"एकशे पंधरा रुपये" रिक्शा वाल्याने पुन्हा एकदा सांगीतले तशी तनया भानावर आली.
पर्स मधुन तिने पैसे काढुन त्याच्या हातावर ठेवले. आज नेहमीचेच ठि़काण तिला अनोळखी भासत होते. याच शहरात तर तिने तिच्या कॉलेजचे सोनेरी दिवस व्यतीत केले होते. याच ठीकाणी कित्येक मित्र मैत्रिणींचे वाढदिवस आणि नंतर एकेकांचे जॉब सुरु झाल्यावर सेलिब्रेशन केले होते.आणि याच ठिकाणी.... तिची आणि तेजस ची पहिली ओळख झाली होती.
आज कित्येक दिवसां नंतर तनया पुण्यात येत होती. दिवस कोठे जवळपास तीन एक वर्षे झाली असतील आता.कॉलेज संपले त्यानंतर काही दिवस सगळा ग्रुप जमेल तसे भेटत होता. हळुहळु प्रत्येक जण आपापल्या विश्वात गुतंत गेला. क्वचित कधी वाढदिवस विश करणे वगैरे कारणे सोडली तर प्रत्येक जण बिझी होत गेला. बहुतेक सगळ्या मैत्रिणी सुखाने संसार करण्यात रमल्या. नाही म्ह्णायला सुनेधा आणि मिता अजुनही पुण्यातच होत्या.
सुनेधा ने खुपच आग्रह केला म्ह्णुन आज तनया मिताच्या लग्ना नंतर लगेच परत जायचा बेत रद्द करुन आणखी दोन दिवस सुनेधा सोबत रहायला तयार झाली. पुढच्या सहा महिन्यातच सुनेधा पण लग्न करुन अरुण सोबत अमेरिकेला जाणार होती. आणि मग मात्र तनया एकटी पडणार होती.
खरे तर तेजस ला भेटायचे नाहीच असे तिने मनाशी पक्के केले होते. म्हणुनच " जमले तर येईन , पण जास्त वाट नको पाहुस. नक्की सांगु शकत नाही " असे त्याला फोन वर सांगुनही पाय मात्र आपोआप वैशाली कडे वळत होते.
नेहमी प्रमाणे तेजस आज पण उशीरा येणा हे तिने ग्रुहित धरले होते आणि मनाची तयारी केली होती. आता थोड्यावेळ सुमेधा सोबत फोन वर बोलावे कि आधी घरी कॉल करावा असा विचार करत तिने वैशाली मधे पाऊल टाकले. आश्चर्याचा सुखद धक्का बसला तनया ला. तेजस नेहमीच्या टेबला जवळ बसुन तिचीच वाट पहात होता.
काय बोलावे ते तनया ला सुचत नव्हते. तेजस... तेच रोखलेले डोळे, तेच मिस्किल हसु आणि तेच प्रसन्न व्यक्तिमत्व.
"अग वेटर दोन वेळा येवुन गेला, काय मागवायचे? मला तर खुप भुक लागली आहे. " तेजस बोलत होता.
तिलाही खुप काही विचारायचे होते, सांगायचे होते. पण त्याच वेळी एक मन म्हणत होते... आधीचे सगळे विसरलीस तु?
" सकाळपासुन नाष्टा पण नाही केला मी "... तेजस अजुन बोलतच होता. जणु मधला काळ थांबला होता. अगदी कालच भेटुन आज परत भेटत होती ती दोघे.
"का?" तनयाने दुसरे काहीच न सुचुन विचारले.
"तुला भेटायचे होते ना! काहिच सुचत नव्हते त्यामुळे. " तेजस ने हसुन उत्तर दिले. त्याच्या आवाजात एक प्रकारचा कंप जाणवला तनया ला. पण क्षणभरच. लगेच त्या जागी त्याचा नेहमीचा बेफिकिरपणा आला.
"हं, काही मागव" तनया नेहमी प्रमाणे भावुन न होता बोलत होती. तिचा आवाज आज तिला स्वतःलाच अनोळखी वाटत होता.
" आधी दोन कप कॉफी, अगदी तुझ्या आवडीची आणि तुझ्यासारखीच कडवट " त्याने हसतच दोन कप कॉफी मागवली.
तिला आठवले तो नेहमीच तिच्या कॉफिवरुन तिला चिडवायचा. आणि मग हलकेच तिचा रुसवा घालवण्यासाठी प्रयत्न करायचा. पण आज परत या सगळ्यात तिला गुंतायचे नव्हते.
" मग काय म्हणतेस?"
"मी काय म्ह्णणार, मजेत आहे. तु बोल, सध्या काय सुरु आहे?"
"मी आता घरच्या बिझनेस मधे उतरलो आहे. सुरवातीला थोडा त्रास झाला. पण आता छान जम बसला आहे.आता पप्पा पण खुप कमी वेळ देतात या बिझनेस मधे.त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. बिझि झालोय खरा त्यामुळे."
" अरे वा! तु चक्क सुधारलास की " तनया ने टोमणा मारला.
पण तेजस ने नेहमी प्रमाणे हसण्यावारी नेत विचारले " पण मी बिघडलो कधी होतो?"
तेजस आधी पेक्षा बराच समंजस वाटत आहे का आज? तनया विचार करत होती.
तेजस मात्र नेहमी प्रमाणे अखंड बड्बड करत होता.
"मग लग्न कधी करते आहेस?" अचानक सिरियस होत त्याने विचारले.
माझ्या लग्नाची बोलणी सुरु आहेत असे तिनेच त्याला तीन वर्षांपुर्वी सांगीतले होते.
हा प्रश्न इतक्या लवकर विचारला जाईल असे अपेक्षित नसल्याने ती गोंधळली.
" अजुन नाही ठरले कधी ते. त्या आधी मुलगा पसंद करायला हवा ना..."
तिच्या ताटातली ईडली उचलत त्याने परत बेफिकिर होत विचारले " बोला आता इथुन कोठे जायचे? "
कमी बोलायचे आणि लगेचच निघायचे असे तिने येतानाच जरी ठरवले असले तरी तिला बोलते कसे करायचे हे तेजस ला चांगलेच माहिती होते. आणि त्याच्या सोबत असताना तीचा रुसवा कसा पळुन जातो हे देखिल त्याने बरेच वेळा अनुभवले होते.
"अग तु एकटिने इतक सगळ खाल्लंस तर जाडी होशील. मग लग्न कोण करेल तुझ्या सोबत? "
"तु बदलला नाहिस."
तनया चा निश्चय फार काळ टिकु शकला नाही.
"का? कोणीच नाही मिळाला, तर तु तितकासा काही वाईट नाहीस" तनया पुर्वी प्रमाणेच बोलुन गेली.
आपण असे बोलायला नको होते असे तिला वाटायला लागले.
पण या वेळि लगेच तेजस ने तिच्या डोळ्यात पहात शांतपणे उत्तर दिले..." मी तयार आहे. तु बोल"
तो तिच्या उत्तराची वाट पहात राहिला.
तेजस मनापासुन विचारत आहे कि नेहमी प्रमाणे तिची चेष्टा करत आहे ते तिला समजत नव्हते.
" चल आता. मला लवकर परत जायचे आहे "मनावर मोठ्या कष्टाने ताबा ठेवत ती इतकेच बोलु शकली.
" जाशील गं! इतनी भी क्या जल्दी?
पुन्हा परत भेट होईल याची खात्री तर नाहीच, पण निदान आता भेटलोच आहोत तर आजचा दिवस तर सोबत घालवु"
त्या नंतर मधल्या काळचा दुरावा विसरुन ती दोघे बराच वेळ भटकत राहीली. तनया सारखी स्वतःला बजावत राहिली...हे फक्त आजच्या पुरतेच. आता तेजस चा आणि आपला मार्ग पुर्णपणे वेगळा आहे. परत एकदा त्याच्या मधे गुंतणे भावनिक रित्या तिला परवडणारे नव्हते. इतक्या कष्टाने तिने स्वतःला सावरले होते, आता परत एकदा ते दिव्य तिला जमेलच असे नाही हे तिला पक्के ठावुन होते.
तेजस मात्र अगदी नेहमी प्रमाणे वागत होता. निदान वरकरणी तसे दाखवत तरी होता.
"तु खुष आहेस ना तेजस?"
"हो का नाही? आणि तु? तुझे कसे सुरु आहे?"
" सध्या नागपुरातच ईंटिरियर ची कामे घेत आहे. चांगला जम बसतो आहे. बाबांच्या साईटचे बरेचसे क्लायंट्स घराचे काम होताच , ईटीरिअर डिझाईनिंग साठी माझ्याकडे येतात."
" माझ्या एका मित्राला मदत हवी आहे. पुण्यातली कामे घेणार असशील तर मी बोलतो त्याच्या सोबत. "
"बघु , नंतर सांगते"
दुपार आणि मग संध्याकाळ कधी झाली दोघांनाही समजले नाही.
"चल एक कप कॉफि घेवु आणि मग निघु."
तनया शांतपणे तेजस सोबत चालत राहिली. दोघांच्या मनात अनेक विचार येत होते.पण दोघेही शांत रहायचा प्रयत्न करत होते.
तिचा हात हाता मधे घेत त्याने तिच्या कडे पाहिले. त्या नंतर तिला जाणवत राहिले वरकरणी जरी नेहमीचा बेफिकिरीचा भाव असला तरी तेजस खुप समंजस झाला होता. आता परत जाताना मनातुन तिच्या इतकाच भावुक झाला होता.
तेजस तोच होता. आधी सारखाच. पण तिच्यातिल तनया ला मात्र ती सारखी थोपवत होती.
तिला घरी सोडुन तेजस परत निघाला.
तेजस जाताच सुनेधाने विचारले "काय अगं? किती वेळ? तुझा फोन पण बंद होता. मला उगाच टेंन्शन आले. चल आता , तु फ्रेश हो आणि मग बोलु."
सावरण्यासाठी तनया ला देखिल थोडा वेळ हवाच होता. आता सुनेधा प्रश्नांची सरबत्ती करणार हे तिला ठावुन होते.
" तुम्हा मैत्रिणींच्या गप्पा चालु राहु द्या. रात्री वाटलेच तर दुध ठेवले आहे गॅसवर. चहा, कॉफि करुन घ्या. नंतर फ्रिज मधे ठेवायला विसरु नका गं . आणि जमलेच गप्पांमधुन वेळ मिळालाच तर थोडी झोप पण घ्या हो " सुनेधा च्या आईने बजावले. त्यांना माहिती होते दोघी आता निवांत गोन ते तीन तास बोलत बसणार. आधी अभ्यासा साठी त्यांना सतत बोलणे आवरुन अभ्यास करा असे सांगावे लागे. आता तर काय कॉलेज पण नव्हते आणि अभ्यास पण.
आई झोपायला जाताच सुनेधाने सुरवात केली.
" तुझे नक्की काय आणि कोठे अडले आहे ?"
बराच वेळ मग त्या दोघी बोलत राहिल्या.
बर्याच उशीरा तेजस चा फोन आला. सुनेधा वैतागुन झोपायला निघुन गेली.
फोन वर बोलण्यात परत तास दिड तास कसा गेला तनया ला समजलेच नाही.
परत एकदा भेटायला आपण तयार का झालोत याचे स्वतःशीच आश्चर्य करत तिने आता दोन दिवस त्याच्यासोबत घालवायचे , न जाणो पुन्हा भेट होईल ना होईल असे ठरवले.
दुसर्या दिवशी ती, तेजस आणि सुनेधा दिवसभर भटकत राहिली. तिघे जणु परत एकदा कॉलेज मधले दिवस अनुभवत होते. तेजस सुनेधा ची नेहमीप्रमाणेच थट्टा करत होता. आता तर ती लवकरच बोहल्यावर चढणार होती. तनया मात्र बरीचशी अलिप्त होती या सर्वा पासुन.
"आपण तेजस च्या बाबतीत आता अशा अलिप्त का वागतो असे सुनेधा विचारत होती, काय समजावणार तिला?" तनया मनात म्ह्णाली.
याच तेजस वर तनयाने जीवापाड प्रेम केले होते. तिचा स्व्भावच असा होता कि प्रत्येक गोष्टित मनापासुन झोकुन देणे. मग तो अभ्यस असो, मैत्री असो अथवा मदत. आणि हे तर चक्क प्रेमात पडली होती ती.
तेजस ला कळत होत्या तिच्या भावना. पण प्रत्येक गोष्टिचा सारासार विचार करणारा, पण प्रत्यक्षात मात्र वरकरणी बेफिकिरी चेहर्यावर बाळगणारा मुलगा होता हो.पण मनाने तो किती हळवा आहे हे तनयाने चांगलेच अनुभवले होते.
ती दोघे दिवसातला बराच वेळ एकत्र घालवत. अभ्यास, प्रोजेक्ट्स, खरेदी, मित्र मैत्रिणी. तेजस पुण्याचा तर तनया शिक्षणासाठी पुण्यात आली होती.
तिची काळजी घेत तिला जपत असतानाच आपल्याला तिच्या प्रेम भावना कळतच नाहीत असा भाव चेहर्यावर ठेवायला तो विसरत नसे.
दिवस, महिने जात होते. शेवटचे वर्ष सुरु झाले.
"असे किती दिवस आपण एकमेकांना टाळणार आहोत? कधी ना कधी हा विषय बोलावा तर लागणारच ना?".. तनया
"कसला विषय?"
"वेड पांघरुन पेडगावला नको जावुस"
"हे कोणते गाव? प्रथमच नाव ऐकतो आहे" चेहरा शांत ठेवत तेजस म्ह्णाला. आणि तिच्या कडे पाहुन हसायला लागला.
" बर नाही हसत मी. मग तर खुष?" थोडे सिरियस होत तेजस म्ह्णाला. " हे प्रेम वगैरे काही नसत गं. "
"म्ह्णजे तुला माझ्या बद्दल खरेच काही भावना नाहित?"
" काय वाटायला हवे? हे पहा असे काही नाही. आणि तु पण आता जास्त विचार करु नकोस. त्रास होईल फक्त मिळणार तर काहिच नाही"
" पण मला नकोच आहे काही. एखादं माणुस आपल्याला आवडत याचा अर्थ आपण त्याला आवडायलाच हवं असे कोठे आहे? मला तु आवडतोस. पण त्या बदल्यात मला काहिच नको आहे. शेवटचे काहीच महिने राहिलेत आता. आनंगाने राहु. मला रडत बसायचे नाही. "
" बघ रडायचे नाही म्ह्णताना पण रडते आहेस वेडाबाई. म्ह्णुनच म्हणतो आहे, आता भेटणे कमी करायला हवे. कसे होणार तुझे? "
" आपण तर रोज भेटतोच ना? मग आता तु मला आवडायला लागलास तर असा काय मोठा फरक पडतो? नाही तरी तुला कशाचाच फरक पडत नाही ना?"
दिवस जात होते. तनयाला माहिती होते तेजस आणि ती एक होणे जवळपास अशक्य आहे. तरिही ती मात्र त्याच्यावर मनापासुन प्रेम करत राहिली. त्यात आता समंजसपणाची भर पडली. दुरावण्याचे दिवस जवळ येत होते.पण आता तनयाची मानसिक तयारी झाली होती. झाली होती कि तेजस करुन घेत होता हे ठरवणे कठिण होते. पण या दिवसांची शिदोरी आयुष्यभर पुरेल असे तिला वाटत होते तर तो सतत या गोष्टी काळाच्या ओघात मागे पडतील असे समजावत होता.
तेजस ने आपले मन शेवटच्या दिवसापर्यंत मोकळे केले नाही.
अजुन दोन आठवडे आणि आता परत जायचे हे आठवुन तिचे डोळे भरुन येत होते.
घरातुन सारखे फोन येत होते. परिक्षा संपल्या होत्या, आता तिने लवकर परत यावे असे घरच्यांना वाटत होते. सगळ्याच मैत्रिणींनी अजुन आठ दिवस एकत्र घालवुन निघायचा निर्णय घेतला होता.
तेजस ने आज पर्यंत प्रत्येक ठीकाणी तिला सोबत केली होती. पण नेहमीच तो आपला वाटता वाटता परका बनत असे. तिचा प्रत्येक हट्ट पुरवत असतानाच आता हट्ट कमी करा, शहाणी हो जरा असे बजावत असे. परत भेटनार नाही असे म्ह्णत असतानाच पुढच्या भेटी ठरत असत.
त्याचे तिच्या बद्दलचे प्रेम त्याच्या प्रत्येक क्रुती मधुन जाणवत असे. पण जणु कबुल करायचे नाही अशी प्रतिज्ञा केली होती त्याने. त्या मागे तशीच काही कारणे होती. पण जर आपण आपल्या भावना व्यक्त त केल्या तर तनया जास्तच गुंतेल हे त्याला माहिती होते.
आणि नाही केल्या तर ती रागावेल, चिडेल असे त्याला वाटले होते. पण झाले उलटेच. तनया ने सगळे हसत मुखाने सहन केल होते.
निघण्यापुर्वी सगळ्या मित्र परिवाराला तेजस ने घरी बोलावले होते. सतत जीन्स आणि टी शर्ट मधे असणार्या आणि मेक अप करणे म्हणजे शिक्षा आहे असे मानणार्या तनयाने साडी, मॅचिंग बांगड्या टिकली या सर्वाने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.
आज तिला परत एकदा त्याच्या आणि तिच्या घरातील फरक प्रकर्षाने जाणवला. त्याच्या घरात त्याची वहिनी अगदी डोक्यावर पदर घेवुन सर्वांना हवे नको पहात होती. पण घरातील सर्वजण खुप प्रेमळ होती.
आज मात्र निघण्याच्या आधी एक दिवस ती प्रथमच लहान मुला प्रमाणे रडत होती.
" तेजस का रे असा वागतोस? मला काही नको रे. मी लग्नच कर असे नाही म्ह्णत तुला. आणि तुला जर खरेच माझ्याबद्दल काही प्रेम नसतेच तर ते हि मान्य होते मला. पण तुला जे वाटते ते कबुल का नाही करत तु?......." तनया बोलत होती , रडत होती.
" सांगुन काय फरक पडणार होता? माझ्या आणि तुझ्या घरात जमीन आस्मानाचा फरक आहे. आपल्या दोघांना यची पुर्ण जाणीव आहे. तु पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जावे असे तुझ्या घरच्यांना वाटते. आपले घरचे कदाचित आपल्या प्रेमाखातर या लग्नाला तयार होतीलही. पण मला ते पटत नाही. मनापासुन वाटणे आणि आपल्यासाठी तयार होणे यात फरक आहे. तुझ्या किंवा माझ्या कोणाच्याच घरातील वडिलधार्या व्यक्तिला दुखावुन मला पुढे जायचे नाही. तुला माझ्या पेक्षा खुप चांगला मुलगा मिळेल......" तेजस प्रथमच इतका हळवा झाला होता.
" पण एकदा तरी कबुल कर ना ... तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही?"
त्यानंतर तनया ने पुणे सोडले. मध्यंतरी एकदा ईथे आली होती. स्नेहल चे लग्न ठरले होते. ग्रुप मधले पहिलेच लग्न. त्या वेळी मात्र ती बरीच सावरली होती. तेजस ला चांगलेच जानवले होते ते.
त्या वेळी जाताना तिने सांगीतले होते, " हा माझा नंबर. फेन कर असे नाही सांगणार. कारण मी सांगीतले तर तु करशीलच याची खात्री आहे मला. आणी मला तेच नको आहे.तुला स्वतःहुन वाटले तर मात्र नक्की कर. माझे काही चुकले असेल तर मला माफ कर. "
तेजस बोलला काहीच नाही, पण आज मात्र चेहरा ठरवुनही कोरा ठेवणे जड जात होते त्याला.
" मला माहिती आहे तुला माझी आठवण येणार , पण करावा वाटला तरी तु सहज असा फोन करणार नाहिस. ए पण मला विसरु नकोस हं ... सांगुन ठेवते " एकाच वेळी डोळ्यात आसु आणि ओठांवर हसु घेवुन तनया बोलत होती.
" विसरायचे ठरवले तरी तु विसरु देशील का?"
" ते ही खरेच म्हणा. खरच माझ्या इतके डोके खाल्ले नसेल ना कोणी तुझे?"
दोघेही वातावरणातला ताण हलका करण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहीले.
काही दिवसांनी फोन कमी होत गेले. सर्वच जण कामामधे बिझी होत गेले. तनया ने पुढच्या शिक्षणाची तयारी सुरु केली.
एकदा तेजस ला फोन करुन घरा मधे लग्नाची बोलणी सुरु आहेत असे तिने सांगीतले. हे सांगताना तिच्या आवाजात अजिबात कंप नव्हता. तिने स्वतःला चांगलेच सावरले होते आता.
" काय ग? कसला विचार करतेस? झाले आता तु पण सासरी जाशील लवकरच..." सुनेधा ला चिडवता चिडवता अचानक सिरियस होत तेजस ने तनयाला विचारले.
आणि तनया वर्तमानात परत आली.
" अरे तेजस , असा रे काय करतोस? तनया चे लग्न अजुन ठरले नाही. आणि तिचे कांदेपोहे अजुन सुरु झालेच नाहीत मुळी. तिने नकार दिला या सगळ्याला. "
" काय हे तनया, तु नाही सांगीतलेस याला अजुन?"
तेजस ला पुढचे काही ऐकु येत नव्हते.
इतके दिवस त्याला वाटत होते तनया दुसरीकडे लग्नाला तयार झाली आहे.आणि त्याच वेळी त्याला प्रकर्षाने जावले हि विचित्र परिस्थिती त्याने स्वतः निर्माण केली आहे. आणि तनया सोबत असताना न जाणवलेली गोष्ट म्हणजे आपण तिच्या शिवाय दुसर्या कोणाचाच आपल्या आयुष्यात विचार करु शकणार नाही.
माणसाला जेंव्हा एखादी गोष्ट समोर असते तेंव्हा जाणवत नाही, पण जेंव्हा ती दुर जाते त्या वेळी तिची खरी किंमत कळते. म्ह्णतात ना दुराव्याने प्रेम वाढते.
ईतके दिवस लग्ना बद्दल बोलायलाच तयार नसलेल्या तेजस ने घरी तनया पुण्यात आली आहे असे आई ला सांगीतले. आज कित्येक दिवसांनी त्याच्या चेहर्यावर हसु होते. आणि त्याच वेळि आता वेळ न घालवता तनया सोबत बोलायलाच हवे असे त्याच्या आईने ठरवले.
" अजुन किती दिवस आहे ती पुण्यात? आणि घरी बोलाव ना तिला जेवायला" आईने विचारले.
" अग फक्त दोन दिवसांसाठी आहे ती ईथे" तेजस ठोडा निराशेने बोलला.
" मग आपण तिला कायमची ईथेच ठेवुन घेवु. आम्हाला सुन पसंद आहे. हां , आता घरी समजावुन सांगावे लागेल सर्वांना. पण सर्वांनाच आता याची कल्पना आली आहे. मी तु सांगशील म्ह्णुन वाट पाहिली खुप. आणि आई आज्जी ला मी सांगेल तु नको त्याचा विचार करुस" तेजस चकीत होऊन पहात राहिला आईकडे.
" अग पण पप्पा....."
" ते आधी नव्हतेच तयार. पण आता तनया ला घ्यायला गेले आहेत. आज मीच तिला घरी बोलावले आहे. आणि बर का, तिच्या घरच्यांची परवानगी घेवुन तिला बोलावले आहे हो तिला घरी."
तेजस ला आज काही हरवुन परत मिळण्यात काय आनंद असतो ते समजले.
तनयाच्या नसण्याने सैरभैर झालेला तेजस आई ने जवळुन पाहिला होता. जीव तुटत होता तिचा, आणि म्ह्णुनच गेले काही महिने सतत घरच्यांचे मन वळवत होती ती. तिकडे तनयाच्या घरी परिस्थिती फार वेगळी नव्हतीच. पण तनया मात्र आता सावरत होती.
जेवणा नंतर तेजस तिला सोडायला निघाला.
"तु नव्हतीस तेंव्हा सारखी तुझी कमी जाणवायची." तेजस
"खरेच? कि मला बरे वाटावे म्ह्णुन हे बोलत आहेस्?पण तेजस आता हि आधिची तनया नाही राहिली. तु नाही म्हणालास तरी मी परिस्थिती अॅक्सेप्ट केली आहे आता. तुझ्या होकार अथवा नकाराने फार फरक नाही पडणार आता. या सगळ्या वाटण्याच्या पलिकडे गेले आहे रे मी आता....."
" असे नको ना म्हणुस..."
"का?"
" कारण... कारण आय लव्ह यु"
एक क्षण प्रचंड शांततेत गेला.
" मला माफ करशील? माझ्या सोबत लग्न करशील?" तेजस
" किती रे उशीरा केलास?" तनया बोलत राहिली..."आज तु हे कबुल केलेस तेजस. पण खुप उशीर केलास. आता मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. खुप प्रेम केले तुझ्यावर. पण आता तुझ्या सोबती शिवाय राहण्याची सवय करुन घेते आहे. तु म्ह्णायचास ना तेच खरे. प्रेम वगैरे सगळे असते रे पण त्या शिवायही जगता येते. मी माझ्या करिअर मधे जास्त लक्ष घालते आहे. नुसते रडत बसुन काय मिळणार... हे काही दिवसात जाणवले.तु कबुल केले नव्हतेस, तरी तु माझ्यावर नेहमीच प्रेम केलेस. सतत जाणवायचे ते. आणि प्रत्येक प्रेमाचा शेवट लग्नातच व्हावा असा माझा कधीच हट्ट नव्हता." तनया शांतपणे बोलत होती.
" आता तर तुझे प्रेम मला आयुष्यभर पुरेल. दुसर्या कोणावर प्रेम नाही रे करु शकणार मी. आणि म्ह्णुनच मला लग्नच करायचे नाही आता. मला नेहमीच समजुन घेतलेस, आता पण घेशील माहिती आहे.आणि हो मला फोन कर नक्की ".
एअरपोर्ट वरच्या गोंधळात तिची नजर सतत तेजस ला शोधत राहिली. अगदी शेवटच्या क्षणी आला तो. हातात तिच्या आवडीचा केशरी गुलाब आणि चेहर्यावर पुन्हा तेच जीवघेणे हास्य. उशीरा झाला तरी त्याबद्दल आता तिला काहिच तक्रार नव्हती.
समाप्त
जुनीच गोष्ट पुन्हा पोस्ट केली
जुनीच गोष्ट पुन्हा पोस्ट केली आहेस का?
http://www.maayboli.com/node/12507
हम्म ...
हम्म ...
सायो, जुन्या माबो वर होती. तु
सायो,
जुन्या माबो वर होती.
तु दिलेली लिंक आजचीच आहे. परत लिहायला सुरवात मधे केली , पण अप्रकाशीत ठेवली होती.
त्यामुळे जुनी तारिख दाखवत होती.
प्लच !
प्लच !
रिया... हो शेवट लिहिताना फार
रिया...:) हो शेवट लिहिताना फार घाई केली असे नंतर वाटले. पण असो. आधी शेवट वेगळा होता. ( जुन्या माबो वर).
आता काढेन कथा ईथुन.
हा शेवटही आवडला गं पण नाही
हा शेवटही आवडला गं पण नाही आवडला !

पण असं नकोय हेही नक्की 
म्हणजे कथा आहे म्हणून ठिकेय पण रिअल आयुष्यात नकोच असलं काही
काय माहीत! मला नीट नाही सांगता येतेय काय ते
हे आवडलय एवढं नक्की