रशियाचे शासन तेथील इस्कॉन मंदिर पाडणार ! जागो मोहन प्यारे!!!

Submitted by आंबा३ on 25 December, 2012 - 09:45

http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2012/12/blog-post_9674.html

भगवद्गीतेवर बंदी घालण्याचा प्रयत्न होऊन एक वर्ष होत असतांना रशियाच्या शासनाने आता त्या देशातील हिंदूंचे एकमेव मंदिर पाडण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीपर्यंत इस्कॉनचे मॉस्कोस्थित मंदिर नामशेष केले जाणार आहे. (जगभरात हिंदूंची संस्कृती नष्ट करण्याचा विडा उचललेल्या धर्मांध खिस्त्यांचा डाव ओळखा ! - संपादक)
इस्कॉन मठाधिशांनी दिलेल्या माहितीनुसार मॉस्को शहर प्राधिकरणाने मंदिर पाडण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतभेटीवर असून या भेटीच्या वेळी इस्कॉन मंदिराचे सूत्र उपस्थित होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने यापूर्वीच हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. रशियामधील भारताचे राजदूत अजय मल्होत्रा यांनी प्रशासनाशी चर्चा करून वेळ मागून घेतली होती. रशियामध्ये ‘वैदिक कल्चरल सेंटर’ची निर्मिती करण्याचा कार्यक्रम त्यांना पूर्ण करायचा होता. ३१ डिसेंबर २०१२ या दिवशी ही वेळ संपणार आहे. भारतातील रशियाचे राजदूत अ‍ॅलेक्झांडर यांनी मंदिर तोडण्याची शक्यता फेटाळून लावली आहे; परंतु इस्कॉनचे साधू मदनमोहन दास यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर तोडण्याचा आदेश रहित करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी मंदिर तोडले जाऊ शकते. रशियाचे शासन नवी देहलीत रशियन चर्च उभारू पहात आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नही चालू झाले आहे.

--------------------------- ----------------------------------------------------------------------------------
----------बातमी समाप्त. आमचा लेख सुरु ------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------
रशियन सरकारला जाग आली म्हणायची! रशियन सरकारचे अभिनंदन

प्रश्न आहे, तो या इस्कॉनची भारतातील देवळे कधी उध्वस्त होतील हा!

हा इस्कॉन म्हणजे भक्ती संप्रदाय नाही. ती अमेरिकेतील नफेखोर कंपनी आहे.. भारतातील पाच इस्कॉन देवळातून आणि त्यंची पुस्तके विकून ही कंपनी भारतातून किती धन गोळा करते काही कल्पना आहे का? अमेरिकेतील कोल्गेट कंपनी अमेरिकेत टुथ पेस्ट विकूनही इतका नफा मिळवत नाही! Proud Biggrin

ही इस्कॉन म्हणजे आधुनिक ईस्ट इंडिया कंपनी आहे... भारतातलाच कच्चा माल, भारतातच प्रोसेस करुन भारतातच विकणे!

भारतातील मुरलीधराची देवळं मोडकळीला आलेली आणि गोर्‍या लोकांचं संगमरवरी देऊळ बघायला जाऊन लोक लाखानं पैसा ओतून येतात! आणि ती 'जशी आहे तशी' उराशी कवटाळून बसतात !!

जागो मोहन प्यारे!!!

ग्लानिर्भवती भारत !!! जागे व्हा!!

http://www.youtube.com/watch?v=ZlPaN5p-46s

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

--------------------------- ----------------------------------------------------------------------------------
----------बातमी समाप्त. आमचा लेख सुरु ------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------
रशियन सरकारला जाग आली म्हणायची! रशियन सरकारचे अभिनंदन
प्रश्न आहे, तो या इस्कॉनची भारतातील देवळे कधी उध्वस्त होतील हा!

"उध्वस्त' हा शब्द कशासाठी. परदेशात चर्चसाठी किंवा अन्य कारणासाठी मंदिर उध्वस्त करून ती जागा ताब्यात घेणे समजू शकतो पण भारतातही आपणच मंदिरांची प्रतारणा करायची? इस्कॉन संस्था कशी जरी असली तरी (अर्थात त्या बातमीची वास्तविकता जरा बाजूला ठेवून) कोणताच सश्रद्ध हिंदू देऊळ उध्वस्त करा असे म्हणणार नाही. आपले सरकार अतिशय प्रामाणिक असल्यामुळे सरकारने संस्थेवर बंदी आणून ते मंदिर आपल्या ताब्यात घ्यावे असे फारतर म्हणेल (पद्मनाभमंदिरात सध्या काय चालले आहे कोणास ठाऊक. जेव्हा सरकारदरबारी कोणतीच प्रतिक्रिया किंवा बातमी नसते तेव्हा काहीतरी लोचा असतो हे एव्हाना अनुभवाने माहीत झालेले आहे.) किंवा त्यावर मंदिरांवर प्रशासक नेमावा असे म्हणेल पण मंदिरे जमीनदोस्त व्हावीत असे आम्हाला कधीच वाटणार नाही.

सरकारची "डोन्ट डू एनी कॉमेंटस्‌' नीती. लोकांची मेमरी शॉर्ट असते. त्यांना केवळ दैनंदिन समस्यांमध्ये (उदा. सद्य गॅस-के.वाय्‌.सी प्रकरण - लोकं बसली आहेत हेलपाटे मारत) गुरफटून ठेवायचं मग ते मोठमोठे घोटाळे विसरून जातात. निवडणुकीच्या अगोदर दारिद्र्यरेषेखालील जनतेस 12 सिलिंडर द्यायची, थोड्या फार सवलती जाहीर करायच्या, मतदानाच्या आदल्या दिवशी काय घडतं हे येथे सांगायलाच नको. मध्यमवर्ग मतदानापासून कसा परावृत्त होईल ते पाहायचं. (येथे डेंजर झोनमध्ये असल्यामुळे जास्त लिहीत नाही) थोड्याफार डिफरन्सने बरोबर आपण निवडून येऊ. झालं ! मग पुढली पाच वर्षे चिंता नको! हे सर्व अनुभवाने माहीत झालेले आहे म्हणत होतो मी..............

हरिहरा,
म्हणजे मी दोन खोटी कनेक्शन घेतलीत अन माझ्या मारूतीत ग्यासकिट बसवून स्वस्तात ती गाडी चालवली, हा घोटाळा नाही का?
१३० कोटी लोकसंख्येत दर महा समजा ६० कोटी सिलिंडर लागतात. एकावर सरकारने ३०० रुपये सबसिडी दिली, तर मी व माझ्या सारखे लोक फक्त १८००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार दर महा करण्यास हातभार लावतो हे माझे म्हणणे चुकीचे आहे काय?

मग जर असा घोटाळा शोधून काढण्यासाठी सरकार पाऊले उचलत असेल, तर चुकले कुठे???

बरोबर ना?

प्रश्न फक्त काँग्रेस हाकलण्याचा नाहीये. आपण प्रत्येकाने आपले स्वतःचे मॉरल्स उंचावले नाहीत तर मोठ्ठा लोचा होईल हा प्रश्न आहे..

एकावर सरकारने ३०० रुपये सबसिडी दिली, तर मी व माझ्या सारखे लोक फक्त १८००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार दर महा करण्यास हातभार लावतो हे माझे म्हणणे चुकीचे आहे काय?
---- सरकार सबसिडी देते म्हणजे एक प्रकारे सामान्य नागरिकांना आर्थिक मदत करते. आर्थिक निर्णय दोन प्रकारांत मोडतात. (अ) लोकांना एखादी कृती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उदा: सौर चुल मधे तुम्ही १५०० रुपयांची गुंतवणुक केली तर सरकार ५०० रुपयांची मदत करेल. (ब) एखादी वस्तू खुप महाग आहे, आणि सामान्य नागरिकांना परवडण्याच्या पलीकडे आहे, अशा वस्तुंवर सरकार सबसिडी (आर्थिक सुट) देण्याचा विचार करते.

सबसिडीला भ्रष्टाचार म्हणायचे झाल्यास (जे चुकीचेच आहे) तर प्रत्येक भारतीय हा भ्रष्टाचार करतो आहे असे म्हणावे लागेल कारण प्रेट्रोलियम पदार्थ प्रत्येक व्यक्ती या नाही त्या अनेक प्रकारे वापरत असतो.

कर स्वरुपांत गोळा झालेला पैसा जनतेच्या कल्याणासाठी कसा, कुठे आणि किती वापरावा हे बघणे सरकारचे कर्तव्य आहे आणि ते तो बजावत असते. सवलतीचे निकष ठरवल्यानंतर त्याचा फायदा त्या निकषांत बसणार्‍या सर्वांनाच मिळतो. येथे कुणी कुणाची फसवणुक करतो असे मला वाटत नाही.

भ्रष्टाचारा बाबत असे म्हणता येत नाही. भ्रष्टाचार करणारा सरकारची किंवा व्यक्तीची किंवा व्यक्ती समुहाची फसवणुक करत असतो.

प्रश्न फक्त काँग्रेस हाकलण्याचा नाहीये. आपण प्रत्येकाने आपले स्वतःचे मॉरल्स उंचावले नाहीत तर मोठ्ठा लोचा होईल हा प्रश्न आहे..
----- अनुमोदन... काँग्रेस किंवा अजुन कुठल्याही पक्षांला लोकं सामान्यातुनच जातात... राजकीय पक्ष हा जनतेच्या मानसिकतेचा आरसा आहे. सामान्य नागरिकांचे मॉरल्स उंचावल्यावर सर्व प्रश्न मिटतील आणि तेच आपल्या हातात आहे... सोपे नाहीच नाही पण अशक्यही नाही.

भारतीय उपखंडातले देश सोडले तर अन्य कोणत्याही लोकशाही देशात जनतेला कायम मामा बनवणे शक्य नसते. ज्या देशातील जनतेला उद्धारासाठी मसिहाची गरज लागत नाही तिथेच हे शक्य असते.

बहुदा 'रशियाचे शासन तेथील इस्कॉन मंदिर पाडणार' हा धाग्याचा विषय असावा...
कुणी शंकानिरसन करू शकेल काय

इब्लिस | 26 December, 2012 - 00:24
म्हणजे मी दोन खोटी कनेक्शन घेतलीत......मग जर असा घोटाळा शोधून काढण्यासाठी सरकार पाऊले उचलत असेल, तर चुकले कुठे??? बरोबर ना?

मी सरकारने सवलतीत सिलिंडर द्यावीत असे कुठे म्हटलेले नाही. तुम्ही का बरे तुमच्यावर ओढवून घेतले? इतके दिवस मारुतीत तुम्ही घरगुती सिलिंडर वापरत होता का? अरेरे ! ह्या निर्णयाने खरचं तुमची पंचाईत झाली असेल.
मी म्हणालो होतो की दैनंदिन समस्येत लोकांना गुरफटून ठेवायची नीती. आता के. वाय्‌. सी. चे घ्या. गेले दोन महिने लोकं गॅस एजन्सीमध्ये दररोज अक्षरशः हेलपाटे मारत आहेत. एकदा हे नक्की काय आहे? मुदत कधी आहे? फॉर्म शिल्लक नाही? चार दिवसांनी येणार आहे? फॉर्म भरला नाही तर गॅस कट होणार ह्या भीतीपायी मनःस्वास्थ्य हरपलेले आहे. विशेष म्हणजे गॅस एजन्सीकडून ऑफिशियल पत्र पाठवून मागणी झालेली नाही. ही एक साधी गोष्ट सांगितली. सरकारची नीती स्पष्ट नसल्यामुळे मध्यमवर्गीय जनतेस किती त्रास होत आहे.
आता चारही गॅस कंपन्या स्पेशल सॉफ्टवेअर वापरून बोगस कनेक्शन शोधून काढणार. स्पेशल त्यासाठी सॉफ्टवेअर निर्मिती चालू आहे. तुमच्या-आमच्यासारखे सरकारलेखीचे चोर लोक हुडकण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार अतिशय चांगली गोष्ट आहे. येथे मला एक प्रश्न पडतो मग हा अत्याधुनिकपणा सरकार दरबारी का नाही? एक साधी गोष्ट सांगतो. जर टोल नाक्यावर कॉंप्यूटर वापरले जातात. त्या नाक्यापुरते असलेले सर्व व्यवहार नेटवर्क कनेक्टेड असतात. जर हेच नेटवर्क राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वेबसाइटला कनेक्ट केले तर किती सोय होईल? जर माझी रिसीट नं, वेळ व रक्कम मला ऑनलाइन दिसली तर मला खात्री होईल की माझी रक्कम सरकार दरबारी पोचलेली आहे. दररोज किती कलेक्शन जमा झाले हेही दिसेल. अजून किती टोल भरायचा हेही कळेल. अशाच प्रकारे मी भरत असलेल्या सेल्स टॅक्स तसेच विविध टॅक्स संदर्भात नीती बाळगता येईल माझा टॅक्स कोठे जातो हे मला माहीत असेल. अर्थात ही फारच पुढची गोष्ट आहे. सध्या टोल नाक्यापुरते जरी झाले तरी आनंद आहे. सरकारने जर ठरवले तर लगेचच ही गोष्ट तर होऊ शकते. पण होणार नाही ह्याची खात्री आहे. असे बरेच काही सांगता येईल. पण एक तर हा धार्मिक कक्ष आहे आणि दुसरे म्हणजे आंबा3च्या डेंजर झोनमध्ये आहे.
आता हा विषय थांबवून मूळ विषयावर येऊ - आंबा3 ह्यांनी वापरलेल्या "उध्वस्त' शब्दाबद्दल आपले काय म्हणणे आहे?
("आंबा1/आंबा2/आंबा3 यांनी असे म्हणावयास नको होते' आपणाकडून येणाऱ्या अशा प्रकारच्या वाक्याची चातकासारखी वाट पाहत आहोत. असत्यावर (अर्थात तुम्हाला वाटणाऱ्या) घाला घालण्याची आपली नीती आहे. चांगले आहे. मग येथे का बर पक्षपातीपणा करता. जर "उध्वस्त' सारख्या ठिकाणी आपण फोडून काढत नसाल तर अन्य ठिकाणी जेथे जेथे फोडून काढता तेथे एककल्ली विचाराची बू येईल.)

सरकार, ट्याक्स, कर, टोल, उध्वस्त, धर्म ....... एका धाग्याला अठरा अध्याय जोडलेत ..

ही मंदिरे लोकांचे रक्त शोष्त आहेत. ती उध्वस्तच व्हायला हवीत .. अर्थात, कुष्ण तसाच ठेऊन, देऊळही तसेच ठेऊन तिथे रुग्णालय सुरु केलेत तरी मंदिर या स्वरुपाचे उध्वस्तीकरण झालेच ना?

फॉरिनच्या लोकानी फॉरेनच्या प्रकाशनाचे पुस्तक आणि देऊळ लोकाना का गोंजारावे वाटते समजत नाही.

उदय, इब्लिस यांची पोस्ट एका घरात/नावावर दोन एल्पीजी कनेक्शन्स आणि त्यामुळे मिळणार्‍या नियमबाह्य अशा सहा सिलिंडर्साच्या सबसिडीच्या संदर्भात आहे. 'एका घरात एक कनेक्शन'वर मिळणार्‍या सबसिडीच्या संदर्भात नाही.

बहुदा 'रशियाचे शासन तेथील इस्कॉन मंदिर पाडणार' हा धाग्याचा विषय असावा...
कुणी शंकानिरसन करू शकेल काय
माबो नियमानुसार विषय काहीही असो , धाग्यात काही लिहीलेल असो प्रतिसादात काँग्रेस कस वाईट्ट आणि भाजप कस धुतल्या तांदळाच हेच ठासुन सांगितल पाहिजे आणि त्याला काहींनी कांऊटर पण केलच पाहीजे.

<<<<प्रश्न आहे, तो या इस्कॉनची भारतातील देवळे कधी उध्वस्त होतील हा!>>>

तुम्हाला बरेच प्रश्न पडतात बुवा !!

असे प्रश्न आम्हाला पडले तर ?

हे बघा
madrassas: Terror factories? Powell: Madrassas breeding grounds of terrorists - Jihad Watch
तुम्ही पाडा ईस्कॉन ची मंदिरे आम्ही पाडतो सर्व मद्रसा आणि मस्जिद चालेल ?

ही इस्कॉन म्हणजे आधुनिक ईस्ट इंडिया कंपनी आहे... भारतातलाच कच्चा माल, भारतातच प्रोसेस करुन भारतातच विकणे!

ईस्कॉन असेल नफेखोर पण राष्ट्रविरोधी तर नाही , तुमचे सर्व मद्रसा तर अतिरेकी बनवायचे कारखानेच आहेत. असे पुरावे आहेत.

आता बोला !!

काल germany मधे मुस्लिम मुलांनी एका हिंदु मुलाची जीभ कापली कारण त्याने मुसलमान होण्यास नकार दिला. वाचा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17791128.cms

भारतात तर हिंदुना छळणे चालुच आहे आता परदेशात सुद्धा सोडत नाहीत. फक्त germany मधे त्या गुन्हेगारांना शिक्षा तरी होईल, भारतात मोकाट सुटले असते.

नरेंद्र मोदी हाच पर्याय - ( हे वाक्य फक्त कुजलेल्या आंब्या साठी )

हे भयानक आहे .परदेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारबाबत मी दोन धागे यापूर्वी काढले आहेत. निदान आतातरी भारत सरकार आणि हिंदुत्ववादी संघटनांनी योग्य ती पावले उचलावीत

http://www.maayboli.com/node/38096

http://www.maayboli.com/node/38100

Woman charged with hate crime murder in New York subway death of Indian
Ref: http://timesofindia.indiatimes.com/nri/us-canada-news/Woman-charged-with...

"I pushed a Muslim off the train tracks because I hate Hindus and Muslims ever since 2001 when they put down the twin towers I've been beating them up," Menendez told police, according to the district attorney's office.

२००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर साठी हिंदुना जवाबदार ??

आता अमेरीकेत सांभाळारे बाबानो !! ईथे भारतीय असणेच धोक्याच आहे. कोणी एरिका सारखी येऊन सरळ रेल्वे गाडी खाली ढकलुन द्यायची !!

ईथे भारतीय असणेच धोक्याच आहे >>>> कांग्रेसवाल्यांनी भारताची सर्व जगात इतकी बदनामी केली आहे कि त्यामुळे सर्व भारतीयांना भोगावे लागत आहे.

Pages