काटेवाडी गावाला जत्रेची परंपरा जुनीच . फार वर्षापासून ही जत्रा होते . चार दिवस जत्रा चालते गावातील सर्व लोक तेथे जातात . गावातीलच नाही तर आजुबाजुच्या गावाचे तालुक्याचे सारेच लोक येथे येतात त्यामुळे जत्रा गर्दीत होते . जत्रेत वेगवेगळी दुकाने थाटली जातात उंच उंच पाळणे छोट्या छोट्या रेल्वे गाड्या तसेच लहान मुलांना आकर्षित करणारे वेगवेगळे घटक असतात. वेगवेगळ्या नाश्त्याची , ज्यूसची , प्रसादाची , चिरमूऱ्याची , धार्मिक पुस्तकांची नि कशाकशाची दुकाने जत्रेत लागतात . चार दिवस चालणाऱ्या या जत्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तमाशा ऑर्केस्ट्रा कुस्त्या आणि काय काय …..। मागच्या पाच सहा वर्षापासून पहिल्या दिवशी कुस्त्यांचे जंगी मैदान होते , दुसऱ्या दिवशी तमाशा होतो, तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा होतो , नि शेवटच्या दिवशी गाव-जेवन असते . या जत्रेच्या बहुरंगी कार्यक्रमात लोक आपले सुख दुःख विसरून आनंदाने सामील होतात . जत्रेतील सगळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी असाते मात्र खासकरून तमाशाला नि ऑर्केस्ट्राला जास्तच गर्दी असायची . लोक दोन-दोन तास आधी येऊन बसायचे पुढे बसण्यासाठी लोकांची भांडणे व्हायची .
आज ऑर्केस्ट्राचा दिवस होता आणि गण्या मन्या राम्या यशा आणि आबा राम्याच्या घरची मका करायला व्यस्त होते. मिशन वाल्याने उशीर केल्याने त्यांना ऑर्केस्ट्राला जायला उशीर होणार होता .
“ आईला राम्या तुला दुसरा दिवस घावला नाही का मका करायला “ मन्या वैतागून म्हणाला
“ नाहीतर काय आता कुठली मिळते आपल्याला पुढे जागा ” आबा मन्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला
“ असुद्या रे घ्या संभाळून आपलाच मित्र आहे तो त्याला मदत करायची नाही तर कोणाला मदत करायची ” गन्या राम्याची बाजू घेत सगळ्यांना म्हणाला . “ झाल आता ही शेवटचं पोतं टाकू या आणि पाच मिनिटात सगळं आवरून पारावर भेटूया “
काटेवाडी गावची दीड-दोन हजार लोकसंख्या असली तर निम्म्या लोकांहोऊन अधिक लोक वाड्या वस्त्यावरती राहायचे. हे पाच मित्र ही काटे वस्ती वरती रहायचे . गावापासून दूर दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणारी काटे वस्ती आणि तेथील हे पाच मित्र आज रात्री भलत्याच संकटात अडकणार होते . काटे वस्ती वरून गावात जायला तशी एकच वाट त्याच वाटेने लोकांची ये-जा चालायची मात्र त्या वाटेने चालत जायला अर्धा ते पाऊण तास लागायचा . या वाटेमुळे दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणारे गाव तीन ते साडेतीन किमी व्हायचे . तशी दुसरी एक वाट होती पण ती वाट दिवसा वापरायलाही लोक भ्यायचे त्या वाटेचे नाव होते पाद्र्याची वाट . पाद्र्याच्या वाटेबद्दल बऱ्याच अख्यायिका प्रसिद्ध होत्या . या आख्यायिका गावात फक्त दिवसाच आवडीने चगळल्या जायच्या मात्र कोणीही पट्टा त्या वाटेने जायला तयार नसायचा . गावातील प्रत्येकाचे स्पष्ट मत होते की त्या वाटेवर पाद्र्याचे भूत आहे . कोणी कोणी ते भूत पाहिले होते तर कोणी कोणी त्या भूताला अमावस्येच्या रात्री कंदील घेऊन फिरताना पाहिले होते . कोणी कोणी तर चक्क भुताचा आवाज हि ऐकला होता तो पादरी इंग्रजी माणूस असल्याने तो इंग्रजीत बोलत असणार हे साऱ्यांनी गृहीत धरून भूत हे इंग्रजी बोलत होते इंग्रजी गाणे म्हणत होते असे गावात पसरवले होते .
ठरल्याप्रमाणे पाचच मिनिटात आवरून गाण्या पारावर पोहोचला . बघतो तर अजून कोणच आले नव्हते त्यामुळे तो जाम वैतागला तो मन्याला हाक मारायला जाणार तेवढ्यात त्याला मन्या येताना दिसला .
“ आईला मन्या आधीच उशीर झाला आहे आणि हे अजून आले नाहीत आपल्या आपणच जायचं का का बोलवायला जाऊया त्यांना “ गाण्या मन्याला म्हणाला तेवढ्यातच उरलेले तिघे त्याला येताना दिसले त्यांना दोन चार शिव्या देऊन वक्तशीरपणाचे लेक्चर गण्याने उरकून टाकले
अगोदरच उशीर झाला असल्यामुळे गण्या म्हणाला की आता आपण पाद्र्याच्या वाटेने गावाकडे जायचे.
राम्या आणि मन्या तयार झाले मात्र यशा आणि आबा घाबरून लांबच्या वाटेने जाऊया असं कळकळीने गन्या राम्या आणि मन्याला सांगू लागले . गन्याला मागं बसनं अजिबात पसंत नव्हतं म्हणून जवळच्या वाटेने पटकन जाऊया असं त्याचं म्हणणं होतं . त्यावेळी आबाने पद्र्याच्या भुताची आठवण करून दिली त्याच बरोबर कंदील घेऊन फिरणाऱ्या पांडबाची भीतीसुद्धा आबाने गाण्याला दाखवली मात्र गन्या त्यांना घाबरणाऱ्यातला नव्हता . “ भागुबायांनो तुम्ही जावा लांबच्या वाटेने पण आम्ही पाद्र्याच्याच वाटंन जाणार “ असा टोला मारून गन्या राम्या आणि मन्या पाद्र्याच्या वाटेने निघाले .
या पाद्र्याची नि पाटलाच्या पोरी ची चमत्कारिक प्रेम कथा ही गावात फारच प्रसिद्ध होती . साधारणपणे सांगितलं जायची की ६० - ७० वर्षापूर्वीच्या काळात हे लफडं ( गाववाल्यांच्या भाषेत ) झालं .
पूर्वीच्या काळी ख्रिश्चन लोक धर्मप्रसारासाठी गावोगावी जात असत त्यासाठीच पाद्री गावात आला होता आणि त्याने ख्रिश्चन धर्म प्रसार सुरू केला होता . गावाच्या पाटलाची पोरगी की मुंबईला शिकून आलेली त्यामुळे बऱ्याच पुढारलेल्या विचारांची होती . तिचं नाव शेवंता होतं . शेवंता जर रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेला जायची. चर्च म्हणजे काही फार प्रशस्त व मोठा नव्हता . तिथल्या तिथे प्रार्थनेसाठी म्हणून छोटासा चर्च पाद्रीने बांधून घेतला होता . एरवीही वेळ मिळेल तेव्हा ती त्याला भेटायला जायची . चर्चमध्ये प्रार्थनेसाठी फार थोडे लोक जमायचे मात्र काही गोष्टी गावभर पसरावयच्यख असल्या तरी जास्त लोकांची गरज लागत नाही . जंगलात वनवा जसा पसरत असतो तशा या गोष्टी आगीसारख्या भरभर पसरत जातात . शेवंताच्या आणि पाद्रीच्या बाबतीत असेच झाले. लोक शेवंता च्या बाबतीत नाही नाही त्या गोष्टी बोलू लागले .
“ सर्वांदेखत पाद्री शेवंताच्या हाताचे मुके घेतोय असे मग सगळ्यांच्या डोळ्यामागं काय काय होत असेल देव जाणे “ लोक म्हणायचे . गावाला चगळायला एक चवदार विषय मिळाला होता . काही झालं तरी शेवंता पाटलाची पोरगी होती , मागं कोणीही कितीही वाईट वंगाळ बोललं तरी पाटलांसमोर बोलायची हिम्मत कुणाची नव्हती . मात्र अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाही एक दिवस ही गोष्ट पाटलाला कळालीच . तेव्हापासून म्हणे पाटलाने शेवंताला पाद्रीला भेटायची मनाई केली . पाद्रीलाही चांगलाच चोप दिला . मात्र शेवंताला हे सारं सहन न झाल्यामुळे तिनं चर्चा पुढे जाऊन फास घेतला.
पोरीन फास घेतल्यामुळे पाटील चांगलाच पिसाळला त्याने पाद्रीचा चर्चमध्येच खून घडवून आणला सारा गाव जो या लफड्याला नावं ठेवत होता तोच या दोघांसाठी हळहळून रडू लागला . पाटलाच्या नावानं खडे फोडू लागला . त्याला शिव्या घालू लागला . शेवंता आणि पाद्रीच्या प्रेमाला लैला-मजनू , हीर-रांझा, बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमाच्या उपमा देऊ लागला पाटील यांच्या दृष्टीने खलनायक झाला . पाटील खलनायक झाला खरा मात्र याच खलनायकाचा पाद्र्याच्या भुताने भयानक अंत केला . लोक म्हणू लागले पाटलाला चांगला धडा मिळाला मात्र त्याच बरोबर त्या वाटेवर जायलाही भिऊ लागले
या साऱ्या गोष्टींमुळे ज्या बाजूला छोटखाना चर्च होता त्या बाजूच्या या वाटेला पाद्र्याची वाट असे नाव पडले . आणि त्याच वाटेवरून गन्या मन्या आणि राम्या जायला निघाले होते.
दिवसाउजेडी माणसाने कितीही फुशारकी मारली की आपण कशाला भीत नाही भूत असो नाहीतर काहीही असो मात्र रात्री अंधार पडल्यावर साऱ्यांचीच बोलती बंद होते . गण्याने कितीही मोठ्या बाता मारल्या असल्या तरी त्याच्या अंतर्मनात कुठेतरी भीती आपले पाय पसरवत होती.
पाद्र्याची वाट ही काही वर्दळीची वाट नव्हत गाडीवाट असली तरी चाकाच्या 2 चाकोरीपुरतीच वाट राहिली होती बाकी सगळीकडे रानटी झाडे झुडपे माजली होती त्यामुळे जंगलात आल्यासारखं वाटत होतं . पायाखालचं वाळून गेलेलं गवत पाय पडल्यावर चुरचुर करत होतं . सुरुवातीला या जंगलात फिरताना राजेशाही असणारी त्यांची चाल थोड्याच वेळात दीनदुबळ्या माणसासारखी झाली. काही वेळाने शिकार शिकारीपासून जीव वाचवून पळण्यासाठी जशी धडपड करते त्याहून अधिक धडपड हे तिघे त्या जंगलातुन बाहेर पडण्यासाठी करू लागले . कुठेतरी कोल्हेकुई व्हायची आणि त्यांची काळीजं झटकन उडायची . मग काही काळ शांत जायचा पायाखाली असणाऱ्या गवताच्या चुरचुरी चा आवाज इतका भयानक वाटायचा की कानाचे पडदे फाटायचे . तरीही धीर करून ते चालले होते त्यांच्या मनात कुठेतरी लपून बसलेला विचार म्हणत होता की भुते वगैरे काही नसतात सारे भास असतात पण……….।
तो विचार किती खरा आणि किती खोटा या सार्यांपेक्षा सहीसलामत बाहेर जाणे अधिक महत्त्वाची होती इतकावेळ विचारांच्या तंद्रीत चालणाऱ्या भानावर येत मन्या व राम्याला हाका मारल्या त्याचा आवाज त्या निस्तब्ध जंगलात कुठच्या कुठे हरवून गेला. त्याच्या हाकेला उत्तर न आल्याने त्याने मागे वळुन बघीतले तर………….
तिथे कोणीच नव्हतं . तो एकटाच चालत होता …. कधीपासून …?केव्हापासून …? त्याला काहीच माहित नव्हत.त्याला काहीच कळत नव्हत . तो घाबरला. गुरासारखा ओरडत मान्या राम्या त्यांच्या नावाने हाका मारत सुटला . थोडाच वेळ पण थोड्या वेळानंतर तो ओरडला खूप ओरडला पण त्यालाही स्वतःचा आवाज ऐकू येईनासा झाला . त्या अघोरी जंगलाने त्याच्यावर ती कोणती करणी केली होती कोणास ठाऊक ….?
तो वेड्यासारखा धावत सुटला इकडून तिकडे तिकडून इकडे धाप लागेपर्यंत तोंडाला फेस येईपर्यंत तो धावतच होता पण तो कुठेच पोहोचत नव्हता फिरून फिरून एकाच जागी येत होता.
तो घाबरला खूप घाबरला मृत्यू दारावरती दिसल्यावर मृत्यूचा पाश जीवनवृक्षाचा रस संपूवू लागल्यावर सगळेच घाबरतात आणि हाच घाबरट पणा हीच हीच मूर्ती पासून ची भीती सामान्य माणसाकडून अचाट कामे करून घेते मृत्यूपूर्वीच असच बळ त्याच्या अंगी संचारला त्याला राग आला त्या जंगलाचा , त्या पाद्रीचा , त्याच्या प्रेमात पडणार्या शेवंताचा , दोघांच्या मिलनाचा अडथळा बनणाऱ्या पाटलाचा ही.
त्याच रागाच्या भरात त्यानं एक अचाट धाडस केलं .
जंगलातील वाळलेली लाकडं गोळा केली , पालापाचोळा गोळा केला , त्यांचा ढीग लावला आणि खिशात हात घातला पण आगपेटी नव्हतीच . तिथेच पडलेले दोन गारगोटीचे दगड घेतले आणि एकमेकांवर आपटणे सुरू केले . त्याला कशाचेच भान नव्हत एकाच गोष्टीवर त्याचं लक्ष होतं ती म्हणजे जंगल जाळायचं……। गारगोटीवर गारगोटी आपटता आपटता त्याच्या डाव्या हाताचा अंगठा ठेचून निघाला त्याच्यातून रक्त वाहू लागलं पण त्याला कशाची जाणीव नव्हती गारगोट्या संघर्ष वाढत होतं नि शेवटी त्यातून ठिणगी उडाली ती पाल्यावरती पडली आणि एकच भडका उडाला …..।
जाळ लागल्याबरोबर ओली वाळली सगळी लाकडे आगीच्या कचाट्यात येऊ लागली. त्याचबरोबर आजूबाजूचे वृक्ष-वेली सगळेच आगीने आपल्या बाहुपाशात आजूबाजूला घेतले . सगळीकडे नुसती आग झाली . आगीच्या ज्वाला त्याच्या शरीराला स्पर्श करू लागल्या आगीचा दाह आता प्रकर्षाने जाणवू लागला ….। हळूहळू तोही यज्ञामध्ये पडलेल्या आहुतीप्रमाणे अग्नी मध्ये जळू लागला . मृत्युलाही भीती वाटावी इतकी भयानक वेदना त्याला होऊ लागली पण वेळानंतर सारे काही शांत झाले .
त्याला काहीच कळेना तो कोठे होता तिथे काहीच नव्हते त्याला काहीच दिसत नव्हते त्याला काहीच जाणवत नव्हते फक्त मोकळं आणि हलकं जाणवत होतं हाच असतो का तो मृत्यू ज्याला आपण भित असतो पण यात भिण्यासारखं काहीच नाही…।
हळू हळू त्याला शीतल पाण्याच्या तुषारांचा गारवा जाणवू लागला आणि गारव्याबरोबरच अनेक आवाज त्याच्या कानात गर्दी करू लागले…..।
मन्या आणि राम्या त्याला उठवत होते . तो बेशुद्ध झाला होता हळूहळू त्याने डोळे उघडले त्याला जाणवले आपण जिवंत आहोत .
मग ते जंगल ती आग हे सगळं खोटं होतं का ? तेव्हाच त्याच्या हाताच्या अंगठ्याला असह्य वेदना झाल्या , हे सारं खरं होतं तर …? मग तो वाचला कसा ? कुणी वाचवलं ? पद्र्याच्या भुतानं यांना काहीच केलं नाही का ….?
तो एका झोपडीत होता . झोपडी यासाठीच म्हणायचं कारण ती लाकडाची होती पण एकदम आलिशान होती . तो एका लाकडी पलंगावर खोलीच्या एका बाजूला होता . त्याला लागूनच एक लाकडी कपाट होतं, त्याच्यावर अतिसुंदर वर्तुळाकार आरसा होता. त्यावरून खोलीतील दिव्याचा प्रकाश परावर्तित होऊन खोलीभर पसरला होता . खोली सुंदर सजवली होती .
“ आयला रम्या आपल्या काटेवाडीच्या जंगलात असला बंगला हाय ते आपल्याला कसे माहीत नव्हते रे “ गण्या शुद्धीवर येत म्हणाला. आम्हाला तर कुठे माहीत होतं तेवढ्यात समोरचं दार कुरकुरीत उघडू लागलं . तिघेही प्रतिक्षिप्त क्रिये मुळे भलतेच जास्त सावध होत आक्रमक पवित्र्यात आले.
“ अरे घाबरू नका मीच आहे “ एक इसम आत येत बोलला. राम्या व मान्या त्याच्याकडे बघत परिचयाचे हसले . “ तुम्ही आहात होय आम्हाला वाटलं ते पाद्र्याचं भूत आहे ” गणाच्या तोंडावर प्रश्नचिन्ह बघून राम्या म्हणाला त्यांनीच आपल्या सर्वांना वाचवलं आहे नाही तर आपलं राम नाम सत्य झालं असतं ..
गण्या उठून बसत म्हणाला “ कोण आपण ? “ क्षणभर विचार करून शांतपणे तो इसम म्हणाला ” मीच तो पाद्री “ तेव्हा तिघांचीही भीतीने गाळण उडाली. तिघेही भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागले . इतकावेळ मराठमोळा वाटणारा त्याचा वेश हळूहळू पालटू , लागला त्याच्याभोवती त्याला झाकून टाकणारे छोटे-छोटे काळसर ढग जमू लागले. मग दोन-तीन सेकंद तो पूर्ण अंधारात गडप झाला .
त्याच्यांंपुढील खुर्चीत बसत तो म्हणाला “ I am the Priest of this Church “ त्याचा पोषाख पुर्ण बदलला होता . पाद्री लोकं घालतात तसा पायघोळ झगा घातला होता . गळ्यात क्रूस होता आता तो एक इंग्रजी पादरी वाटत होता. त्याचं इंग्रजी तर यांची खात्रीच झाली की हेच त्याचं भूत . पुन्हा एकदा ते मृत्युच्या दाढेत अडकले होते . अशा गंभीर परिस्थितीतही राम्या त्याला म्हणाला की “ मग तुम्ही एवढं चांगलं मराठी कसं काय बोलू शकता ? “ हा प्रश्न ऐकून पादरी जो हसत सुटला तो थांबेचना . “ अरे मी भुत आहे आणि तसंही मला मरण या अगोदरच मराठी येत होतं “
मग गण्या म्हणाला “ आम्हाला मारलं कसं नाही “
“अरे काय रे भुतांना माणसाला त्रास देण्याशिवाय दुसरी कामे नसतात असं तुम्हाला वाटतं काय ”
“ नाही तसं नाही तुम्ही लई जणांना मारलं म्हणून म्हटलं “
“ मी फक्त पाटलाला मारलं कारण त्यान मला शेवंताशी लग्न करून दिले नाही म्हणून “
“ मग तिथंन पुढं. माणसं मरायला चालू झाली त्यांना कोणी मारले “
“ जंगलात चालते ती सारी पाटलाच्या भुताटकीची करामत आहे “
“ काय “ ते तिघेही चाटच पडले.
“ आतातर तुम्ही एक नमुना बघितला राम्याला झाडांनी व वेलींनी धरून स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला तरं मन्या जमीनी गिळण्याचा प्रयत्न केला आणि गण्याला आगीने आपले भक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला “
“ मग तुम्ही आम्हाला का वाचवलं ? “
“ मग काय मरू द्यायचं होतं की काय ? “
“ पण पाटील तर मेला आहे ना आणि त्याच भूत कुणी बघितलंय “
मी सगळं सुरुवातीपासून सांगतो काय झालं ते त्या पाद्रीने सांगायला सुरुवात केली ……
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी भल्याभल्यांना वेड करते . प्रेमासाठी माणूस काहीही करायला तयार होतो . माझेही शेवंता वरती प्रेम होतं . तिच्यासाठी मी काहीही करायला तयार होतो . अगदी काहीही म्हणून तर मुंबईमधील चांगली प्रोफेसरची नोकरी सोडून मी इथे आलो असतो . हो मी मूळचा पाद्री नाही आणि मी शेवंताच्या प्रेमात गावात आल्यावरती पडलेलो नाही . मी मुंबईत त्याच कॉलेजमध्ये शिकवायला होतो जिथे शेवंता शिकायला होती. तिथेच आमची ओळख झाली , ओळख मैत्रीत,आणि मैत्री प्रेमात बदलली . आम्ही दोघे एकमेकांवर खुप प्रेम करायचो .
एक दिवस मी तिला लग्नाची मागणी घातली . तिला अनपेक्षित नव्हते ,
ती म्हणाली मी तर केव्हाच तुझी झाली आहे पण….
पण काय मी म्हणालो
बाबा परवानगी देणार नाहीत
मी येईन त्यांची समजूत काढून
अरे जरी माझ्या प्रेमापोटी माझ्या बाबांनी परवानगी दिली तरी समाज हे स्वीकृत करणार नाही बाबा एकटे पडतील
पाद्री सांगत होता
मधेच राम्या म्हणाला मूर्ख मुलगी ..
या मुली अशाच असतात
त्यांना सांगायला पाहिजे
हमको मिटा सके ये जमाने में दम
नही हमसे जमाना खुद हे
जमाने से हम नही
तुमचं चालू द्या पुढे त्याच ब्रेकअप झाल्यापासून तो जरा पिसाळल्यासारखे करतोय मन्या आवेशाने उठलेल्या राम्याला बसवत म्हणाला
म्हणून मग मी ठरवलं तिच्याबरोबर गावात यायचं पण प्रोफेसर म्हणून आलो असतो तर कुणी ढुंकूनही पाहिलं नसतं त्यातून मला गाववाल्यांची ही सहानुभूती पाहिजे होती पाद्री झालं की machinery तर्फे खर्चही झाला असता धर्म प्रसारही झाला असता गाववाल्यांची सहानुभूतीही मिळाली असतील आणि माझं लग्नही झालं असतं
अरे वा एका दगडात चार पक्षी मारले की हो तुम्ही मन्या म्हणाला
बाकी काही होऊद्या अथवा न होऊ द्या पण लोकांची सहानुभूती तुमच्याकडेच आहे बरं का …
मन्या म्हनाला
पाद्री होऊन यायच्या ऐवजी लाल कपडे काळी टोपी वाले साहेब होऊन आला असता तर सगळं काम सोपं झालं असतं की …
गण्या म्हणाला
अरे एवढा मोठा नव्हतो रे मी पाद्री म्हणाला
तो पुढं सांगू लागला
असो गावात आलो नि तिचं आणि माझं भेटणं वाढलं . गावभर चर्चा चालू झाली म्हणलं ही योग्य वेळ आहे आत्ताच पाटलाला शेवंताची मागणी घालू पण झालं उलटंच .
मी मागणी घातल्यावर त्याने शेवंताचा बाहेर पडणं बंद केलं . माझ्या वरही दोन-तीन वेळा हल्ले केले . म्हणून मी दोन चार दिवस लपून बसलो . एक दिवस माझ्या कानावर आलं की शेवंताने चर्च पुढं फास घेतला म्हणून मी आलो . तर शेवंता गेलीच नव्हती . ती जिवंत होती तिला चर्चमध्ये डांबून ठेवलं होतं दुसऱ्या कुठल्यातरी पोरीचा पाटलाने अंतिम संस्कार केला होता आणि गावभर बातमी पसरवली की शेवंतान फास घेतला .
“ पण तसं का केलं त्यानं “ आम्ही विचारलं
अरे शेवंताने त्याचं नाक कापलं होतं ना..
मग मी आल्यावर तिच्या देखत माझा खून केला
अन तिचं काय झालं
त्यांनी तळघरात डांबून ठेवलं रे माझी शेवंता मी गेल्यावर सुद्धा यातना भोगत होती . आयुष्याचं वाटोळं झालं रे तिच्या कुणीतरी उमललेलं एखादं फूल गाडून टाकावे तसं तिच्या आयुष्याचं झालं . ती रडत होती माझ्या आठवणीत आणि मी काहीच करू शकत नव्हतो . कारण मी जिवंत नव्हतोच भूत होतो . तिला त्या अंधाऱ्या खोलीत त्रास भोगावा लागतोय पण मी काहीच करू शकत नव्हतो . मी हतबल होतो फक्त भटकत होतो तिच्या वेदना पाहत होतो , तिचे दुःख अनुभवत होतो , मला तिचं कौतुक वाटायचं की हा सारा की कसा सहन करू शकते पण ती…. तिने स्वतःला अजून त्रास करून घ्यायला चालू केलं.. तिने अन्न त्याग केला . तिचं शरीर हळूहळू क्षीण होऊ लागलं . मला तिचा मृत्यू दिसू लागला पण तरीही मी काहीच करू शकत नव्हतो . एक दिवस आला ती सदा सर्वदा साठी मुक्त झाली. आणि माझ्यातील क्रोधाने पाटलाचा अंत केला . शेवंता बिचारी स्वच्छ मनाची मृत्यू पावताच मुक्त झाली पण मी ..
मी अजूनही हा त्रास का बघतोय का ? का ? आणि कशासाठी ? त्या परमेश्वराला माझी दया का येत नाही ? का तो मला या बंधनातून मुक्त करत नाही ?
पादरी भावूक झाला होता त्याच्या डोळ्यातून आसवे वाहात होती कोणालाच कळेना की काय करायचं ?
पाद्रीला अश्रू अनावर झाले तो मुसमुसत रडू लागला .. त्याचं दुःख खरंच मोठं होतं . तो किती वर्षे असा भटकत होता काय माहित ? एवढ्या वर्षाचा एकांत ? कितीही मोठा गुन्हा असला तरी ही शिक्षा फारच मोठी होती . देव त्याला ही शिक्षा कोणत्या गुन्ह्यासाठी देत होता काय माहित ?
“ तुम्ही स्वतःला आवरा , याच्यावर ती काही ना काही उपाय असेलच “ गण्या म्हणाला
“ नाही मला शतकानु शतके असंच राहावं लागेल, नरक यातना म्हणतात त्या याच असाव्यात “ पादरी भावूक होऊन म्हणाला
“प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं ,या अडचणीतून ही काही ना काही मार्ग सापडेलच “गण्या म्हणाला
“ आहे एकच उपाय आहे “ पादरी म्हणाला
“ कोणता ? “ तिघेही एकदमच ओरडले.
“ मी हे कसं सांगू शकतो ? मी एवढा स्वार्थी कसा होऊ
शकतो ? “ पादरी मधूनच वेड्यासारखं बडबडू लागला
“ सांगा ना कोणता उपाय “ राम्या म्हणाला
“ अरे मी तुम्हाला कसा त्रास देऊ शकतो “
“आम्हाला सांगा , नक्की काय म्हणताय तुम्ही ? “
“ मी किती आंधळा झालो स्वहितासाठी दुसऱ्याच्या अन्हीत करायला निघालो !!’
“ अहो सांगा तरी एकदा कोणता उपाय आहे ?”
“ सांगतो माझ्यासाठी कोणत्याही जिवंत तीन व्यक्तींनी स्व इच्छेने दोन थेंब रक्त सांडलं तरच माझी मुक्तता होऊ शकते “
“ फक्त दोन-तीन थेंब रक्त आम्ही बाटली बाटली रक्त दान करतो “
“ तसं नाही पण माझ्यासाठी तुम्हाला उगाच त्रास कशाला “
“ आहो दोन-तीन थेंब रक्ताने तुमची मुक्तता होणार असेल तर ते काहीच नाही “
“ पण तुम्हाला एक मंत्र म्हणावा लागेल”
“ म्हणजे ओम फट स्वाहा यासारखा “
“ नाही नाही तसं नाही अगदी अंतर्मनातून म्हणा की हे मी माझ्या स्वतःच्या इच्छेने देत आहे”
“ इतकच अण्णा तो चाकू इकडं “ गण्याने चाकू घेत हाताला एक रेष मारली व त्यातून रक्त प्रवाह होऊ लागला
गण्या म्हणाला “ हे रक्त मी स्व इच्छेने देत आहे ”
मन्या आणि राम्याने ही तसेच केले दोन-तीन थेंब पडले तसे आसपासचं जग पाण्यात रंग विरघळावे तसे विरघळु लागलय . तो पादरी , तो चर्च किंवा बंगला त्यांचे मित्र आणि बाकी सारं विरघळून गेलंय . उरला फक्त अंधार ,घनदाट अंधार , काळा अंधार . काळोखात दूर कूठेतरी प्रकाशाची शलाका चमकली अंधकारात सर्वत्र पांढराशुभ्र प्रकाश पसरू लागला . बरोबरच एक मंद सुगंध आसमंतात भरून राहिला . त्या सुगंधा बरोबर एक सुकोमल मधुर आवाज , किती सुंदर ऐकवत राहवा असा आवाज . काही कळत नव्हतं तो आवाज काय पुकारतोय पण किती छान वाटत होतं ऐकायला . हळूहळू कळू लागलं
“ गणेश गणेश उठ नारे !
“ गणेश अरे गणेश….
गाण्याचं नाव एवढ्या चांगल्या प्रकारे पुकारलं जाऊ शकतं याचं गाण्याला अप्रुप वाटू लागलं. आणि भानावर येत डोळे उघडले . त्याच्या डोळ्यासमोर एक अत्यंत सुंदर स्त्रीचा चेहरा होता कशासारखा चेहरा चेहरा दिसतोय याचा विचार न करता , त्या चेहऱ्याची सुंदरता पाहण्यात त्यानं मन गुंतवलं . त्या मुखड्याचे सौंदर्य त्यांनं काळजात साठवून घेतलं . ती त्याला काहीतरी सांगत होती , ते त्याला काहीच कळत नसलं तरी तिच्या ओठांची होणारी हालचाल त्याला मोहक वाटत होती . बोलताना चेहऱ्यावर येणारे केसाची बट हळुवार पणे मागे सारणारी तिचे कोमल हात सारे काही सुंदर होते . तो सुंदरतेचा आस्वाद घेत होता
गण्याला आजूबाजूच्या परिसराची जाणीव झाली .त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते .तो एकटाच होता. तो त्या घरातही नव्हता. तो बाहेर होता . जंगलात आणि एकटाच .
पण तरीही त्याला भीती वाटत नव्हती एक वेगळीच सुरक्षिततेची भावना मनात होती. ती सुंदर मुलगी तिथे दिसत नव्हती . त्याने इकडे तिकडे पाहीले , पण ती कुठेच नव्हती. तेव्हाच आवाज आला....
" गणेश लक्ष देऊन ऐक तुझं नि तुझ्या मित्रांचं आयुष्य तुझ्या वरती अवलंबून आहे . तुला जर जगायचं असेल तर मी सांगते तसं कर....
" कोण , कोण ? आहात तुम्ही आणि कुठे आहात ...?
" ते सांगायला माझ्याकडे वेळ नाही . मी सांगत आहे तेवढं एक , नाही ऐकलं तर तुझा मृत्यू निश्चित आहे .
" हे जे तू पाहत आहे ते स्वप्न आहे .;जेव्हा तू जागा होशील तेव्हा त्याच घरात असशील .तुझ्या मित्रांना तुला शुद्धीवर आणावं लागेल . आणि जेवढं लवकर शक्य होईल त्या घरातून बाहेर पडावं लागेल . घरातून बाहेर पडताना तेथील भांड्यावर झाकण ठेवायला विसरू नको . आणि बाहेर पडल्या नंतर पिवळ्या कंदिलाच्या मागे जा .तो कंदील तुला जंगला बाहेर जाण्याची वाट दाखवील . जर तु घाइ केली नाहिस तर तुझा मृत्यू निश्चित आहे "
मृत्यू निश्चित आहे .... हेच वाक्य त्याच्या कानात मध्ये घुमत राहिले नि तो शुद्धीवर आला . एक भयानक दुर्गंधी त्याच्या सभोवताली भरून राहिली होती . कुजलेल्या मासाची . त्याला ठसका लागला . तो उठू लागला तसं त्याला चक्कर आल्यासारखं जाणवलं . त्याच्या हातातून संततधार लहानसा रक्तप्रवाह सुरूच होता . तो प्रवाह विचित्रपणे वाहत होता . हातातून ठिबकणारा रक्ताचा थेंब जमिनीवरती पडतच नव्हता . तो थेंब हवेतूनच वाहत जात , तिथेच ठेवलेल्या एका भांड्यामध्ये जमा होत होता , त्याने खिशातून रुमाल काढून हाता भोवती बांधला . मन्या व राम्या बेशुद्ध होते . त्यांच्या हातातून तो रक्तप्रवाह तसाच वाहत होता .
त्याने मन्याला व राम्याला उठवायचा प्रयत्न केला पण दोघेही शुद्धीवर येत नव्हते . त्याने पाण्यासाठी शोधाशोध सुरु केली तिथे कुठेच पाणी नव्हते . मग तो बाहेर गेला आणि त्याला पाण्याचे डबके सापडले . त्याने तेथील पाणी आणून त्याच्या तोंडावर शिंपडले आणि मन्या शुद्धीवर येत हलचाल करू . पण राम्या अजूनही बेशुद्ध होता .
" काय झालं गण्या एवढा कसं काय
भेलेला आहे ? " शुद्धीवर येत मन्या म्हणाला
गण्याने घडलेला सर्व वृत्तांत मन्याला सांगितला.
" म्हणजे पाद्री आपल्याशी खोटं बोलला की काय ..?
पण खोटं बोलून त्याला काय मिळणार आहे . मारायचं असतं तर त्याने आपल्याला तेव्हाच मारलं नसतं का .? " मन्या गण्याला म्हणाला.
" जरा तुझ्या हातात कडे बघ रक्त कसं उडत आहे . ही काही तरी बेकारच भुताटकी दिसत आहे . पटकन काहीतरी बांध हाताला ." गण्या म्हणाला
" हाताला बांधून काही उपयोग नाही गण्या . बघ जरा तुझ्या हातात कडे बांधलेल्या रुमालामधून सुद्धा रक्ताचे थेंब त्या भांड्याकडे जात आहेत ... .."
गण्याने हाताला रुमाल बांधून देखील त्या रूमलातुन रक्त ठिपकत होते व त्या भांड्याकडे जातच होते .जरी रूमलातुन रक्त ठिपकत होते तरीही त्या रुमालाला एक थेंबही रक्त लागलेले नव्हते . तो पांढरा शुभ्र होता .
आठव तिने अजून काहीतरी सांगितलं असेल . गण्याने आठवून पाहिलं तरीही त्याला काहीच आठवेना .
" काय सुद्धा आठवत नाही लागा ..."
तेव्हाच एक विचित्र आवाज तिथे घुमू लागला .
घुं ss घुंss ..... दोघांच्याही पोटात भीतीने गोळा आला . राम्या अजून बेशुद्धच होता . काहीतरी करायलाच पाहिजे होतं . मन्या तावातावाने त्या भांड्याकडे गेला . ते भांड त्याने आदळून आपटलं . ते काचेचं असल्याने तुकडे झाले आणि रक्ताचे शिंतोडे सर्वत्र उडाले . एका भयानक दुर्गंधीबरोबर एकाच वेळी कितीतरी जणांची रडल्याचे , ओरडण्याचे , प्राणांतिक किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले , आणि या साऱ्यांच्या पार्श्वभूमीला मघाशीचा घुं घुं घुत्कार होताच .
2 सेकंदात असं काहीतरी घडून गेलं की ते दोघालाही कळालं नाही . ते भांड होतं तिथेच होतं . तुकडे झालेलं भांडण पुन्हा जुळालं कसं? सर्वत्र उडालेले रक्ताचे शिंतोडे गायब झाले होते . ते रक्त आहे तसं भांड्यात जमा झालो होतं . घुं ss घुंss चा घुत्कार सोडला तर बाकी सारे आवाज बंद झाले होते . गण्याला व मण्याला अजून बऱ्याच ठिकाणी अजून जखमा झाल्या होत्या .
गण्या मधूनच ओरडला " आठवलं "
व त्याने तिथेच ठेवलेल्या झाकण भांड्यावर ती झाकून टाकले . तेव्हा त्यांच्या हातातून ठिबकणारे रक्त बंद झाले . कोणीतरी त्यांच्या शिकारीला आलं होतं घुंss घुंss चा आवाज कानाचे पडदे फाडत होता . त्यांनी दोघांनी राम्याला उचललं . ते पटकन घराबाहेर पडले . पण घरातून येताना राम्याच्या हाताचा धक्का लागून ते झाकण खाली पडले . मात्र त्या दोघांनाही ते कळालं नाही .
घरा बाहेर पडल्यानंतर त्यांना समोरच पिवळी मशाल दिसली त्या मशालीच्या मागे ते दोघेही निघाले . पण गन्या विसरला की त्याला कंदिलाच्या मागे जायचे होते जो उजव्या बाजूला थोड्या लांब अंतरावर होता
क्रमशः.....
Khup chaan aahe katha
Khup chaan aahe katha