Submitted by मी मधुरा on 14 August, 2019 - 03:41
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे
नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे
मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता
आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता
काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती....
ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती....
ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा
कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा!
मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर
पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर!
ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला!
नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला
हातात कटोरा तरीही, धमकवती दुसऱ्याला
अणू रेणूस धमकावे जणू लांघून मर्यादेला....
@मधुरा
#14August
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चाल जोडुन छान गीत करता येईल.
चाल जोडुन छान गीत करता येईल.
छान. पाकडे प्रेमींना मिरची
छान. पाकडे प्रेमींना मिरची लागेल.
धन्यवाद अक्कु, धन्यवाद अमर
धन्यवाद अक्कु

धन्यवाद अमर
छान लिहिलीये कविता..
छान लिहिलीये कविता..
धन्यवाद मन्या
धन्यवाद मन्या
छान!!
छान!!
धन्यवाद राजू!
धन्यवाद राजू!
नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ
नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे ...........
सुदंर आशा या ओळी आहेत
धन्यवाद यतिन!!
धन्यवाद यतीन!!
छान
छान
भारीच
भारीच
धन्यवाद, नीत्सुश.
धन्यवाद, नीत्सुश.

धन्यवाद, सुपु.