कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये भारताची गुप्तहेर संस्था रॉ च्या कारवाया ? की अजून दुसरे काय ?

Submitted by फुरोगामी on 2 October, 2023 - 10:36

भारतास हवा असणारा खलिस्तानी अतेरिकी निज्जर कॅनडा मध्ये मारला जाण्याअगोदर पासूनच भारतास हवे असलेले पण पाकिस्तान आणि कॅनडा मध्ये आश्रयास असलेले तब्बल १८ टॉप मोस्ट अतेरिकी un known व्यक्ती कडून संपवले गेले होते .
जून महिन्यात निज्जर वर हल्ला झाला , त्या बद्दल भारतावर आरोप करण्यासाठी कॅनडाचा पंतप्रधान जस्टीन ट्रूडो ला चार महिने लागले .
त्याच्या आरोपांना केराची टोपली दाखवल्या मुळे
आरोप करताना आक्रमक असलेला ट्रूडो आठ दिवसांत मवाळ झालेला दिसला .
इथे हिंसक कारवाया करून भारताच्या कानून के लंबे हाथ पासून कोसो दूर कॅनडा आणि पाकिस्तानच्या राजकीय छत्रछायेखाली हे अतेरिकी ऐश् करून समस्त भारतीयांना वाकुल्या दाखवत होते .
शिवाय ते अतेरिकी तेथील सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या दिमाखात सहभागी देखील होत होते .
या क्षेत्रातील जाणकारानुसार भारताची रॉ संघटना भाड्याचे हल्लेखोर घेवून या कारवाया करत आहे तर काहीच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानची आय एस आय त्यांना संपवत आहे .
एक मात्र नक्की जागतिक आर्थिक मदती कडे नजर लाऊन बसलेल्या पाकिस्तानला FATAF ग्रे लिस्ट मधून बाहेर पडण्यासाठी ज्या तरतुदी लावल्या गेल्या होत्या त्यात अतेरिक्यांच्या मुसक्या आवळण्याची देखील होती .
म्हणून कदाचित आय एस आय ने देखील पाकिस्तान मधील अतेरीकी संपवण्यास हाथ भार लावला असावा !
खरं खोटे कोणास ठाऊक , पण कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये आश्रयास असलेल्या अतेरिक्यांना आपल्या कोर्टात आणून शिक्षा देणे भारतासाठी अवघडच झाले होते .
पण त्यांचा un known person काटा काढत आहेत यातच सर्व आले.
इस्रायलची मोसाद गुप्तचर संघटना इस्रायल विरोधी तत्वांना वेळीच वेसण घालते तशी वेसण रॉ ने घालायला सुरुवात केली काय ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग अमेरिका त्या पन्नू टन्नूला भारताच्या हवाली का करत नाही? खलिस्तानवाद्यांना पाठीशी का घालते? अशा अमेरिकेच्या गळ्यात आपण का पडायचं?>>>>>>>
मला तरी हे निखिल गुप्ता प्रकरण पूर्णपणे scripted वाटतंय . न्यू यॉर्क मध्ये हत्यारांबाबत खुला बाजार असताना , तेथे एक से एक किलर्स मिळाले असते .
त्या टन्नू ला मारण्यासाठी भारतातून ते ही नेमका गुजरात मधील निखिल गुप्ता जातो , एक लाख डॉलर्स द्या मी टन्नू ला मारायची व्यवस्था करतो .
तो जातो , किलर शोधतो , सुपारी कोणाला देतो तर एफ बी आय agent ला.
सुरवातीचा advance १५ हजार डॉलर्स दिले जातात , मग अमेरिकी सरकार ॲक्टीव होते आणि निखिल गुप्ता ला अटक होते .
हळु हळु सगळे बाहेर येईलच !
आणि भरत तुमच्या आवडत्या बायडेन ला भाजप सरकारच्या गळ्यात का पडता म्हणून विचारा की .

हिंदु असल्याचा गर्वच नाहि तर माज आहे.
हिंदुचा पैसा देनगी म्हनुन घेऊ, हिंदुंना सोडुन देउ. तुम्ही मुसलमान दाऊदला सोडलं तसं.

>>>>>>पण तीन मॅडम उत्तर द्यायल्या आल्या.
यात ३ या आकड्याबद्दल आक्षेप आहे की मॅडम या शब्दाबद्दल की ओपन फोरमवरती कोणीतरी उत्तर द्यायला सरसावले यावरती आक्षेप आहे?

तो निखिल गुप्ता ड्रग ट्रेडर् होता म्हणे aninत्याच्यावर गुजरात मध्ये criminal केसेस आहेत .
बर अमेरिका कोणाची बाजू मांडत आहे ? तर ज्या पन्नू टन्नू ने भारताच्या एअर इंडियाचे विमान उडवून सामान्य नागरिकांना मारण्याची धमकी दिली .

पन्नू प्रकरण यानंतर अमेरिका च्या बाजूने आवरते घेतले जाण्याची शक्यता जास्त वाटते.
बरं या वर्षीच्या फेब्रुवारीत एअर इंडिया ने बोईंग ला पाचशे विमाने बनवण्याची ऑर्डर दिली आहे आणि त्याच एअर इंडिया चे विमान पन्नू बॉम्ब ने पाडायचे म्हणतोय !
इथून पुढे सरळ फ्रान्स च्या एअर बस ला विमाने बनवण्याची ऑर्डर्स देवून तिरक्या अमेरिकेला फाट्यावर मारले पाहिजे .
एक गोष्ट नक्की पन्नू जितक्या दिवस जिवंत राहिलं तितका अमेरिका भारताच्या व्यापारावर परिणाम होणार हे निश्चित ......

ज्या अधिकारीने गुप्ता सुपारी दिली
त्याने किलर कोन त्याची चौकशी केलि नाहि हे पटत नाही.
तो किलर अमेरीकाचा सीआयडी अधिकारी आहे
हे त्याला कळलं नाहि.
हे पटण्यासारखे नाही.
काही तरी झोल आहे.
तुम्हाला मोदीच डोक माहिती नाही.
आता मूर्ख विरोधक सरकार वर टीका करतील.
ती मोदी सरकारची जाहीरात होईल.
फुकटात.
बिनडोक विरोधक मतदारला सांगतील.
मोदी देशाच्या दुश्मन ला सुपारी देऊन मारतो.
मतदार म्हणेल चांगल काम करतो मोदी.
त्यालाचू मत देवू.
तो बायकोला पोरांना सांगल.
मित्राना सांगल.
नातेवाईकांना सांगल
पन्नास लोकांना सांगल.

ज्या कुणाला वाटते की देश (आपला नव्हे, कुठलाही) देश हितासाठी गरजेच्या वाटणार्‍या गोष्टी करत नाही आणि करत असेल तर ते चुकीचे आहे - त्यांना विचारावेसे वाटते - सिरियसली?

ह्यात सरकार कुठले आहे ह्याचा विचार करायची तरी गरज आहे का? आणि त्यानुसार पाठिंबा देण्याची न देण्याची?

ह्यात सरकार कुठले आहे ह्याचा विचार करायची तरी गरज आहे का? आणि त्यानुसार पाठिंबा देण्याची न देण्याची?>>>>>>>>>>>
अतेरिक्याला वाचवण्यासाठी रात्री १२ वाजता सुप्रीम कोर्ट उघडायला लावणाची मानसीकता असलेल्या लीब्र्य लोकांना देशाशी काहीही घेणेदेणे नव्हते !
त्याच प्रमाणे निज्जर / पन्नू च्या केस बाबत कॅनडा आणि अमेरीका या देशांना भारत सरकार ला उत्तर द्यावे लागत आहे हे पाहून त्याच लिब्र्यांचा आनंद उफाळून बाहेर आला आहे .
बाकी काही नाही....

Loyalty to country ALWAYS. Loyalty to government, when it deserves it. Mark Twain.

इथे सरकार जे करतंय ( असं दिसतंय आणि भाजप समर्थकच तसं म्हणताहेत) ते देशहिताचे आहे असं वाटतं नाही.

याच भाजप समर्थकांना देविंदर सिंग, निरव मोदी, मल्ल्या, चोक्सी यांच्याबाबत सरकार काहीच करत नाही यात काही वावगं वाटत नाही.

ज्या कुणाला वाटते की देश (आपला नव्हे, कुठलाही) देश हितासाठी गरजेच्या वाटणार्‍या गोष्टी करत नाही आणि करत असेल तर ते चुकीचे आहे - त्यांना विचारावेसे वाटते - सिरियसली? ///
देशहित म्हणजे बहुसंख्य जनतेचं हित. त्यांना जर अंतर्गत सुरक्षा , दहशतवादविरोध याची पडलेली नसेल तर आता शेवटच्या सहा महिन्यांत मोदी सरकारने या भानगडीत पडू नये. तुम्ही २०१४ पासून दहा वर्ष अंतर्गत सुरक्षा दिली- thankless job होता तो. Zero terror attacks in mumbai. But who cares.
आता २०२४ मध्ये सरकार बदललं की २०१४ च्या आधी व्हायचे तसे मुंबई पुण्यात घुसून टेरेरिस्ट हल्ले परत सुरू होऊ शकतील. मग मायबोलीवर थरारक घटना लिहायला सदस्य सरसावतील- मी अमुक ठिकाणी होतो, मला काही दिसेना, माझी आई वाचली असेल का हा प्रश्न पडला होता वगैरे. आणि हे लोक लगेच पुढच्या धाग्यावर काँग्रेसचा प्रचारही करतील.

देशहित म्हणजे बहुसंख्य जनतेचं हित हा बहुसंख्यवाद झाला. लोकशाही नाही. ( आता तुमचं गाडं आरक्षणावर आणि जितनी आबादी उतना हक वर येणार. तुम्हांला बहुसंख्य जनतेला त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवून मुळातच प्रिव्हिलेज्ड असलेल्या लोकांना त्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त वाटा देऊन त्यांचा प्रिव्हिलेज कायम ठेवणारी व्यवस्था हवी आहे. ते जितनी आबादी उतना हक असं आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांनाच सगळं असं नाही )

You had to specify Mumbai. That says it all.
I think all bjp supporters know and believe that Pulwama was not a terror attack afterall. That's why they keep mum about it and the complacency of the government.

आणि भारतात भाजपवाले सोडले तर खलिस्तानचा ख सुद्धा कोणी उच्चारत नाही. शेतकरी आंदोलनाला यांनी खलिस्तानचा लेबल लावलं. अचानक कुठूनतरी एक अमृतपालसिंग उगवला. पोलिसांशी लपाछपी खेळला. त्याला अटक झाल्यावर पंजाबात कसलीही प्रतिक्रिया उमटली नाही. कोणी आणलं त्याला?

आणि विदेशी भूमीवरून कोणी देशविरोधी कारवाया करत असेल, तर त्या देशाला त्याबाबत पुरावे देऊन त्यांचं प्रत्यार्पण करून घेणं हाच योग्य मार्ग आहे.
तुम्हां लोकांना असं म्हणायचं आहे का की अमेरिका भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांना थारा आणि संरक्षण देते? भारत सरकार तसं म्हणणार आहे का?

उद्या भारतातले सरकार बदलले आणि तुम्ही सरकारविरोधात म्हणजे तुमच्याच शब्दांत भारताविरोधात लिहिताय किंवा लिहिलंत म्हणून त्या सरकारने तुमची सुपारी दिली तर त्याचं स्वागत कराल का? आम्ही तेव्हाही सरकारला विरोधच करू.

नानबा, कोड्यात आणि कोड लॅंग्वेजमध्ये लिहू नका. तुमची भूमिका स्पष्ट करा. विदेशी नागरिकांसाठी सुपारी देणं तुम्हांला पटतं का?
डरो मत.

विदेशी नागरिकांसाठी सुपारी देणं तुम्हांला पटतं का?
डरो मत. >>>>>
भले त्या विदेशी टन्नू ने भारतातील सामान्य नागरिकांना
आणि परदेशातील दुतवासातील अधिकाऱ्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या तरी आम्ही टन्नूचे च जोडे उचलणार कारण आम्हाला संविधान ने हक्क दिलेला आहे .
दुसरी गोष्ट सध्याच्या केंद्र सरकार विरोधात सतत टीका करणाऱ्या अमेरीकन कर्णी ची या सरकारने सुपारी दिली तर आम्हीही नक्कीच विरोध करू !
शेवटी काय वैचारिक स्वातंत्र्य महत्वाचे मग त्या साठी देश खड्यात गेला तरी चालेल.

प्रश्न कोणाला होता हे महत्त्वाचे नाहीच !
म्हणून तर , देश विरोधी कारवाया करणाऱ्या लोकांच्या समर्थनार्थ बोलण्याच्या तुमच्या संविधान ने दिलेल्या हक्काला फुंकर मारली आहे .

आणि विदेशी भूमीवरून कोणी देशविरोधी कारवाया करत असेल, तर त्या देशाला त्याबाबत पुरावे देऊन त्यांचं प्रत्यार्पण करून घेणं हाच योग्य मार्ग आहे.>> हो ना. जसे दाऊद, टायगर मेनन, मोलाना मसुद अजहर इत्यादी इत्यादी मंडळींना मुसक्या बांधून भारतात आणलं तसंच आणता येईल.

{देश विरोधी कारवाया करणाऱ्या लोकांच्या समर्थनार्थ बोलण्याच्या}
फुरोगामी सर, तुम्ही कधीतरी खरं, तथ्याधारित लिहाल का?

वीरू, मग ललित -निरव मोदी इ.साठी तो मार्ग का निवडला आहे.
आणि तुम्हांला नको असलेल्या बाहेरच्या देशातल्या लोकांना सुपारी देऊन उडवल्या वर, ते देश तुम्हांला प्रश्न विचारणार नाहीत का?

मुळात सरकार म्हणतंय, आम्ही कोणाला मारलं नाही. It's not our policy. तुम्ही लोक कशाला उडताय इतके?

{शेवटी काय वैचारिक स्वातंत्र्य महत्वाचे}
अमेरिका खलिस्तान्यांबद्दल हेच म्हणतेय. ( पॅलेस्टाइन बद्दल नेमकं उलट करतेय). यावरून अमेरिकेशी संबंध तोडणार का?

बरोबर आहे !
कथित हत्येचा प्रयत्न झालेला तो टन्नू शांत बसलेला असताना भारतातील लिबरे उडले तर ते जगमान्य आहे ....

Pages