शरद जोशी: पंगा घेणारा गेला
Submitted by चिंतामण पाटील on 20 December, 2015 - 00:11
चिंतामण पाटील****
शेतकरी राब राब राबून पिकवतो. पण त्याने घाम गाळून
काढलेल्या मालाचं बाजारात कवडीमोल होतं. तेव्हा
त्याच्या त्या घामाच्या मोबदल्यात रास्त दाम
मिळविण्यासाठी हा शरद जोशी नावाचा माणूस
व्यवस्थेशी पंगा घ्यायला उतरतो. शेतकऱ्यासाठी
लढणाऱ्या या शिलेदाराने 12 डिसेंबरला अखेरचा निरोप
घेतला. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांसाठी राजकारणीही
आंदोलन करताना दिसतील, पण मतांचं गणित
सांभाळण्यासाठी शेतमालाचे दरही घसाघस उतरवतील,
तेव्हा शेतकऱ्यांसाठी निर्भेळ पंगा घेणारा शरद जोशी
नावाचा महान माणूस आठवत राहणार.
विषय:
शब्दखुणा: