क्षुब्धरान

Submitted by शिवम् on 6 February, 2013 - 15:01

रान भाबडे रडु लागले,
देत आठवणींचे हुंदके,
हिरवीगार काया सरली
रुक्ष या समया आगे ..

काळचक्रे फिरली अशी की,
अगतिक झाले पाखरु,
असुनही माता जवळी,
रडू लागले गोंडल वासरु .!

हिरवे पातेही नाही रानी,
हतबल झाला बळीराजा,
दुष्काळ समयी नमले सगळे,
"काय देव आणि काय ख्वाजा?"

जनावरांच्या दिमतीला नाही ,
कोवळा पिवळा चारा,
निसर्गाचे अमानुष तांडव,
आहे आपुलाच दोष सारा .!

रान म्हणाले,"हे दुष्काळा
काय केलीस आमुची थट्टा?"
तो निर्दयी म्हणतो असा की,
"खेळा 'जीवन' मरणाचा सट्टा...!"

-शिवम् पिंपळे,औरंगाबाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुष्काळ समयी नमले सगळे
काय देव आणि काय ख्वाजा !
विशेष आवडले ..
आता हीच स्थिती येणार वाटतेय..

दै.दिव्य मराठी औरंगाबाद आवृत्तीत ही कविता प्रकाशित झाली ......

पेपेरात द्यायची होती तर अजून चांगली हवी होती (माझे वै म)

एक शेर आपल्या कवितेसाठी,

दुष्काळाचा तोरा काही कायम चालत नाही
एक वेळ आली की पाउस येतो म्हणजे येतो.

धन्यवाद, कन्सर्न पोहोचतोय आपला.

धन्स ,विदिपा !!
आपला शेर आवडलाच !

माबोकर सुशांतरावांचा एक दुष्काळी शेर आठवला...

धरणीस पाहुनीया बिजलीस मोह होतो
पण मोल मातीचे या मेघा कसे कळेना ?