निवडणुकी नंतर कुठला पक्ष वृद्धांन साठी समाधानकारक चांगल्या योजना सुरू करण्यात येतील

Submitted by विवेक१११ on 10 May, 2019 - 07:42

निवडणूक निकालानंतर सर्व काही शांत होइल अशी अपेक्षा ठेवून वृद्धांना दिलासा देणारा असा कोणता कारेक्रम अमलात येइल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कसला दिलासा ?

कसला दिलासा ?
बस , सिटी बस , लोकल सर्वत्र राखीव जागा आहेत.
इन्कम त्येकसमध्ये सूट आहेत.
व्याज दर एक टक्का जास्त आहे.
दवाखान्यात सगळ्या सोयी आहेत,
धडधाकट असेल तर कमी पगारावर होनररी म्हणून नोकरी करता येते ( व तरुणाईची बर्गेनिंग पॉवर शून्य करता येते )
अगदी निराधार असतील तर संजय गांधी पेन्शन योजना आहे. मला वाटले होते , आता नवीन सरकार म्हातार्याना आता सावरकर पेन्शन वगैरे 10000 करेल , पण अजून संजय गांधी 700 रु च आहे.
बाजपेयींने सरकारी नोकरांच्या पेन्शनीना लोटा दाखवला होता.

अजून काय हवे आहे ?

ज्या काही योजना 'अनुदान' देण्याच्या असतात त्या प्रत्येक भारतीय जेष्ठ नागरिकांना का नाहीत? विशिष्ट आर्थिक परिस्थिती चा निकष का? सर्वसाधारण मध्यमवर्गातील जेष्ठांनांही ही अनुदान मिळायला हवे. नंतर ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याने स्वतःहून अनुदान सोडून देण्याची सोय अशी.

काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आश्वासने
नवीन Submitted by भरत. on 11 May, 2019 - 09:03
<<

ती फक्त आश्वासनेच राहतील हे सांगायला कुणा जोतिष्याची गरज नाही. मुळात कॉंग्रेसने दिलेली आश्वासने, पुर्ण करण्यासाठी दिलेली असतात का हाच प्रश्न आहे.

आठवा १९७१ साली दिलेले "गरिबी हटाव"चे आश्वासन, म्हणजे कॉंग्रेस १९७१ मधे गरिबांच्या नावावर मते मागत होती व आज २०१९ मधे देखिल गरिबांच्या नावावर मते मागत आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीत दिलेले शेतकर्‍यांचे कर्जमाफिचे आश्वासन पूर्ण झाले आहे का ?
--
जनतेला शेंडी लावायचे दूसरे नाव म्हणजे, कॉंग्रेसचा जाहिरनामा.

वृद्धांना सर्वात जास्त दिलासा कोणत्या निर्णयातून मिळेल
1) ज्यांना कोणतेच आर्थिक प्राप्ती चे साधन नाही त्यांना सरकारने योग्य अनुदान ध्यावे
2) ज्या घरात सून आणि मुलगा ह्यांच्या पासून छळ होतो त्यांना कडक कायद्यांनी संरक्षण ध्यावे
3) ज्यांचे कोणीच जवळ राहत नाही त्यांच्या साठी घरपोच औषध,रेशनिंग, पैसे पोचतील अशी यंत्रणा उभी करावी
बघूया कोणाला हे जमतंय का

हे सगळे पहिले व दुसरे - आधीच कायदे आहेत,

तिसरे शक्य नाही , कारण औषध लिहून घ्यायला , तपासायला रुग्णाल दवाखान्यात जावेच लागेल.

रेशन घ्यायलाही बायोमेट्रिक लागते.

खाजगी सुविधा पुरवायचे तर होऊ शकेल

आर्थिक प्राप्ती चे साधन नाही त्यांना अनुदान मिळाले पाहिजे व ते अनुदान त्यांच्या जवळपास सर्व पण अवश्यक गरजा भागवतील इतकी रक्कम असावी.

जनतेला शेंडी लावायचे दूसरे नाव म्हणजे, कॉंग्रेसचा जाहिरनामा.

पाच वर्षे तुमचाच मोदी असूनही असा धागा काढला कुणीतरी , ह्यातच सर्व आले.

अजून संजय गांधी 700 रु वरच भिस्त आहे.

वाजपेयींने सगळ्या सरकारी नोकरांच्या पेंशनीला लोट्यात घातले अन स्वतः 90 वर्षे जगून पेन्शन घेतली ,
आणि आता स्वतःचेच पैसे घालून त्याला पेन्शन योजना म्हणून त्याचे नाव ठेवलेय , अटल पेन्शन योजना!

आपण फक्त सामान्य लोकांचा विचार केला तर त्यांचे काम फक्त मत देण्यापूरताच
सत्तेचा फायदा त्यांना कधीच मिळत नाही.
100 रुपये गैर व्यवहारांची मिळकत असेल तर 1 रुपया जनतेला (सामान्य),खर्च करणार ते पण वाजत गाजत

बोकलत
शेवटच्या स्तरावरील कार्यकर्त्यां ना फक्त चिकन आणि दारू दिली की सर्व परतफेड झाली असेच नेते समजतात ।
आणि हेच मारामारी करणे,मतदार जमा करणे
कामधंदा सोडून नेत्यांच्या पाठी फिरणे ह्यात अग्रेसर असतात

दोन वर्षांपूर्वी वय वंदना योजना आली होती. पण नंतर तिच्याबद्दल फारसे ऐकून नाही. यात ज्येष्ठ नागरिकांना LIC कडून ही पॉलिसी घ्यायची होती, जी रक्कम गुंतवली त्यावर मासिक ६% व्याज मिळणार होते. म्हणजे एक लाख गुंतवले की महिन्याला ६,०००.
ही योजना अद्याप आहे का, याचा किती लोकांनी लाभ घेतला याची कल्पना नाही, तुम्ही चौकशी करून बघु शकता. अजून ही योजना असेल तर लाभ घेता येईल.

एक लाख गुंतवले की महिन्याला ६,०००>>
महिना नाही हो, वर्षाचे असतील. लोकांना लुबडण्यात हयात गेली LIC ची एवढं भलं नाही करायचे. Proud

<मासिक ६% व्याज मिळणार होते. म्हणजे एक लाख गुंतवले की महिन्याला ६,०००.>
नाही हो. ८% दर आहे.
पॉलिसीच्या प्रत्येक हजार रु पयांमागे वर्षाला ८० ते ८३ रुपये.
मासिक हजार रुपये मिळायला १,४४,५७८ ची पॉलिसी घ्यावी लागेल.

योजनेच्या विक्रीची मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवलीय.

पण मला हा धागा ऐवैं वाटतोय.

ओह, ओके ओके.
मी महिन्याला वाचले होते, आता शोधले तर तसे इथे आहे.

http://mahamtb.com/Encyc/2017/7/21/arun-jaitley-to-launch-new-pension-sc...

इथे तर ६०,००० गुंतवले की महिन्याला ५,००० लिहीलंय.
मी असंच लाखाला ६,००० वाचलं होतं कुठे बहुतेक.

ऐवैं म्हणजे काय?

संपूर्ण भारतात जर फक्त ९% जेष्ठ नागरिक असतील तर सरसकट ८००० महिना प्रत्येक जेष्ठ नागरिकांना दिल्यास आपल्या अर्थ वेवस्था वर काय परिणाम होइल?

महिना नाही हो, वर्षाचे असतील. लोकांना लुबडण्यात हयात गेली LIC ची एवढं भलं नाही करायचे

हो ना , पॉलिसी घेताना , हम साथ साथ है.
अन क्लेम देताना, हम आपके है कौन ?

संपूर्ण भारतात जर फक्त ९% जेष्ठ नागरिक असतील तर सरसकट ८००० महिना प्रत्येक जेष्ठ नागरिकांना दिल्यास आपल्या अर्थ वेवस्था वर काय परिणाम होइल?>>

शेटला सांगा की प्रत्येकाला जे १५ लाख देणार होतास त्यापैकी ज्येष्ठांच्या वाट्याचे तरी गुंतव ह्या योजनेत म्हणजे महिना आठ काय दहा हजार मिळतील Wink

ऐवैं म्हणजे काय?
>>

ऐवैं म्हणजे उगाच, विनाकारण.

मैं तो ऐवैं ऐवैं लूट गया

असं गाणं आहे एका चित्रपटात. त्या गाण्यात नटी पंजाबी ड्रेस घालून नाचते, सबब, पंजाबी शब्द असावा.

शेटला सांगा की प्रत्येकाला जे १५ लाख देणार होतास त्यापैकी ज्येष्ठांच्या वाट्याचे तरी गुंतव ह्या योजनेत म्हणजे महिना आठ काय दहा हजार मिळतील Wink

Submitted by Filmy on 12 May, 2019 - 12:49. >>>

प्रत्येकाला 15 लाख देणार असं मोदींनी केव्हा म्हटलं? खुद्द "लाव रे तो व्हिडीओ" वाल्यांना मिळाला नाही तो व्हिडीओ आपणाला मिळाला का साहेब?

अन कुणी इ मेल नाही केला तर कुंभकर्ण तसाच मुडद्द्यागत झोपून रहाणार का ?

संजय गांधींसाठी कुणी कुणास मेल केला होता ?

कुंभकर्ण वरून राजस्थानमधील कुंभकर्ण योजना आठवली !

बाकी "संजय गांधींसाठी कुणी कोणास मेल केला होता?" या प्रश्नाचं प्रयोजन समजल नाही. इथे पेन्शन योजना महत्वाची आहे की तिला कुणाचे नाव द्यावे हा प्रश्न महत्वाचा आहे?

तुमच्यामते मोदी कुंभकर्ण असतील तर तुमच्यासारख्या चतुर व्यक्तीने झांज वाजवायचं काम हाती घ्यायला हवे. शेवटी सत्ताधारी पक्षाला जनतेची गरज दाखवून देण्याचं काम विरोधी पक्षाला करावं लागतं (आता पुढची किमान 10 वर्षे तेच करायचंय काँग्रेसला)