जत्रा ( एक भयकथा ) संपूर्ण -३

Submitted by शुभम् on 22 October, 2018 - 23:25

पुढे चालू....।

" काय पाद्रीने मारलं तुम्हाला " मन्या

" हो "

" पण तुमचं प्रेम होतं ना त्याने तुम्हाला का मारलं ? " गण्या
.
.जॉननेच मारले मला . आपल्याकडे जास्त वेळ नाही , तुम्ही पटकन निघा अन्यथा तुमचा ही जीव जाईल . " शेवंता

" नाही त्याने आमच्या राम्याला मारले . त्याला आणि असं सोडणार नाही " मन्या

" होय ज्याने आमच्या राम्याचा अंत केला , त्याचा अंत केल्याशिवाय आम्ही जाणार नाही " गण्या

" गण्या मन्या असं करू नका लगा हो . जोपर्यंत तुम्ही जंगलातून सहीसलामत बाहेर जाणार नाही तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही . तुम्ही शेवंताचं ऐका पटकन बाहेर पडा " राम्या

" इतकी वर्ष आपण एकत्र राहिलो आता मरण आले तरी येऊ दे , एकत्रच मरू " गण्या

" तुम्ही सांगा काय झालं ते " मन्या

" तुम्हाला काय माहित आहे आणि काय माहित नाही हे मला माहित नाही . तुम्हाला किती खरं किती खोटं माहित आहे हे ही मला माहित नाही . आता मी सांगणार आहे याची सुरुवात कुठे झाली ? यासाऱ्या घटनांचा इतिहास काय आहे ? "

" मी पाटलाची मुलगी . आमच्या घरात परंपरागत पाटिलकी चालत आली होती . आमचं घर बऱ्यापैकी सधन . बाबांचही बऱ्यापैकी शिक्षण झालं होतं . त्यावेळी गावात शाळा नव्हती म्हणून लहानपणापासूनच त्यांनी मला त्यांच्या मित्रांच्या म्हणजेच सदू काकाच्या घरी मुंबईला शिकायला ठेवलं होतं . मी तिथेच लहानाची मोठी झाले फक्त सुट्टी पुरतं गावात यायची. माझ्या शालेय शिक्षण पूर्ण झालं . बाबांच मत होतं की आता बास करावं शिक्षण . पण काकांनी बाबांना समजावलं की कॉलेज पूर्ण करू दे . इतक्या वर्ष शिकवलं , थोड्यासाठी माघार नको .

" मी कॉलेजला जाऊ लागले. हेच माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होते . हातातील वाळू कशी निघून जावी तसे हे क्षण झटपट निघून गेले . पहिल्याच वर्षी माझ्या आयुष्यात जॉन आला . तो प्रोफेसर होता . तरुण होता , सुंदर होता , छान दिसायचा , छान राहायचा . काळी पॅंट , पांढरा शर्ट त्याच्यावरती काळा कोट , पायात शूज ,एका हातात पुस्तक नि दुसर्‍या हातात पाईप . सारं कसं छान वाटायचं .असं वाटायचं की जॉनने शिकवत राहावं आणि मी असंच शिकत राहावे . त्याच्या पहिल्या लेक्चर पासून मी त्याची दिवानी झाले होते . म्हणून मी नंतर काही ना काही कारण काढून त्याच्या बरोबर जास्त वेळ घालवू लागले . सुरुवातीला मला वाटायचं की तो मला टाळायचा प्रयत्न करतो पण नंतर तो ही माझ्यात मिसळू लागला . आमचा एकमेकांबरोबर चा वेळ वाढत होता . आम्हाला माहीत होतं आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो.

पण प्रश्न होता प्रपोज करण्याचा . मग एक दिवस त्यानेच मला प्रपोज केला . मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता . मी हो म्हणाले पण त्याला भलतीच गडबड होती . तो सरळ सदु काकाच्या घरी आला आणि लग्नाची मागणी घातली . मला माहित नव्हतं सदू काका काय म्हणतील ? पण काय आश्चर्य ते हो म्हणाले . त्यांचा काही आक्षेप नव्हता . पण त्यांच्या मते बाबा तयार झाले नसते . मग सदू काकांनीच जॉनला पाद्री बनवून गावात जाण्याची कल्पना सांगितली . कारण जेव्हा सदूकाका नि बाबा एकत्र शिकायला होते तेव्हा ते दोघेही चर्चमध्ये प्रार्थनेला जात असत . तिथला पाद्री जो काही सांगेल ते बाबा लक्ष देऊन ऐकायचे . काही अडचण आली तर तो सांगेल तसे उपाय करायचे . पाद्री लोकांविषयी बाबांच्या मनात अपरंपार आदर होता . म्हणूनच पाद्री बनून जर मला मागणं घातलं तर ते नाही म्हणणार नाहीत अशी अटकळ आम्ही बांधली . खरंतर ही कल्पना इतकी चांगली नव्हती पण जॉन पाद्री म्हणून गावात यायला तयार झाला . त्यामुळे आम्ही बाकीचा जास्त विचार न करता याच योजनेवर अंमलबजावणी करण्याचे ठरवले .

" मी पुढे आले नंतर महिन्याभराने जॉन आला . आल्या आल्या सरळ आमच्या घरी आला . कारण गावात काय करायचं झालं तर बाबांची परवानगी घेणं आवश्यकच होतं. त्या दिवशी आमच्या घरीच राहिला त्याने बाबांना काय काय सांगितलं काय माहित ? पण बाबा अगदी खुश झाले . त्यांनी चर्च बांधायला सुरुवात केली त्याचबरोबर जॉनसाठी दोन खोल्या बांधायला चालू केल्या . जॉन मराठी चांगल्या प्रकारे बोलायचा . लोकांमध्ये फिरायचा , त्यांना चार गोष्टी सांगायचा , रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेला बोलवायचा . प्रार्थना झाल्यानंतर कधी कपडे , कधी मिठाई काही ना काही वाटायचं . तो गावाचा चर्चेचा विषय झाला होता . बाबांचं त्याच्याविषयीचं मत चागलं झालं होतं . सदू काकांना जाऊन ज्याने माझी मागणी घातली होती तो जॉन बाबांना माझी मागणी घालायला घाबरत होता . तो दिवस पुढे ढकलत होता . मग एक दिवस सदूकाकाचं पत्र आलं . बाबांना त्यांनी आमच्या विषयी सर्व सांगितलं होतं . त्यांचा आणि बाबांचा पत्रव्यवहार चालू होता तेव्हा त्यांनी याबाबत सर्व काही बाबांना कळवलं होत . त्यांनी आम्हाला फक्त त्यांच्या समोर जाऊन उभा राहायला सांगितलं होतं .

" अरे जॉन एवढं सारं करायची काही गरज नव्हती . तू जरी सरळ मागणी घातली असती तरी मी नाही म्हणालो नसतो . "
त्यांच्या दोघात बरीच चर्चा झाली बाबा शेवटी म्हणाले
" पण लग्न लग्न मात्र आमच्या पद्धतीने होणार बर का ? अगदी पद्धतशीर .....! "

" मग आमचा साखरपुडा झाला . जॉन अनाथ होता म्हणून त्याच्या बाजूने सदू काका व काकू होत्या . साखरपुड्यानंतर जत्रा आली म्हणून हळदी व लग्न पुढे ढकललं . त्याकाळीही जत्रा खूप मोठी व्हायची . भरपूर दुकानं लागायची . अगोदरच मी पाटलाची मुलगी आणि बरोबर गोरा साहेब त्यामुळे सारेजण आमची बडदास्त ठेवत होते . आमचं सारे काही राजेशाही थाटात चालू होतं . खरंच तो जत्रेतील दिवस माझ्या आयुष्यातला अत्यंत सुखाचा व आनंदी दिवस होता . पण तो आनंद पुढे येणाऱ्या दुःखाची नांदी सांगत होता हे मला माहीत नव्हतं . कारण पुढे जे काही झालं ते खूपच दुःखदायक होतं .

" त्या रात्री कुणातरी क्रांतिकारकांचा गट जॉनला उचलून घेऊन गेला . मी फार घाबरले मला वाटत होतं आता जॉनचा जीव वाचणार नाही . मी तेव्हा ग्लानी येऊन बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले तेव्हा कळालं जॉन जिवंत होता आणि ज्यांनी जॉनला नेलं होतं ते क्रांतिकारी नव्हते दरोडेखोर होते . त्यांनी जॉनकडे जे काही सोनं होतं ते लुटून त्याला बेशुद्ध करून गावाबाहेर टाकून दिलं होतं .

पण त्या दिवसानंतर जॉन पूर्ण बदलला . इतक्या दिवस मी ज्या व्यक्तीला ओळखत होते ती व्यक्तीच मला दिसली नाही . मला वाटायचं हे शरीर फक्त जॉनचं आहे पण त्याच्या वरती नियंत्रण दुसऱ्या कोणाचं तरी आहे . मी कोणाला बोलले नाही . मला वाटलं तो घाबरला असेल होईल हळूहळू सारं काही व्यवस्थित . पण बाकी कोणालाच काहीही फरक जाणवत नव्हता .

अशातच आमची हळदी झाली .अगोदरच गोरा-गोमटा असलेल्या जॉनला जेव्हा हळद लागली तेव्हा ते ध्यान पाहण्यासारखं होतं . मी तर नुसती हसत सुटले. एरवी चेष्टा मस्करीला खळखळून हसून दाद देणारा जॉन मख्खासारखा गप्प बसून होता . त्याचं वागणं दिवसेंदिवस फारच विचित्र होत चाललं होतं .

हळदीचा कार्यक्रम उरकल्यानंतर तो मला म्हणाला
"सगळे झोपल्यावर मळ्यात ये , माझ्या खोलीवर , मला काहीतरी सांगायचं आहे , please come "

मला माहित होतं तो बोलावून त्याला कशाचा त्रास होत आहे हे सांगेल . म्हणून मी सगळे झोपल्यानंतर घराबाहेर पडले आणि मळ्यात जाऊन पोहोचले . मी मळ्यात पोहोचले तेव्हा रात्रीच्या अडीच किंवा तीन वाजले असतील .मी दार ठोठावलं . पण त्याने उघडलं नाही मी ढकलून पाहिला तर उघडच होतं .

मी आत गेले . सर्व घरात फुलांचा सुगंध दरवळत होता जॉनने चक्क घर सजवलं होतं .

" जॉन sss जॉन sss काय हा वेडेपणा ..घर का सजवले ? "

अचानक मला कोणाची तरी मिठी पडली . मी घाबरत होते पण तो जॉन होता

" We are going to marry dear
उद्या आपले लग्न होणार आहे "

" उद्या होणार आहे ना .आज का सजवले ? "

" कारण उद्या तू नसशील ....."

तो इतक्या थंड पाणी हे वाक्य बोलला की माझ्या जिवाचा थरकाप उडाला .

" काय काहीही काय बोलतोय ? "

त्याचे उष्ण श्वास मला माझ्या मानेला जाणवत होते

" म्हणजे उद्या तू माझी प्रेयसी नसशील बायको असशील "

त्याने त्याचं बोलणं सावरून घेतलं पण तो थंडपणा मला घाबरूवून गेला होता . मी स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून घेतलं

" हे सांगायला बोलवले का तू मला ..

" नाही

असं म्हणत त्याने मला ओढून घेतले व माझ्या ओठावर ओठ टेकवले त्यापुढे जे काही झालं त्यावरून मला इतकं कळालं की तो जॉन नव्हता . त्याचं फक्त शरीर होतं .

त्याचे वासनेने बरबटलेली डोळे नंतर काळेकुट्ट झाले .हळूहळू खोलीतल्या संगंधाची जागा दुर्गंधीने घेतली. कसली घाणेरडी दुर्गंधी होती . नंतर नंतर त्याच शरीर पण सडत गेलं . त्याच्या सर्वांगावर काळेकुट्ट डाग पडले . नंतर-नंतर ते मानवी शरीर नष्ट होत गेलं व त्याठिकाणी अमानवी अतिंद्रिय शक्ती अवतरली . ती नक्कीच क्रूर होती .भयंकर होती .भीतीदायक होती . तिच्या बाहुपाशात माझं शरीर आवळलं गेलं होतं . कसलातरी तरी केसाळ , लबलबित , घाणेरडा ,दुर्गंधीनें भरलेला असा तो आकार माझ्या शरीराचा यथेच्छ उपभोग घेत होता . मी काहीच करू शकत नव्हते . त्या दुष्ट शक्तीपुढे मी काहीच नव्हते .अगदी कागदी कस्पटाप्रमाणे होते .

फक्त मला एवढच कळत होतं तो जॉन नव्हता ते शरीरही जॉनचं नव्हतं . त्या रात्री मी नेहमीसाठी निद्रिस्त झाले .

" पण ज्यांच्या शरीरात जे कोणी होतं त्याने तुम्हाला का मारलं ? " गण्या म्हणाला

" ते मलाही माहीत नाही . ते जे काही आहे त्याच्यामुळेच मी अजूनही मुक्त झालेली नाही . त्यांनेच मला बंदिस्त केलेले आहे .

" पण तो आहे तरी कोण ?

" मीच तो " एक खर्जातला खरखरीत आवाज . कोणीतरी आपल्या लांब नखाने लोखंडावर घासल्यावर येईल तसा , कानाला कर्णकर्कश्य व कटू वाटणारा असा आवाज आला

" मीच तो " एक खर्जातला खरखरीत आवाज , कोणीतरी नख्यांनी लोखंडावर घासल्यावर येईल तसा आवाज आला.

" मीच तो ज्याने गण्याला जंगल जाळण्यापासून रोखले .
" मीच तो ज्याने तुम्हाला तिघांनाही त्या बनावट चर्चमध्ये नेलं
" मीच तो ज्याने शेवंताच्या मृत्यूची खोटी गोष्ट सांगून तुम्हाला फसवून तुमचं रक्त घेतलं
" मीच तो ज्याने शेवंताला गाण्याच्या स्वप्नात प्रवेश करू दिला
" मीच तो , जो मशाल दाखवून तुम्हाला इथं घेऊन आला
" मीच तो काळोख ज्याने राम्याचा अंत केला
आणि
" मीच तो ज्याने जॉनच्या शरीरात प्रवेश करून.........

किती विचित्र आवाज होता . त्या आवाजाने गण्या व मन्या दोघांच्याही अंगावर काटे आले. इतका वेळ ज्या गोष्टीपासून दूर पळत होतो , ज्या गोष्टीपासून वाचायचा प्रयत्न करत होतो तीच गोष्ट आता समोर उभा राहिली होती . त्यामुळे त्यांच्या काळजाचा थरकाप उडत होता .

" आमचा बळीच द्यायचा होता तर अगोदरच द्यायचा नव्हता का ? एका फटक्यात गोष्ट संपवून टाकायची होती . आमचा इतका छळ करायची काय गरज होती ? " गण्या तावातावात बोलून गेला

" शेवंताssss ये ना ग्.. माझी लाडकी शेवंता "
तोच तो घाणेरडा आवाज शेवंताला हाक मारत होता
गण्या , मन्या त्याच्यापुढे एक शुल्लक निरुपद्रवी प्यादे होते . त्याचे दोघांकडेही लक्ष नह्वते .

" सांगा तुम्ही आम्हाला का मारून नाही टाकत , असा छळ का लावलाय आमचा ? " मन्या

" मारेन , मारेन , वेळ आली की लगेच मारेन . सध्या मी माझ्या लाडक्या शेवंताला शोधतोय . इथेच तर होती . "

मन्याची शीर सनकली . तो वेड्यासारखं करायला लागला . कोणी दिसत नव्हतं . आवाज चहूकडून येत होता . आतापर्यंत झालेल्या घटना काय कमी होत्या त्यात भर म्हणून हे सगळं . आणि जीवही जात नव्हता , मोकळा व्हायला . मन्याच्या मनावर प्रचंड ताण आला .

" आयला असं तीळ-तीळ तुटुण मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं "
आणि तिथल्याच दगडावर जोरजोरात डोक आपटू लागला .

" आरं मन्या , काय करतोय लगा "
गण्या त्यांना अडवायला गेला पण त्यांना गणालाही ढकलून दिलं .

पुन्हा तोच खर्जातला कर्णकर्कश आवाज आला
" मारायचा आहे तुला , गडबड आहे , मर मग . "

तेव्हाच मन्या हवेत उडाला .एखाद कलिंगड हत्तीच्या पायाखाली यावे तसे त्याच्या मस्तकाच्या चिथड्या उडाल्या .
अपरिमित रक्त सांडू लागलं . पण ते सार हवेतच राहिलं . कसलंतरी गोलाकार परदर्षक भांड असल्याप्रमाणे . मन्याचं धडा विना व रक्तात बुडालेलं शरीर हवेत अधांतरी तरंगत होतं .

पुन्हा एकदा आवाज आला
" तुला पण मरायचं का ? आत्ताच सांग . मला वाटलं होतं तू थोडा फार हुशार असशील , पण तू तर महामूर्ख निघाला . अरे तुम्ही तिघही माझ्या लाडक्या शेवंती नावाच्या मासोळी साठी जाळं होता रे .. जाळं ..... "

" माझी शेवंता , तिला दुसऱ्याला झालेला त्रास सहन होत नाही , आता सापडली जाळ्यात , माझ्यापासून इतकी वर्षे लपत होती आता सापडली ना जाळ्यात . "

" आता तुझं नी माझं मिलन होणार , किती तरी युग आता आपण एकत्र घालवणार , अगं माझी शेवंता , बोल ना तू , बोलत का नाही ? "

तेव्हाच शेवंता च्या आवाजात गण्या बोलला
" कोण आहेस तू ? का मला त्रास देतोय ₹ जॉन आणि मी सुखाने जगलो असतो तु कोणा आला आमच्या आयुष्यात "

शेवंताला गणाच्या शरीरात प्रवेश करायला भाग पाडले तेव्हाच त्या अघोरी शक्तीने शेवंताला गण्याच्या शरीरात कैद करून टाकले .

" शेवंता हे तू बोलतेस ! किती वर्षातून ऐकला हा तुझा मधुर आवाज ...! हीच ती वेळ आहे आपण दोघे एकत्र येऊ . मग तू चांगलेच ओळखशील मला ...."

आणि क्षणात आजूबाजूचा पूर्ण परिसर बदलला . ते एका उंचच्या उंच कड्यावर होते . आजूबाजूला जिथवर नजर जाईल तिथपर्यंत मिट्ट काळ्या पाण्याचा समुद्र पसरला होता . कसलाही आवाज नव्हता . भयान शांतता . तो समुद्र ही विचित्र होता . त्याच्यावर ती एकही लाट नव्हती . ना कसली हालचाल होती . ना हवेची झुळूक होती . ना वाऱ्याचा आवाज होता . त्या ठिकाणी सजीवाचे कोणतेच लक्षण नव्हते . मनावर एक दडपण होते . तो अघोराचा समुद्र होता .

धप्पकन आवाज झाला मन्याचे छिन्न झालेले शरीर त्या समुद्रात कोसळले . इतक्या वेळ शांत असलेल्या त्या समुद्राने रौद्र रूप धारण करून , उंच उंच काळ्यापाण्याच्या लाटा उसळवून त्या पडलेल्या धडाचा स्वीकार केला .

त्यावेळी फक्त गणा जिवंत होता . मन्या , राम्या , शेवंता जॉन सारी भूतेच होती . शेवंता गण्याच्या शरीरातून बाहेर निघाली . गण्या च्या एका बाजूला राम्याचे आणि मन्याचे व दुसऱ्या बाजूला जॉन व शेवंताचे आत्मे होते . त्यांच्या समोर एक गोलसर काळपट आकार होता त्यातून आवाज येत होता

" बघ हा आत्मशक्तीसाठी व रक्ताच्यासाठी भुकेलेला समुद्र . शेवंता हा समुद्र म्हणजे मार्ग आहे आपल्या मिलनाचा , युगानुयुगे एकत्र राहण्याचा , त्यासाठी फक्त या साऱ्यांची आहुती द्यायची आहे ."

आणि त्या गोलसर काळपट आकारातून दोर बाहेर यावा तसे काहीतरी बाहेर येऊ लागले ..... व ते राम्या व मन्या यांच्या आत्म्याभोवती आवळले जाऊ लागले.

" या दोघांची पहिली आहूती.....

इतका वर्ष जॉन त्याच्या गुलामीत होता . त्याला त्या
' कुणाच्यातरी ' शक्तीची कमजोर नस कळलीच असणार...

त्याच वेळी जॉनने त्या गोलसर काळपट आकारावरती जलद चाल केली . त्या काळ्या , गोलाकार ढगातून चित्रविचित्र आवाज आले . शेवटी तो गोलसर काळपट आकार नष्ट झाला व खाली पडला एक हाडांचा सापळा . ज्याला कुठे कुठे मांस राहिले होते . एक भयानक दुर्गंधी पसरली .

" आपल्याला ह्याला नष्ट करायला पाहिजे "जॉन म्हणाला

" पण कसे " शेवंता

" कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात . तसेच शक्ती ही दोन प्रकारची असते , विचारही दोन प्रकारचे असतात .त्या दोन बाजू म्हणजे चांगले व वाईट , सुष्ट व दुष्ट , सकारात्मक व नकारात्मक , पवित्र व अपवित्र आणि मंगलमय व अमंगल . दोन्ही बाजूंना एकमेकांपासून धोका असतो . कारण ज्या ठिकाणी एक प्रबळ असते तिथे दुसरीला जागा नसते . किंबहुना जी बाजू प्रबळ असते ती दुसरीला संपवायचा किंवा आपल्या हद्दीतून घालावायचा प्रयत्न करत असते . आपल्या या सृष्टीमध्ये अनंत काळापासून मंगलमय , पवित्र शक्तीचा वास आहे व अपवित्र दुष्ट शक्ती त्या शक्तीच्या विरोधात कटकारस्थाने करून आपले स्थान प्रबळ व आपले वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करत आहे . मात्र नेहमी सत्याचा विजय होत आलेला आहे . यावेळी आपल्याला तेच करायचा आहे . ती मंगलमय , पवित्र शक्ती नक्कीच आपल्या मदतीला धावून येईल .

" पण नक्की करायचं काय ? "

" आपल्या पवित्र जे काही आहे ते याच्या वरती झोकून द्यायचं. म्हणजे तुम्हाला काही चांगल्या आठवणी असतील ,
पवित्र आठवणी असतील , पवित्र गोष्टी असतील , पवित्र विचार असतील , देवाचं नाव असेल . जे काही तुमच्यामध्ये चांगलं असेल , ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही केल्या असतील त्या साऱ्या काही आठवा . ते सारं काही मनात आणा , आणि ते सारं नष्ट कोणामुळे होणार आहे हेही मनात आणा . आपल्या सात्विक संतापाच्या विचार , सात्विक संतापाची अस्त्रं त्याच्यावरती झोकून द्या . "

जॉनला शेवंताचा प्रेम आठवलं . शेवंताला जॉन आठवला , तिच्या बाबांची तिच्यासाठी जी तळमळ आठवली , सदूकाकां व काकूंचे जीव्हाळा आठवला . अजुनही बऱ्याच गोष्टी आठवल्या . गण्याला त्याच्या मित्रांसोबतची दोस्ती आठवली. आई नव्हती पण आईची माया जाणवली . वडिलांनी त्याला आईची कमतरता कधीच भासू दिली नाही , त्यांनी त्याला मोठा केला . मित्रांनी प्रेम दिलं . सारं काही आठवलं. सगळ्यांनी चांगल्या गोष्टी आठवल्या . त्या गोष्टींचे , त्या विचारांचे अस्त्र बनवले नि फेकून दिले त्या पवित्र व मंगलमय दुष्ट शक्ती वरती आणि तेव्हाच नाश झाला त्या दुष्ट अमंगलमय अपवित्र शक्तीचा . तो हाडाचा सापळा हवेत विरून जाऊ लागला .
त्यांचा विजय झाला होता . विजय झाला होता पावित्र्याचा , मांगल्याचा , सकारात्मकतेचा . विजय झाला होता मानवी मनाचा , मानवी नात्यांचा , मानवी भावनांचा नि साऱ्या वरती विजय झाला होता मानवाचा .

तो हाडाचा सापळा नष्ट झाला . तिथेच एक आकृती अवतरली . बहुदा तोच आत्मा होता ज्याने हे सगळे कारस्थान केले होते .

" प्रताप तू " शेवंता म्हणाली

जॉन म्हणाला " तू याला ओळखतेस

" हो , हा माझा बालमित्र आहे .

" प्रताप तू केलंस हे सगळ पण का...?
..
.
. क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> " शेवंताssss ये ना ग्.. माझी लाडकी शेवंता " > Rofl Rofl

> इतका वर्ष जॉन त्याच्या गुलामीत होता . त्याला त्या
' कुणाच्यातरी ' शक्तीची कमजोर नस कळलीच असणार..> असं व्हेग नाही चालनार. कमजोर नस कोणती होती ते नीट स्पष्ट सांगायला पायजे.

धन्यवाद अॅमी .....
कमजोर नस म्हणाल तर
ती कमजोर होती म्हणून म्हणून तिला कमजोर नस म्हणतात...
Haa haa