Submitted by अक्षय समेळ on 9 November, 2021 - 07:06
हृदयातील भावना जेव्हा उचंबळतात
ओघळते अश्रू तेव्हा सहज मिसळतात
काय माहिती काय जादू असते?
फेसाळणाऱ्या त्या सोमरसाच्या ग्लासात
काहींसाठी ते टाकाऊ अन् नकोसे गटार असते
काहींसाठी ते हवेहवेसे स्वर्गाचे द्वार असते
व्यक्ती तितक्या वल्ली... पु लं चे अगदी खरे!
चांगले किंवा वाईट असे खरेच काही असते?
घटना घडतात आणि त्या घडणारच
त्यांचा अर्थ लावणारा हरवतो विचारातच
कित्येक पेले सोमरसाचे खाली होतात
मोजण्याच्या आत माणूस ढगात
थंडीने कुडकुडत बसलेल्यांना अमृत वाटते
रिकामटेकड्याना वेळ घालवण्याचे साधन असते
विलासी राहणीमानाचा अनिवार्य पर्याय असते
बघाल तशी दिसेल, बघण्याचा दृष्टिकोन योग्य हवे
- अक्षय समेळ.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा