मग ज्योतिष्याचा उपयोग काय?

Submitted by केअशु on 10 September, 2023 - 09:35

काल एका मुलाने प्रश्न विचारला की जर नशिबात जे लिहिलेलं आहे ते होणारच असेल , न टळणारं असेल तर मग फलज्योतिष कशासाठी आहे? फक्त पुढे काय होणार हे सांगण्यासाठी ? बरं समजा पुढे जाऊन काय होणार आहे हे सांगितलं आणि ते आपण बदलू शकणार नाही आहोत किंवा आपली तेवढी कुवत नसेल किंवा ते अटळ असेल तर मग ज्योतिष्याने दिलेल्या या माहितीचा उपयोग काय ? नशिबात जे नकोसं लिहिलेलं आहे त्याला विरोध करण्याची मानवी क्षमता किती ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फलज्योतिष बघणे हे पण ज्यांच्या नशिबात लिहिलं आहे, त्यांच्यासाठी ते आहे

अनिश्चितता कधी कधी पेलवत नाही. अशा वेळी एक anchor म्हणून ज्योतिषशास्त्राकडे बघितले जाते. जे जे शाश्वत नाही आणि विज्ञानाकडे ज्या प्रश्नांची ठोस उत्तरे नाहीत ते ते प्रश्न घेऊन ज्योतिषाकडे जाणारे लोक जास्त दिसतील. जसे की लग्न जुळवणे, एखाद्या किचकट शास्त्रक्रियेतून रुग्ण जगेल की दगावले.
जर हवामान खात्याने अचूक पावसाचे अंदाज दिले असते तर गावांकडल्या जत्रांमधून पावसाचे कौल लावणारे लोक कमी झाले असते.

- तब्येतीच्या तक्रारी हे भविष्य २५ वर्षांपूर्वी पु ना ओक यांनी माझी कुंडली पाहून वर्तविले होते.
मी त्या भविष्याचा उपयोग करुन घेउन, व्यायाम-आहार-झोप यांची किमान नियमितता ठेवायला हवी होती. पण तसे झाले नाही आणि अनंत दुखणी मागे लागली.

तेव्हा उपयोग होउ शकतो पण तो जर केला तरच.
----------------------
प्रेडिक्टीव्ह सायन्स (सुडो) पेक्ष ज्योतिष हे मानसिक कल, आवडी निवडी, कार्मिक क्रिस्टलाइझ्ड पॅटर्न्स हे ओळखण्याकरता वापरावे असा अने क पाश्चात्य ज्योतिर्विदांचा मुद्दा आहे.

पुन्हा पुन्हा ज्योतिषाकडे जाणारे लोक प्रचिती आली म्हणून जाणारे असतात. त्यांना यात आपला काय आणि कसा फायदा आहे हे कळलेलं असतं. धर्मो रक्षति रक्षित:|
ज्याला यात काही अर्थ नाही असं वाटतं त्यांनी यात पडू नये. तसंच हिंदू धर्म, सनातन हे थोतांड आहे, किटाणू आहे , दुसरे धर्मच छान आहेत असं वाटणाऱ्या लोकांनीही ज्योतिष, मंदिर इथें अज्जिबात फिरकू नये. तेवढीच जरा इतर श्रद्धाळू लोकांना दर्शनासाठी लाईन कमी होईल आणि ज्योतिषांच्या apoointments लवकरच्या मिळतील.

@सामो
मी त्या भविष्याचा उपयोग करुन घेउन, व्यायाम-आहार-झोप यांची किमान नियमितता ठेवायला हवी होती. पण तसे झाले नाही आणि अनंत दुखणी मागे लागली.

म्हणजे ज्योतिषावर विश्वास ठेवणे आणि तो सांगतो ते अंमलात आणणे हे सुद्धा नशीबात असायला हवे. Happy

मी सुरवातीला फार पूर्वी भविष्य सांगायचो. लोकं सारखी माझ्याकडे यायची कारण मी सांगितलेलं भविष्य अचूक असायचं. ग्रह तारे यांच्या पलीकडे जाऊन मी आकाशगंगा आणि वेगाचा मेळ घालून हे सगळं साध्य केलं होतं. लोकं मला खूप पैसे द्यायचे पण मी घ्यायचो नाही. शेवटी लोकांनी नकळत एक मोठा बंगला बांधला आणि मी रात्री झोपलेला असताना मला उचलून त्या बंगल्यात ठेवला. तेव्हापासून मी भविष्य बघणं सोडून दिलं.

अचुक भविष्य सांगणारा भेटायला तर हवा.. असे अभ्यासु जाणकार खुप कमी असतात. कोणी काहीही सांगेल आणि आपण त्यावर विसंबुन राहायचे हे योग्य नाही, त्या मुलाला सांगा की भविष्य जाणायच्या भानगडीत न पडता तु स्वतः स्वतःचे भविष्य घडव.

भविष्यावर विश्वास ठेवणे न ठेवणे आपल्या हाती आहे. पण ते आधीच कळले तर योग्य ते उपचार करुन परिणाम नियंत्रित ठेवता येतात असे वाचले आहे. सामोने भविष्य माहित झाल्यावर निरोगी जीवन शैली अंगिकारली असती तर भविष्यावर मात केली असती, यालाच ज्योतिषी फ्री विल म्हणत असावेत. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर लिखित भविष्यही बदलता येते म्हणे.

>>>>>सामोने भविष्य माहित झाल्यावर निरोगी जीवन शैली अंगिकारली असती तर भविष्यावर मात केली असती, यालाच ज्योतिषी फ्री विल म्हणत असावेत. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर लिखित भविष्यही बदलता येते म्हणे.
अगदी बरोबर. पण घोडचूक तीच असते आपण हाफ हार्टेडली ज्योतिषाकडे जातो. ना धड विश्वास ठेवतो ना अविश्वास. ना घर का ना घाट का. मी त्यांनी सांगीतल्यापैकी फक्त - नवरा स्वाभिमानी व कर्तुत्ववान असेल हे सिलेक्टिव्ह वाचले. खरे तर त्यांचे तेही भविष्य खरे आहे. पण मुद्दा तो नाही. आपण सिलेक्टिव्ह ऐकतो.

मग ज्योतिषाचा उपयोग काय ?
>>>

कोणाला ? ज्योतिषाला खूप उपयोग आहे. उपजीविकेचे साधन मिळते.
इतरांना काय फायदा ? तर काहीही नाही.

फलज्योतिष बघावे लागते हे पण ज्यांच्या नशिबात लिहिलं आहे, त्यांच्यासाठी ते आहे

पोपटाला पेरू मिळे. हल्ली पोपट पाळण्यावर बंदी आली आणि पोपट सुटले.