*

पुरावा (गझल)

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 12 July, 2018 - 03:32

माझे सासरे श्री वसंत देशपांडे, ह्यांनी १९८२ ते १९९० या कालावधीत गझल लेखन केले, त्यावेळी त्यांच्या गझल मेनका व गझल-गुंजन या मासिकात येत असत, मा. श्री सुरेशजी भट साहेबांनी कौतुकाची थाप देत त्यांना पत्र देऊन तुमचा २५ वा नंबर असल्याचे कळविले होते. वयोमानामुळे त्यांनी गझल संग्रह प्रकाशीत करण्यास नकार दिला होता, परंतू आम्ही तो मागील महिण्यात प्रकाशित केला. ते स्वत: आंतरजालावर येत नसल्याने काही गझल येथे क्रमाने देईल.

आता नको आम्हाला आभास रौरवाचा
दुष्काळ होत आहे गुणधर्म जीवनाचा

आली कशी कळा ही इतक्यात सभ्यतेला
माणूस घेत नाही कैवार माणसाचा

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - *