नवऱ्याची मैत्रीण . . .
लग्नाआधीची नवऱ्याची जवळची मैत्रीण, हा विषय म्हणजे सगळ्या स्त्रियांच्या कपाळाला आठ्या आणणारा विषय,
त्यात ते अजूनही जवळचे मित्र मैत्रीण असतील तर ह्या विषयावरून नवरा बायकोत हमखास पेटते, आणि कहर म्हणजे ते एकमेकांसोबत व्हाट्सअप फेसबुक वरून रोज बोलत असतील तर मग सांगायलाच नको. . .
अशाच एका विषयावर एक काल्पनिक कथा लिहण्याचा प्रयत्न . . .
मी वृंदा, मी माझा नवरा सारंग, आई बाबा, दीर असं आमचं कुटुंब, आई बाबा मुलीसारखी आणि दीर बहिणीपेक्षा जास्त जीव लावतो, तसं मी सगळ्यांना लग्नाच्या आधी पासूनच ओळखते, मी सारंगच्या चुलत मामाची मुलगी,
आईने आधीच मला सारंग साठी पसंत केली होती, आणि माझ्या बाबांनीपण होकार दिला होता, हे मला आधीपासूनच माहित होत फक्त सारंगला माहित नव्हतं आधी,
तर माझा सारंग, सांगू तेवढं कमीच आहे त्याच्या विषयी, म्हणजे,
असाच होता मनात माझ्या माझा साजन गं, स्वप्नी पहिला तसा भेटला माझा साजन गं ...
कृष्ण सावळा वर्ण, शरीराने सुदृश, उंच, पाणीदार डोळे, आणि निर्मल हास्य, डोळ्यांत कायमच सगळ्यांसाठी माया जिव्हाळा असतो त्याच्या, त्याने माझा हात हातात घेऊन आयुष्यभर त्या प्रेमळ नजरेत कैद करावं मला कायमच असं वाटत राहतं,
कधी कोणाला उलट बोलणार नाही, कोणावर ओरडणार नाही, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मन जपणारा,
त्याचा स्वभाव इतका गोड़ आहे ना, मी त्याच्या सोबत एक दोन महिने जी व्यक्ती राहील ती त्याच्या नक्कीच प्रेमात पडेल,
जशी मी पडलीये त्याच्या प्रेमात . . .
देव माणूस म्हणावा अगदी तसा आहे माझा सारंग, देवाचे आभार मानू तितके कमी आहेत असा साथीदार दिल्याबद्दल .. .
माझ्यावर तर खूप प्रेम करतो, मी सांगेल ते आणून देतो, आणि ह्या तीन वर्षाच्या संसारात एकदा हि आमचं भांडण झालं नाही, तो काही वाईट वागलेलं मला आठवतच नाही,
आई बाबांचा खूप आदर करतो, अजूनही बाबा म्हणतील तोच शेवटचा शब्द, त्यांचा एकही शब्द खाली पडू देत नाही हो, आईवर हि खूप प्रेम आहे त्याच फक्त किंचित एकमेकांमध्ये दुरावा जाणवतो मला, मी खूप वेळा विचारलं पण काहीच नाही असंच दोघे म्हणाले, असो असेल काही . . .
आणि मी, दिसायला तशी मध्यम आहे, म्हणजे पहिल्या नजरेत कुणी माझ्या प्रेमात पडेल अशी मुळीच नाही, माझ्यापेक्षा सुंदर मुलगी त्याला सहज मिळाली असतीही तरीही त्याने आई बाबांच्या इच्छेसाठी माझ्याशी लग्न केलं आणि मी खूप सुखी आहे त्याच्या सोबत . .. .
पण कधी कधी असं वाटतं इतक्या चांगल्या माणसाला एखादी तरी जवळची मैत्रीण असेलच ना, मी असंच खूप वेळा विचारलं देखील त्याला पण तू आहेस ना माझी मैत्रीण अजून कशाला कोण हवी इतकंच म्हणतो आणि विषय बदलतो,
पण असंच कधीतरी मी त्याला विचारांत हरवलेला पहिला आहे, कधीतरी अचानक भरलेले डोळे, तर कधी मोबाईल स्क्रिन कडे एकटक भावुक होऊन पाहताना पाहिलं आहे,
तेव्हा मला खूप टेन्शन यायचं, मी दोन तीन वेळा खोदून खोदून विचारलं देखील पण काही साध्य झालं नाही,
त्याच्या नकळत मी त्याचा मोबाईल पण चेक केलाय, पण ना कोणी अनोळखी फोटो मिळाला ना अनोळखी फोन नंबर,
संशय घ्यावा असा माणूस तो नाहीच, त्यामुळे मी सोडून दिल होतं, शोध घ्यावा असं कधी वाटलं नाही मला पण आज वाटलं . . .
आज माझ्या घरी एक मुलगी तिच्या लग्नाची पत्रिका घेऊन आली होती, पत्रिका जाऊदेत, मी स्वतः मुलगी असून तिच्याकडे वेड्यागत पाहत राहिले, इतकी सुंदर दिसत होती ती,
माझ्या इतकीच उंचीला पण एकदम मेंटेन्ड बॉडी, नक्कीच योगाभ्यास करत असावी, सुंदर लाघवी हास्य, फिक्कट निळ्या रंगाची साडी पदर एका बाजूने मोकळा सोडलेला, एका बाजूने खुले सोडलेले तिची लांब सडक केसं, बापरे किती सुंदर होते ते, कॉफ़ी रंग आणि छान अशी चमक, तिची इतकी लांब आणि सुंदर केसं पाहून मला माझ्या हातभर केसांची कीवच आली, उजव्या हाताला घड्याळ आणि डाव्या हातात पर्स, तिच्या सावल्या सौंदर्यावर हे सगळं खुलून दिसत होतं, आणि तशीही कोणतीही अविवाहित मुलगी साडी मध्ये खूप सुंदर दिसते आणि हि तर कडक दिसत होती. . . अजून एक पेज लिहता येईल इतकी सुंदर होती ती पण जास्त तारिफ नको ना. . .
मी घरात एकटीच होते, तिने सरळ दारात उभी राहून सारंगच घर हेच का?? असं विचारलं . . .
मी ह्या आधी तिला कधीच पहिली नव्हती, मी हो सांगून तिला आत यायला सांगितलं, किती गोड़ हसते ती,
तू वृंदा ना?? मला तिने कसं ओळखलं मला प्रश्नच पडला.
मी तिला विचारलं देखील तुम्ही मला आणि सारंगला कसे ओळखता म्हणजे मी तुम्हाला ह्या आधी कधीच पाहिलं नाही वैगेरे ,
मग तिने सांगितलं कि मी आणि सारंग खूप चांगले मित्र होतो, तुझा सागर दादा आहे ना तोही ओळखतो मला.
सारंगची मैत्रीण आहे पण सारंगने कधीच हिच्या विषयी मला सांगितलं नव्हतं, माझ्या मनात खूप विचार येत होते पण मी ते बाजूला केले.
ती खूप काही सांगत होती, छान बोलत होती, खूप आपुलकीने घरातल्या सगळ्यांची चौकशी केली. मला तर काही कळतच नव्हतं ती सगळ्यांना ओळखते मग मलाच कशी माहित नाही हि,
ती इतकी सुंदर मराठी बोलत होती, इतकी स्पष्ट शुद्ध आणि अस्खलित कि मला तिच्या सोबत बोलायला शब्दांची जुळवाजुळव करावी लागत होती, आम्ही आपली साधी गावरान मराठी बोलतो, कधीच तरी शुद्ध, पण तिच्या समोर मला माझ्या भाषेची किंचित लाज वाटली . . .
ती नक्कीच खूप शिकलेली असणार, विचारू का हिला ??पण घरी आलेल्या पाहुण्याला त्याच शिक्षण कसं विचारणार?? ती थोडीना मुलगा पाहायला आलीये, मी माझ्याच विचारांवर हसले. . .
तिला मी चहा नाश्ता विचारला पण काही न घेता माझ्या जवळ प्रेमाने बसली,
माझ्या हातात तिच्या लग्नाचं कार्ड आणि दोन कॅडबरी डेरीमिल्क मोठे वाले देऊन म्हणाली,
" मी इकडे नसते राहायला, पण बाबांची इच्छा आहे कि माझं लग्न गावाकडेच व्हावं, त्यामुळे इकडे येणं झालं, आलीच आहे तर म्हटलं सारंग आणि तुला भेटूनच जावं, तुमच्या लग्नात तर मला नाही जमलं यायला पण तुम्ही सगळे आवर्जून या, मी वाट पाहीन सगळ्यांची, प्लिज सारंगला सांग मी आले होते म्हणून, त्याला सांग त्याला यायचंच आहे माझ्या लग्नात नाहीतर मी रागवेन, आणि एक सांगू खूप लकी आहेस तू जे तुला सारंग मिळाला"
इतकं म्हणून ती गेली . . .
ती गेली आली माझ्या डोक्यात विचारांचे किडे सोडून गेली, एकतर ती सारंगला एकेरी नाव साद घालत होती, म्हणजे ते जवळून एकमेकांना ओळखत असणार.
मैत्रीण आहे मग मला कधी बोलला का नाही?? मी कितीवेळा विचारलं पण हिच्या विषयी कधीच काही बोलला नाही, का?? त्याने मुद्दाम लपवून ठेवलं का माझ्यापासून ??? कि अजून काही . . .
संशय नाही पण नको नको ते विचार मन व्यापू पाहत होते, संध्याकाळी काय ते कळेलच सारंग आला कि म्हणून मी सगळे ते विचार गॅस वर पेटवून स्वतःला कामात गुंतवून घेतलं,
तरीही तिचे विचार मनात येत होते, ती किती सुंदर दिसते, तिची हसण्याची स्टाईल, भाषा, तिची केसं, आपल्या सारखीच असून देखील आपल्यापेक्षा किती वेगळी आणि सुंदर दिसते ती, मी हि तिच्या सारखी दिसायचा प्रयत्न करेन, वृंदा किती गचाळ राहतेच तू, सुधर जराशी, अशे काही बाही विचार करत, कधी संध्याकाळ झाली कळलं देखील नाही . . .
सारंग आला, जेवण उरकलं, मीही पटापट कामं उरकून माझ्या रूममध्ये गेले. सारंग नेहमी सारखा मोबाईलवर मेसेज वैगेरे चेक करत बसला होता. मला पाहून नेहमी सारखा मी बाजूला बसावी म्हणून सरकला.
मी कार्ड आणि कॅडबरी त्याच्या हातात दिले, त्याने माझ्या कडे पाहून हे काय असं विचारलं.
ते एक मुलगी आली होती आपल्या घरी तुला विचारात होती, म्हणे तुझी जवळची मैत्रीण आहे, आणि सगळ्यांना नीट ओळखत होती ती, मग माझ्या पासून का लपवलं तू तुझी कुणी मैत्रीण आहे म्हणून??ते वाच आधी आणि सांग मला कोण आहे नक्की ती . . . मी नाटकीच रागावले
काहीही काय बोलतेस वेडे तू, जुन्या ऑफिसच्या मॅम वैगेरे असतील,असं म्हणून त्याने ते कार्ड उघडलं. त्याने कार्ड मध्ये ते नाव वाचल आणि तो बिथरलाच, त्याची नजर कावरी बावरी झाली होती, ते वाचून जणू त्याचा श्वास जागीच थांबला असावा असं काहीतरी, किंचित धाप लागल्यागत झालं त्याला, मी विचारलं काय झालं??
पाणी . .. पाणी देतेस का प्लिज . ..
मी पळत जाऊन पाणी घेऊन आले, पाहते तर तो सावरलेला दिसत होता, पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या, आणि त्याने घाईघाईत पुसल्या असाव्या त्यामुळे ते लगेच लक्षात येत होतं,
काय झालं रे ??? मी विचारलं तर म्हणाला, डोकं दुखतंय अचानक, झोपलो कि बर वाटेल असं म्हणाला, तो थोडा वेळ तसाच हरवल्यासारखा बसून होता,
तसं आमच्यामध्ये मीच जास्त बोलते, म्हणून मीच सुरुवात केली,
किती गोड़ आहे रे ती, मी जर मुलगा असते ना तर कधीच तुला सोडून तिच्या मागे लागले असते,
बळेबळेच हसला तो,
सांग ना रे नक्की कोण आहे ती???
अगं खरंच फक्त ओळख होती इतकंच, तुझ्या सागर दादा आणि माझी चांगली ओळख होती, खूप वर्ष आधी सोडून गेली होती ती सगळं, हे गाव, इथल्या ओळखी आणि सगळंच.
आता कुठे रहरे काय करते काही माहित नाही आणि माहित करून तरी काय करणार. . . त्याने एक मोठा सुस्कारा सोडला,
खूप डोकं दुखतंय झोपुयात आपण, असं म्हणून तो मला पाठ करूनच झोपला . . .
डोकं कसं दुखेल असं अचानक?/ आणि कार्ड वाचायच्या आधी ठणठणीत होता हा?? तीच नाव वाचून ह्याला काहीतरी झालं??
नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, हा काहीतरी लपवतोय माझ्यापासून, पण काय??
ह्याच तिच्यावर प्रेम वैगेरे???
ह्या नुसत्या विचारानेच मी घाबरले, मी माझ्या मनाची समज घातली,
नाही नाही कसं शक्य आहे, तो असा नाहीये, वृंदा मुर्खासारखी काहीही विचार करू नकोस, शांत हो, असं काहीच नसणार आहे,
मी खूप डिस्टर्ब झाले होते, त्याला पाहिलं तर तो कदाचित झोपला होता.
खूप प्रयत्नांनी मी माझ्या विचारांना दूर लोटले, ते काय आहे ना, माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि तो माझ्या व्यतिरिक्त अजून कोणाला प्रेम करत असेल हा विचार सहन नाही होतं ना.
असो,
मी हि झोपले होते पण दोन तीन तासांनी मला माझ्या बाजूने दबलेल्या हुंदक्यांचे आवाज येत होते,मी अर्थातच झोपेत होते, पण कुणी तरी उशीत तोंड कोंबून रडल्याचं मला स्पष्ट जाणवत होतं,
मी तर खूप घाबरले होते मी आधी सारंगला उठवायला वळले होतेच, तर तोच डोळे पुसत चोळत उठला, मी पटकन डोळे बंद केले, तो अजूनही हमसत होता,
आई शप्पत म्हणजे हा, स्वतः रडत होता??? का?? विचारावंस वाटलं तर त्याने दुसऱ्या हाताने ते कार्ड बाजूला ठेवलं आणि वॉशरूमला गेला, मी पाहिलं तर कार्ड ओलं होतं,
म्हणजे हा तिच्याच मुळे??/
आता रडायची वेळ माझी होती, एकतर ती इतकी सुंदर होती कि तिच्यासाठी कुणीही माझ्या सारख्या शंभर बायका सोडेल,
तो फ्रेश होऊन आला, मी झोपायचं नाटक केलं, माझ्या उश्या शेजारी बसून माझं डोकं कुरवाळत बसला काही क्षण, मला काहीच सुचत नव्हतं,
पुन्हा नको विचारूस ती माझी कोण आहे ? मी नाही सांगू शकणार आणि तू समजूही नाही शकणार, स्वतःच्या विस्कटलेल्या आयुष्याची काय ओळख सांगू तुला मी .
पण मी आपली नात्याशी एकनिष्ठ आहे आणि कायमच राहीन.
इतकं म्हणून तो झोपला . . .
मी जागीच थरारले होते, तो झोपला आणि माझी झोप मात्र उडाली होती कायमची . . .
म्हणजे सारंग आणि मारवा . . . सारंग तिच्यावर प्रेम . . .
मला हे वाक्य मनातल्या मनात देखील पूर्ण करायची हिम्मत होत नव्हती, विचारांमध्येच पहाट झाली, मी रात्रभर जागीच होते,
सकाळी उठले, डोकं खूप दुखत होतं, त्यापेक्षा मनात काहीतरी जड जड वाटत होतं, कसेतरी सकाळची कामे उरकली, नाश्त्याला सगळे आले, पण सारंग कुठेच नव्हता,
कोणाला काही न सांगता देव जाणो कुठे गेला होता, मी त्याच्यासाठी नाश्ता काढून आवरा आवर करून घेतली,
३ तास होऊन गेले ह्या माणसाचा पत्ता नाही, म्हणून मी त्याला कॉल केला, तर फोने रूम मधेच, ऑफिस ला कॉल केला, दोन वेळा कुणी उत्तर दिलं नाही, माझा जीव कासावीस झाला होता,
पुन्हा केला तेव्हा कुठे फोन उचलला गेला, विचारलं तर तो ऑफिस ला गेलाच नव्हता, आता माझं डोकं खराब झालं होतं,
हा नक्कीच तिला भेटायला गेला असणार, मी आतल्याआत धुमसत होते, घरी येउदेत मग सांगते वृंदा काय आहे ते, सागर दादाला विचारून उगीच घरात सगळ्यांना कळलं असत म्हणून मी त्यांना हि काही विचारलं नाही.
माझ्या डोक्यात विचारांनी नुसतं थैमान घातलं होतं, मला कसले कसले विचार येत होते, सारंग आणि मारवा एकमेकांना भेटत आहेत, तो तिच्याकडे एकटक पहाट आहे, ती लाजतेय, त्याने तिचा हात हातात घेतलाय, ती अलगद त्याच्या मिठीत शिरतेय,
मला संशय नव्हता घ्यायचा त्याच्यावर पण आता जे घडत आहे, ते डोळ्यांसमोर ते मी डोळसपणे कसं झिडकारू??
शेवटी बायकोच मन आहे ते, मी कसं सहन करणार होते ते, माझा प्रचंड मनस्ताप होतं होता.
तो घरी आला कि मी सरळ त्याला विचारणार होते, शेवटी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे . . .
संध्याकाळी नेहमीपेक्षा एक तास उशिराच तो घरी आला, चेहरा उतरलेला दिसत होता, तरीही कृत्रिमपणे हसण्याचा प्रयत्न करत होता,
मला वाटून गेलं, हा आजच असा मुखवटा घेऊन हसतोय कि आधीपासूनच असा आहे, कि मी नीट लक्ष दिलंच नाही त्याच्याकडे,
त्याच्या हसणाऱ्या चेहर्या मागे त्याचा खरा चेहरा असावा का?? ज्यावर भूतकाळाचे काळे व्रण असावेत.. .
माझं काही चुकलं आहे का?? कि मीच ओळखू शकले नाहीये त्याला??माझं मन नकळत दुहेरी विचारांत हरवून गेलं. . .
मी स्वतःला सावरलं, असेल ते असेल पण जे घडत हे त्याचा आधी सोक्षमोक्ष लावायला हवा, मी रूम मध्ये गेले, सरळ दार लावून घेतलं आणि सरळ मुद्द्यालाच हात घातला
कुठे गेला होतास न सांगता आज???
" सॉरी, अगं ऑफिसला अर्जेंट काम निघालं, म्हणून लगेच न सांगता जावं लागलं, आणि चुकून फोन घरीच राहिला" तो कसातरी नजर चोरून म्हणाला . .
हा चक्क खोटं बोलला माझ्याशी, माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता, इतके वर्ष ज्या माणसाने माझ्यापासून एकही गोष्ट लपवली नाही तो माणूस चक्क खोटं बोलतोय माझ्या तोंडावर,माझी तळपायाची आग मस्तकात गेली,
शांत वैगेरे गेलं खड्ड्यात, हा बाहेर जाऊन शेण खाणार आणि आम्ही ह्याच्या इज्जती सांभाळत राहायचे..
खोटं बोलू नकोस सारंग, ऑफिसला कॉल केला होता मी, तू तिकडे नव्हतास, आणि काय रे, काय होतंय तुला ह्या दोन दिवसात हा, ती मारवा आल्यापासून होतंय ना हे सगळं??
तिलाच भेटायला गेला होतास ना?? सांग ना??
लाज नाही वाटली?? बाहेर तोंड काळं करायचं होतं तर माझ्यासोबत लग्नच का केलं??
तो काहीच बोलत नव्हता, कदाचित असं काही घडेल ह्याची त्याला अपेक्षा नसावी, तो गप्प होता म्हणून मला जास्त राग येत होता, गप्प आहे म्हणजे ह्याचा गुन्हा ह्याला मान्य आहे असा अर्थ होता,तो काहीच न बोलता रूम मधून बाहेर जात होता तर मी त्याला अडवलं,
बाहेर गेलास ना तर सरळ आई बाबांसमोर गोंगाट भरेल कि कळलं,
आणि तीही इतकी सतीसावित्री बनून माझ्या घरी आली होती, लाज नाही वाटली माझ्या पायरीवर पाय ठेवायला तिला, शी, घाणेरडी कुठली, लग्न झालेल्या माणसाबरोबर संबंध ठेवते आणि वागते कशी जशी देवीचं,
माझंही तोंड सुटलं होतं,
तिच्याविषयी एक अक्षरदेखील वाईट नकोय हा तुझ्या तोंडातून मला, कळलं ..
आणि मला न जुमानता सरळ दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपला. . .
# आमचं पाहिलं भांडण . . .
मी खूप रडले त्या रात्री, असल्या माणसासोबत कशाला राहायचं, त्याला तीच आवडते मग मी का राहू इथे,मी सकाळी सगळं उरकून, आई बाबांना थातुर मातुर कारण देऊन त्याच्या समोरून माहेरी आले, एका, एका शब्दाने देखील अडवलं नाही त्याने मला.
म्हणजे त्याच्या लेखी मी काहीच नाहीये, माझी किंमत शून्य आहे तिच्या समोर. . .
मी मनात त्या मारवा ला खूप शिव्या दिल्या खूप जास्त, तिच्या मुळे माझ्या आयुष्यच वाट्टोळं झालं होतं.
मला खूप राग आला होता, इतका कि दोन दिवस त्याचे येणारे कॉल मी घेतलेच नाहीत, ना मेसेजला उत्तर दिल., इतकंच काय तर तिसऱ्या दिवशी सरळ फोन बंद करून ठेवला.
माझ्या आई बाबाला काही कळू दिलं नाही, पण पाचव्या दिवशी तो मला घ्यायला आला.
मी तोपर्यंत घटस्फोट वैगेरेचा विचार करून मोकळे झाले होते, खरेपणी असं काही करायची माझी हिम्मत नव्हतीच पण रागत मी ठरवलं होतं.
तो आला तसा मी दार आतून बंद करून बसले, आई बाबा मला आवाज देत होते मी कोणालाच उत्तर दिलं नाही,मग तो आला, वृंदा, तीच प्रेमळ साद, पण मी आवाज दिला नाही,
मी रागात माझं लग्न झालं आहे, मला सगळं सांभाळावं लागत वैगेरे सगळं विसरून गेले होते, आई बाबांना त्याने काहीतरी सांगितलं असेलच मी का रागावले आहे ते, त्यामुळे मला इतकं टेन्शन नव्हतं,
त्याने पुन्हा आवाज दिला, सगळं सांगतो तुला, आधी घरी चल, प्लिज . . .
मला सगळं ऐकायचंच होतं, पाहायचंच होतं मला, मला कश्या प्रकारे फसवलं आहे ते, मी दार उघडलं, माझ्यासमोर केविलवाणा चेहरा घेऊन तो उभा होता, माझ्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होतं नव्हती त्याची,पण खोलवर खूप रडल्यासारखा, हरल्यासारखा दिसला मला, अगतिक वाटला, पण मला दया आली नाही.माझा राग जास्त हवी होता माझ्या मनावर त्यावेळेस.
गाडीत बसले, तो एकही शब्द बोलला नाही, मला तरी काय पडली होती, मी हि बोलले नाही, त्याने सरळ घरी न नेता आमच्या शेतावर नेली,
आमचं तिथे छोटंसं घरवाजा खोपट आहे, आणि बाहेर मस्त बाज आहे, त्यावर आम्ही बसून मस्त शेत, हिरवळ न्याहाळत बसतो.
त्याने जवळ जवळ मला खेचतच त्या बाजेवर बसवलं आणि तो स्वतः माझ्या पायाजवळ मातीत बसला, माझ्या मांडीवर डोकं ठेऊन स्वतःच माझा हात त्याच्या केसांत ठेवला. . .
आणि त्याने सगळं सगळं सांगितलं . . .
वृंदा सगळ्यात आधी मारवा विषयी तुझ्या मनात जे काही विष तू भरून ठेवलं आहे ते आधी फेकून दे, आणि ज्या माणसा विषयी अपलाल्या काही माहिती नसेल ना तिच्याविषयी चुकीचंच काय कुठलंच मत ठरवू नये.
तू तिला दोष देतेस ना, अगं तिने माझ्यामुळे जितकं सहन केलं आहे ना, त्याची भरपाई मी आयुष्यभर नाही करू शकणार,
माझ्यामुळे आणि नकळत आपल्या जुळलेल्या ह्या नात्यामुळे. . .
सागरच्या वर्गात शिकायची ती, तिच्या काकांच्या लग्नात मला एकदा तो घेऊन गेला होता, तिथेच ओळख झाली,
नंतर सागर BSc ला आणि ती इंजिनीरिंगला गेली, मी त्यावेळेस नवीनच जॉबला लागलो होतो, मला सायन्सच काही जमलंच नाही, त्यामुळे मधेच शिक्षण सोडून बाबांनी ओळखीवर जॉब शोधून दिला,
गम्मत म्हणजे मी त्याच रोडने जॉबला रोज जायचो ज्या रोडवर ती बससाठी थांबलेली असायची, आमची सकाळी जाण्याची वेळ एकच होती, एक दोन वेळा नॉर्मल ओळख म्हणून मी तिला स्माईल दिली ती हि ओळख द्यायला लागली,
मस्त वाटायचं ग ती दिसली कि, काहीतरी भारी फीलिंग यायची, ती रोजच दिसावी असंच वाटायचं.
दिसली कि दिवस एकदम प्रसन्न जायचा आणि नाही दिसली कि काहीतरी चुकल्या सारखा वाटतं राहायचं . .
आमचे स्वभाव एकदम जुळायचे, आणि विचारदेखील, माझ्यासारखीच हळवी आहे ती, प्रेमळ आणि साफ मनाची . . .
एक दिवस अचानक मला तिने थांबवलं, खूप घाईत होती ती, पेपर होता तिचा आणि तिला उशीर झाला होता, मला तिने सोडशील का कॉलेज ला म्हणून विचारलं,
मी तर एका पायावर तयार होतो, तिला सोडलं कॉलेजला, तेव्हा मला कळलं कि माझं ऑफिस तिच्या कॉलेज च्या फक्त दोन स्टेशन पुढे होतं, आमचा रास्ता पण एकच होता.
मला त्या दिवशी तिचा फोन नंबर मिळाला, तुला सांगू काय खुश होतो मी त्या दिवशी, खूप म्हणजे खूप. . .
आम्ही हळू हळू मेसेज वर बोलू लागलो, हळू हळू एकमेकांना सगळं शेअर करू लागलो, मेसेज वरून कॉल, वेळ मिळेल तसं ती माझ्यासोबत बोलू लागली. मी आठवड्यातून दोनेक वेळा तिला कॉलेज ला सोडू लागलो. तिचा मी बेस्ट फ्रेंड झालो आणि माझ्या साठी ती माझं आयुष्य . . .
खूप काळजी घ्यायचो आम्ही एकमेकांची, तिचा सागर सोबत आत काही संबंध उरला नव्हता पण माझं नवीन नातं जुळलं होतं तिच्याशी,
ती भेटली कि दिवस अगदी फुलपाखरासारखा जायचा, तिच्यासोबत बोललो कि जेवण खाण्याचं काही भान राहतं नसायचं,
तिला ना खूप शिकायचं होतं, मोठं नाव करायचं होतं, मला हि ती कॉलेज चालू कर पुन्हा शिक्षण पूर्ण कर सतत सांगायची, मी हे सोडून तीच सगळं ऐकायचो, ती कितीही मोठी झाली शिकली तरीही मला कधीच अंतर देणार नव्हती इतका माझा तिच्यावर विश्वास होता, कारण तीही माझा एकही शब्द झाली पडू देत नसायची,
तिच्या सोबत राहून तिच्या प्रेमात आकांत बोडलो होतो मी, आणि तिच्या हि मनात प्रेमाचं अंकुर फुटलं होतच, तिच्या डोळ्यांतून ते स्पष्ट दिसत होतं पण ती पुढाकार घेणार नव्हती..
एक दिवस मी तिच्यासोबत तिच्या कॉलेजला गेलो होतो. माझ्यासाठी तिने तिचे दोन तास बुडवले, खूप गप्पा मारल्या आम्ही, समोरासमोर बसून, ती माझ्या डोळ्यांत डोळे घालून बोलत होती. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आदर आणि प्रेम मला स्पष्ट दिसायचा आणि माझ्या डोळ्यांत त्या दिवशी तिला तिच्या साठीच प्रेम दिसू नये म्हणून मी नजर चोरून बोलत होतो.
तीच ते गालातल्या गालात हसणं, ओठांच्या हळुवार हालचाली, लाजून नजर चोरणं, मला वेड लावून गेलं होतं. खूप गोड़ आहे गं ती, त्या दिवशी पहिल्यांदाच मी असा एकटा म्हणजे आम्ही दोघांनी सोबत वेळ घालवला होता,घरी आलो तर गड जिंकल्यासारखं जाणवत होतं मला, इतका खूप होतो मी.
तीच इंजिनीरिंगचं शेवटचं वर्ष होतं, ते झालं कि मी तिला लग्नाची मागणी घालणार होतो आणि ती होत म्हणणार होती, मला पूर्ण खात्री होती. .
आम्ही दोघेही आमच्याच विश्वात रमून गेलो होतो.
खूप स्वप्ने पहिली होती मी तिच्या सोबत,
तिच्या मांडीवर डोकं ठेऊन भविष्याची स्वप्ने रंगवायची होती, तिचा हात हातात घेऊन आयुष्याची वाट चालायची होती, तिच्या मिठीत शिरून ह्या जगाला विसरून जायचं होतं, आणि खूप काही . . .
तिच्यासोबत चार वर्ष फुलपाखरं सारखी गेली, तीच शिक्षण पूर्ण झालं कि मी तिच्या घरी जाणार होतो लग्नाची मागणी घालायला आणि मलाही ऑफिस मध्ये प्रमोशन मिळालं होतं, सगळं सगळं सुरळीत चाललं होतं ,पण . . .
पण अचानक आईने एक दिवस घरात माझ्या लग्नाचा विषय काढला आणि तुला माझ्यासाठी पसंत केलीये सांगून टाकलं बाबांचं पण तेच मत होत, मी हादरून गेलो होतो.
उभ्या आयुष्यात मी आई बाबांच्य मनाविरुद्ध काहीच केल नव्हतं , माझ्यासाठी आई बाबा मारवाला हसत हसत स्वीकारतील असं मी गृहीत घरून चाललो होतो, मी खूप घाबरलो होतो त्या वेळेस, एकतर आई बाबानीं ठरवून टाकलं होतं सगळं, तुझ्या घरीहि बोलून झालं होतं, मी चांगल्या कचाट्यात सापडलो होतो.
मी ओळखत होतो ग तुला पण ओळखी व्यतिरिक्त कधीच काही भावना नव्हती .
आईला साखरपुडा करून घ्यायचा होता, मला मुलगी पसंत आहे कि नाही तिने विचारलंच नाही. बाबांनी विचारलं चालेल ना वृंदा ?बायको म्हणून ?
मी काहीच बोललो नाही, हो नाही काही नाही, हिम्मतच नाही झाली.
नक्की काय आड यायचं माहीत नाही, मी नेहमी ते बोलतील ते करत आलो होतो, त्यांना नाही बोलायची हिम्मत झालीच नाही माझी.
मी घाबरलो होतो गं खूप, काही निर्णय होत नव्हता.
तिचे मेसेज कॉल आले मी चार पाच दिवस टेन्शन मध्ये तिच्यासोबत एकही शब्द बोललो नाही.बाबांसोबत बोलायचा प्रयत्न केला पण नाहीच हिम्मत झाली.
आम्ही शब्द दिलाय आणि तसाही माझा सारंग आमच्या शब्दाबाहेर नाही, जगात अशक्य शक्य होईल पण सारंग आमचं शब्द पडू देणार नाही, आईचे शब्द नुसते कानात घुमत होते.
पाच सहा दिवस मी तिच्यासोबत काहीच बोलोलो नव्हतो आणि आणि एक आठवड्याने तिनेही कॉल करणं बंद केलं.
तिलाहि खूप राग आला असावा माझ्या वागण्याचा, मी मुलगा असूनहि माझं प्रेम मिळवायला असमर्थ होतो.
मला नाही माहित नक्की काय आड येत होत आईबाबासोबत तिच्याविषयी बोलायला आणि सगळ्यात मूर्खपणा म्हणजे मी तिच्या सोबत हे जे घरी घडत होत त्या विषयी बोलायचं टाळलं.
खूप हिम्मत करून मी आईजवळ विषय घेतला , खूप समजावलं तिला, माझं किती प्रेम आहे केव्हापासून ओळखतो सगळं, ती किती चांगली आहे, घरी किती चांगले आहेत, खूप म्हणजे खूप समजावलं.
पण आई नाही ऐकली ग, म्हणाली बिगर जाती वाली पोरगी सून म्हणून मी स्वीकारणार नाही, आणि जरी तू माझ्या मनाविरुद्ध काही केलं, तर एकतर ती घरात राहील नाहीतर मी.
आईच असं वागणं मला अपेक्षित नव्हतं, ती का इतका बाऊ करते मला कळत नव्हतं.
मी पुन्हा २ दिवसाने बोललो आईसोबत तर म्हणाली, ती घरात आली तर माझं मेलेलं तोंड बघशील, आता तू ठरव तुला ती पाहिजे कि आई आणि बाबा सोबत बोलला तरी माझा निर्णय मी नाही बदलणार. लोक आमच्या तोंडात शेण घालतील तुम्हाला काय, २ महिन्याचं प्रेम २ आठवडयात विसरता येतं. वृंदा सारखी मुलगी शोधून हि सापडणार नाही तुला, त्यामुळे फक्त वृंदाचा विचार कर आता.
मी खूप मूर्खासारखं वागलो ग त्यावेळेस तिच्यासोबत वीसेक दिवस बोललोच नाही तिनेहि रागवून कॉल करणं बंद केलं.
आणि
लोक काय बोलतील ह्या विचाराने आई बाबांनी माझं काय होईल, मला काय वाटतं आहे हा विचार नाही केला कदाचित, त्यांचं हि चुकीचं नव्हतच, माझंच चुकलं सगळीकडे,
मी निर्णय घेतला, माझ्या सुखासाठी मी आईच्या जीवाशी खेळू शकत नव्हतो, तसं काही तिने खरंच केला असतं तर ना मी आयुष्यभर सुखी राहू शकलो असतो ना मारवा ते गिल्ट घेऊन जगू शकली असती, शेवटी मी आईला सांगितलं तुला पाहिजे तसं कर पण पुन्हा मरायची भाषा करु नकोस.
तुझ्यासाठी ती ऐकेल माझं, जाईल माझ्या आयुष्यातून कायमची.
त्या संभाषणापासून आई आणि माझ्यात एक दुरावा निर्माण झाला तो अजून तसाच आहे जाणवला असेल तुला हि, आणि आमच्यात जे बोलणं झालं ते सागर ला सुद्धा नाही कळू दिलं मी. विषय तिथेच बंद झाला.
साखरपुडा ठरला, मी स्वतः माझं आयुष्य माझी स्वप्ने उध्वस्त करून घेतली. मी स्वतः मारवाला हे सगळं सांगायला गेलो होतो तिच्याघरी.
एव्हाना महिना व्हायला आला असेल आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता, मी गेलो तेव्हा ती एकटीच रूम मध्ये पडून होती, मला पाहताच तिने घट्ट मिठी मारली ग, काय नव्हतं त्या मिठीत, त्याच मिठीत प्राण जावेत असं राहून राहून वाटलं मला तेव्हा, तिचे ओघळणारे अश्रू माझ्या पाठीवर ओघळत होते, त्या गरम अश्रूंमध्ये पण तिच्या प्रेमाची उब मला जाणवत होती, तिचे हात माझ्या पाठीभोवती पुरत नव्हते म्हणून नखांनी घट्ट ओढलेला माझा शर्ट, तिच्या हृदयाची धडधड, तिचा ह्या ४ वर्षात प्रथमच होणार इतका जवळचा स्पर्श, सगळं माझ्याप्रेमासाठी होतं. तिची धडपड मला जाणवत असून हि मी स्वतःला रोखलं.
ती माझ्या मिठीतच रडत रडत बोलत होती. आई गेले रे सारंग अटॅक ने, तिला खूप मिस केला मी खूप एकटी पडले होते. पण तू कुठे हरवला होतास काय माहित, रडून रडून दमले मी, तुझ्या कुशीत येऊन तू थोपटावं आई सारखं सतत वाटत होत रे.
बाबा बोलत आहेत आपण इथे नाही राहायचं त्यांना सतत आईची आठवण इथे सतावते. त्यांनी ट्रान्सफर पण करून घेतलीये, पण मला नाही जायचं, तुझ्यासाठी थांबायचं आहे, तू बोल ना मला नको जाऊस?? आपण बोलूयात ना बाबांसोबत, बोलूयात ना?? बोलशील ना तू त्यांच्यासोबत? बोल ना सारंग ?
मारवा मी तुला हे सांगायला आलो होतो कि ... आई बाबानीं ... माझं लग्न ठरवलं आहे एका मुलीसोबत, आणि थोड्याच दिवसात साखरपुडा आहे आमचा
ह्या वाक्यासरशी झटका लागावा तसं तिने मला दूर लोटलं, त्या मिठीतुन आणि तिच्या आयुष्यातून
तिच्या डोळ्यात जे होत ते शब्दात उतरावण मला कधीच शक्य नाही होणार.
ती गेली तिच्या बाबांसोबत आणि तू आलीस माझ्या आयुष्यात.
महिन्यात साखरपुडा झाला, मला तिचा विरह सहन नव्हता होतं, खूप कोसल मी स्वतःला, खूप रडलो, हसणं खेळणं सोडून जिवंत पुतळा झालो होतो मी, पण सांगणार तरी कोणाला, माझ्या हातानेच मी सगळं माझ्यावर ओढवून घेतलं होतं,
मग काय, एक आदर्श नवरा आणि मुलगा ही जबाबदारी इतकंच माझं आयुष्य स्वतःला शिकवलं आणि शिकलो मुखवटा घेऊन जगायला.
खोटं हसता येत
खोटं रडता नाही येत
ती माझी कोण आहे मला नीटस सांगता नाही येत ...
पण सांगू तू आल्या नंतर मी तिचा विचार केव्हाच नाही केला. तुझ्या सोबत जी सात वाचन घेतली ती मनापासून निभावतोय आणि निभावेल अगदी आयुष्यभर.तुला सांगणार होतो पण तू समजून घेशील कि नाही म्हणून नाही बोललो.
माझं तुझ्यावर हि प्रेम आहेच ग, फक्त तिची आठवण आली कि त्रास होतो खूप, सगळे मुखवटे तिच्या आठवणी पुढे गळून पडतात.
आणि माझ्या मूर्खपणा मुळे मी तिला गमावून बसलो हे टोचत राहतं सतत मनात.
विसरून जावी तशी ती नाहीच ग पण तुला फसवावं असा मी नाही , हो ना ? ??
मी ते प्रेम मागे टाकलं आहे केव्हाच तू रागावू किंवा टेन्शन नको घेऊस. मी एकनिष्ठ आहे आणि राहील, आणि तिच्यापेक्षा तू कमी आहेस किंवा तू कॉम्प्रमाईस वैगेरे आहेस असा चुकूनही विचार करू नकोस, मनापासून प्रेम आहे माझं तुझ्यावर, खरंच, प्लिज विश्वास ठेव माझ्यावर . . .
तिला भेटायची ओढ लागते पण मला नाही भेटायचं किंवा बोलायचं, आता सावरलोय तुझ्या सोबत तुझ्याशिवाय नकोय कुणी मला, खरंच.
विश्वास ठेवशील माझ्यावर ???
मी त्याला घट्ट मिठी मारली आणि खूप रडले, मीच कारण होते कुठेतरी त्याच्या अपूर्ण प्रेम कथेला.
तरी हि त्याने मला एकदाही जाणवू दिल नाही आणि आता हि तो मलाच समजावत होता. मला खूप वाईट वाटलं आणि स्वतःचा राग हि आला कि मी ह्या माणसावर संशय घेतला.
आणि
पुन्हा तिची आठवण आली कि माझ्यासोबत तिच्या आठवणी शेअर करायच्या हे प्रॉमिस घेऊन आम्ही घरी आलो.
तो त्या रात्री खुप सुखाने झोपला,कदाचित मनावरचं मोठं ओझं कमी झाल्यासारखं, मी रात्रभर त्याला पाहत बसले.
ती लग्न झालं कि कायमची जाणार होती, मला वाटत होतं सारंग ने तिला शेवटचं भेटून यावं, म्हणून मी त्याला एकट्याला लग्नाला जा म्हणाले, पण तो मला हट्टाने सोबत घेऊन गेला, अभिमानानेच माझी बायको म्हणून ओळख करून दिली तिला.
मी तिला ह्ग करून तिच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या, आणि मी स्वतः त्याला सांगितलं म्हणून त्याने देखील तिला ह्ग करून शेवटचा निरोप घेतला, त्या एक दोन क्षणांची किंमत सारंगसाठी आणि मारवासाठी काय होती ते त्या दोंघांबरोबर मीहि जाणून होते. ती इतकी जवळ असताना देखील त्याने एकदाही मला दुर्लक्षित केलं नाही, माझा हात एकदाही सोडला नाही .
ती आली आणि गेली पण मला तिचा मित्र देऊन गेली ....
सारंग आणि माझ्या नात्यात नवीनच गोडवा आलाय, नवरा बायको सोबत आम्ही बेस्ट फ्रेंड झालो आहोत.
तिची आठवण आली कि तो तिच्या आठवणी शेअर करतो, म्हणतो आधी रडायचो पण तुझ्यासोबत
सोपं झालय सगळं.
मी हि तिला विसरून जा वैगेरे सांगत नाही, मी पात्र आहे त्यापेक्षा दहा पट जास्त प्रेम करतो तो माझ्यावर अजून काय हवय ...
आणि
जिच्या वाटायचं होतं ते पूर्ण प्रेम त्याने माझ्या ओटीत ओतलं आहे. मग तिच्या आठवणींना हि जागा देऊ नये इतकी कृतघ्न मी कशी वागू शकते .
आणि मी तिला मनापासून स्वीकारली आहे आणि न रागावता न लाजता सांगेल हो ती माझ्या नवऱ्याची मैत्रीण आहे ...
छान लिहिलेय!
छान लिहिलेय!
पहिले भांडण काही झेपले नाही पण.
छानचं.
छानचं.
बापरे ! काय लिहिलंय एकदम
बापरे ! काय लिहिलंय एकदम सुर्रेख .... काळजाला भिडेल असे.
मनाली भिडली कथा. खूपच छान
मनाली भिडली कथा.
खूपच छान
हम दिल दे चुके पार्ट 2 होऊ
हम दिल दे चुके पार्ट 2 होऊ शकला असता.
सगळ्याच नवर्यांना आवडेल ही
सगळ्याच नवर्यांना आवडेल ही कथा
मध्यंतरी unexpected शेवट
मध्यंतरी unexpected शेवट करणाऱ्या धक्कातंत्रातील कथांचं पेव फुटलं होतं माबोवर.
ही कथा मात्र straight forward क्लासिकल टाईपची आहे.
आवड्या ! लै भारी !
सोहनी ^2 rocking !
बावळट ए तो सारंग!!
बावळट ए तो सारंग!!
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप ऑन)
आईबाबांना स्पष्टपणे 'मला अमुक अमुक मुलीशी लग्न करायचं आहे' सांगू न शकणारी, त्याच्या आधीच सुंदर सर्व प्रकारे वाईफ मटेरियल मुलीला प्रेम बॉडी लँग्वेज ने दाखवणारी आणि मग मुलगी पण प्रेमात पडली की तिला 'आईबाबांना दिलेलं वचन निभावायला दुसरीशी लग्न करणार' सांगणारी, स्वतःच्या बायकोला उगीच संशयास्पद वागून ताप देणारी, तिने खोदून विचारल्याशिवाय खरं न सांगणारी भयताड मुलं जन्मालाच का येतात?
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप मोड ऑफ)
एक्स-गर्लफ्रेंड, जिच्याशी आता
एक्स-गर्लफ्रेंड, जिच्याशी आता बहुधा काहीच संपर्क नाही म्हणजे मैत्रीण कशी काय बरं? की बायको हीच मैत्रीण? शीर्षक वाचून मला असं वाटलं होतं की भिन्नलिंगी मैत्री स्वीकारलेल्या बायकोची कथा असेल.
मुळात प्रेयसीला मैत्रीण असं
मुळात प्रेयसीला मैत्रीण असं संबोधून बायकोने स्वतःला मुर्ख बनवणंच चुकीचं आहे.
आणि त्यात <<मी पात्र आहे त्यापेक्षा दहा पट जास्त प्रेम करतो तो माझ्यावर अजून काय हवय ...>> स्वतःला इतकं कमी का लेखायचं? नवर्याचे तडजोडीचे प्रेम उपकार वाटतंय हिला.
खूप छान लिहिलंय . एखाद्याच्या
खूप छान लिहिलंय . एखाद्याच्या जीवनातील खरी कथा आहे, असच भास झाला वाचतांना .
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप ऑन)

आईबाबांना स्पष्टपणे 'मला अमुक अमुक मुलीशी लग्न करायचं आहे' सांगू न शकणारी, त्याच्या आधीच सुंदर सर्व प्रकारे वाईफ मटेरियल मुलीला प्रेम बॉडी लँग्वेज ने दाखवणारी आणि मग मुलगी पण प्रेमात पडली की तिला 'आईबाबांना दिलेलं वचन निभावायला दुसरीशी लग्न करणार' सांगणारी, स्वतःच्या बायकोला उगीच संशयास्पद वागून ताप देणारी, तिने खोदून विचारल्याशिवाय खरं न सांगणारी भयताड मुलं जन्मालाच का येतात?
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप मोड ऑफ)>>
मला वाटतं जोपर्यंत प्रेमाचा
मला वाटतं जोपर्यंत प्रेमाचा इजहार केला जात नाही आणि समोरून इकरार मिळत नाही तोपर्यंत गर्लफ्रेंड, प्रेयसी अशी संबोधन वापरता येणार नाहीत.
त्यामुळे सारंग-मारवा नाते unsaid love प्रकारातच मोडत राहणार आहे. त्रयस्थ लोकांच्या (ज्यात बायकोही आली) दृष्टीने ती मैत्रिणच.
===
अनु +१
मी अनु ह्यांच्या संपूर्ण
मी अनु ह्यांच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप ऑन)
त्या वेळेतहि एक हात बायकोचा धरून आणि एका हाताने एक्स-प्रेयसीला हृदयाशी धरायला.... सबके बस की बात नही है ये!! 
आईबाबांना स्पष्टपणे 'मला अमुक अमुक मुलीशी लग्न करायचं आहे' सांगू न शकणारी, त्याच्या आधीच सुंदर सर्व प्रकारे वाईफ मटेरियल मुलीला प्रेम बॉडी लँग्वेज ने दाखवणारी आणि मग मुलगी पण प्रेमात पडली की तिला 'आईबाबांना दिलेलं वचन निभावायला दुसरीशी लग्न करणार' सांगणारी, स्वतःच्या बायकोला उगीच संशयास्पद वागून ताप देणारी, तिने खोदून विचारल्याशिवाय खरं न सांगणारी भयताड मुलं जन्मालाच का येतात?
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप मोड ऑफ) >>
अनु+1 सिमंतीनी+1
अनु+1
सिमंतीनी+1
कथेच्या नायिकेचा केवढा मोठा
कथेच्या नायिकेचा केवढा मोठा मनाचा मोठेपणा.
क्षमा शील वृत्ती मी तर भारावून गेलो(●__●)
सकारात्मक: वर्णन न कथनशैली
सकारात्मक: वर्णन न कथनशैली चांगली आहे. इतके लिहिण्यासाठी खूप कष्ट लागतात. त्यामुळे लेखामागची प्रमाणिक कष्ट दिसून येतात.
नकारात्मक:
* फारच पाल्हाळीक झाली आहे. शंभर-दहा-सहा शब्दांच्या कथांचा उतावीळ वाचकांचा काळ आहे. इतके वाचयला होत नाही आजकाल.
* काल्पनिक असेल ठीक आहे पण वास्तवादी वाटत नाही. मुलाचे काल्पनिक मनोरथ वाटते. कि मी कसाही नेभळट वागलो तरी चिकणी पोरगी मला पटणार. मग आईबाबा माझे लग्न साध्या मुलीशी लावून देणार. आणि ती मुलगी सुद्धा इतकी चांगल्या मनाची असणार कि त्या चिकण्या मुलीशी असणारी "फ्रेंडशिप" समजून घेणार आणि आपल्या हजेरीतच तिला आपल्या संमतीने मिठीत पण घ्यायला लावणार. मज्ज्याच मज्ज्या.
असे मनोरथ करणाऱ्या मुलांसाठी इंग्लिशमध्ये wanker शब्द आहे. हि कथा एका wanker चे हसीन सपने आहेत.
प्रत्यक्ष आयुष्यात आजकालची कोणतीही मुलगी आपल्याला जेंव्हा भावनिक आधार हवा तेंव्हा देऊ न शकणाऱ्या मुलाला ताबडतोब ब्रेकप देते. आणि आईबाबाचे कारण देऊन लग्नाला नकार देणाऱ्या पुळचट मुलाचे चुकूनमाकून प्रेमात पडलेली सुंदर मुलगी तर पुन्हा आयुष्यात थोबाडसुद्धा बघत नाही.
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप ऑन)
आईबाबांना स्पष्टपणे 'मला अमुक अमुक मुलीशी लग्न करायचं आहे' सांगू न शकणारी, त्याच्या आधीच सुंदर सर्व प्रकारे वाईफ मटेरियल मुलीला प्रेम बॉडी लँग्वेज ने दाखवणारी आणि मग मुलगी पण प्रेमात पडली की तिला 'आईबाबांना दिलेलं वचन निभावायला दुसरीशी लग्न करणार' सांगणारी, स्वतःच्या बायकोला उगीच संशयास्पद वागून ताप देणारी, तिने खोदून विचारल्याशिवाय खरं न सांगणारी भयताड मुलं जन्मालाच का येतात?
(काल्पनीक पात्राबद्दल सात्विक संताप मोड ऑफ)>>
@अनु, मलाही पटतय पण....
@अनु, मलाही पटतय पण....
सगळंच +ve अन गुडी गुडी असेल तर जगण्याला चव काय?
कुछ मिर्चमसाला तो मंगताय!!!
पण तुमची लिहायची कोडिंग आवडली

startif()
....
Endif()
अरे बापरे कंटाळा आला म्हणून
अरे बापरे कंटाळा आला म्हणून शेवट वाचलाच नव्हता की मी!
> ती पुन्हा जाणार होती मग शेवटचं सारंगने तिला भेटायला पाहिजे म्हणून मी त्याला एकट्याला लग्नात पाठवत होते पण त्याने मला सोबत नेलं. अभिमानानेच माझी बायको म्हणून ओळख करून दिली तिला.
मस्त आहे हे!
मी मुद्दाम तिला मिठी मारली, मीच तिला म्हणाले पुन्हा भेट होईल नाही होईल मित्राला नीट निरोप तर दे, तिने हि सारंगला मिठी मारली.
त्याने त्या वेळेतहि एक हात माझा धरून आणि एका हाताने तिला हृदयाशी धरलं.
त्या एका मिठीची किंमत सारंगसाठी आणि मारवासाठी काय होती ते त्या दोंघांबरोबर मीहि जाणून होते.
आणि त्या व्यतिरिक्त मी अजून काही करू शकत नव्हत >
काय म्हणावं असे वेचक वेधक
काय बाई म्हणावं आता असे वेचक वेधक उतारे पोस्टल्यावर ...

इंग्लिश विंग्लिश मोड ऑन
इट्स जस्ट अ हग, अॅमी. इससे करिबी रिश्ता नही बनता
इंग्लिश विंग्लिश मोड ऑफ.
मस्त खुलवलीय!
कथा मस्त खुलवलीय!
छान..आवडली गोष्ट.. पु.ले.शु.
छान..आवडली गोष्ट..
पु.ले.शु.
शेवट न वाचताच कसे काय
शेवट न वाचताच कसे काय निष्कर्ष काढता कि फालतू स्टोरी आहे म्हणून?
श्वाशनक रेडम्पशन, शटर आयलंड वगैरे चित्रपट पण आवडले नसतील ?
कथेतील नायकाला,नायिकेला किंवा
कथेतील नायकाला,नायिकेला किंवा
मारवा ला दोषी ठरवता येत नाही.
नायक हा सरळ मार्गी आई वडिलांच्या आज्ञा पाळणारा सरळ मार्गी सभ्य मुलगा आहे..
ह्या अर्थ तो घाबरट आहे असा होत नाही.
प्यार किया nahi जाता हो जाता है!.
दिल दिया नाहि जाता खो जाता है!
ही ओळ प्रेम कस होत ह्याचे वर्णन करते.
प्रेम ठरवून कधीच होत नाही.
ठरवून जे प्रेम होत त्याला प्रेम म्हणता येणार नाही..त्या प्रमाणे नायकाचे प्रेम जडल त्यात त्याचा सुंदरी मुलगी पटवणे हा हेतू नव्हता .
पण जेव्हा आई वडिलांनी दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवले तेव्हा त्यांनी स्वतः chya प्रेमाची आहुती दिली..ह्यात मारवा चा बळी गेला त्यात तिचा दोष नव्हता..
हे मात्र मान्य आहे..
नवरा बायकोच्या नात्यात जुन्या प्रेमाचा अडसर त्याने येवू दिला नाही आणि त्या साठी किती भावना माराव्या लागतात ह्याची कल्पना बहुतेक लोकांना असेल.
संशयास्पद घटना घडल्यावर संशय येणे ही नैसर्गिक भावना आहे तसा संशय त्याच्या बायकोला आला.
पण सर्व परिस्थिती माहीत पडल्या नंतर तिचा समजूतदार पना दाखवला ह्या प्रसंगात बायकोचा mature पना.प्रेयसी चा mature पना,दिसून येतो .
राधिकाच्या serial ची story
राधिकाच्या serial ची story अशी हवी होती.. वीसपोर्टराधिका ने कंटाळा आलाय..
का आवडते बायकोला राधिका!
कथा अतिशय काल्पनिक असून पण प्रचंड आवडली...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत (prequel? )
कहिहि असो मला कथा प्रचंड
काहीही असो मला कथा प्रचंड आवडली. सगळ्या संवेदना सध्या आजकालच्या यांत्रिक आणि प्रॅक्टिकल युगात बोथट झाल्या आहेत असे वाटत होते पण ही कथा वाचली आणि आपसूक पाणी आलंच डोळ्यातून, अजूनही ओलावा शिल्लक असल्याची खूण...
@ अनु सात्विक संताप येणं
@ अनु सात्विक संताप येणं साहजिकच आहे..
पण तुम क्या जानो मर्द का दर्द?
एकीकडे आई आणि दुसरीकडे प्रेयसी..दोघीच्यांत बिचर्यांची किती फरटफट झालीय..दोघींपैकी एकीला निवडायचं म्हटल्यावर कुठेतरी तडजोड करावी लागणारचं ना..नायकाने आपल्या स्वतः प्रेमाचा विचार न करता आपल्या कुटूंबाचा विचार करून आपलं प्रेम sacrificed केलं तर तो भैताड कसा ठरतो?
लग्नानंतर लगेच सांगितलं असतं तर त्याच्या नववधूने कितपत समजून घेतल असतं? मेय,बी त्याला वाटलं असेल नकोच तो चाप्टर त्याने तो क्लोजही केलाय .. आता हीच आपली बायको..हीच आता जग कशाला तिला दुखवा? किंवा छान चाललेल्या नात्यात कशाला मिठाचा खडा?
आता आपोआप उघडला गेला तर त्याची काय चूक?
मुलीच फक्त संवदेनशील असतात का? मुलेही असतात..
नसेल जमत त्याला सांगायला पटकन? तर काय करणार तो?
***
ह्यावरून मला एक जुना मराठी चित्रपट आठवला.
बायको आणि आईच्या तक्रारी आणि सततच्या भांडणाला कंटाळून बिचारा मुलगा जीव देतो अशी काही कथा आहे..
Pages