सिद्ध कथेचे खरे रहस्य
तंत्र साधनेत तारा महाविद्या किंवा आद्य काली पहिली महाविद्या ह्यात साधकाचे सर्वोच्च समर्पण काय तर स्वतः च समर्पित होणे स्वतः चे मस्तक देवी च्या चरणी वहाणे,
पूर्वी गुरू स्वतः च शिष्या चे मस्तक धडा वेगळे करून देवी चरणी वहात असे, त्याला दोघे ही तितक्याच तयारी चे लागत मग गुरू देवीच्या चरणी वाहिलेले मस्तक शिष्या च्या निर्जीव धडावर बसवून त्याला परत जीवन देत आणि मग शिष्य हा गुरू प्रमाणे सिद्ध होत असे तंत्र मार्गातील ही खंड विखंड साधना आपल्याला श्री शंकर महाराज ह्यांच्या पोथीत पण गोष्ट रूपाने आढळते
पण आता असे गुरू राहिले नाहीत , आहेत ते बली देऊन स्वतः ची मनोकामना पुरी करताना दिसतात
म्हणून आपण जेव्हा तिरुपती बालाजी येथे जातो तेव्हा केस अर्पण करतो, मस्तक अर्पण करणे शक्य नसते म्हणून केस हे प्रतीक रूपाने अर्पण केले जातात व त्याचे योग्य ते फलित मिळतेच मिळते, नारळ हे देखील मस्तकाचे प्रतीक आहे
सर्वोच्च समर्पण भाव व्यक्त करण्या साठी आपण देवा समोर नारळ ठेवतो , कधी वाहतो
भारतीय आध्यत्म अतिशय गहन आहे . पण ते समजवून देणारे नसल्याने व समाजात भोंदू बाबा बुवा ह्यांची चालती असल्याने , नवीन पिढी चा मग गोंधळ उडतो व दुर्दैवाने ते नास्तिक ते कडे झुकत जातात
@स्वामी@
सिद्ध भाग २
Submitted by SanjeevBhide on 20 November, 2019 - 07:37
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरे बाप रे!!
अरे बाप रे!!