Submitted by प्रांजलीप्रानम on 26 April, 2019 - 06:25
विचार
मन आपलं कधीच पूर्ण शांत नसतं,
कोणत्या ना कोणत्या विचारांचं
काहूर माजतं असतं.
स्वप्नाळू दुनिया रंगीन मोठी असते,
विचारांच्या वादळाला मात्र
कधी तीही अपवाद नसते.
शून्य मनात...
मन शून्यत्वाचा विचारच करते,
विचारांच्या गतीला तर
इथेही काही स्थिरता नसते.
भावना-विवशता मोठी चमत्कारीक असते,
विचारांच्या वाक्यांना इथे
शब्दांचीच काही जोड नसते.
तटस्थ निर्णयाची दुर्दशा असते,
मन-बुध्दीच्या अडकित्त्यात
विचारांची सुपारी वसते.
..... प्रांजली.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
Good
Good