आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.
१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्� �� घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.
४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्� �ा दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.
१२) जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.
१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपान� � मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.
१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.
१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी प िळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.
Dr. Santosh Jalukar
Phone: 9969106404
santoshjalukar@rediffmail.com
चांगली माहीती! मला एक प्रश्न
चांगली माहीती!
मला एक प्रश्न नेहमी पडतो. आयुर्वेदात प्रत्येक औषध कशा प्रकारे बनवायचे/ त्या वनस्पती कशा प्रकारच्या वातावरणात तयार झालेल्या हव्यात अशा बर्याच अटी आहेत. जेव्हा आयुर्वेदिक औषधे तयार करतात तेव्हा या सर्व नियमांचे पालन औषधे तयार करणार्या कंपन्या करतात का?
एकदा एका वैद्यांना मी त्यांच्या दवाखान्यात च्यवन्प्राश करताना बघितले. त्यानी चक्क अॅल्युमिनीयमचे मोठे पातेले वापरले होते. अॅल्युमिनीयमचा औषधावर विपरीत परिणाम होत असेल ना?
मी गरोदरपणात मासानुमासिक अशा नावाच्या काही गोळ्या घेतल्या. त्या गोळ्याचा रंग गडद निळा, हिरवा असा प्रत्येक महिन्याच्या गोळ्यांचा वेगवेगळा असयचा. त्यातले रंग हे त्या गोळ्यातल्या ईनग्रेडियंण्टस मुळे आलेले आहेत की रंग टाकले जातात?
असे बरेच प्रश्न आहेत.
डॉ. साहेब उत्तम माहितीबद्दल
डॉ. साहेब उत्तम माहितीबद्दल आभारी. 'भर्जित' धान्य जेवणात कशा प्रकारे वापरता येऊ शकतात यावर जरा सविस्तर सांगू शकाल का?
माहितीपूर्ण आणि उपयोगी लेख!
माहितीपूर्ण आणि उपयोगी लेख!
माहितीपुर्ण लेख “चार
माहितीपुर्ण लेख
“चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.>>> हे सूत्र चांगले आहे.
निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही>>> हा मात्र अशास्त्रिय दावा आहे. अॅनॅटॉमी आणि फिजिऑलॉजी या दोन्ही निकषांवर माणूस हा सर्वभक्षी (ऑम्निव्होरस) प्राणी आहे. मानवी उत्क्रांतीशास्त्राप्रमाणे आपल्या पूर्वजांनी मांसाहार केला नसता तर मानवी मेंदूची इतकी वाढच झाली नसती.
मानवी
मानवी उत्क्रांतीशास्त्राप्रमाणे आपल्या पूर्वजांनी मांसाहार केला नसता तर मानवी मेंदूची इतकी वाढच झाली नसती.
मानव केवळ शाकाहारी नसुन सर्वाहारी आहे हे मान्य पण मांसाहार केला नसता तर मेंदूची वाढ झाली नसती हे कसे काय? मग निव्वळ मांसाहारी प्राण्यांचे काय? त्यांचे मेंदूही मानवाएवढे प्रगत आहेत काय?
कृपया अजुन माहिती द्या...
चांगला लेख.
चांगला लेख.
आपण कोठे असता? मी मुंबई ला
आपण कोठे असता? मी मुंबई ला असते. आपले clinic कुठे आहे
पहिला मुद्दा हा की मी मानवी
पहिला मुद्दा हा की मी मानवी मेंदूच्या उत्क्रांतीबद्द्ल बोलतो आहे, त्याच्या आत्ताच्या स्वरुपाबद्द्ल नव्हे.
दुसरी गोष्ट ही की आहार हा मेंदूच्या उत्क्रांतीमागचा फक्त एक घटक आहे, एकमेव नव्हे.
आपला ब्रेन/बॉडी रेशो सर्व प्राण्यात सर्वात जास्त आहे, म्हणजेच शरीराच्या मानाने आपला मेंदू फारच मोठा आहे. अशा प्रकारचा मोठा आणि क्लिष्ट अवयव तयार होण्यासाठी सततच्या हाय प्रोटीन/ हाय कॅलरी डाएटची गरज होती, जी मांसाहाराने भागवली. माणसाच्या पूर्वजाने हत्यारांची निर्मिती केली, ज्याने शिकार सुलभ झाली, त्यामुळे कमी वेळात मोठ्या प्रमाणात जास्त पोषक आहार मिळवणे शक्य झाले,ज्यामुळे मेंदूचा अधिक विकास झाला त्यामुळे जास्त प्रभावी हत्यारे बनवता आली. असे चक्र चालू झाले.
फक्त शाकाहार किंवा फक्त मांसाहाराने इतका वेगवान विकास शक्य झाला नसता.
मग निव्वळ मांसाहारी
मग निव्वळ मांसाहारी प्राण्यांचे काय? त्यांचे मेंदूही मानवाएवढे प्रगत आहेत काय?>> नव्या Time मधे आलेल्या लेखामुळे नविन संशोधन असे दाखवतेय कि social carnivores (सिंह, तरस) हे social herbivores पेक्षा अधिक हुशार असतात.
>>लवकर झोपून लवकर उठावे, हा
>>लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते
पटले नाही. संदर्भ द्यावेत.
इंग्लंडात झोपण्याच्या वेळांबाबत केलेल्या संख्याशास्त्रीय अभ्यासात एव्हढेच आढळले की उशीरा झोपून उशीरा उठणारे लोक लवकर झोपून लवकर उठणार्यांपेक्षा थोडे जास्त श्रीमंत असतात!! अगदी थोडेच. आरोग्याबाबत काही वेगळे आढळले नाही. हा अभ्यास २० वर्षांच्या काळासाठी केला गेला होता. संदर्भ - कॅथरीन गेल आणि ख्रिस्तोफर मार्टिन, साउदम्प्टन युनिव्हर्सिटी.
Gale C & Martyn C (1998) Larks and Owls and health, wealth and wisdom.
>>निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही
हेही पटले नाही. शाकाहारी प्राण्यांचे आतडे लांब आणि कप्प्यांचे असते. शाकाहारात (गवत, पाने, फुले, फळे) तुलनेने कमी पोषणमूल्य असल्याने हे प्राणी सतत खात असतात. या उलट मांसाहारी प्राण्यांचे आतडे कमी लांबीचे असते. आणि ते सतत चरत नसतात.
मनुष्य, वानरे, कपि सारे संधीसाधू सर्वाहारी आहेत. म्हणजे चरण्याची आवश्यकता शाकाहारी प्राण्यांइतकी सततची नाही पण मांसाहारी प्राण्यांइतकी कमीही नाही. मिळेल ते मिळेल तेव्हा खावे हा या सर्वाहारी प्राण्यांचा मूलमंत्र आहे. आता मनुष्याला हवे तेव्हा अन्न उपलब्ध होते आहे, त्यामुळे मिळेल तेव्हा सतत खावे हा नियम उपयोगी नाही. त्यासाठी ४ ते ८ तासांचा नियम योग्य वाटतो. पण सरसकट मांसाहार वर्ज्य करावा हे पटलेले नाही.
निसर्गाचा निर्माता हा मुद्दाही पटला नाही. पण तो विषय नाही.
चांगली माहिती!
चांगली माहिती!
उपयोगी माहिती. मुद्दा ३ -
उपयोगी माहिती.
मुद्दा ३ - बहुतेक याच कारणासाठी जापानी लोक जेवणानंतर कोमट पाणी घेत असतील. पण मग ह्याचा अर्थ आपण जेवणात सोलकढी, ताक हे पण गार घेणे बरोबर नही असेच ना? आणि कधीतरी जेवणा नंतर आईस्क्रीम पण नाहीच का?
काही शंका कॉमन
काही शंका कॉमन आहेत.
वाचकांच्या शंकाना डॉ. नी लवकर उत्तर द्यावे ही विनंती ...
अतिशय माहितीपूर्ण लेख..
अतिशय माहितीपूर्ण लेख.. धन्यवाद त्याबद्दल. चर्चाही फार अभ्यासपूर्ण चालू आहे. निवडक १० त नोंदवत आहे.
चांगला लेख.
चांगला लेख.
बायदवे, मला प्रसिक यांची टिप
बायदवे, मला प्रसिक यांची टिप सगळ्यात जास्त आवडली.

कोणाला जर स्व:त जाडं झालेल वाटत असेल तर त्याने आपल्याही पेक्षा जाड्या माणसांच्या संगतीत रहावं.>>>>
इतक्या सुंदर टिपेचा ह्या धाग्यावर अनुल्लेख कसा झाला बरे?
वा छान माहिती. मधे एका
वा छान माहिती.
मधे एका पेपरात हेच वाचलय मी, तुम्हिच लिहिलं होतत का? पेपरचं नाव नक्कि आठवत नाहि पन बहुतेक पुण्य नगरी..
आगाऊ, असामी ... माहितीबद्दल
आगाऊ, असामी ... माहितीबद्दल धन्यवाद.
छान समजुन सागितले आहे. लेख
छान समजुन सागितले आहे. लेख मला आवडला.
@ समिर.. मी नाही लिहलं कदाचीत
@ समिर.. मी नाही लिहलं कदाचीत वाचलं असेल, कुठे ते आठवत नाही,
चांगली माहिती आहे... माझ्या
चांगली माहिती आहे... माझ्या निवडक १० मधे, धन्यवाद.
डॉक्टरांनी फार छान लेख लिहिला
डॉक्टरांनी फार छान लेख लिहिला आहे . आणि ह्या टिप्स नक्की उपयोगी आहेत . मला फक्त एक गोष्ट समजली नाही .
चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो.
मी नेहमी व्यायाम करतो तसेच ज्या ठिकाणी मी काम करतो तिथे पण खूपच घाम येतो .तरी वजन स्थिर आहे. त्या बद्दल काही माहिती मिळाली तर आभारी राहीन
चिंतामणी
उत्तम लेख ! छान शास्त्रोक्त
उत्तम लेख ! छान शास्त्रोक्त माहिती मिळाली.
डॉक्टर, तुम्ही दिलेली माहिती
डॉक्टर, तुम्ही दिलेली माहिती खूपच छान व उपयुक्त आहे. पण " निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही " हे विधान शास्त्रज्ञांना मान्य नाही. कारण मनुष्य हा उभयभक्षी प्राणी असल्याचे शास्त्राने तीन कारणांमुळे सिद्ध केले आहे.
(१) मानवी शरीरात दोन आतडी असतात. छोटे आणि मोठे. यापैकी छोटे (short / रुंदीने मोठे) हे फक्त मांसाहारी प्राण्यांत आढळते तर मोठे (long/रुंदीला लहान) शाकाहारी प्राण्यांत. मानवी शरीरात ही दोन्ही आतडी असतात
(२) मांसाहारी प्राण्यांना नखे असतात. शाकाहारी प्राण्यांना खूर असतात.
(३) मांसाहारी प्राण्यांना सुळे (canine teeth) असतात. शाकाहारी प्राण्यांना molar teeth असतात.
शिवाय शाकाहारी प्राणी कान हलवू शकतात. मांसाहारी प्राणी नाही.
अर्थात शाकाहार काय, मांसाहार काय किंवा मद्यपान काय, अति सर्वत्र वर्जयेत हे सर्वच बाबतींत खरे आहे.
खुप छान माहिति आहे. चांगला
खुप छान माहिति आहे. चांगला लेख आहे...
......
छान माहीती पालन करतोच आहे
छान माहीती
पालन करतोच आहे
खरोखर वाचुन खुप महिती
खरोखर वाचुन खुप महिती मिलाली.जेवनाआधी गोड पदार्थ खावे हे मात्र नक्की.
मेद किंवा चरबी विषयी जागरूक
मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.<< मग मटकी / मूग कुकरमधे उकडून त्याचा पेंडपाला केल्याने ही वजन वाढते का?
पोटावरची व कमरेवरची चरबी कमी
पोटावरची व कमरेवरची चरबी कमी करण्यासाटी कोनता योगा कारावा?
सुर्य नमस्काराने कमी होते का?
Pages