ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.

jt382.jpg

आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताण Rofl

चूक सर्वस्वी रसप यांची आहे. त्यांनी 'ताण' लिहीलं म्हणून जो तो आपापल्या परीने ताणण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यामुळे काहींना फारच ताण आलेला दिसतोय.

Happy ताणताणुन आता मुळ आकार हरवला..

वर्षाकाठी १-२ चित्रपट पहायचे तर ते बर्फी, कहानी, OMG, विकी डोनर, पा असल्या लायकीचे तरी असलेच पाहिजेत नाही का? >>>>+१
शाहरुख खान आणि सलमान दोघेही सारखेच...तुलना करायची असेल तर ETT JTHJ ची ३ idiots, rang de basanti, A Wednesday, Muna bahi MBBS अशा सिनेमाशी करा आणि मग ठरवाकी हे सिनेमे खरच भांडण्याचा लायकीचे आहेत का?
A Wednesday च collection मला माहीत नाही पण नक्कीच ETT आणी JTHJ पेश्रा उजवा.

तेरे नाम चा काळ आठवा...सलमान बद्द्ल सगळे वाइट्च बोलत होते...Wanted नंतर सगळे बदलले...
शाहरुखने पायावर धोडा पाडुन घेतला करण जोहर आणी चोप्रा मंडळीच्या मागे जाउन...चक दे, स्वदेस सोडले तर बाकी नुसता नंबराचा खेळ.
अगदी पुर्वी (म्हणजे कभी हा..कभी ना, येस बोस पर्यन्त) अशी सणक नव्हती पण दुर्दैवाने हळुहळु वाढत गेली.
हल्ली सणक परकोटीला आहे.>>>+१
१०० कोटीच्या लिस्ट मध्ये एक ३ idiots सोडला तर खरच कुठला सिनेमा पटत नाही.(गजनी too)...

आपल्या आधीच्या पिढीकडे चुपके चुपके, शोले सारखे सिनेमे होते जे आजून आपण आपले म्हणतो पण आपली मुल रा वन, रेडी (इसने धो डाला तो लाइफ झिंगलाला Happy ) सारख्या सिनेमांना (१०० कोटीचे) आपले म्हणतील का?

अरे बाप रे...!! दिवाळी आणि त्या सुट्टीला लागून थोडी अजून सुट्टी घेऊन बेटर हाफ बरोबर बाहेरगावी जाऊन येईपर्यंत हा बाफ कसला वाफाळला आहे..! अरे मित्रांनो, शा.खा. वि. स. खा. हा वाद नका रे घालू! मला परीक्षण लिहिताना एकट्या शा.खा. ला शिव्या घालायच्या नव्हत्या.. तर सगळ्यांनाच घालायच्या होत्या. एकंदरीत ह्या सिनेमात (काही प्रमाणात अनुष्का शर्मा वगळता) सगळेच साफ गंडलेत..

-------------------------------------------

हा शुक्रवार सुट्टीत गेल्याने चित्रपट पाहायचा राहून गेला !!
पुढील शुक्रवारी कुणाला हाणावं.... विचार करतो!! Wink

-------------------------------------------

धन्यवाद!!

रसप समद्यांना "ताण" देऊन मस्त फिरायला गेला.....;)

तेवढ्यात इकडे दोन तीन नवीन धागे पण निघाले.....आता येउंदेत दुसरं पण एखादं परीक्षण...धीस टाइम पिक समवन अदर द्~अन खारूक... Wink

अवांतर - काही वेळा आपण असं दिग्गजांचे पिक्चर्स अरेवा यांनी काढलेला म्हणून यांदे तरोताजा करायला गेलो की खरंच आपल्याला हा चित्रपट आवडला होता? असं वाटतं.. माझं इतक्यात पुन्हा चांदनी पाहिला तेव्हा झालं...देवा त्या "दिल्ली शहर में चांदनी नामकी लडकी मुझको मिल्ली" मध्ये सगळी जनता त्यांच्याकडे बघतेय वगैरे आता पाहताना म्हणजे पूर्ण पिच्चर पाहूच शकलो नाही.....:P

हा शुक्रवार सुट्टीत गेल्याने चित्रपट पाहायचा राहून गेला !!
पुढील शुक्रवारी कुणाला हाणावं.... विचार करतो!!
<<
'लव्ह शव ते चिकन खुराना'बद्दल नाही लिहिलत अजुन ?
टीपी आहे एकदा बघणेबल :).

हा लेख फेसबूक वर फिरायला लागला आहे.>>

हो.. मेलवरही फिरतो आहे !

जेव्हा एखाद्या गोष्टीबाबत आनंद मानावा की चिंता करावी कळत नाही, तेव्हा मी आनंद मानतो !! Happy

रसप कालच मला माझ्या ऑफिसातल्या एका मुलिने लिंक फॉरवर्ड केली त्याच ईमेलात हा लेख डकवलेला, वर चक्क वेळ मिळाला की नक्की वाच, खूप हसशिल असा प्रेमळ फोन पण केला तिने. मी शिर्षक पाहून तिला म्हणले, 'बेटी तुम जिस स्कूल में पढती हो, उस स्कूल में हम हेडमास्टर है.. Proud
तिने माबोचे सदस्यत्व घेऊन टाकले कालच.

माहीती वाटल्याने ...........ज्ञान वाढते............किरण.
.
.
.
माझे ज्ञान वाढव Lol

खरोखरच ह्या परीक्षणाला, ह्या परीक्षणामुळे माझ्या ब्लॉगला गेल्या आठवड्याभरात खूप जोरदार प्रतिसाद मिळाला.... त्यासाठी सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. ______/\______ !

एक अत्यंत भंकस सिनेमा बनविल्याबद्दल जतहैंजा च्या संपूर्ण टीमचे (रा.रा. शा.खा. सकट) विशेष आभार !!

धन्यवाद..........आपल्या परिक्षणामुळेच..........९ दिवसातच १०० कोटीचा टप्पा ओलांडला.......धन्यवाद .......:हाहा:

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे. >> +१००
आणि A R Rahman ने सुद्धा त्यांना अगदि साथ दिलेलि दिसतेय अगदि फालतू म्युझिक देवुन!

रणजित एक नंबर परिक्षण लिहिलयस. त्या सारुक काकांना आजकाल तर नाचताही येत नाही . असो.

कंटाळा आणला या चित्रपटात शाहरुखने.... फुकटाला महाग.

अतिशयोक्ती असलि तरी सन ऑफ सरदार बरा वाटला. कीमान सरदारचे जोक्स तरी चांगले आहेत

Pages