फलज्योतिष कशासाठी

Submitted by पशुपत on 11 September, 2023 - 06:58

फल ज्योतिष याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात कुतूहल निश्चितच असते. त्याच्यावर विश्वास असणाऱ्या लोकांमध्ये तर याबद्दल खूप आकर्षण असते .
यासंदर्भात दोन-तीन विचार मला वाचकांसमोर ठेवायचे आहेत आणि त्यावर साधक अशी चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.

पहिली गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की फल ज्योतिष हे निश्चितच शास्त्रीय पद्धतीने भविष्याबद्दल केलेल्या तर्काचे मांडणी आहे. ज्या गोष्टींचा तर्क करण्यासाठी कुठलीही विचारसरणी, विज्ञान, शास्त्र किंवा पूर्वानुभव उपयोगी पडत नाही त्या गोष्टींच्या भविष्याबद्दल तर्क करण्यासाठी ही पद्धती अस्तित्वात आली असावी.
म्हणजे नेमके काय हे सांगण्यासाठी एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
एक विद्यार्थी अतिशय हुशार आहे, परीक्षेसाठी त्याची तयारी पूर्ण झालेली आहे . त्याला आत्मविश्वासही आहे . पण परीक्षेला जाताना नेमकी त्याच्या सायकलला रिक्षाची धडक बसते , तो जायबंदी होतो आणि पेपराला दोन तास उशिरा पोहोचतो आणि एका तासात लिहिता येईल एवढं प्रश्नांची उत्तरे लिहून तो उत्तीर्ण होतो पण जो विद्यार्थी त्या विषयात प्रथम येण्याची क्षमता असलेला आहे तो कसाबसा पास होतो . हे अवास्तव कशामुळे घडले याचे उत्तर विज्ञान पुढील प्रमाणे देईल कि त्याला अपघात झाला, तो उशिरा पोहोचला, त्याने पूर्ण उत्तरे लिहिली नाहीत , वगैरे म्हणून!
पण ह्या मुलाच्या बाबतीतच नेमकं पेपराच्या वेळेलाच असा प्रसंग का घडला हा प्रश्न मानवी मनाला निश्चितच भेडसावणारा आहे . या घटनेकडे पाहण्यासाठी खरे ज्योतिषाचा आधार निश्चित घेता येत असतो.
म्हणजे पत्रिका पाहून कोणीतरी ज्ञानी माणूस हे आधीच सांगू शकतो की या मुलाच्या बाबतीत अशा तऱ्हेच्या घटना घडण्याची शक्यता आहे. हे जर आधीच ठाऊक झाले तर त्या मुलाच्या संदर्भात या घटना टाळण्यासाठी उपाययोजना काही हद्दीपर्यंत निश्चितच करता येतील.
आणखीन एक उदाहरण सांगतो .
जीवनाच्या प्रवासाला निघालेल्या मनुष्याला गाडीत बसल्यावर जर कोणीतरी सांगितलं की अरे मित्रा ही गाडी अशा ठिकाणी जाणार आहे जिथे खूप थंडी आहे , तर तो जाताना त्या थंडीचा सामना करण्यासाठी निश्चितच थोडीशी पूर्वतयारी करू शकतो. जसे की मधल्या कुठल्या स्टेशनवर त्याला शक्य असेल तर उतरून चांगले गरम कपडे, शाल अशा वस्तूंची खरेदी करणे वगैरे .. की ज्यामुळे त्याच्या पुढे येऊ घातलेल्या समस्येला तो चांगल्या रीतीने हाताळू शकेल.
हे उदाहरण शब्दशः न घेता मुद्दा समजावून सांगण्यापुरते घेतले आहे याची जाण ठेवावी.
त्यामुळे ज्योतिष ढोबळपणे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या किंवा चांगल्या गोष्टी यांचं थोडंसं निदान आधीच करू शकत असेल तर त्या दृष्टीने त्या गोष्टी हाताळण्यासाठी त्याकडे बघण्या इतपत सामंजस्य जर माणसाने दाखवलं तर ते शास्त्र निश्चितच उपयोगी ठरेल.

पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की कुठलीही गोष्ट प्रमाणात केली तर ती उपयुक्त असते ! प्रमाणामध्ये सर्व काही असावे.

फलज्योतिष या विषयावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी कृपया कुठलेही प्रतिसाद देऊ नयेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते ज्योतिष हे 'सेल्फ-अवेअर्नेस' टूल(साधन ) आहे. 'फल' ज्योतिषापेक्षा मला ते ललित किंवा क्रिएटिव्ह रायटींग करण्याचे फॉडर म्हणुन आवडते. कारण प्रत्येक राशीत, योग/दॄष्टी आदिंमध्ये 'आर्केटाइप्स' खच्चून भरलेले आहेत.
- कुंडलीतील चवथे घर
- आम्ही सार्‍या चंद्रसख्या
- धनु राशीच्या शुक्रास पत्र
- कन्या रास/ ६ व्या घरातील शुक्र
- ब्युटी द बीस्ट (प्लूटो + ट्रान्स्फॉर्मेशन)
- बुध नेपच्युन‌ जोडी
- चवथ्या घरातील प्लूटो

पशुपत आणि सामो सहमत.

१) हल्लीच्या व्यवहाराचा मुद्दा म्हणजे चरितार्थ कशावर चालणार आणि त्यात कितपत संपत्ती मिळेल. ते ज्योतिष सांगते.
२)परदेश का देशातच?
३)नोकरी, व्यवसाय,दुकानदारी,भागीदारी का स्वतंत्र. यावर चांगला उजेड पडतो.
४) नेतागिरी,राजकारण?
५)सरकारी का विरोधी प्रवृत्ती
६) ज्यांचा आपल्या चांगल्या आणि वाईटावर प्रभाव पडतो परंतू ते प्राक्तन आपल्या हातात नसते अशा लोकांचा विचार -आईवडील,भाऊ बहिण,इतर आप्त, शेजारी,बाहेर वरिष्ठ,कनिष्ठ आणि सहकारी.
हे काही थोडे विचार ज्योतिष सांगते. जिथे प्रयत्न काही कामाचे नसतात तिथे.

बरोबर, अगदी अचूक माहिती जरी नाही मिळणार तरी थोडी शक्यता / दिशा कळली तर त्या माहिती नुसार तयारी करता येऊ शकते..