दहशतवाद - १९९४ ते डिसेंबर २००८ आकडेवारी
दहशतवादामूळे भारताची केवढी मनुष्य हानी झाली ह्याची आकडेवारी देत आहे. ह्यात मालमत्तेला झालेले नूकसान गृहीत धरलेले नाही.
तक्ता १
India Fatalities, 2008 |
|||
Civilians | Security Force Personnel | Total | |
Jammu & Kashmir | 64 | 87 | 151 |
Assam | 219 | 16 | 235 |
Delhi | 26 | 1 | 27 |
Gujarat | 57 | 0 | 57 |
Haryana | 0 | 0 | 0 |
Maharashtra | 171 | 20 | 191 |
Karnataka | 0 | 0 | 0 |
Manipur | 125 | 13 | 138 |
Meghalaya | 0 | 0 | 0 |
Mizoram | 0 | 4 | 4 |
Nagaland | 42 | 2 | 44 |
Rajasthan | 80 | 0 | 80 |
Tripura | 7 | 4 | 11 |
Left-wing Extremism | 182 | 202 | 384 |
Uttar Pradesh | 1 | 7 | 8 |
Total* | 974 | 356 | 1330 |
* Data till December 1, 2008 | |||
* Does not have the full details of 26-11 and does not include terrorist deaths |
*फक्त २००८ ह्या वर्षात १ डिसेंबर पर्यंत १३३० लोक मृत्यूमुखी पडले.
तक्ता २
Deaths from 1994 to 2007 |
|||
Civilians | Security Force Personnel | Total | |
1994 | 1696 | 417 | 2113 |
1995 | 1779 | 493 | 2272 |
1996 | 2084 | 615 | 2699 |
1997 | 1740 | 641 | 2381 |
1998 | 1819 | 526 | 2345 |
1999 | 1377 | 763 | 2140 |
2000 | 1803 | 788 | 2591 |
2001 | 1693 | 721 | 2414 |
2002 | 1174 | 623 | 1797 |
2003 | 1187 | 420 | 1607 |
2004 | 886 | 434 | 1320 |
2005 | 913 | 287 | 1200 |
2006 | 1104 | 388 | 1492 |
2007 | 1099 | 404 | 1503 |
Total* | 20354 | 7520 | 27874 |
एक क्षण थांबा. विचार करा. आपल्याला हे परवडनारे आहे का? एक सामान्य नागरिक म्हणून मी काय कॄती करनार हाच विचार करनार का?
दोन्ही आकडेवार्या पाहील्या तर असे दिसून येईल की तिन सामान्य नागरिकांपाठीमागे एक सुरक्षा रक्षक ( सैन्य, पोलीस, किंवा इतर) शहिद झालाय. ह्या आकडेवारीतूनच आपण किती अकार्यक्षम आहोत हे दिसून येते. मुंबईमुळे हे फक्त प्रकाशझोतात आले इतकेच. आपण गेल्या दिवसांचा ( १९६५, १९७१) गर्व बाळगत किती दिवस बसनार आहोत देव जाने. ३०३ रायफली घेऊन ऐके ४७ वा ५६ ला जर मुकाबला करनार असू तर त्यांना आपल्याला मारण्याचा पुर्ण हक्क आहे.
हे किती दिवस चालवून घेणार? हा दहशतवाद तूम्ही समजताय तेवढा दुर नाही. उद्या ह्या मृतांच्या आकड्यात तूमचा ही नंबर लागू शकतो. वेळ आली आहे. जो कोणी ह्या दहशतवादाला खतपाणी घालतो त्याला चेपन्याची. मग ती एका विशिष्ट धर्माची वा संप्रदायाची माणसे असली तरी हरकत नाही.
इथे व्होट्स चे राजकारण करत बसलो तर लवकरच भारतात देखील हिंदू स्फोट, दलीत स्फोट, जैन स्फोट, ख्रिश्चन स्फोट होऊ शकतात नव्हे, झालेत.
दुर्दैवाने आपण भारतीय असेच समजत होतो की फक्त काश्मीर पुरता दहशतवाद त्रास देतोय. त्यावर काही हिंदू बोंब मारत आहेत एवढीच आपली दहशतवादाची ओळ्ख. वर मासल्या दाखल फक्त २००८ ची राज्य निहाय आकडेवारी दिली आहे. फक्त काश्मीर हा प्रश्न नाही तर "भारत" हा प्रश्न आहे.
अनेक ब्लॉग्स व काही लेखांमध्ये अहिंसेनी सामना करु हे वाचले. अहिंसेच्या दिवास्वनातून बाहेर यायला लोक का तयार नाहीत? "दहशतवादाचा मुकाबला फक्त शस्त्राने होऊ शकतो. गुलाबाचा फूलाने नाही." हे काही भारतीयांना कोण समजावून सांगेल हा प्रश्न मला पडलाय. आणि दहशतवादाचा खात्मा केला तर आपण काही हिंसक होणार नाही हे का कळत नाही. स्वरक्षन करने म्हणजे हिंसा का?
"१०० गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये" हे भंपक तत्वज्ञान आपण निदान दहशतवादांच्या केसेस मध्ये सोडायला पाहीजे. २९,२०४ लोक सरकारी आकडेवारी नुसार ह्या गेल्या काही वर्षात मेली आहेत. अजून किती निरपराध "अफझल गूरू" सुटनार आहेत ह्याचा विचार मानवतावाद्यांनी करायची गरज आहे.
आकडेवारी संदर्भ - Institute for Conflict Management
बापरे. हे
बापरे. हे पण एक प्रकारचे क्लिनझिंगच चाललेले आहे. तिकडे त्या मुगलीस्थाना बद्दल वाचले. इकडे प्रकाशित आकडेवारी त्यातले तथ्य दाखवितेय असे वाटते. त्या उल्फा, मार्क्सवादी इ सर्वांना पण मुस्लीम दहशतवाद्यांसारखेच सारखेच ट्रिट केले पाहीजे.
केदार, हे
केदार, हे आकडे सरकारी आहेत? वास्तव याही पेक्षा भयानक असावे.
नुकत्याच झालेल्या मुंबई हल्ल्यात १८० ह्या सरकारी आकड्यां पेक्षा नक्कीच जास्त मनुष्य हानी झाली आहे. हा सरकारी आकडा लोकांचे मनोधैर्य खचु नये (आणि शत्रुचे वाढु नये) या साठी होता. कृपया एक तक्ता अतिरेक्यांचा पण टाका. म्हणजे १० वाईट्ट माणसे नाहीशी होतांना, १८० (सरकारी आकडा) चांगल्या माणसांना नाहिशी करतात १:१८ प्रमाण.
अरे केदार...
अरे केदार... फक्त अफझल गूरूच नाव कस काय घेतलस बाबा?? तू सगळया धर्मांच्या एकेक दहशतवाद्यांचं नाव लिहायला हावं होतस.. !!!!!!! निधर्मीवाद किंवा सर्वधर्मसमभाव नको का पाळायला आपण????
ऍडमा बरोबर
ऍडमा बरोबर आहे. कळतयं मला.
उदय हो ही आकडेवारी चूकच असनार ह्यात वाद नाही. खरा आकडा ह्यापेक्षा कितीतरी जास्त असनार आहे.
------------------------------------------
अबला न माझिही माता रे। कथिल हे अगस्तीस आता रे।
बाप रे! वीस
बाप रे! वीस हजार लोक मरण पावलेत १४ वर्षात.... म्हणजे दरवर्षी कमीत कमी एक हजार लोक मरतात कोणत्या ना कोणत्या दहशतवादामुळे....