहिती

पंढरपुरात राहण्यासाठी उत्तमोत्तम धर्मशाळा आणि हॉटेल्स ढिगानं आहेत इस्कॉन नदीच्या त्या बाजूला आसल्याने कुत्रेही फिरकत नाही तिकडे त्यामुळे तुम्हाला तसे वातावरण मिळाले असेल पण खरी मजा गावातच
अगदी स्वस्तात्ल्यापासून खूप महागड्या राहण्याच्या जागा आहेत पंढरपुरात ..१००- १५० पासून ३-४ हजार पर्यंत ...
आणि महत्त्वाचे म्हणजे पंढरपुरात माझे घरही आहे(इथे आधी माझ्या बाबाना विचारून फुकटात व्यवस्था होवू शकेल :))

धागा तीर्थक्षेत्राबद्दल आहे म्हणून महाराष्ट्राबाहेरची आठशे किमीटरातील ठिकाणे सुचवतो .

१ओंकारेश्वर -खांडवा(५५०किमी मुंबई) येथे उतरून नैरोगेज रेल्वे अथवा बसने पन्नास किमी .
पुढे इंदुरचे महांकाळेश्वर
व्हाया माहेश्वर.(४०+८०किमी)
उजैन आणखी चाळीस किमी आहे .उजैन सप्तपुरींपैकी एक आहे .पन्नास रुपयात उजैन दर्शन सहल असते .क्षिप्रा नदी भात्र आता 'तीर्थ' राहिली नाही .मंगळाचे देऊळ खास आहे .
या ८०किमी च्या परिसरांत खूप हॉटेल्स आणि धर्मशाळा आहेत .पुण्य गोळा करण्यास भरपूर वाव आहे .नर्मदा दर्शन .

२ गोकर्ण -
कोकण रेल्वेने .रम्य ठिकाण
समुद्रकिनारा .

३ अंबाजी -
राजस्थान सहलीत माउंट
अबू शेवटचे ठिकाण असेल तर अंबाजीला जाऊन संध्याकाळची पाचची अवंतिका इक्सप्रेस आरामात मिळते .एसी तिकीट असल्यास अबूरोड स्टेशनची मडक्यातली रबडी आणता येते .

वरील तीर्थक्षेत्रीं देव जरी भेटला नाही तरी चित्तवृत्ती आनंदी होण्याची ग्यारंटी .

अक्कलकोट चे भक्तनिवास मला यात्रानिवास पेक्षा चांगले वाटले. आजिबात गडबड गोंधळ नसतो तिथे.मठापासून गाणगापुर रोडवर फक्त १ किमी वर आहे >> +१

नृसिंहवाडीला एस्टी डेपो समोर हॉटेल गुरुदत्त मधे AC, Non AC, Dormitory ची चांगली सोय आहे.

पंढरपुरला गजानन महाराज संस्थानात रहाण्याची चांगली सोय होते.

शुक्रवारी हुसेनसागर एक्स्प्रेसने (आता ही गाडी आहे की नाही माहित नाही) सकाळी गाणगापूर रोड. <<< अश्विनी, अजून ती ट्रेन आहे आम्ही त्याच ट्रेनने गेलो होतो आणि मुंबई -हैद्राबाद ह्याचे ट्रेनने जातो.
धन्यवाद सर्वांना.
महाराष्ट्राबाहेरील तीर्थक्षेत्रांबद्द्लही माहिती द्या. उपयोगी पडेल.
गमभन धन्यवाद तुमच्यामूळे हा धागा उघडला. Happy

शिर्डी प्रमाणेच तिरुपती बालाजी आणि श्रीशैलमचे ऑनलाईन बुकिंग करता येते.

तिरुपती बालाजी
http://www.tirumala.org/acco_tpt.htm

श्रीशैलमला पाताळेश्वर आणि चंदेश्वर सदन मंदिरा जवळ आहेत.
http://srisailamtemple.com/Srisaila_devasthanam/accommodation.html

आरती चांगला धागा.. उत्तरामधील माहिती किंवा स्थानानुसार पान क्र. वरती संकलीत केल्यास जास्त उपयोगी होईल.

सामी, वेका धन्स.
उत्तरामधील माहिती किंवा स्थानानुसार पान क्र. वरती संकलीत केल्यास जास्त उपयोगी होईल. << वेका, वरती संकलीत केली.

Pages