आंतरजातीय विवाह... लोक काय म्हणतील!!!

Submitted by आरुश्री on 17 December, 2019 - 12:49

"जब लडका लडकी राजी तो क्या करेगा काजी"
हे वाक्य तर तुम्ही ऐकलं असेलच, पण जेव्हा ही गोष्ट "आंतरजातीय विवाह" यावर येते तेव्हा मध्ये येतो तो सर्वात मोठा शत्रू म्हणजे "समाज".
एका रिसर्च नुसार भारतात फक्त 5% लोक अशी असतील ते इंटरकास्ट मॅरेजेसला परवानगी देतात आणि बाकीचे 95 % लोकं बळजबरीने अरेंज मॅरेज करून 3 ते 4 परिवार बरबाद करतात. कारण बहुतेक पालकांना आपल्या मुलांना काय वाटतं यापेक्षा समाज काय म्हणेल, समाजातील ती चार लोक काय म्हणतील, लोक तोंडात शेण घालतील, स्वतःच्या जातीतली सोडून दुसऱ्याच्या जातीतली पोरगी घरी आणली तर समाजाला तोंड कसं दाखवणार?" हे आणि असे खुप सारे illogical प्रश्न पडलेले असतात ज्यामुळे पालकांना इंटरकास्ट मॅरेजेस मध्ये प्रॉब्लेम असतो.
भारतामध्ये सर्वात पहिला आंतरजातीय विवाह 4/फेब्रुवारी/1889 मध्ये यशवंत आणि राधा यांचा झाला होता. यशवंत म्हणजे जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांचा मुलगा आणि राधा म्हणजे ज्ञानोबा कृष्णा ससाने यांची मुलगी. आणि ह्या गोष्टीला जवळपास एकशे तीस वर्षे उलटून गेली तरी आपले बुरसटलेले विचार अजून तिथल्या तिथेच आहेत हि खंत.
So Dear Parents,
मान्य आहे की तुम्हाला तुमच्या मुलांपेक्षा तुमची इज्जत आणि समाज काय म्हणेल हे जास्त महत्त्वाच आहे, मान्य आहे की तुम्ही ज्या समाजात लहानपणापासून वाढलात, मोठे झालात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे सगळं नाही accept करू शकत. पण तुम्ही त्यांना सोबत घेऊन चला जे आज तुमच्या सोबत आहेत, त्यांचा विचार करत बसू नका जे कधी तुमच्यासोबत नव्हतेच.
समाज आणि त्या समाजातील लोक हे तर महत्त्वाचे आहेतच... पण सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमची फॅमिली, तुमची मुलगी, तुमचा मुलगा, तुमचे आई बाबा.
आणि जर तुम्हाला असं वाटतंय की कोणी तुम्हाला चुकीचं समजेल, तुमच्या मुलांना चुकीचं समजेल, तुमची खिल्ली उडवतील , तर विचार करा हे असल्या कसल्या प्रकारचे मित्र, लोक, किंवा समाज आहेत जे आज तुम्हाला नाव ठेवतायेत, उद्या दुसरं कोणाला तरी नाव ठेवतील, तर परवा तिसरच कोणीतरी असेल. आणि ह्या अशा लोकांसाठी तुम्ही तुमच्या मुलांना आयुष्यभरासाठी का त्रासात टाकायचं.
ते म्हणतात ना " सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग". खरं तर ह्या लोकांना तुमच्याशी काही देणं-घेणं नसतंच. पण तुम्हाला कायम भीती असतेच, की लोक काय म्हणतील!. आणि हे कसलं logic झालं की' "स्वतःच्या जातीतल्या गाढवासोबत लग्न झालेलं चालेल, पण दुसऱ्याच्या जातीतला घोडा सुद्धा नको".
म्हणून तुम्ही बळजबरीने तुमच्या मुलांचे लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी लावून दिलं जिथे तुमचा समाज हे accept करेन आणि तुमच्या मुलांनी सुद्धा हे बळजबरीच लावून दिलेल लग्न मान्य केलं तर नंतर पुढे काय?... तुम्ही काय गॅरंटी देऊ शकता की पुढे जाऊन तुमची मुलं खूश राहतीलच आणि समोरची व्यक्ती चांगली निघेलच. मग का आपल्या मुलांच्या आयुष्याशी खेळायचं, ते पण फक्त समाजासाठी आणि तो पण असा समाज जो कधी तुमचा नव्हताच.
अशी लोकं एक दिवस तुमच्या मुलांच्या लग्नाला येतील, डोक्यावर चार अक्षदा टाकतील, नंतर चर्चा रंगवतील की मुलगा - मुलगी काय करते, त्यांचं खानदान कसये, तुम्ही लग्नात किती खर्च केला आहे, किती तोळे दिलेत, कशी कपडे घातलीत... आणि या सगळ्या गोष्टींवर तोंडसुख घ्यायला जर काही कारण नाहीच भेटले तर घरी जाऊन ते म्हणणारच आहेत की " भाजीत जरा मीठ कमीच होत बर का..!"
थोडक्यात सांगायचं काय तर ज्या लोकांना नाव ठेवायची आहे ती लोक कशाही प्रकारे ती ठेवणारच आहेत. मग तुम्ही कितीही आणि काहीही करा. तर मग कशाला स्वताला ह्या असल्या परिस्थितीत टाकून घ्यायचं जिथे लोक तुम्हाला judge करतील.
खूप साऱ्या पालकांच म्हणंण हे असं असतं की "आमच्या जमान्यात तर असं नव्हतं, आई-बाप पसंत करायची आणि आम्ही डायरेक्ट बोहल्यावर जाऊन उभे राहायचो. आमचे कुठे संसार मोडलेत, चाललेच आहेत की चांगले. I agree, पण आज-काल जमाना बदलाय तशी लोकही बदललीच आहेत की.. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आजकाल आपण आपल्या मुलांना शाळेत घालायचं असेल तर काय पाहतो, तिथे कॉम्प्युटर आहेत का, लायब्ररी आहे का, सायन्स लॅब आहे का, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होतात का? या आणि अशा कितीतरी गोष्टी. आता तसं पहायला गेलं तर तुमच्या जमान्यात कदाचित शाळांमध्ये हे सर्व नसेलही पण आत्ता आपण आपल्या मुलांना शाळेत घालताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करतोच ना, कारण काय तर आत्ता आपल्याकडे ऑप्शन आहेत, आयुष्य अजून चांगलं जगण्यासाठीचे. असं नाही की तुमच्या जमान्यात हे सर्व नव्हतं म्हणून तुम्ही खूष नव्हते किंवा शिकलेच नाहीत, पण आता ते सर्व ऑप्शन आहेत ज्यामुळे तुम्ही जास्त चांगलं काहीतरी मिळवू शकता आयुष्य अजून चांगलं सोपस्कर होण्यासाठी. नवीन जमान्यानुसार आपण बदललो ना. मग अशीच पद्धत तिकडेही का लागू होत नाही.
पालकांचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे " आमच्या जमान्यात डिव्होर्स कमी व्हायचे किंवा व्हायचेच नाहीत" तर मला अशा लोकांना एवढेच सांगायचे आहे की असं नाहीये की तुमच्या जमान्यात लोक जास्त खुश होते. ते फक्त समाजासाठी, जे आहे त्यात ॲडजस्ट करून कसेबसे जगत होते. "पदरी पडलं अन पवित्र झालं" असंच काहीसं. पण आजकालच्या जमान्यात लोक एवढं सहन करत बसतच नाहीत. पटत नाहीत तर दोघे वेगळे होतात divorce घेतात आणि पुन्हा आपल्या लाईफमध्ये आपापल्या पद्धतीने जगतात.
शेवटी एक विचार नक्की करा की जेव्हा उद्या आपण ह्या जगातून निघून जाऊ, तेव्हा ती आपली स्वतःचीच मुलं असतील जी त्यांच्या मुलांना आपल्याबद्दल गोष्टी सांगून आपल्याला जिवंत ठेवतील तो तो समाज नव्हे ज्याला आपण आता इतके महत्व देतोय.
आणि मुलांसाठी सांगायचं म्हणाल तर तुम्ही स्वतः आधी शिका, मोठे व्हा, नोकरीला लागा, फायनान्शिअली सेटल व्हा. म्हणजे उद्या तुमच्या घरच्यांनी हा विचार नक्की करावा कि इंटरकास्ट मॅरेज आहे तर ठीक आहे पण दोन्ही मुले स्वतःच्या पायावर उभी आहेत, काबिल आहेत, तर आपण पुढचा विचार करायला काही हरकत नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages