पक्षफुटीनंतर एखाद्या गटाला मान्यता देण्याआधी पक्षकार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावित काय?

Submitted by ashokkabade67@g... on 13 July, 2022 - 03:06

खरतर कुठल्याही पक्षाचे नगरसेवकांपासून ते आमदार खासदारा पावेतो सारेच निवडून येतात ते कार्यकर्त्यांच्या जीवावर पण प्रत्येक पक्षातील हेच निवडून आलेले लोक पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत पक्षत्याग करतात खरतर असे हे नेते यांना कुठल्याही तत्वांशी काहीही बांधिलकी नसते असते ती फक्त सत्ता आणि स्वस्वार्थाशी हेलोक खरतर गद्दार च असतात नैतिकता पहाता खरतर यांनी पदाचा राजीनामा देऊन मग पक्षांतर करायला हवे कारण हे फक्त पक्षाशीच नव्हे तर यांना निवडून आणनाऱ्या कार्यकर्ते व यांनामत देणाऱ्या मतदारांशी गद्दारी करत असतात पण राज्यपाल असो की निवडणूक आयोग फक्त संख्या पहातात आणि मान्यता देतात ।यात सत्तेचा गैरवापरच होतो हेही तितकच खर असाव कारण राज्यपाल केंद्र सरकार नेमत आणि कुठल्याही पक्षाच सरकार असल तरीही अधिकाराचा गैरवापर होतच असतो हे न्यायालयात आजपावेतो दाखल असलेल्याअनेक प्रकरणात दिसून आले आहे पण तो प्रश्न वेगळा ,पक्षफुटीनंतर कधीकधी पक्षच ताब्यात घेण्याचा हे लोक प्रयत्न करतात मग प्रश्न येतो तो निवडून आलेलेहे लोक म्हणजे पक्ष का ज्यांनी यांना निवडून आणले ते कार्यकर्ते म्हणजे पक्ष कारण हे बोटावर मोजण्या इतपत यांची संख्या आणि कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त
यांची संख्या लाखोत असते मग निवडणूक आयोग यांना कुठल्या सांख्यिकी बळावर मान्यता देऊ शकत बर पक्ष प्रतिनिधी म्हणून म्हटल तर यांनी पक्ष त्यागलेला असतो व बंडखोरी केलेली असते पण कार्यकर्ते मात्र पक्षातच असतात आणि मग हे प्रतिनिधी कसे काय असु शकतातयावर निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही मग जर उत्तर नसेल तर मान्यता देण्याचा अधिकार ही उरत नाही आणि मघ लोकशाही उरलीच कुठे हा प्रश्न उरतोच की यावर उपाय काय ?कारण राज्यकर्ते आपल्या पक्षीय स्वार्थासाठी यासाठी काही करतील अशी आशाच नाहु मग सत्तेत कुठलाही पक्ष असो।यावर जनतेला वा न्यायालयालाच मार्ग काढावा लागेल किंवा एक असो वा शंभर बंडखोर त्यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडणूक लढवावी व मगच हव ते कराव असा दंडक का असु नये।कारण जनता काँग्रेस असो वा भाजप राष्ट्रवादी असो वा सेना जनता यांच्या विचारसरणीवर मते देत असते म्हणजेच ही बंडखोरी फक्त पक्षाशीच नाही तर कार्यकर्ते व त्या पक्षाच्यि मतदारांशीही ठरते म्हणून प्रत्येक लोकप्रतीनीधींनी पक्ष सोडण्याआधी पदत्याग करणे गरजेचे आहे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तर तो देवींदर असेल एखाद्या मदरशात ! >>> चला कबुल केले देविंदर भाजपाचा आहे आणी मदरशात जाउन अतिरेकि हल्ले करव्तो !

तारेक मीर , ध्रुव सक्सेना, निरंजन होजाइ, मोहम्म्द फारुख खान मोठी लिस्ट आहे - सगळे भाजपाचे पदाधिकारी आहेत ! >>>>>>
थोडक्यात ! ह्या लोकांची मेंट्यालिटी ही शेवटी घातकी , अविश्वासू गद्दार च असते हेच सिध्द होतेय .
पण पक्षात घेण्या अगोदर हे कसे कळणार ...

कागाळे, वेड पांघरून नकोस. देवींदर सिंग हा काश्मीरमधल्या बडा पोलिस. अधिकारी. दहशतवाद्यांना दिल्लीला घेऊन येताना पकडला.
त्यांच्यावरची केस का बंद केली? कोणी केली?
पुलवामा झालं, तेव्हा तो तिथला इन चार्ज तोच होता, हा निव्वळ योगायोग?

स्वरा तू काळजी करू नकोस ,
त्या देविंदर ची चौकशी एन आय ए करत असेल .
कसं असतय , एक आंबा जरी नासका निघाला तर सुसाट बोंबलत पळायची काही लोकांना सवयच असते , त्या मुळे काळजी करू नका !

मद्रशे वाले पैशासाठी इमान विकतील ? अरे रे रे ! >>>> ते तुम्हालाच जास्त माहिती , सगळे अतिरेकि भाजपातच सापडतात

तस पाहिल तर भाजपचा हिंदुत्ववाद अनेकवेळा उघडा पडलेला आहे काश्मीर मधे असो वा गोव्यात यात हिंदू मुस्लिम वाद आणने निरर्थकच आहे ना येथे कुणी हिंदुत्ववादी हिंदुंचे रक्षक आहेत ना कुठलाही पक्ष मुस्लिमांचा मसिहा हे फक्त दुकान मांडून बसले आहेत सत्तेचा मलिदा खाण्यासाठी मग अब्दुल सत्तारही यांना चालतात मग भाजप असो सेना पण विषय तो नाही .येथे प्रश्न आहे तो मतदार व कार्यकर्ते व विचारसरणीशी प्रत्येक पक्षातुन बंडखोरी करणाऱ्यांचा मग सेना असो वा भाजप वा काँग्रेस मुळातच पक्ष सोडण्याआधी त्या बंडखोराने राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून आपली लायकी सिद्ध करण्याचा आजपावेतोचा ईतिहास पहाता परत बंडखोरांना स्थिन मिळालेले नाही व्यक्त व्हा तो अधिकारच आहे पण विषयाला अनुसरुण ।

>>तुम्ही पण दोन वर्षे लपूनच बसला होता की!<<

कामेधामे असतात लोकांना Happy
एकच माणूस दहा आयड्यांनी तेच तेच बोलून जेंव्हा वात आणतो तेंव्हा त्याच्या तोंडी लागण्यापेक्षा इग्नोरास्त्र वापरावे..... त्याला लपून राहणे म्हणत नाहीत.
वेळ मिळतो तेंव्हा येतो दोन चार टपल्या मारायला.... तेव्हढाच वेळ मजेत जातो Wink
तुम्ही नका मनावर घेऊ..... तुमचे चालू द्या Proud

चला धागालेखक अवतरला?? अडीच वर्षापूर्वी कुठे होतात तुम्ही?? >>> तिथेच होते ते जेथे फडणबीसांनी अजित पवारांसोबत सरकार स्थापन केले

वेळ मिळतो तेंव्हा येतो दोन चार टपल्या मारायला.... तेव्हढाच वेळ मजेत जातो >>> दुसरे येते काय तुम्हाला !
एकच माणूस दहा आयड्यांनी तेच तेच बोलून जेंव्हा वात आणतो तेंव्हा त्याच्या तोंडी लागण्यापेक्षा इग्नोरास्त्र वापरावे..... त्याला लपून राहणे म्हणत नाहीत. >>> मग आता दहा माणसे दहा आयड्यांनी आली हे समजले आहे तर !

>>जेथे फडणबीसांनी अजित पवारांसोबत सरकार स्थापन केले<<

हो हो!! त्यावेळी चवताळून त्यांनी धाग्यावर धागे काढलेले पण तीन चाकांच्या रिक्षाबद्दल तोंडात मीठाची गुळणी धरलेली Proud
तुमचे कल लपून राहत नाहीत. उगाच तटस्थपणाचे मुखवटे कशाला घालायचे म्हणून लिहलेले की ताकाला जाऊन भांडे वगैरे पण मग काही उत्तरे नसल्यामुळे कंपूकडून व्हॉटअबाउट्री सुरु झाली Proud

>>मग आता दहा माणसे दहा आयड्यांनी<<

अरे इतके असते तर सरकार आले असते की तुमचे.... वर्षानुवर्षे इथे करवादणारे किती मोजकेच आहेत ते माहिती आहे Rofl
सध्या जरा वेळ आहे टाईमपास करायला इतकेच Wink

तुमचे कल लपून राहत नाहीत >> इथे उघड उघड मोदीविरोधी लिहित आहेत , मोदी विरोधी कोणी लपुन लिहित नाहित पण भक्ताना भक्त म्हणले की पहिल्याम्दा म्हणतात "आम्हि भक्त नाहित पण ...."
अरे मोदी सारखे करु नका, ५६ इची आहे म्हणायचे पण चायनाचे नाव घेताना शेपूट आतम्ध्ये !

>>इथे उघड उघड मोदीविरोधी लिहित आहेत , मोदी विरोधी कोणी लपुन लिहित नाहित<<

सगळे स्वताला लावून घेउ नका हो..... धागाकर्त्याच्या विविध ठिकाणी आणलेल्या तटस्थपणाच्या उसन्या अवसानाबद्दल आहे ते Wink
तुम्ही त्यांचे ड्यूआयडी आहात का त्यांच्या वतीने बोलायला Happy

इंदिरा गांधींना पब्लिकने दगड मारला
पवारना थोबाडीत दिले

ह्यांच्यावर नुसती टीका करायची म्हटली तरी भक्त फुसफुसफूस करत वर येतात

थोडक्यात हे आणि यांचा बालिश नेता फक्त डिजिटल स्ट्राइक करण्यात मास्टर !
तो ट्विट वर ट्विट फेकून कंटाळा आला की परदेशात फिरायला जातो , आणि हे त्याच्या ट्विट चे जी !जी र !जी !! करायचे काम इमानइतबारे करत बसतात .
परिणामी दिवसेंदिवस आमदार आणि खासदारांची संख्या आटत चालली आहे .
बर यांना पक्की खात्री आहे की यांचा बालिश नेता आयुष्यात कधीच पंतप्रधान होऊ शकत नाही .
मग भांजळल्या सारखे ममता ला सपोर्ट कर तर कधी फारुक अब्दुल्ला ला सपोर्ट कर ! उठा ला सपोर्ट तर कधी काका ला सपोर्ट कर !
अमावस्या पूनवेला कधी कधी केजरू पण यांचा आवडता असतो .
हे सगळे नेते भाजप विरोधक आणि त्या नेत्यांनी कधी भाजप विरोधात भूमिका घेतली की यांच्या हाफ बिर्याणी ची सोय होते .
मग काय सगळ्या सोमी वर हे खालच्या भाषेत भाजप समर्थकांवर शाब्दिक हल्ले करायला चालू करतात.

बर ममता आणि काँग्रेस मधून विस्तव जात नाही , तसेच केजरू आणि काँग्रेस देखील एकमेकांचे कट्टर वैरी .
त्या त्या राज्यात काँग्रेसचे सगळे सहकारी पक्ष एकमेकांच्या बोकांडी बसतात .
पण लोकसभा मात्र यांना एकी करून लढवायची असते . आणि कधी तरी सगळे पक्ष एकत्र येवून भाजप ला हरवतील , आणि यांच्या बालिश नेत्याला पंतप्रधान पदावर बसायला इतर पक्ष अनुमती देतील फक्त याच आशेवर यांची धुकधुकी टिकलेली आहे ...

मग भांजळल्या सारखे ममता ला सपोर्ट कर तर कधी फारुक अब्दुल्ला ला सपोर्ट कर >>> अतिरेक्यांबरोबर फक्त भाजपाच जाउ शकते

अमावस्या पूनवेला कधी कधी केजरू पण यांचा आवडता असतो . >>> अमावस्या पूनवेला कधी कधी शिव्सेना, नितिश्कुमार, अकालि दल, पासवान, राणे , लिस्ट सम्पत नाहि कितिहि लिहा - तुम्हि प्रत्येक रात्री बदलता कि हो !

अमावस्या पूनवेला कधी कधी शिव्सेना, नितिश्कुमार, अकालि दल, पासवान, राणे , लिस्ट सम्पत नाहि कितिहि लिहा - तुम्हि प्रत्येक रात्री बदलता कि हो !>>>>>>>>>>>>>
पक्षाची अध्यक्ष महिला असणाऱ्यांनी इतरांना अशी भाषा वापरू नये !
एक कॉमन सेंस .....

पक्षाची अध्यक्ष महिला असणाऱ्यांनी इतरांना अशी भाषा वापरू नये ! >>> भाजपा प्रत्येक रात्री युती बदलतो - हे महाराष्ट्रातच प्रुव्ह केले आहे , पहाटे पहाटे अजित पवारांसोबत शपथ घेउन ! बाकि रेपिस्ट च्या बाजुने रैली काढणारे आणी विधान्सभेत पोर्न बघणारे काय मनोव्रुतीचे आहेत ते सर्वाना माहित आहे.

म्हणूनच आता ऑनर किलिंग प्रकार वाढलेत , तरी लोक सुधारत नाही . >>> तुमचा पाठींबा आहे ऑनर किलिंग ला अशी हि कोमेंट आहे ! निषेध !

म्हणजे सभ्य भाषा फक्त बायकांनीच वापरायची का ?

पक्षाचा अध्यक्ष पुरुष असला तर मेम्बर काहीही बोलू शकतात

मनुस्मृती अध्याय कितवा ?

पक्षाची अध्यक्ष महिला असणाऱ्यांनी इतरांना अशी भाषा वापरू नये ! >> अग्गागा!!! मामुशेट्चा महिलांप्रती आदर पाहुन, विशेषतः ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी ह्यांच्याबाबत असणारा आदर, पाहुन टडोपा!!! चुकुम मलिदा खाल्ला की काय ?

उर्फी जावेद ,
लोक काही बोलतात हो , पण ते समजू शकते !
पण महिला अध्यक्ष असणारे इतरांना तुम्ही प्रत्येक रात्री बदलता म्हणता !
मग महाराष्ट्रात काका , कधी अखिलेश तर कधी लालू तर कधी कुमार स्वामी हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर होते का ?

महाराष्ट्रात काका , कधी अखिलेश तर कधी लालू तर कधी कुमार स्वामी हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर होते का ? >> मोदी साहेबांना विचारा. अटलजींना विचारु शकत नाहीत हे तुमचे दुर्दैव

त्या देशप्रेमी , समाजहितकारक ,दोन धर्मातील संबंध सुरळीत करण्यासाठी निवृत्त जीवन घालवनाऱ्या अन्सारी चे ?
केंव्हाच तुझ्याच धाग्यावर टाकले होते !

नागपूरचे माजी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लहान राज्यांच्या निर्मिती, सुरुवात विदर्भापासून करावी, अशी मागणी केली आहे. देखमुख यांनी चार पानांचं पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं असून यामध्ये त्यांनी परदेशामध्ये कशापद्धतीने छोट्या राज्यांची निर्मिती करण्यात आलीय याचाही संदर्भ दिला आहे. “भारत ७५ @ ७५ लहान राज्यांच्या निर्मितीची सुरुवात विदर्भापासून करावी,” अशा विषयाचं पत्र मोदींना पाठवण्यात आलंय.

https://www.loksatta.com/desh-videsh/vidharbha-should-be-declare-separat...

पक्ष काय हे तर राज्यच फोडतील

खरा पुणेकर आधीतर स्वताचे नाव लपवायचे आणि स्वताला खरा म्हणायचे हा भक्तांचा गुणधर्म असावा असो,मित्रा तुझ राजकीय ज्ञान किती आहे हे कळल पण खमीतकमु ईतिहास तरी चाफल रे बाबा ,काँग्रेस सरकारला हरवण्यासाठी आणिबाणी पासुन भाजप व संघाने कुणाकुणाशी संग केला अगदी जेपी [ आता जे पी कोण हे विचारु नकोस ]आंदोलनापासुन ईतिहास बघ आघाड्यांची, निरनिराळ्या विचारसरणीच्या त्यात प्रत्येक आघाडीत फारक अब्दुल्लाही असायचे इतकच कशाला मायावतीजी ममताजी जयललिताजी आज ज्यांना फुरोगामी म्हणून हिनावतात त्यांच्यासोबतही भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी आघाडी केलीच होती ना ते खरा पुणेकर असुन तुला आठवू नये ही शोकांतिका आहे मोदींनीही तेच केले है सत्य नाकारणार आहे का भारतात च नाही तर स्वार्थासाठी अशा आघाड्या जागतिक राजकारणातही होतात हे लक्षात ठेवा ।खरतर उत्तर देण्यासारखा आपला प्रश्न नाही पण आपण धागाकर्ता अडचणीच्या प्रश्न आलाकी पळ काढतात या आपल्या वाक्यामुळे उत्तर देत आहे आणि राजकारणात कुठल्याही पक्षाच समर्थन करा पण भुतकाळात आपल्या पक्षाने काय केले याचा ईतिहास ही अभ्यास ठेवा।

Pages