लोकशाहीचा महाउत्सव सुरु झाला। काही काळका होईना मतदार राजा झाला।तेच जुने प्रश्न तेच आहेत यांचे नारे।बदलल नाही काही तेच आहेत तारणहार जुने चेहरे।आता होईल आश्वासनांचि खैरात ।आणि करतील एकमेकांवर आरोपांची बरसात।हाम्हणेल मी चौकिदार आहे ते म्हणतात चौकिदार चोर आहे।कुणी म्हणेल आमची 56 ईंच छाती।दुसरा म्हणतो कशाला वाटते मग भीती।आता आवागमन सुरु आहे ।निष्टा विसरुन सत्तेसाठी धावपळ सुरू आहे।एकेकाळी ज्याला चोर,ब्रष्टाचारी म्हटले ।ते कळपात येताच पवित्र झाले।कुणी पाय गरिबांचे पाय धुणार तर कुणी मंदिराकडे वळणार।लोक म्हणतात मिडिया विकला गेला सांगत नाही खरे। जो देईल पैसा त्याच्या मागे धावतात सारे।सत्ताधारी म्हणतात आम्ही विकास केला देशाचा।मग प्रश्न का निर्माण होतो शेतकरी आत्महत्यांंचा।पहेले मंदिर फीर सरकार म्हणणारेही आता शांत झाले।एकमेकांना शिवी देणाऱ्यांनी आता गोडवे गाणे सुरु केले।नोटबंदी, हमिभाव, काळापैसा आणि रोजगार यावर कुणी बोलत नाही।मागच्याच सरकारला दोष देणे सुरु आहे।निवडून गेल्यावर पाच साल दिसत नाही ज्यांचे थोबडे ।तेच येतील आता मतासाठी घालतील साकडे।राजा होतो एक दिवस भिकारी। मतांचा जोगवा मागत फिरतो दारोदारी।कधि यांना तर कधि त्यांना आम्ही देत असतो सत्ता।आम्ही बनतो गरीब नेत्यांची वाढत जाते मालमत्ता।सारे सारखेच आहेत दोष द्यावा कुणाला।पण एक खरे आहे काही दिवस का होईना मतदार राजा झाला।
लोकशाहीचा महा उत्सव
Submitted by ashokkabade67@g... on 26 March, 2019 - 12:34
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दोष कोणाचा , नेत्यांचा ,
दोष कोणाचा , नेत्यांचा , मतदारांचा , राजकीय पक्षांचा , की लोकशाही चा .
दोष कुणाचा? यावरहि वादावादी
दोष कुणाचा? यावरहि वादावादी होईलच!
अहो सत्ता, पैसे कुणाला नको असतात? नि दुसरे काहीच महत्वाचे नाही बर्याच लोकांना.
तसे अनेक महात्मे आहेत, जे लोकांची नि:स्वार्थपणे सेवा करतात, लोककल्याणाच्या गोष्टी करतात. त्यांना प्रसिद्धी पण हवीच असते असे नाही, फक्त त्यांच्या कार्याला पोषक होईल एव्हढीच हवी असते. पण त्यांना राजकारणात रस नसतो. कारण राजकारण करणार्यांना फक्त स्वार्थ, पैसा, सत्ता, प्रसिद्धी यात गम्य असते. तिथे जाऊन सेवा, लोककल्याण या गोष्टी करणे कठीण. तेंव्हा जरी निवडून आले तरी त्यांचे काही चालणार नाही.
तर असे हे चालायचे. कारण पैसा, सत्ता, प्रसिद्धी असणारे लोक मुर्दाड होतात, कुणि कितीहि ओरडा केला तरी ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे मतदारांनी कितीहि जोरात ओरडा केला तरी उपयोग नाही.
दोष कुणाचा? यावरहि वादावादी
दोष कुणाचा? यावरहि वादावादी होईलच!
<<
बाकी काहीही असो. झक्की, दोष फक्त आणि फक्त तुमचाच.
<<<झक्की, दोष फक्त आणि फक्त
<<<झक्की, दोष फक्त आणि फक्त तुमचाच>>>
अहो हे काय? एव्हढ्यातच निष्कर्ष काढून मोकळे तुम्ही?
असे नसते मायबोलीवर. मुळात काहीहि निष्कर्ष न निघता दहा बारा पाने भरून जाईल इतकी बाचाबाची व्हायलाच पाहिजे अशी मायबोलीची पद्धत आहे. त्यातून विषयाला वार्यावर सोडून इतरच विषयांवर गुद्दागुद्दी व्हायलाच पाहिजे, नैक्का?
छेछे.
छेछे.
फक्त तुमचा दोष आहे.
बाकी उत्सव म्हटलं की आम्हाला तरी फक्त रेखा आठवते.
क्काय चिकणी आहे रेखा.
क्काय चिकणी आहे रेखा.
आम्हाला रेखा माहित नाही.
आम्हाला रेखा माहित नाही. आम्ही नर्गिस, वैजयंतीमाला, फार तर साधना, शर्मिला टागोर वगैरे. (नावेहि आठवत नाहीत आता!)
तसेच अशोक कुमार, राजकपूर, दिलिप कुमार वगैरे.
हाच आमचा दोष असेल तर असू द्या. चंद्रावर डाग असला तरी तो सुंदर असतो, तसे दोषासहित आम्ही सज्जन असतो.
<<क्काय चिकणी आहे रेखा.>>
<<क्काय चिकणी आहे रेखा.>>
काय हे सेक्सिस्ट लिखाण!
आता बायकांनीहि त्यांना कुणा पुरुषाची स्तुति करायची असेल तर इथेच करावी. भले त्याचा विषयाशी संबंध नसो. पण वादावादीस मुद्दे मिळतील.
नाही नवीन मुद्दे मिळाले तर आपलेच पोस्ट परत परत टाकू - केसरी बीबी वर चालले आहे तसे.
निवडणुक कशी जिंकली जाते
निवडणुक कशी जिंकली जाते
आपल्या देशात जातीय समीकरण , धर्मिक समीकरण , हे दोन महत्वाची समीकरण आहेत निवडणूक जिंकायचे .
शहरांत भाषा आणी प्रांत हे पॉईंट असतत .
त्या नंतर gundagardhi .लोकल गुंडा ना दारूच्या पार्ट्या देणे पैसे देणे असले प्रकार .
कुठेच निवडणूक जिंकायला चांगल्या चरित्र ची आणी विकास ची जाण असण्याची गरज नाही चांगला उमेदवार सर्व दबाव झुगारून निवडणुकीला उभा राहिला तरी जनता त्या उमेदवाराला लायक समजत नाही
राजेश तुम्ही भाजपही अशाच
राजेश तुम्ही भाजपही अशाच प्रकारे निवडणूक लढवतात असे तर नाही म्हणता म्हणता आहात.
पहिली गोष्ट म्हणजे मी कोणत्या
पहिली गोष्ट म्हणजे मी कोणत्या चा पक्षाचा समर्धक नाही पण आपली निवडणूक अशीच असते हा अनुभव आहे
तिकडे तर लै भाजपची बाजू घेऊन
तिकडे तर लै भाजपची बाजू घेऊन राहीले व्हते भौ. बिनबुडाचे गाडग्यासारख्या कोलाट उड्या नका मारू.
तिकडे तर लै भाजपची बाजू घेऊन
तिकडे तर लै भाजपची बाजू घेऊन राहीले व्हते भौ. बिनबुडाचे गाडग्यासारख्या कोलाट उड्या नका मारू.>>>>>> अशा उड्या मारल्या होत्या का?

कोलांट्या उडी पहायला
कोलांट्या उडी पहायला डोंबाऱ्याचा खेळ बघा. रंगबदलू लोक पाहिले की दलबदलू लोक यांच्या पुढे फिके पडतील असे वाटते.
आता पहिल्यांदाच नोटीस केलं कि
आता पहिल्यांदाच नोटीस केलं कि रेखाच्या डोळ्यांच्या आकाराच्या तुलनेत बुबुळं फारच छोटी आहेत. गुड बॅड अग्ली मधल्या बॅड सारखी
घाडगे आणि सून मधील अमृता चे
घाडगे आणि सून मधील अमृता चे डोळे बघून भीतीच वाटायची मला अॅमी जी. पण राव रेखा खरंच कमाल ( माल) आहे.
श्या
श्या
वाहते पान अन माझी रेखा गेली वाहून. टू ब्याड.
आरारा तुमच्या नावाचा फुलफॉर्म
आरारा तुमच्या नावाचा फुलफॉर्म काय आहे.
२३ मे नंतर मायबोली वरच्या
२३ मे नंतर मायबोली वरच्या तमाम रुग्णांना कोलायला बरे पडावे म्हणून हाच प्रतिसाद अनेक धाग्यांवर देऊन ठेवत आहे.
थोडी कळ काढा.
मायबोली वरच्या तमाम नमोरुग्णांची अवस्था मे मध्ये निकाल लागल्यानंतर खरोखरच वाईट होणार आहे. आजारपण तीव्रतेने उफाळून येणार आहे. त्यात प्रामुख्याने मूळव्याध,बद्धकोष्ठ,स्किझोफ्रेनिया,गळू,हृदयविकार या आजारांचा समावेश असेल.
भारतात रहात असतील तर ठीक आहे. पण दुसऱ्या कोणत्या देशात रहात असतील तर उपचारांचे खर्च परवडणार नाहीत. त्यांनी मे नंतर आयुष्मान भारत योजनेत उपचार करून घ्यावेत हि सूचना देऊन ठेवत आहे.
लखू जी नमोरुग्ण म्हणजे कोण
लखू जी नमोरुग्ण म्हणजे कोण मोदी समर्थक की विरोधक? संभ्रम दूर करा. इतके परफेक्ट सांगताय ज्योतिषी आहा काय.
इथल्याच काही आयडींची अवस्था
इथल्याच काही आयडींची अवस्था बघून हि तुम्हाला नमोरुग्ण कोण ?? असा प्रश्न पडलाय ?
आणि मी भविष्य वगैरे सांगत नाही. फक्त डोळे उघडे ठेऊन... कोणताही चष्मा ना घालता आजूबाजूच्या घटना बघतो. भाजपा ३५०+ आणि NDA ४००+ मारणार असे वाटत आहे.
लखूला मराठी आंतरजालावर जोक
लखूला मराठी आंतरजालावर जोक मारायला ठेवलाय वाटतं. अजून एक येउ देरे....
जर तू म्हणतो तसे सीट्स येणारच आहे तर इथे येऊन बोंबाबोंब कशाला करायची? का स्वतःलाच सांगणे चालू आहे - ऑल इज वेल ऑल इज वेल?
नेमकं काय साध्य होते असे अमुक तमुक बहुमत येणारच आहे असे निवडणूकीआधी सांगून? येणार नाही हे माहित आहे पण भक्तांनी भरवंसा सोडू न्ये म्हणून काकुळतीने प्रयत्न सुरु आहेत का?
लखूच खरे फेकू आहेत. रेखा खरंच
लखूच खरे फेकू आहेत. रेखा खरंच सुंदर आहे.
भक्तांनी भरवंसा सोडू न्ये
भक्तांनी भरवंसा सोडू न्ये म्हणून काकुळतीने प्रयत्न सुरु आहेत का?>> असे फक्त कॉन्ग्रेसच्या लोकाना वाटत असेल कारण दुसर्या बाजूने पाह्यले तर कॉन्ग्रेसच्या लोकाना डिप्रेस करायला म्हणून त्यानी ते आकडे दिले असतील. अहो आठ टर्म जेथून गान्धी-नेहरु जिन्कुन आले आहेत ती जागा सोडून राहुल गान्धीना वायनाडला जायची जरूरि का वाटावी. अणि हे डिफेन्ड करताना २०१४ मधे कोणी कोणी २ जागा लढवल्या ते उकरून काढू नका. कारण आपण २०१९ विषयी बोलत आहॉत. धन्यवाद.
हा हा हा... माझे बघू नका.
हा हा हा... माझे बघू नका. तुमचे सांगा.. लाट लाट म्हणत असतांना मोदी वाराणशी ला का उभे राहिले ते विचारू नये. तुम्हाला फक्त कोन्ग्रेस ने काही केले कि प्रॉब्लेम असतो. भाजपने केले कि ती श्रावणी असते. तद्दन संघी भामटेपणा...
रेखा ची अजून चित्रं डकवा.
रेखा ची अजून चित्रं डकवा.
लखू रिसबूडना फक्त तो एकच
लखू रिसबूडना फक्त तो एकच परिच्छेद इथेतिथे डकवायचं कंत्राट मिळालेलं दिसतंय.
लख्या रिसबुड , तू तुझे बूड
लख्या रिसबुड , तू तुझे बूड सँभाळ.
मॉ वायनाड ने बुलाया है
मॉ वायनाड ने बुलाया है
<< मॉ वायनाड ने बुलाया है >>
<< मॉ वायनाड ने बुलाया है >>
------ छान.
न मैं आया, न मुझे भेजा गया, मां कबिनी (कपिला) ने बुलाया मुझे.
https://en.wikipedia.org/wiki/Kabini_River
Pages