Submitted by राज अज्ञानी on 27 May, 2026 - 04:01
वेधक वेचक बातम्यांची लिंक वर असलेल्या धाग्यावर दिली जाते. पण बऱ्याचदा ती लेखाशी सुसंगत असत नाही. तसेच तो धागा मागे पडला कि संबंधित बातमी पण विस्मरणात जाते.
लक्षवेधी बातम्या एका ठिकाणी असणारा धागा सर्च मधे सापडत नाही. असेल तर हा धागा बंद करण्यात आला तरी चालेल.
नसेल तर कृपया इथे बातम्या डकवायची सोय आहे. चित्र, लिंक, मजकूर कोणत्याही प्रकारची माहिती चालेल. देणाऱ्या ने बातमी प्रतिष्ठित संस्थेच्या हवाल्याने दिलेली असावी किंवा व्हेरिफाय केलेली असावी. फर्स्ट हॅंड असेल तर सत्यता पटवण्याची जबाबदारी घेतलेली असावी एव्हढीच माफक अपेक्षा.
विषयाचे बंधन नाही.
एखाद्या बातमीवर जास्त काळ चर्चा होईल असे वाटल्यास स्वतंत्र धागा काढावा ही विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
जपानने भारताचा हापूस आणि केसर
जपानने भारताचा हापूस आणि केसर या आंब्यांवर बंदी घातली आहे. एक खेप परत पाठवून दिली आहे.
याचे कारण म्हणजे जपानचे अधिकारी जेव्हां भारतात हापूस आंब्यांची लागवड आणि प्रक्रिया यांची पाहणी करण्यासाठी आले होते, तेव्हां फ्युमिगेशन प्रोसेस दरम्यान आंतरराष्ट्रीय मानकांची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांना आढळले. फ्युमिगेशन म्हणजे कीटकनाशकांचा वापर. यात जे विषारी पदार्थ वापरतात ते घातक आहेत.
भारताचा माल अनेकदा परत येतो. त्यानंतर भारतातली माध्यमे त्या देशांना दोष देतात. पण कीटकनाशकं म्हणून घातक रसायनांचा सर्रास वापर होतो. ही कीटकनाशकं जमिनीत अनेक वर्षे राहतात. पाण्यात मिसळली जातात. त्याने कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात. हा एक मोठा तिढा आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर करायचा तर खर्च मोठा होईल, ज्यामुळे फळांच्या किंमती जास्त वाढतात. आणि जर सध्याची कीटकनाशकं वापरणं थांबवलं तर कीड येऊन पीक नष्ट होतं. ज्यामुळे नुकसान सोसावं लागतं.