इतकेच
Submitted by बेफ़िकीर on 28 August, 2016 - 12:45
एकोणतीस वर्षांची झाले. माझे लग्नच ठरत नव्हते. आलेल्या सगळ्या स्थळांमध्ये सांगण्यासारखे खूप गुण आणि काढण्यासारखे खूप दोष होते. गुण माझे बाबा ऐकवत होते आणि दोष माझी आई सांगत होती.
एकदा तर साखरपुडाही झाला. पावणेतीन लाख खर्च करून साखरपुडा झाला. पावणे दोनशे लोक जेवून गेले. लग्न आठ दिवसांवर आले आणि ते आम्हीच मोडले.
का तर मुलगा रोमॅन्टिकली वागतच नाही. सदोदीत आई वडील आणि भाऊ वहिनी ह्यातच मश्गुल!
माझ्याशी बोलतच नाही.
विषय:
शब्दखुणा: