ईव्हीएम चा घोळ संपला

Submitted by नितीनचंद्र on 28 May, 2019 - 12:44

आजच दुरदर्शनच्या एका चॅनलवर बातमी आली की ५ % ईव्हीम पॅट आणि इव्हीम ची जुळणी केली असता यात एकाही मताचा घोळ आढळला नाही.

मध्यंतरी निकाल लागायच्या आधी एका चॅनलने बातमी दिली होती की निवडणुका जाहीर झाल्यापासून गुगल सर्च वर केरळ सोडता सर्व राज्यात मोदींच्या सभा, भाषणे याचे प्रमाण सर्वाधीक होते.

ईव्हीएम ने याच पध्दतीने निकाल दिलेला आहे.

खोटेपण तर सर्वच पक्ष करतात. १९७७ साली नसबंदी हा असाच खोटा विषय जनता पक्षाने पसरवला. पुढे इंदीराजी सत्तेत आल्यावर याची शहाषाशा झाली. पण १९७७ ते १९८० काळात भितीपोटी नसबंदी कार्येक्रमाची हानी झाली. याकाळात लोकसंख्या वाढीचा वेग वाढला ( संदर्भ - शल्यकौशल्य - लेखन डॉ भा. नि. पुरंदरे )

ईव्हीएम च्या वर केलेल्या खोटारडे आरोपामुळे विरोधी पक्ष तांत्रीक सुधारणांचे चाक उलटे भिरवून पुन्हा शिक्का आणि मतपत्रिका आणण्यास सुप्रिम कोर्टाच्या माध्यमातून बाजी मारणार असे वाटत असताना , निवडणुक आयोगाने आपली रास्त भुमिका कायम ठेवत ईव्हीम ची अपरिहार्यता सिध्द केली आहे.

जगात कुठेही घरुन मोबाईल / कॉप्युटरच्या माध्यमातून निवडणूक केंद्रावर न जाता एकाच दिवशी भारतात सर्वत्र निवडणुका होऊन संघ्याकाळ पर्यंत निकाल लागेल असे तंत्र माझ्या हयातीत दिसावे असे माझे स्वप्न आहे.

मोदीजींनी निवडणुका मधे प्रचंड शासकीय पैसा खर्च होतो, सरकारी यंत्रणा कामाला लागते, आचारसंहीतेमुळे विकास थांबतो यासाठी सर्वच निवडणुका एकाच वेळी घ्यायला हव्या असे म्हणले होते.

पण जर तांत्रिक सुधारणा होऊन या निवडणुका जर मोबाईल फोन च्या माध्यमातून झाल्या तर निवडणुकांच्या साठी सुट्टी, खर्च, गैरप्रकार या सर्वालाच आळा बसेल.

नुकतेच पोस्टल मत देणार्या सरकारी नोकरांना या पध्दतीची अत्यंत प्रार्थमीक तंत्र पध्दती निवडणुक आयोगाने विकसीत केल्याचे ऐकले.

आता संपुर्ण निवडणुका या पध्दतीने होण्यास काही काळ लागला तरी याची वाटचाल सुरु व्हावी. किमान पदवीधर मतदार संघात याची सुरवात व्हावी ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुस्पष्टपणे म्हन्जे कस म्हन्ता? तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे वेगळ्या वेगळ्या आयडींना विचाराव लागेल -
१) तुम्हाला तुमची जात काढुन समजावुन हव असेल तर वेगले आयडी आहेत. ते कोण ते तुम्हाला माहिती आहेत.
२) तुमची अक्कल काढुन समजवुन पाहिजे असेल तर वेगळे आयडी.
यातली एक सबक्याटेगरि म्हणजे एका विशिष्ठ जिओग्राफिक लोकेशन वरच अक्कल काढुन समजावुन सांगणारे किरणुद्दीन. त्यांची शिकवणी फ़ाट्यावर असते. ते सारख सगळ्यांना फ़ाट्यावर मारतो फ़ाट्यावर मारतो अस म्हणतात. पण घाबरु नका. फ़ाट्यावर त्यांनी (इतरांची) इतकि अक्कल साठेबाजी केली आहे की तौबा!
३) जात आणि अक्कल दोन्हि काढुन समजावुन सांगणारे असहि प्याकेज मिळत
४) झालच तर फ़ारिनच्या पेशल ट्युशनी सुध्दा मिळतील. ते खुप लॉजिकल विचार करतात अशी त्यांना तरी १००% खात्री असते. पण मधेच काही जणांना भारतात होणार्‍या सबक्या-विकासाने भरुन येते, आवेग अनावर होतो. तेवढा वेळ टैंप्लिज द्या.
५) तुम्हाला समजावुन घ्यायच आहे आणि समजलेलं आवडलं सुध्दा पाहिजे तर तुमच्याच एको चेंबर मधे विचारा.
६) जात अक्कल धर्म न काढता देशप्रेमाचे उमाळे न काढता आम्हालाच फ़क्त सत्य कळलय/तय अशी खात्री न बाळगता समजावुन सांगणारे कोणि सापडले तर "आमेन" म्हणा आणि इथे कळवा.

६) जात अक्कल धर्म न काढता देशप्रेमाचे उमाळे न काढता आम्हालाच फ़क्त सत्य कळलय/तय अशी खात्री न बाळगता समजावुन सांगणारे कोणि सापडले तर "आमेन" म्हणा आणि इथे कळवा. >> हो नक्की कळवा. म्हणजे त्यांना "७" नंबर आणि नवीन कॅटेगरी लेबल बहाल करून वरची "६" नंबर कॅटेगरी कायम रिकामी राहिल अशी खबरदारी घेता येईल. Wink

अहो अ‍ॅडमिन
मलाही चार ड्युआयडि द्या बरं प्लीज Lol

चौबेजी Rofl

बाकी चार चार आयडी मागणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की पोहऱ्यात यायला आधी आडात असावे लागते ..... चार चार आयडी घेऊन शेवटी गोल गोल जिलेब्याच पाडायच्या असतील तर त्याचा काय उपयोग?

काँग्रेस ने त्यांच्या प्रवक्त्यांना काहीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे, माबोवरच्या पण प्रवक्त्यांना हे लागु आहे का?

महाराष्ट्राच्या ४७ मतदारसंघांत ईव्हीएमची आकडेवारी जुळत नसल्याबद्दल तक्रारी दाखल होणार.
देशभरात एकूण २०० मतदारसंघांमधे आकडेवारीमधे फरक असल्याच्या बातम्या आहेत.

संभ्रमकार सुरू झाले... आता चोरी हा शब्द वापरलाच आहे, त्यातून मनस्थिती समजून घेता येईल.
बाकी, मतांची तफावत, "एका" व्यक्तीला evm हॅक करण्याची परवानगी ना देणे व 2009 चे भाजपने दाखल।केलेले खटले यांमधील संबंध सुस्पष्टपणे सांगायला अजूनही संभ्रमकारांची हिम्मत होत नाहीय.

गल्लीत छापले जाणारी वर्तमान पत्रे आणि बातम्या. टी आर पी वाढवण्यासाठी संशयास्पद असा शब्द वापरुन बातम्या तयार करनारे न्युज चॅनल हे काही पुरावा नसतात. ज्यानी कोणी हायकोर्टात केस चालली ही बातमी दिलेली आहे ती लोकसभेच्या संदर्भात नाही हे निश्चीत कारण इतक्या लवकर हायकोर्टात काहीच होत नाही.

आज शरद पवार साहेबांनी घोटाळा ईव्हीएम मधे नसून मतमोजणी साठी जे यंत्र वापरले जाते त्यात आहे असा आरोप करुन सर्व विरोधी पक्षाच्या आजवरच्या आरोपातील हवा काढून टाकली आहे.

यातून एक गोष्ट नक्की होते की ईव्हीएम मधे त्याची खात्री देण्यासाठी जी यंत्रणा ( ईईपॅट ) निवडणुक आयोगाने आणली त्याची खात्री शरद पवार साहेबांना पटली आहे.

एकंदरीत घोळ काय आहे यात एकवाक्यता नाही. मोर्चे काढून आणि सुप्रीम कोर्टात जाऊन किंवा संशय व्यक्त करुन विरोधी आपला पराभव झाला हे मान्य करायला तयार नाहीत. निवडणुक आयोगाला याने काही फरक पडत नाही. ते आपला सुधारणा कार्येक्रम राबवणारच

अमेरीकेत किंवा अन्य देशात पुन्हा बॅलेट पेपर्स आले ही बातमी गैर आहे. त्यांची लोकसंख्या काय ? साक्षरता किती ? लोक शिक्के कसे मारतात ?

पुर्वी बाद झालेली मते, विजयी उमेदवार आणि दुसर्या क्रमांकाची मते घेणारा उमेदवार या पेक्षा जास्त असत. ईव्हीएम ने मतदान सुरु झाल्यापासून मते जाणिवपुर्वक बाद म्हणजे नोटा होऊ शकतात पण मतदारांच्या दोन शिक्के मारणे, चिन्हावर शिका न मारता इतरत्र मारणे या प्रकाराने बाद होणारी मते शुन्य झालेली आहेत.

थोडक्यात पुन्हा मागे न जाता आहे या सिस्टीम मधे अजून विश्वासार्हता आणणे हाच पर्याय आहे. निवडणुक हारल्यानंतर सिस्टीमवर शंका व्यक्त करण्याच्या मनोवृत्तीवर काहीच पर्याय नाही.

थोडक्यात पुन्हा मागे न जाता आहे या सिस्टीम मधे अजून विश्वासार्हता आणणे हाच पर्याय आहे. निवडणुक हारल्यानंतर सिस्टीमवर शंका व्यक्त करण्याच्या मनोवृत्तीवर काहीच पर्याय नाही.

कार ला अपघात होतो म्हणून बैलगाडीने प्रवास करा म्हणणार्या गाढवान्स्मोर कसली गीता वाचताय?

इथले सर्वच प्रतिसाद का डिलीट झाले ?
त्यात नितीनचंद्र यांच्या पोस्टला उत्तर दिलेला प्रतिसाद ही गेला.

गाढव वगैरे उल्लेख आपापल्या संस्कारांप्रमाणे आलेले प्रतिसाद झळकत आहेत.

गाढव वगैरे उल्लेख आपापल्या संस्कारांप्रमाणे आलेले प्रतिसाद झळकत आहेत.

गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता अशी एक म्हण आहे मराठीत. पण अक्कल, शिक्षण, विचार आणि संस्कार या सगळ्यांचाच लोचा असल्याने तुम्हाला कळलं नसेल. जाऊ द्या. रेहान वद्रा च्या राज्याभिषेकाची तयारी करा.

अ‍ॅडमिन
वर नितीनचंद्र यांच्या खोटेपणाला उत्तर देणारी पोस्ट उडवली गेली आहे. पण इथल्या वैयक्तिक हल्ल्याच्या पोस्ट्स तशाच ठेवल्या जात आहेत. याच धाग्यावर नाही तर प्रत्येक धाग्यावर.
२०१४ च्या आधी ईव्हीएम हॅक होऊ शकतात असे उच्चरवात बोलणारी मंडळी आता इतरांना त्याच कारणासाठी शिवीगाळ करताहेत. मायबोलीवर हे प्रकार खपवून घेतले जात नाहीत असा माझा समज आहे.

२०१४ च्या आधी ईव्हीएम हॅक होऊ शकतात असे उच्चरवात बोलणारी मंडळी आता इतरांना त्याच कारणासाठी शिवीगाळ करताहेत.

नवीन Submitted by किरणुद्दीन on 13 June, 2019 - 08:13. >>>

2014 च्या आधीची काही उदाहरणे आहेत काय? त्यावेळी जे आयडी EVM वर शंका उपस्थित करत होते ते आताही आहेत काय? जर तुम्हाला जुने माबोसदस्य नवा आयडी घेऊन प्रतिसाद लिहीत आहेत असा भ्रम होत असेल तर त्या गोष्टीला सत्य सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय पुरावे गोळा केलेत?

इथल्या वैयक्तिक हल्ल्याच्या पोस्ट्स तशाच ठेवल्या जात आहेत.

आणि येता जाता दुसर्यान्चे सन्स्कार काढणारे, कोणत्यातरी जुन्या सदस्याचे डुआयडी असल्याचे आरोप करणारे सदस्य वैयक्तिक हल्ल्याच्या तक्रारी करतायत.

अ‍ॅडमिन साठी लिहीलेल्या पोस्टला काही ड्युआयडी का परस्पर उत्तरं देताहेत ? ते अ‍ॅडमिन झालेत का ?

अ‍ॅडमिन साठी लिहीलेल्या पोस्टला काही ड्युआयडी का परस्पर उत्तरं देताहेत ? ते अ‍ॅडमिन झालेत का ?

नवीन Submitted by किरणुद्दीन on 13 June, 2019 - 09:44

आता याला उत्तर दिले, की तुम्ही लहान मुलासारखे भोकाड पसराल. म्हणून जौ दे.

अ‍ॅडमिन साठी लिहीलेल्या पोस्टला काही ड्युआयडी का परस्पर उत्तरं देताहेत ? ते अ‍ॅडमिन झालेत का ?

नवीन Submitted by किरणुद्दीन on 13 June, 2019 - 09:44>>

त्यावर फक्त मीच उत्तर दिलय. मी ड्युआयडी आहे या गोष्टीला तुमच्याकडे काय पुरावा आहे?

अ‍ॅडमिन
https://www.maharashtranama.com/india/bjp-leader-book-democracy-at-risk-...
या आदरणिय नेत्यांचा इथे गाढव असा उल्लेख झालेला आहे. यातले अनेक जण सध्या मंत्री आहेत. एक माजी गृहमंत्री होते. अशा महत्वाच्या पदांवरील व्यक्तींचा अशा अर्थाने उल्लेख होणे योग्य वाटत नाही.

https://www.amazon.com/Democracy-Trust-Electronic-Voting-Machines/dp/819...

ईव्हीएम वर शंका घेणारे हे पुस्तक लिहीणारे गृहस्थ भाजपचे तत्कालीन सरचिटणीस आणि नंतर अध्यक्षही होते. तसेच भाजपचे सर्वाधिक काळ अध्यक्ष असलेले व केंद्रीय गृहमंत्री हे पद भूषवलेले लालकृष्ण अडवाणी यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.
ईव्हीएम वर शंका घेणा-यांचा सध्या ज्या शब्दात उल्लेख होत आहे त्यामुळे या मंडळींचा अपमान होत आहे. याकडे कृपया लक्ष द्यावे ही नम्र विनंती.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या निकालात जी मतं व्यक्त केली आहेत त्यासंदर्भात इथले शेरेताशेरे न्यायालयाचा अवमान करणारे ठरतात. तसेच न्यायालयात खटला दाखल करणारे सुब्रमण्यम स्वामी, जीव्हीएल नरसिंहराव न अन्य जबाबदार व्यक्तींच्या बाबतीत हे बदनामीकारक ठरत आहे.

या मंडळींचा अपमान होत आहे.

वेड पांघरून पेडगाव ला जाणे या म्हणीचा प्रत्यय आला.

म्हण आहे हे स्पष्ट लिहिलंय. तरीही काही लोक वैयक्तिक हल्ल्याच्या तक्रारी करतील. परमेश्वर त्यांना बुद्धी देवो!

किरनुद्दीन यांना प्रश्न: काही दिवसांपूर्वी मोदींना इथले काही आयडी अगदी शेलक्या शिव्या देत होते, तेव्हा तुमची ही कळकळ का दिसली नाही?

ठरविक आणि फक्त निवडक प्रसंगीच उद्भवणाऱ्या कळकळीच्या रिमोटची कळ इटलीमेड असल्याने कळ फलक बडवणाऱ्या बिचाऱ्यांच्या हाताचा ह्यात काय दोष !!

Pages