कामथे काका (भाग १२ वा )

Submitted by मिरिंडा on 15 September, 2016 - 02:42

मांडवा बंदराच्या किनाऱ्यावरचा एक वैराण जंगली भाग. रात्री दोनचा सुमार. आत्ता पर्यंत शांतपणे आकाशात चमकणारा चंद्र मध्येच बावचळला असावा. त्याच्याभोवती झालेल्या ढगांच्या दाटीने तरी पाहणाऱ्यास तसेच वाटले असते. असल्या किनाऱ्यावर अशा अपरात्री कोण असणार? आणि कोण बसणार? तसं किनाऱ्याच्या ह्या भागाला जोडप्यांच्या प्रेमगुंजनाचं भाग्य क्वचितच लाभत होतं. त्याला कारण म्हणजे त्या भागाबद्दल उठलेल्या वावड्या. कोंकणंच ते..... रात्री म्हणे तिथे अमावास्येला भुतांची जत्रा भरते. आणि एरव्ही जवळ पासच्या स्मशानाच्या भीतीने तो भाग तसा शापितच झालेला होता. खरंतर जोडप्यांना न बसायला हेच कारण पुरेसं नव्हतं. तर दरवर्षी म्हणे एक तरी तरुण प्रणयात रंगलेल्या जोडप्याचा बळी त्या भागात जातो. आणि योगायोग असा की एकतरी जोडपं तिथेच आत्महत्या करायला येत असावं हे तिथे सापडणाऱ्या जोडप्यांच्या प्रेतांवरून वाटे. तटरक्षक दलाच्या सुरक्षा रक्षकांची तिथे गस्त मात्र असायची पण तीही अनियमित. एकटेपणाने तोही बिचारा गस्त घालायला भिऊन कंटाळायचा किंवा कंटाळून भ्यायचा की काय कोण जाणे. समुद्र किनाऱ्यावरचा वाराच तो. घूं घूं हूं हूं... ऽ करीत वाहत समोरच असलेल्या प्रिन्स जयसिंगजी महाराजांच्या हवेली कम बंगल्याच्या उघड्या खिडक्यांमधून तो मनसोक्त शिरत होता. आणि हवेलीला लागून असलेल्या ताडामाडाच्या जंगलात शिरून त्यांची डोस्की घुसळण्याचा त्याचा उद्योग अव्याहत चालू होता. असं हे रोजच व्हायचं. आजचं वर्णन करण्याचं कारण एवढंच होतं की अशा ह्या खट्याळ वाऱ्याने हवेलीच्या पाहिल्या माळ्यावरच्या राजेशाही दिवाणखान्यातल्या कोचावर अर्धवट झोपी गेलेल्या पेश्तूची झोप चाळवली गेली. त्याने अर्ध्याच तासापूर्वी लागलेल्या झोपेतून जागे होत अर्धवट उघड्या डोळ्यातून दिवाणखान्यावर एक नजर फिरवली. गेल्या जवळ जवळ आठ दहा दिवसांपासून नुसतेच पडलेल्या त्याला शेजारीच पडलेल्या त्याच्या बायकोचाही आता कंटाळा आलेला होता. मायदेशी असता तर आत्तापर्यंत त्याने निदान रोज एकातरी बाई बरोबर मजा केली असती. हट्टाने बरोबर आलेल्या बायकोचा त्याला खरंतर राग आला होता.

त्याला अचानक आपल्या निशाचरी साधनेची आठवण झाली. आल्या दिवसापासून तो रोज रात्री आपला खास ड्रम वाजवून आपण बरोबर आणलेल्या "व्हूडू डॉल " ची स्तुती करीत असे. आणि जमेल तसे तिला प्राणी मारून नैवेद्य दाखवीत असे. तर कधी काहीच मिळाले नाही तर स्वतःच्या हातातून एका लहान बाऊलमध्ये रक्त काढून तिला प्यायला देत असे. म्हणजे तो बाऊल तिच्या तोंडाजवळ नेऊन धरीत असे आणि प्रेमाने तिला पिण्याचा आग्रह करीत असे. नक्की काय जादू होती. कोण जाणे. पण बाऊलमधलं रक्त मात्र नाहीसं होत असे. त्याने उठल्या उठल्या स्वतःच्या आधी दोन तीन कानफटात मारून घेतल्या आणि डॉलची क्षमायाचना केली. आज हे असं घडलंच कसं?....... आपल्या अर्धवट उघड्या पिवळट रंगाच्या चपट्या डोळ्यातून पाहत तो रडू लागला. त्याच्या अगम्य भाषेत तो बोलू लागला. "ओईबोबो, लोआ, शवास्दी! शवास्दी! ऑव नॅन शेष्तू शेष्तू....... " म्हणजे अरे बापरे लोआ (हे त्याच्या व्हुडू डॉलचं नाव होतं)क्षमा कर. क्षमा कर. मी कसा विसरलो कोण जाणे " तरीही घोरणारी झो जागी झाली नाही. त्याची डॉल लोआ म्हणजे एक प्रकारचं वुजगावणंच होतं. पण एखाद्या प्रेताचे थंड भाव तिच्या चेहऱ्यावर होते. एक दोन अडीच फूट लांबीची गोलसर फुगीर चेहऱ्याची, जिचे डोळे टक्क उघडे असून त्रिकाला पलीकडे पाहत असल्यासारखा भास होत होता. तिच्या जिवणीला रक्ताचे डाग आणि काही पक्ष्यांची पिसे लागलेली होती. म्हणजे तिला खायला घातलेल्या पक्ष्यांची पिसे. तिच्या अंगात मानेपासून गळाबंद काळ्या रंगाचा झगा होता. त्यावर लाल रंगाचे मोठाले गोळे होते. तिचे डोळे मात्र पांढरे आणि बुबळं लाल होती. तिचे केस काटेरी तारांसारखे असून ते अँटिनासारखे उभे होते. त्यातल्या काही केसांचा डोक्यावर बो वांधला होता. एका देवदारासारख्या खोक्यात तिला बसवलेली होती. तिचे हात तिच्या शरीराला चिकटलेले होते. अंगातला झगा खालच्या बाजूला सगळीकडे थोडा थोडा फाटलेला होता. पाय पण एकमेकांना चिकटलेले होते अशा अवस्थेत ती खोक्यात बसवलेली होती. खोका महाराजांच्या एका शिसवी शोकेस मध्ये उभा ठेवलेला होता........ आता त्याने कोपऱ्यात उभा केलेला आपला खास मानवी कातड्याचा बनवून घेतलेला ड्र्म काढला आणि तो वाजवू लागला. "बम बम बम... ऽ म्म म्म म्म... ऽ बम बम बम...... " आवाजाने झो उठली. आणि करवादून म्हणाली," आत्ता आठवण आली वाटतं लोआची? इतका वेळ मुडद्यासारखा पडून होतास. कशाला हे काम घेतलस? कुणास ठाऊक? आपण आपल्या देशात होतो ते काय वाईट होतं का?..... झिनाश्ती झिनाश्ती " अशी शिवी देऊन ती त्याच्या प्रतिक्रीयेसाठी थांबली आणि तोंड वाकडं करून आत निघून गेली.पेश्तूने तिच्याकडे लक्ष न देता आपले वाजवणे चालूच ठेवले. मग थोडावेळ थांबून तो मंत्र पुटपुटू लागला.

" मशद्द, मशद्द, लोआ, लोआ, इनाशी इनाशी ऑव " म्हणजे लोआ आय लव यू मला सोडून जाऊ नकोस. असं म्हणून त्याने वेडेवाकडे हातवारे करीत नाचणं सुरू केलं. तो एक प्रकारच्या वेगळ्याच जगात गेला. समोरच्या वाहुलीच्या तोंडातून दोन चमकणारे सुळे बाहेर आले होते. नशा थोडी उतरल्यावर त्याला कळलं की तिला भूक लागली आहे. त्याने नाच थांबवला. आज त्याच्याकडे तिच्यासाठी कोणताही बळी नव्हता. हलकेच त्याने आपल्या खिशातून एक चकचकीत सुरी काढली. सुरीचे पाते लखकन चमकले. तिच्यापुढे गुडघे टेकून जवळच ठेवलेला काचेचा बाऊल जो याच कामासाठी असायचा, तो उचलला. सुरीने त्याने स्वतःच्या मनगटाच्या वर सपकन सुरी फिरवली आणि येणारे रक्त तो बाऊल मध्ये गोळा करू लागला. ते करताना तो काही तरी पुटपुटत होता. कदाचित तो आकडे मोजीत होता. तो पुन्हा ड्रम वाजवून नाचू लागला.....असल्या अघोरी वातावरणाला छेद देत कोचाच्या बाजूला ठेवलेला त्याचा मोबाईल किंचाळला. पण त्याला त्याची जाणीव झाली नाही. त्याने रक्त जमा केलेला बाऊल हातात घेतला आणि मायेने तो लोआच्या तोंडाजवळ नेऊन तिला आग्रह करीत तो पाजू लागला. काही सेकंदातच ते रक्त नाहीसे झाले. लोआचे तोंड रक्ताने लाल झाले. तिचे डोळे चमकले. तिचा आनंद पाहून पेश्तूलाही आनंद झाला आणि आनंदाने ओरडून तिला जागेवर बसवले. मोबाईलचा आवाज बंद झाला होता. तो समाधानाने आता झोपणार होता. आता त्याची लोआ उपाशी नव्हती. तो झोपायला वळणार एवढ्यात त्याचा मोबाईल किंचाळला. त्याने कपाळावर आठ्या आणून तो घेतला. ते दिवाणजी होते. " गुड नाइट पेश्तू साब (त्यांना गुड मॉर्निंग, गुड नाइट चा सेन्स नव्हता) " पेश्तूने कपाळावर हात मारला. आणि म्हणाला, " बिनाश्ता, जिग्वा(म्हणजे बिनडोक लेकाचा) वेस्टींग अ लॉट ऑफ टाइम, बास्टर्ड " दिवाणजींना काही कळलेच नाही, उत्तरादाखल ते फक्त म्हणाले, " थेंक्यू, पेश्तू साब, जल्दबाजी मत करना. " पेश्तू किंचाळला, "गीव्ह मनी यू लोफर. " दिवाणजींना मनी हा शब्द कळला आणि म्हणाले, " भेज राहा हूं " आणि फोन बंद झाला. पेश्तुने परत एक पेग मारला आणि लाईट मालवून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

हवेलीच्या मुख्य गेटजवळ उभा असलेला वॉचमन तेथे घुटमळणाऱ्या कोस्टल गार्ड जयराम शिंदेला हाकलीत होता. " चलता बन चल. यहां कोई नही. चल.! " असं म्हणून त्याने जयरामला जवळजवळ ढकललेच. जयराम शिंदे नुकताच कोस्टल गार्ड म्हणून भरती झाला होता. त्याला नवीन काहीतरी करण्याची खुमखुमी होती. तशात ड्रमचा येणारा आवाज ऐकूनच तर तो इथवर आला होता. त्याने ही गोष्ट वरिष्ठांना रिपोर्ट करण्याचे ठरवले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

मिटिंगचा दिवस उजाडला. सकाळचे अकरा वाजत होते. काका बाहेरच बसले होते. दादाच्या केबिनमध्ये सात आठ लोक होते. काकांना मीटिंग टाळण्याची फार इच्छा होती. पण त्यांना दादाने फोन करून आत बोलवून घेतले. ते निरीच्छेनेच पाय ओढीत आत गेले. साधनाच्या जवळिकीमुळे त्यांना सारखं इथून पळून जावंसं वाटत होतं. मनाच्या अर्धवट अवस्थेत ते आत शिरले. आत येताच काकांना किशा म्हणाला, " काकाजी, आज आपका मूड नही है शायद. " त्यांनी असं काही नसल्याचं मानेनेच उत्तर दिले. आजच्या मीटिंगलाही दोन तीन नवीन चेहरे होते. पण काकांना त्यात फार रस नव्हता. तो इंजिनियरसारखा दिसणारा माणूस पण हजर होता. त्याने काय माहिती आणली होती कुणास ठाऊक. मीटिंगला सुरुवात झाली. काकांनी त्यांनी आणि रमजानने मिळून केलेल्या कामाचा तपशील सादर केला. किशाने फक्त मान डोलवून त्याची पसंती दिली. मग मीटिंगच खऱ्या कामाला सुरुवात झाली. एरिकने (इंजिनियर सारखा दिसणारा) आठवड्यातून एकच दिवस रोकड मोठ्या बँकेत भरायला जात असल्याचे सांगितले. कधी कधी ती अंदाजे तीस चाळीस लाख असते असे सांगितले. याचा अर्थ नेहमीच असते असा होत नाही. असेही एरिक म्हणाला. बुधवार हा त्यांचा ठरलेला वार असतो. म्हणजे बँकेत शनिवारपर्यंत फारफार तर वीस एक लाख रोकड जमा होत असावी. कधी कधी रोकड नसेलही अशी शक्यता आहे. बँकेची सेफ उघडण्याचं काम रमजान आणि केशव त्याचा साथीदार यांच्यावर टाकण्यात आलं. त्यांनीही "वो तो आपून बराबर करेगा असं आश्वासन दिलं. " किशा म्हणाला, " मुझे इसमे कोई गलती नही चाहिये, और आजकल सायरनभी होते है, ये ध्यान मे रखो. " असे सांगून त्यांना त्यातील गांभीर्य समजावून दिले. मग शनिवार रात्री दहा वाजायच्या सुमारासच बँकेत शिरण्याचे ठरवले. काही माणसांनी, वॉचमन बँक बंद झाल्यावर सात साडे सातच्या सुमारास परत एकदा आतली सगळी सुरक्षितता तपासून घेतो. मग मॅनेजर आणि रोखपाल यांच्या उपस्थितीत त्यांच्या सह्या असलेली सिले लावून कुलुपे बंद करतो व परत आत येत नाही. सील पुढचा दरवाजा आणि मागचा दरवाजा या कुलुपांवरच असते. परंतु खिडक्यांनाही आतून कुलपं लावण्याची सोय केलेली आहे असेही सांगितले. दोन वॉचमन सारखे मागे व पुढे फिरत असतात. ते रात्रभर फिरतात. मग शुक्रवार रात्रीपासूनच दादा आणि त्याची माणसं आजींच्या फ्लॅटवर राहतील असे ठरले. लागणारी हत्यारे गॅस कटरसहीत आदल्या रात्रीपासूनच नेऊन ठेवण्याचे ठरले. गॅस कटरचा उपयोग रमजान आणि केशव लॉकर उघडण्यात अयशस्वी झाले तरच करण्याचे ठरले.

तेवढयात एक म्हातारासा माणूस उभा राहून म्हणाला " दादा, मेरेकू तो लगता है रोकडसे भी लॉकरमेसे सोना निकालेंगे तो अच्छा रहेगा. सोनेको जगाभी कम लगती है. जो बझारमे नूर देखकर बेचभी सकते है. और रोकडका कही नंबर लिखा रहेगा तो वांधा होगा. " सगळेच थोडावेळ चूप बसले. बुढ्याला मूर्खात काढत काही जण म्हणाले, "अरे चाचा, दिमाग खराब हो गया क्या? सोना बेचने कौन जायेगा बाहर. "..... काही मिनिटे स्तब्धतेत गेली. मग दादा म्हणाला, " अपना विठालाल है ना, वो सब करेगा" अजून काकांनी विठालाल नावाच्या पात्राला पाहिले नव्हते. तो अर्थातच तिथे हजर नव्हता. अकड्याची माणसं चर्चेत फारशी भाग घेत नव्हती. विरारची खाडी त्या मानाने आत पर्यंत जाण्यासारखी नव्हती. दादाला बऱ्याच लोकांनी समजावून सांगितले होते. त्यांना चिंता होती म्हातारीच्या मढ्याची म्हातारीचं मढं आता फुगत चाललं होतं. दहा बारा दिवस होऊन गेले होते. काही ठिकाणी, काळजी घेऊनही, उंदरांनी कुरतडलेलं होतं. तसंही म्हातारीच्या अंगावर फारसं मांस नव्हतं, म्हणून ती उंदरांनाही आवडली नसावी. तरी बरं बर्फाच्या लाद्यांमध्ये ते ठेवलं होतं म्हणून. त्याला स्लॅब फोडण्याचीही काळजी होती. बाकी दरोड्याच्या बाबतीत ते त्यांच्या पद्धतीने सहकार्य करणार असावेत.

आता काकांनी टी. व्ही. वर सांगितलेली बातमी दादाला सांगितली. ती ऐकून तो म्हणाला, " स्साला, एकेक अडचनही पैदा हो रही है. अब क्या करेंग? " त्याने उपायासाठी सूर्याकडे पाहिलं. सूर्या म्हणाला, " मशीन की आवाज नही है तो ठीक है. अकडा अपना काम इतनाही करेगा की एक हातोडीसे वो स्लॅब टूट जायगी. ये मशीनका मुझे इतना भरोसेका लगता नही है. "..... मग किशा म्हणाला, " अरे लेकीन वोही करनेको बाहरी आवाजकी जरूरत है. और काकाजी, बरसात मे पानी तो इकट्ठा होता होगा ना? वो निकालना तो पडेगा के नही. आप रहने दो. अपना एरिक जाके मुआयना करके आयेगा वो भी कलके कल. "...... थोडा वेळ थांबून तो म्हणाला, " जो बोला है वो जल्दीसे जल्दी करना होगा. और मै अब जो बोल राहा हूं वो ध्यान से सुनो....... अपून सब मिलके और हिरा छोडके आठ लोग रहेंगे. दो जन गाडीमे रहेंगे बाकी छे लोग मेरे साथ बूढीके फ्लॅटमे आयेंगे. पूरा काम रात के दो बजे तक होना चाहिये. सब लोग जानवर का नकाब लगाके काम करेंगे. आवाज कोई भी नही करेगा. अगले शनिवार को यहाँ फिरसे मीटिंग होगी. अगर कोई प्लान के मुताबिक काम नही करेगा तो उसको उधरहीच खलास करेगा. काकाको साथमे आनेकी जरूरत नही है. वो दूसरे दिन आके पूरी लूटका हिसाब लगाएगा. " सूर्याला काकांच्या बाबतीत जे सांगितलं ते आवडलं नाही. पण त काही बोलला नाही. मीटिंग बरखास्त झाली. सूर्या केबीन बाहेर घाईघाईने आला. बाहेर त्याने एक माणूस बोलावला होता. त्याचे नाव होतं काण्या चित्ता. काण्याला काका आधीच दाखवले होते. त्याच्या हातात नोटा कोंबत तो दबक्या आवाजात म्हणाला, "देख, ये बूढा कब, कहां जाता है क्या क्या करता है और किस किससे मिलता है इसकी रिपोर्ट मुझे हर दिन चाहिये. वो भी फोनसे. मुझसे मिलना नही. समझे. किसीको शक नही आना चाहिये. चल निकल तेरी ड्यूटी अभीसे चालू होती है " असं म्हणून तो केबीन मध्ये परत आला. सगळेच मग एकेक करून निघाले. काकाही निघाले.

काका घरी गेले. नीता काहीतरी वाचीत बसली होती. उद्या रविवार होता. निदान उद्यापुरता तरी बँक चॅप्टर क्लोज होता. त्यांनी गेल्या गेल्या श्रेयाला उचलून घेतलं. ते नीताला म्हणाले, " चल मी हिला बाहेर घेऊन जातो. ते ऐकून नीता म्हणाली, "आत्ता? जेमतेम चार वाजतायत. पावसाळी हवा असली तरी ही वेळ फिरण्याची नाही. " मग त्यांनी श्रेयाला खाली ठेवलं आणि ते कपडे बदलायला गेले. चहा घेऊन ते गॅलरीत उभे राहिले. उद्या आपण काय करणार आहोत? त्यांनी स्वतःला विचारले. साधनाकडे तर ते जाऊन आले होते. सोमवारशिवाय बँकेबाबत काही विचार करण्याची आपल्याला गरज नाही. मग त्यांना एक विचित्र शंका आली. दरवेळेला दादा आपल्याला त्याच्या कोणत्याही धंद्यांपासून बाजूला का ठेवतो. आतासुद्धा त्याने दरोड्याच्या दिवशी त्यांना बरोबर न घेण्याचं ठरवलं होतं. दादाचा आपल्याबाबत नक्की विचार काय आहे? ते अंदाज बांधू लागले. का तो आपल्याला काही काम नसताना पगार देतोय? एक मात्र त्यांना आश्चर्य वाटलं, की दादाने आणखीन दोन बँकांमध्ये त्यांना पाठवून वेगवेगळ्या नावांनी खाती सुरू केली होती. त्यांचा उपयोग त्याला काय आहे त्यांना कळेना. असं तर नाही? येणारा दोन नंबरचा पैसा त्यांच्या त्या खात्यांमध्ये तो थेट तर मागवीत नसेल? त्यांची शंका बरोबर होती. फक्त तो ते पैसे थेट मागवीत नव्हता तर कुणाला तरी सांगून त्यांच्या खात्यांमध्ये भरीत होता. तेही त्यांच्या नकळत. हा अंदाज मात्र त्यांना आता आला नव्हता. दादाचा विश्वास सूर्यावर कमी होता. पण काकांना तर तो त्याचा उजवा हात वाटत होता. असो. काकांच्या सहकारी बँकेच्या खात्यात जवळ जवळ लाखाच्यावर थोडी शिल्लक जमली होती. त्या मानाने कमी कालावधीत हे सगळं झालं होतं. त्यांच्या मनात आलं हेच पैसे घेऊन आपण आत्त्ताच पळून गेलो तर? साधनाचा विचार करूच नये. पण लाख सव्वालाख रुपये असे किती दिवस त्यांना पुरणार होते? या विचारांनी ते विचलित झाले. मग त्यांना अचानक दादाने पुढच्या शनिवारी मीटिंग ठेवल्याचं आठवलं. तेव्हा तो काय ठरवणार? तसंच असल्या सहकारी बँकेत तीस चाळीस लाखाची रोकड दर आठवड्याला कशी काय जमत असेल? कुठे तरी गफलत आहे. दादाला ही हे माहीत असावं. दादाने इतर बँका सोडून हीच बँक का निवडली. दुसरा तर काही हेतू नाही? त्यांची बुद्धी फार चालेना. मग ते दमले आणि चहाचा कप आत नेऊन ठेवून आजचा पेपर उघडून वाचीत सोफ्यावर बसले. अजूनही पाच वाजून गेले नव्हते. पावसाची काळोखी पसरली होती. होती.

इकडे दादाच्या ऑफिसमध्ये सूर्या, अकडा त्याचे त्याच इतर सहकारी यांचा खल चालू होता. सूर्या म्हणाला, " दादा ये बँक लूटनेकी क्या जरूरत है? हमेशाकी तऱ्हा अपना धंदा मस्त चल राहा है..... " थोडा वेळ जाऊन देऊन दादा म्हणाला, " चालू धंदोमे पुरी जिंदगी काटनेका इरादा है क्या? दिनबदिन पुलिस सख्त हो रही है. अपने खबरी भी अब शाणे बन गये है. अब रंडीके धंदेमे भी पहले जैसा नही राहा. गुड्डी बोल राहा था श्रीपतरायसे बचके रहना. अपना धंदा हडपनेकी कोशिश कर राहा है. मै सिर्फ उसे रंगेहाथ पकडना चाहता हूं. अब बडा हाथ मारना होगा...... " काही वेळ कोणीच काही बोलले नाही. मग सूर्या म्हणाला, " बडा हाथ मारके चूप बैठेगा क्या? पुलिस चूप बैठने देगी? " दादाने वेळीच विषय बदलला.. " कलतक एरिक क्या करता है देखते है, फिर सोचेंगे...... मग अकड्याकडे वळून म्हणाला, "तुम ये बूढीका एक दो दिनमे फायनल करो. तुम्हे क्या तकलीफ है विरारकी खाडीमे फेकनेमे? बह जायेगी तो अच्छा है, इतना बूढीसे प्यार हुआ होगा तो घर ले जा. " बाकीचे बेतानेच हसले. अकडा मात्र दबकत म्हणाला, " सोच राहा हूं मुंब्राकी खाडीमे फेक आऊ उसमे नजदीक जाके फेक सकता है. " वैतागून दादा म्हणाला, " तेरा दिमाग हमेशा घास खाता है. जो बोला वही करना" असं जरी तो बोलला असला तरी दहा पंधरा मिनिटं स्तब्ध वसल्यावर त्याला एक गमतीदार कल्पना सुचली. त्याने ती बाकीच्यांना सांगितली. ते एकदम चमकले. पण त्यासाठी अजून पुढच्या शनिवार पर्यंत म्हातारीला खालच्या भुयारात ठेवणं भाग होतं...... दादा जागेवरून उठणार तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. " तू बडा आराम फर्मा राहा है? पंधरा नंबरका क्या किया भोसडिके? देख मै जलदीही छूटनेवाला हूं. तेरेको बोलके मैने गलती किया "...... फोन बंद झाला. दादाला शिवी देणारा त्याच्या टक्करचा असावा किंवा त्याचा बाप तरी. दादाला बोलण्याची त्याने संधीच दिली नाही. दादा गंभीर झाला. त्याने पुढच्या प्लानसाठी काकांना बोलवण्याचे ठरवले. तो योग्य संधीचा विचार करू लागला. रात्रीचे दहा वाजत असावेत. त्याला एकदम गुड्डीची आठवण झाली. त्याने सूर्याला बरोबर घेण्याचे ठरवले. बाहेरच्या हॉलमध्ये काम करीत असलेल्या सूर्याला त्याने बरोबर चलण्याचा इशारा केला. ते दोघे गाडीत जाऊन बसले. गाडी फॉकलंडरोड नाक्याकडे निघाली.

हॉटेल डिलाइट आज खच्चून भरलं होतं. सर्वच टेबलं स्त्री पुरुषांनी बहरली होती. प्रत्येक टेबलावरील दिव्याच्या मंद प्रकाशात त्यांचे अर्धवट उजळलेले, अर्धवट अंधारलेले चेहरे आणि टाचक्या टिचक्या कपड्यातून दिसणारी अर्धी उघडी शरीरे कोणत्याही छाया प्रकाशाच्या खेळापेक्ष कमी नव्हती. म्हंटलं तर दिसत होतं, म्हंटलं तर दिसत नव्हतं अशा वातावरणात येणाऱ्या वेगवेगळ्या विक्षिप्त वासांना जिवंतपणा आला होता. दादाची गाडी हॉटेलसमोर थांबली. पण नेहमीप्रमाणे हात जोडीत श्रीपतराय आतून आला नाही. तो गिऱ्हाईकांची खबर घेत असावा. किंवा तो दादा आल्याचे समजूनही न समजल्यासारखे करीत असावा असे दादाला वाटले. आलेली सणक दादाने दाबली. त्याच्या मनात आलं 'दो टकेका चायवाला भैया स्साला'. पण तो काही न बोलता सूर्याला घेऊन मधली गर्दी बाजूला सारीत आत शिरून तडक पहिल्या माळ्यावरच्या गुड्डीच्या ऑफिसकडे निघाला...... गुड्डी आरामात बसून ब्लू फिल्म पाहत पुढ्यातली बियर रिचवीत होता. त्या दोघांना आत शिरलेले पाहून तो चांगलाच गडबडला. फिल्म बंद करण्याचा खटाटोप करीत तो स्वतःला सावरू लागला. त्याची लगबग पाहून दादा चिडला..... "काम करता भी है कभी?, चल श्रीपतको बुलाव, मेरा जिकर नही करना. " गुड्डीने घाईघाईने श्रीपतला फोन लावला.

गिऱ्हाइकी पाहण्यात मग्न असलेल्या श्रीपतने येतो म्हंटले. त्याला अंदाज आलाच होता. तो काही विचारणार तेवढ्यात गुड्डीने फोन बंद केला. तसाही दादाने आणलेला आणि कौतुक केलेला, त्याच्यावर नजर ठेवणारा बायलट त्याला आवडत नव्हता. त्याला गुड्डीचा राग आला. गेल्याबरोबर गुड्डीला त्याने फैलावर घेण्याचे ठरवले. पैशातला कट देऊनही शेवटी तो उलटला होता..... दादा म्हणाला, " स्साला तुम लोगोंको बहोत छूट दी मैने...... " दादासाठी ड्रिंक बनविणाऱ्या गुड्डीला आता काही तरी भयंकर होणार असं वाटू लागलं. थरथरतच त्याने ग्लास समोर ठेवले. दादा ग्लास तोंडाला लावणार तेवढ्यात हलता दरवाजा लोटून श्रीपतराय आत येत गुड्डीला म्हणाला, "अरे यार, कायकू बुलाया? गिऱ्हाईक छोडके आना पडा ना. और....... " पुढे तो काही बोलणार तेवढ्यात त्याची नजर दादाकडे गेली. का कोण जाणे त्याला पाहून तो थोडा बावचळला. त्याला अशी अपेक्षा होतीच पण ती खरच खरी निघेल इतकी खात्री त्याला नव्हती. खरतर गुड्डीचा फोन आल्यावर त्याने ते ओळखायला पाहिजे होतं, पण बेफिकिरीमुळे तो गाफील राहिला. कपाळावर जमणारा हलकासा घाम खांद्यावरील फडक्याने पुशीत तो तसाच उभा राहिला. दादाने सणकून विचारले, " क्यूं श्रीपत फिरसे रास्तेपे चाय बेचना चाहता है क्या? कीडेकी अवलाद साली. " आणि तो बाजूला पचकन थुंकला. त्याच्या अंगावर धावून कानफटीत भडकावीत तो ओरडला, " हमे गुमराह करने लगा क्या? साले भडवे. " श्रीपतने वेदनेने गाल धरून ठेवला. त्याला गुड्डीने चुगली केल्याचे जाणवले. गुड्डीला खुन्नस देत तो म्हणाला, " कैसी बात करते हो दादा, ऐसा कभी होगा क्या? ".... दादा खुर्ची मागे ढकलीत म्हणाला, "अपनीही रंडियोंसे यहाँ बैठनेका पैसा लेते हो तुम? वो साली क्या धंदा करेगी, और क्या हमे देगी? भोसडिके भाडखाऊ! " असे म्हणून त्याने श्रीपतची कॉलर धरली आणि आपला दुसरा हात वर करीत तो पुन्हा त्याला मारणार तेवढ्यात दाराबाहेरील हालचाल पाहून तो ओरडला, " कौन है उधर?..... " सूर्याने चटकन पिस्तुल काढून हातात धरले. हलणारा दरवाजा हळूच उघडला. पेरियरच्या टोळीतले दोघेजण हातातली पिस्तुले दादावर रोखत आत शिरले आणि म्हणाले, " आज से ये धंदा पेरियरका है, श्रीपतसे खरीद लिया है समझे. " फसवलं गेल्याच्या जाणिवेने लाल पिवळा होत दादाने आणि सूर्याने आत शिरलेल्या दोघांवर झडप घातली. आणि पिस्तुल धरलेले हात पिरगळले. दादाने एकाच्या पोटात इतक्या जोरात लाथ मारली की त्याला उलटी झाली.

दुसऱ्याच्या तोंडावर सूर्याने फाइट मारून त्याचा गळा एका हाताने इतका आवळला की तो गुदमरल्यामुळे खाली कोसळला. मग दादाने श्रीपतला पेरियरला फोन लावण्यास सांगितले. श्रीपतने थरथरत्या हाताने पेरियरला फोन लावला आणि दादाच्या हातात दिला. दादा म्हणाला, " तूने क्या नया धंदा चालू किया क्या, आदमी फोडनेका? तेरेकू क्या लगा? तु ये धंदा खाके डकार देगा और हम कुछ नही करेंगे? " त्याला मध्येच तोडीत पेरियर म्हणाला, " ए शाणे शाणा बन. तेरा श्रीपतही आया था मेरे पास भीक मांगने. गद्दारोंकी टोली है तेरी, जो तूने मेरे आदमीयोंके साथ किया ना उसकी तो तू कीमत चुकाएगा मांके..... " आणि फोन बंद झाला. सूर्या म्हणाला, "दादा इन दोनोंका क्या करे? " दादाने थोडा विचार करून सांगितले, "अभी तो अपने पास टाइम कम है, गुड्डीको बादमे देख लेंगे फिलहाल श्रीपत को लेके जाते है. " हे ऐकल्यावर श्रीपत घाबरून म्हणाला, " मै अब किधरभी नही जायेगा. " दादा चिडून म्हणाला, " तू क्या, तेरा बापभी जायेगा" सूर्याला खूण करून तो म्हणाला, " चल इसको लेके गाडीमे जाके बैठ. मेरेको गुड्डीके साथ बात करनी है. " सूर्याने श्रीपतचे केस पकडले आणि ओढत म्हणाला, " चल ए, हरामी, पाव उठा तेरे, पावमे क्या शिशा भरा है क्या?....... " तरीही तो प्रतिकार करीत राहिला. मग सूर्याने पिस्तुल काढून रोखले. म्हणाला, " अब भी नही चलेगा? "आता, मात्र कुरबुरत का होईना तो चालू लागला. ते गेल्यावर दादा म्हणाला, " गुड्डी अब ये होटल तेरेकोही देखना है. जो गलती श्रीपातने की वो अब तू नही करना. और मेरेको एक लाख रुपिया जुर्माना अभी के अभी देनेका. "...... घाबरून गुड्डी म्हणाला, "लेकीन दादा इसका गलती की शुरुवात तो अभी कई दिनोसे हुई है, आप जरा सोचके जुर्माना लगाईये, वरना मै तो बर्बाद हो जांउंगा. " दादा म्हणाला, " वो मै कुछ नही जानता, सजा सजा होती है. जिंदा छोड राहा हूं. सोल्याकोभी नही बुला राहा हूं, समझे चल चल पैसा निकाल. "........ "दादा थोडी मोहलत तो देदो, अभी इतना पैसा तो मेरे पास नही है. " जा कौंटरसे लेले या कहीसे भी ले. " दादा हटत नाही असे पाहून तो गेला. कुठून कोणास ठाऊक पण त्याने एक लाखाची रोकड पैदा केली. आणि दादाला दिली. मग दादा रोकड घेऊन गाडीत जाऊन बसला. खरतर त्याला आज नवीन आलेल्या पोरीचं उद्घाटन करायला बोलावले होते. तिकडे मावशीला फोन करून त्याने उद्या येण्याचे आश्वासन दिले. गाडी पुन्हा सूर्याच्या ऑफिसकडे निघाली. ऑफिसमध पोचल्या पोचल्या त्याने श्रीपतला एक लाथ घातली आणि सोल्याला फोन केला. "सोल्या, कल रातको आ जाना बीस हजार का काम है "..... सोल्याचे रेट ठरलेले होते. नुसती दहशत आणि एखाद दोन बोटांची चटणी असेल तर वीस हजार. अवयव सोलायचा असेल तर पन्नास हजार. चेहरा सोलायचा असेल तर एक लाख आणि हे सर्व करून मारायचे असेल तर पाच लाख. दादाने गुड्डीकडून पैसे उगाचच घेतले नव्हते. सध्या श्रीपतला वीस हजाराची शिक्षाच पुरेशी आहे हे तो जाणून होता. श्रीपतला मात्र माहीत नव्हते, हा सोल्या कोण आणि तो काय करणार, त्यामुळे तो सूर्या आणि दादाला शिव्या देण्यात मागे पुढे पाहत नव्हता.

काका पेपर वाचता वाचता सोफ्यावर आडवे झाले. सोफ्यावर झोपलेलं नीताला आवडत नाही हे, ते केव्हाच विसरले. झोपेची पेंग एवढी होती की नियम आणि आवड निवड यांचा विचार करायला शरीर तयार नव्हतं. नीताच्या लक्षात आलं की ते सोफ्यावर झोपल्येत, पण ती काहीच बोलली नाही. हल्ली ती का नरमली होती कोण जाणे. कदाचित तिरस्कार आणि तक्रार करायला ती कंटाळली असावी किंवा तिने त्यांना खरंच स्वीकारलं असावं. असो. पंधरावीस मिनिटांनी काका उठून बसले. खडबडून जागे झाले ते एका स्वप्नाने. स्वप्नात त्यांना एक बोळ वजा अंधारी गल्ली दिसली. तिथेच कुणाला तरी बांधलेलं दिसलं. कोण होतं कोणास ठाऊक, पण त्या माणसाचे हात रक्ताळलेले होते. तो जिवंत होता. इतकेच, मग रघुमल नुसताच दिसला. आणि ते जागे झाले. स्वप्नाचा अर्थ लावणं त्यांना कठीण गेलं. प्रथम त्यांनी अपराध्या सारखं इकडे तिकडे पाहिलं. नीता तिथे नव्हती. म्हणजे नीताने पाहिलं नाही तर. ते स्वतःशीच पुटपुटले. मग फ्रेश झाले. आणि नीताला चहा करताना पाहून त्यांना बरं वाटलं. आज काल नीता थोडी थोडी रोहिणी सारखी वागत होती. निदान जेवण खाण चहापाणी वगैरेच्या बाबतीत तरी. पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आता तर श्रेयाला घेऊन बाहेर जाणं कठीणच होतं. मग ते तिच्याबरोबर घरातच खेळू लागले. मध्येच चहा झाला. त्यांना अचानक स्वस्थ वाटलं. श्रेयाशी खेळणं, नीताचं बरं वागणं आणि दरोडा, दादा, सूर्या यांचा त्यांना तात्पुरता पडणारा विसर, यांनी ते हरखून गेले. हीच घडी कायम राहिली तर काय बहार येईल. काळ पुढे सरकूच नये. उद्या उजाडूच नये. म्हणजे रवी वार उजाडला नाही तर पुढचे वार उजाडणं बंद होईल. या नुसत्या कल्पनेनेच त्यांना उत्साह संचारला. अचानक त्यांच्यात झालेला बदल पाहून नीताला पण आश्चर्य वाटलं. तिच्या मनात आ लं, यांना एवढा कशाचा आनंद झालाय कोणास ठाऊक?..... काहीही असो, दोघांनाही आपापल्या परीने बरं वाटत होतं, हे काय कमी होतं? आज रमेश नऊ वाजेपर्यंत आला. आठच्या आसपास नीताने त्यां ना वाढून देऊ का असंही विचारलं. त्यांना एकद म बरं वाटलं. पण ते नाही म्हणाले. नीतातला बदल त्यांना उत्साहवर्धक वाटला. आपली अचानक रोहिणीसारखी काळजी तिला वाटलेली पाहून

त्यांना हलके वाटू लागले. तेवढ्यात त्यांच्या खिशातला फोन फुरफुरला. त्यांनी रिंगटोन मुद्दामच लावला नव्हता. म्हणजे येणारे कॉल कोणालाही जाणवणार नाहीत. फोन दादाचा होता. " काकाजी, कल रात आपके लिये एक मीटिंग रखी है आपको आना है. कल इतवार है सूर्याभी नही रहेगा. कितने बजे आनेका और कहां मिलनेका, ये मै बादमे बताउंगा. " फोन बंद झाला.

आपल्यावर दादाचा जास्त विश्वास असावा असं त्यांना वाटू लागलं. आजचा दिवस वेगळाच लागलाय की काय त्यांना कळेना. कशाबद्दल मीटिंग घेणार आहे हा? की जिथे सूर्या नाही. मग कोण कोण असणार आहे? पुन्हा एकदा ते ढवळले गेले. त्यांना रविवार नको होता तोही सोमवार सहित. पण झालं काय? रविवार आता शनिवारही बरबाद करू पाहत होता. ते झाकाळले. अजूनही त्यांना हे माहीत नव्हतं, की त्यांच्यावर सूर्याने पाळत ठेवली आहे. ते कळलं असतं तर ते मारायला घेतलेल्या कोंबडी सारखे फडफडले असते. रमेश आला.

ते सगळेच जेवायला बसले. जेवणात एकप्रकारचा उत्साह होता. जेवताना मोकळं बोलणं बऱ्याच वर्षांनी होत होतं. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे काकांचं आयुष्य जेव्हा फॉर्मात होतं, तेव्हा असा आनंद येत होता. बोलता बोलता रमेश म्हणाला, "बहुतेक माझं व्हिसाचं काम पुढच्या आठवड्यात होईल. म्हणजे लवकरच जाणं होईल. कंपनीचंच काम असल्याने फारसा प्रश्न येणार नाही. मग या महिन्याच्या शेवटी जाणं होईल" मग काकांनी विचारले, " साधारण किती दिवसांसाठी जावं लागेल? "...... "बहुतेक एक दोन महिन्यांसाठी". नीताचा चेहरा काळजीने दाटला. ते पाहून काका म्हणाले, "अगं मी आहे ना, मी करीन बरीचशी कामं. " अर्थातच तिचं समाधान झालं नाही. मग काकांचं लक्ष नाही असं पाहून आपण नंतर बोलू अशी रमेशने तिला खूण केली. काकांनी रात्र कशीतरी ढकलली. उद्याची मीटिंग उगाचच त्यांना दबाव आणू लागली.........

रविवार असाच गेला. ते सगळेच बाहेर जेवायला गेले. विशेष म्हणजे काकांनाही घेऊन गेले होते. जेवताना काकांना जरा भरून आलं. आज रोहिणी असती तर......? या विचाराने ते हेलावले. रमेशच्या लक्षात आलं. पण त्याने त्या गोष्टीला महत्त्व दिले नाही. उगाचच इमोशनल सीन नको. संध्याकाळच्या सुमाराला ते घरी आले. अजून दादाचा फोन नव्हता. त्यांनी हॉलमध्ये जाऊन रमेशला सांगण्याचे ठरवले. ते आतल्या खोलीत शिरणार तेवढ्यात त्यांच्या खिशातला फोन फुरफुरला. दादाचा आवाज आला, " काकाजी आप एक काम करो आप होटल डिलाइटमे आईये, गुड्डीके रुममे मै बैठा हूं. "....... फोन बंद झाला. रात्रीचे नऊ वाजत होते. या वेळी रमेशला काय सांगावं? त्यांना योग्य कारण दिसेना. मग ते नेहमीप्रमाणे अस्वस्थ मनःस्थितीत आत गेले. आणि उगाचच इकडे तिकडे करू लागले. रमेशला लक्षात आलं असावं, त्याने त्यांच्याकडे पाहून प्रश्नार्थक भुवया उडवल्या. त्यांना बोलायचं असेल हे ओळखून तो बाहेर आला. काका म्हणाले, "अरे, माझ्या मित्राची तब्येत जरा बिघडली आहे, त्याच्या मुलीचा फोन होता. मला जावं लागेल. मुलगी एकटीच असते, मी आज तिकडेच राहीन आणि तिकडूनच कामावर जाईन" त्यांनी मुद्दामच कपडे घालायला सुरुवात केली. म्हणजे त्याने हरकत घ्यायला नको. तरी तो म्हणालाच, " कोण हा मित्र? मी पहिल्यांदाच ऐकतोय. " मग ते घाईघाईने म्हणाले, " मागे पण मी एकदा गेलो होतो, नीताला माहिती आहे"

खोटं बोलण्याचं त्यांना एकदम टेन्शन आलं. त्याची नजर चुकवीत ते जुजबी कपडे गोळा करू लागले. तरी रमेश म्हणालाच, "नीताला माहिती आहे, म्हणजे कोण मित्र ते नाही आणि तसंही तुम्ही ठरवलंच आहे तर परवानगी घेण्याचं हे नाटक तरी कशाला? " बोलण्याला वेगळं वळण लागलेलं पाहून ते घाबरले. मग चाचरत, आवाजात खोटी नम्रता आणीत म्हणाले, "ठीक आहे तुझं काही काम असेल तर नाही जात, त्याला जमणार नाही म्हणून सांगतो " त्यांच्या तोंडावर आलेली निराशा आणि आता या वेळेला त्याला वाद नको होता, म्हणून तो म्हणाला, "जा तुम्ही, पण तुमच्या वागण्यात लपवाछपवी वाटत्ये, हे नक्की. " असं म्हणून तो आत गेला. जणू काही त्याची परवानगी मिळाली असं समजूनच ते निघाले. घराच्या परिसरातून बाहेर जाईपर्यंत त्यांची छाती धडकत राहिली. हळूहळू त्यांनी स्वतःला स्थिर केलं. आणि टॅक्सीला हात केला. रात्री नऊ सव्वा नऊच्या सुमारास वयस्कर माणूस हॉटेल डिलाइटला जातोय म्हंटल्यावर टॅक्सीवाला पाहत राहिला.

मग काका जरा कडक आवाजात म्हणाले, "अरे चल ना भाऊ, आता तुला काय वेगळ्या भाषेत सांगायला पाह्यजे का? "....... ते आत बसल्यावर तो म्हणाला, " राग मानू नका साहेब पण तुमच्यासारखा सभ्य माणूस यावेळेला तिकडं म्हणजे....... " काका म्हणाले, " बस! जास्त बोलू नकोस. " गाडी निघाली. रात्रीच्या मुंबईची चमचमणारी हवा अंगावर घेत काका निघाले. काकांच्या मागे काही अंतरावर आणखी एक टॅक्सी येत होती. त्यात काकांच्या पाळतीवर सूर्याने ठेवलेला माणूस बसला होता. काकांना याची जरादेखील कल्पना नव्हती..... हॉटेलच्या जवळच टॅक्सी थांबली. काका उतरले. रस्ता या वेळेलाही त्याला साजेश्या गर्दीने फुलला होता. हॉटेल पासून थोड्या अंतरावर दुसरी टॅक्सीही थांबली. हॉटेल नेहमीप्रमाणे ज्या कारणासाठी होते त्या कारणाने फुल झाले होते. मंद आणि मद्यधुंद वातावरणात काका शिरले. इथे येताना बाई बरोबर असायलाच हवी असा जणू अलिखित नियमच होता. म्हणून काकांना आल्या आल्या वेटरने तुमच्या बरोबर कोणी कसे नाही, हे विचारले. पण दादाचं नाव म्हणजे परवलीचा शब्द असल्याने त्यांना तो नियम लागू झाला नाही. पण सुरक्षिततेची खात्री व्हावी म्हणून हॉटेल मधील एका माणसाने त्यांच्या अंगावर हात फिरवून पाहिला आणि त्यांना सोडले. त्यांना गुड्डी कुठे बसतो हे माहीत असल्याने ते तडक त्याच्या केबिनचं दार ढकलून आत शिरले. आत दादाही बसला होता. काकांना त्याने बसण्याची खूण केली. पाच दहा मिनिटं कोणीच काही बोललं नाही. मग दादा म्हणाला, " चलिये, "....... दादा आणि काका हॉटेलच्या भटारखान्यातून इमारतीच्या मागच्या भागात आले. अतिशय घाणेरडा भाग होता तो. सगळीकडे पावसाने डबकी साचलेली होती. आणि अनेक दिवसांचा कचरा कुजण्याची घाण येत होती. तिथेच काही लोक भट्टीवर काम करीत होते. ती दादाने लावलेली दारूची भट्टी होती. तो दिसताच तिथल्या कामगारांनी एखादा मसीहा दिसावा तसा त्याला आणि काकांना लवून सलाम केला. त्यांच्या अंगावर कधी न बदललेल्या कपड्यांसारखे कुजट्ट घाण मारणारे कपडे होते. एकूण वातावरण पाहून एखाद्याला मळमळ सुटली असती. अपुऱ्या प्रकाशात पाय जपून ठेवत काका दादाच्या मागून जात होते. एका बंद खोलीचा दरवाजा दादाने उघडला आत एक टेबल आणि चार पाच खुर्च्या होत्या. मंद पिवळ्या प्रकाशात खुर्च्यांच्या रंगापेक्षा त्यांच्या अवस्थे कडे काकांचे लक्ष गेले. टेबलाजवळच्या एका खुर्चीत दादा बसला, मग त्याच्या समोर काका बसले. दरवाज्या लागला. दादाचा एक माणूस बाहेर थांबला होता. जो कोणालाही आत येऊन देणार नव्हता. थोडा वेळ काकांना देऊन दादा म्हणाला, "आपके लिये ये सब माहौल अच्छा नही है. मै जानता हूं. फिरभी आप इन चीजोंपर ध्यान मत देना. मै जो बोल राहा हूं, वो ध्यानसे सुनना. और याद भी रखना. " पुन्हा त्याने थोडा वेळ जाऊन दिला. काकांवर तो कोणता बॉंब टाकणार होता कोण जाणे. काका जरा घाबरले. ते पाहून तो म्हणाला, " आप डरना नही. होशियारीसे सब करोगे तो राज करोगे. एक बार आपका डर निकल गया तो सब आसान है. दुनियामे डरकी वजहसे अच्छे अच्छे लोग पीछे रह जाते है. " पुन्हा त्याने थोडा वेळ जाऊन देऊन त्यांची उत्सुकता ताणली. ते म्हणाले, "आप आगे तो कहिये "

"देखिये आपका और मेरा पासपोर्ट, एक नये नामसे तय्यार कर लिया है. और वैसेही दो विझा भी बनाये है. ये बैंक का काम होतेही आपको मै सूचित कर दूंगा. आप तुरंतही मेरा नरिमन पोइंट पर एक फ्लैट है वहां जाओगे. उधर एक लोकरमे मैने आपका विझा और पासपोर्ट पूरे प्लान के साथ एक पोकेटमे रखा हुवा मिलेगा. एक घोडाभी रखा है. घोडा समझते है ना आप(त्याने मध्येच विचारले त्याला काका हो म्हणाले). एक विझा दुबई का होगा और दूसरा कैनडाका होगा. बैंक का काम होनेके बाद तुरंत आप लूटका माल साथ लेकर वहॉ जाकर वहांके लोकरमे रखा हुआ बंद पोकेट लेकर मालके साथ आपके खरीदी हुई रुमपर लेके रखना है. आपको और पैसे मै दे दूंगा उससे आपको एक थाने या कल्यान साईडके देहातमे रुम खरीदनी पडेगी. ये काम आपको आनेवाले हफ्तेमेही सबसे पहले करना है. " मग थोडा वेळ थांबला. त्यांची प्रतिक्रिया अजमावण्यासा ठी त्याने त्यांच्याकडे पाहिले., मग तो म्हणाला, " ये आपको कैसा लगता है? "... न राहवून काका म्हणाले, "लेकीन दादा ये सब आपने कैसे किया? मुझे थोडी तो आयडिया देते "....... तो म्हणाला, " उसपर आप नूक्स निकालते, इसलिये कहां नही. और आपके सब सवाल मै खतम करनेवाला हूं, वो भी आजही, अभी. ".......... त्याने दारावर हाताने वाजवले. आणि किलकिल्या दरवाजातून ड्रिंक मागवले. तो पर्यंत तो सिगरेट ओढू लागला. काही मिनिटातच एक लांडा दरवाजा उघडून आत ड्रिंकचा ट्रे घेऊन आत शिरला. त्यात काकांसाठी थंड पेय्यही होते. दार लावून लांडा गेल्यावर दादा म्हणाला, " आप अभी प्लान सुनो. तो माल रुममे छिपाने के बाद आपको ऐसे शख्ससे मिलना है जिसका बाप बनकर आप कैनडा जायेंगे, नये नामपर. पैसे सब दिये हुवे है. उस लडके से जाकर मिलना है इसलिये की आपकी उससे जान पहचान हो वो भी आपको जाने की उसका नया बाप कौन है. मै बैंकका काम पूरा करते ही कैनडा जा राहा हूं. आपको यहॉ रहकर लूट का माल दुबई जाकर मेरे बैंक खातेसे मुझे कैनडाके बैंकमे ट्रान्स्फर करना है. इसलिये आपको दुबई का विजा भी दिया जायेगा. आपको कोंटेक्ट करना मेरा काम है. और कभी कितना पैसा भेजना है ये बताउंगा. लेकीन एक बात याद रखना, सूर्यासे बचके रहना. वो आपको बिलकुल नही चाहता. इसलिये तो आपको घोडा दे राहा हूं. बाकी स्टेज तो तय्यार किया है अभी आपको अपना किरदार निभाना है. जरा भी गलती बहोत महंगी पडेगी आपको और मुझेभी. अब आप को क्या डाउट है बताइए. प्लान मे जो भी खाली चिजे रह गयी है वो आपको अपनी होशियारीसे पूरी करनी है. अगले हफ्ते वक्त देखकर आपके नये लडके का नाम और पता बता दूंगा. उसे जाके मिल लीजिये "....... तो काकांच्या अनुमती साठी थांबला. काकाना या अशिक्षित माणसाच्या डोक्या चं आश्चर्य वाटलं. आपली बुद्धी नेहमी चाकोरीच्या बाहेर विचार करीत नाही हे त्यांना जाणवलं. पुढे काय बोलावं त्यांना कळेना. त्यांना शंकांपेक्षा भीती जा स्त वाटत होती.

मग चाचरत काका म्हणाले, " दादा इतना सब मेरेसे कैसे होगा? मैने ऐसा कभी कियाही नही. "

ते मनापासून बोलत होते. मग दादा म्हणाला, " वैसे भी आप किसीके पकडमे आये न आये सूर्याके पकडमे जरूर आयेंगे. जरा सोचिये.

आप जेल काटके आये है, आपको खुदके नामसे पासपोर्ट थोडाही मिलने वाला है? और विझाभी. दूसरी बात, बहोत ज्यादा पैसा तो आपको कभी नही मिल सकता. जरा सोचके बताइए. ऐसे मौके बारबार नही आते. एक बार पैसा हाथ आया तो आप शादीभी कर सकते है. आप रंडीके पास जानेवाले तो लगते नही..... वैसे बूरा कया है? पुलिसको अभीतक आपका कोई शक नही आया है. मैने आपको इसलिये तो मेरे धंदोंसे दूर रखा था. सही बताउं तो आप जैसे साधारण लोगही ये कर सकते है बिना किसिको शक आये. "....... त्यांच्या उत्तराची अपेक्षा करीत त्याने वेळ घालवला. काका काही बोलणार एवढ्यात त्याला कसलासा संशय आला की कोणीतरी त्या खोलीच्या भोवती खिडकी खाली उभं आहे, त्याने काकांना गप्प राहण्याची खूण केली. हातात पिस्तूल धरून त्याने मग हळूच खिडकी उघडली. अंधुक चंद्रप्रकाशात त्याला कुठलीशी सावली हलल्याचा भास झाला. त्याने आता दरवाज्याजवळ सरकत हळुच दरवाजा किलकिला केला. बाहेर भट्टीवरचे कामगार दिसत होते. त्याने त्यातल्या एकाला हलक्या शिटीसारखा आवाज करून बोलावले. तर मघाचचाच लांडा होता. त्याच्या कानात त्याने काहीतरी सांगितले. आणि तो परत खिडकीजवळ आला. आता ती सावली दूर जाताना दिसली. त्याने अंदाजानेच गोळी झाडली. त्या आकृतीला ती लागली असावी. मग मात्र ती आकृती जिवाच्या आकांताने पळत मागच्याच गटारांच्या गल्लीतून पळताना दिसली. ज्या लांड्याला सांगितलं होतं तो त्याचा पाठलाग करीत होता. तो होता सूर्याने पाठवलेला माणूस. पायाला गोळी चाटून गेलेली असल्याने पाय दाबून धरीत हॉटेल पासून दूर अंतरावर जाऊन त्याने टॅक्सी पकडली, आणि तो पळाला.

काकांना ह्या सगळ्या चोरट्या गोष्टी करण्याचा कंटाळा आला होता. ते एकूण या सगळ्यातून बाहेर पडायची संधी पाहत होते. पण आपण फारसे काही न करता यात गुंतले आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. आता आपल्याला दादाबरोबरच बॅटिंग करणं भाग आहे. तो म्हणाला की रन काढायची. भीती आणि अनिश्चितता यांनी त्यांचे खांदे खाली झुकले, थोडी फार थरथर सुटली. पण त्यावर ताबा आणीत ते म्हणाले, " दादा, मै पूरी कोशिश करूंगा "........ दादाने त्यांची घालमेल ओळखली असावी. तो म्हणाला, " मै समझ सकता हूं, अंदर आनेसे पहले आपकी जिंदगी एकदम सीधी थी. लेकीन अब जीना है तो ऐसेही चलना पडेगा. जरा सोचिये, आपके सर्कल के लोग आपको जीने देते थे? जो भी हुवा उसके साथ?...... नही ना? अभी आप जादा सोचिये मत, उपरवाला उसीका साथ देता है जो जिगर दिखाता है. "....... काकांना या बोलण्याने जरा धीर आला. ते थोडे स्वस्थ झालेले पाहून तो म्हणाला, " आप कल आरामसे जब चाहे ओफिस आ सकते है, फिर भी तीन बजेसे पहले मत आना. श्रीपतसे दो प्यारकी बाते करनी है. " याचा संदर्भ काकांना लागेना. ते पाहून तो म्हणाला, " छोड दिजिये. आप इस प्लान पर सोचिये, अगर आपको कुछ नया मोड सूझता है तो जरूर बताइये. अरे आप ड्रिंक तो लिजिये. "

......... त्यांनी पेय्य संपवलं. तशी तो म्हणाला, " अभी आप निकलिये" मग त्याने दरवाजा उघडून मगाशी आलेल्या लांड्याला त्यांना टॅक्सी पाहून देण्यास सांगितले. काका टॅक्सीत बसले खरे, पण कुठे जायचं हे नक्की नसल्याने त्यांनी प्रथम साधनाला फोन लावला. अकरा वाजत होते. ती झोपली असेलच असे समजून ते जरा शरमले. पण फोन लावल्यावर कसली शरम? साधनाने फोन घेतला. आवाज ओळखून ती म्हणाली, " बोला, आत्ताच अंथरूणावर पडल्ये. " ते पडलेल्या आवाजात म्हणाले, " मी आजची रात्र तुझ्याकडे राहिलो तर चालेल का? सध्या मी बाहेरच आहे. " थोडा वेळ थांबून ती म्हणाली, " ठीक आहे, या" फोन बंद झाला. तिला आवडलय की नाही याची काळजी करीत ते तिच्या बिल्डिंगजवळ पोहोचले. आजूबाजूला पाहत ते साधनाच्या फ्लॅट जवळ पोचले. बेल दाबल्या दाबल्याच दरवाजा उघडला गेला. ती आज मॅक्सी मध्ये होती. येणारी जांभई हाताने दाबीत ती म्हणाली, " एवढ्या रात्री? " दार लावीत ते म्हणाले, " सॉरी, मी आज तुला काही गोष्टी सांगणार आहे. आता कोणालातरी सांगावं असं वाटायला लागलंय. पण त्या आधी एक सांग तू ताबडतोब दार कसं उघडलंस? " ती

म्हणाली, " सोना आत्ताच झोपल्ये, ती उठू नये म्हणून मी इथेच बसून होते. " असं म्हणून ती आत जाऊ लागली. तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत विचार करू लागले. हिला सगळं सांगणार म्हणजे नक्की किती आणि काय सांगणार? आता बोललोय म्हणजे काहीतरी सांगणं भाग आहे. आपण पण असं विचार न करता कसं काय बोललो. त्यांना जरा अस्वस्थता आली. नाहीतरी बोलायला आहे तरी कोण? रमेश? नीता?

बाहेर येत साधना म्हणाली, " अरे तुम्ही अजून इथेच आहात? आज कपडे आणले नाहीत का? " काकांना तिच्या नवऱ्याचा नाइट ड्रेस दाखवीत ती म्हणाली, "पाहा हा चालेल का? " ते थोडेसे घुटमळले. तिने त्यांची चलबिचल ओळखली आणि म्हणाली, " माझ्याकडे दुसरे पुरुषी कपडे असणं कठीण आहे. "....... मग ते विचार करून म्हणाले, " ठीक आहे " तो नाइट ड्रेस घेऊन ते आतल्या खोलीत गेले आणि घालून बाहेर आले. त्यांना तो थोड्या फार फरकाने फिट बसला. ते पाहून तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काकांना वाटलं होतं, ती काहीतरी बोलेल. त्यांना मात्र साधनाच्या नवऱ्याचे डोळे विस्फारल्या सारखे उगाचच दिसले. त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांच्या साठी तिने खाली गादी घातली होती. त्यांच्या मनात आलं मगे एवढी जवळीक झालेली आहे मग हा दुरावा का? पण ते काहीच न बोलता अंथरूणावर पडले.

तिच्याही मनात यांना आपण बेडवरच झोपायला सांगायला हवं होतं का? असे आले. पण तीही काही बोलली नाही. लाइट बंद करून झाल्यावर ती म्हणाली, "तुम्ही काहीतरी सांगणार होतात ना? " ते विचार करीतच होते. हिला काय सांगावं? आपण दादासाठी काम करतो.

सूर्या वकील नाही, आणि पुढच्या आठवड्यात बँकेवर दरोडा पडणार आहे, रमेश कॅनडाला जाणार आहे, आपला देशाबाहेर जाण्याच प्लान, यातलं नक्की काय सांगाव? कुठून सुरुवात करायची. आपण आत होतो तेव्हापासून? प्रश्नांच्या गोतावळ्यात ते हरवले. ते बोलत नाहीत असे पाहून ती म्हणाली, " जाऊ द्या, तुम्हाला नसेल सांगायचं किंवा सांगण्यासारखं नसेल तर नका सांगू. " असं म्हंटलं की समोरचा माणूस सामान्या असेल त नक्की सांगतो. आणि काका सामान्यच होते. मनाची भरलेली टाकी ब्लॅडर सारखी दाबत होती. आणखी किती दिवस लपवून ठेवणार? त्यांच्या मनात आलं. बॅड इज टु बी अडव्हर्टाइज्ड. म्हणजे मदत मिळते. मग त्यांनी उठून लाइट लावला. तिच्या जवळ ते बेडवर बसले. आणि अथ पासून इति पर्यंत त्यांनी दरोडा आणि त्यांचं जाणं सोडून सर्वकाही सांगितले. ती क्षणाक्षणाला स्तंभित होत गेली. काकांची झोप तर गेलीच होती, त्यांनी तिचीही झोप घालवली असावी असं वाटून ते म्हणाले, " सॉरी, तुला डिस्टर्ब केलं........ " पुढचे बोलणे त्यांनी अर्धवट सोडले. सगळं ऐकून ती काहीच बोलली नाही. तेव्हा काका न राहवून म्हणाले, " तू... तुला यावर काहीच बोलायचं नाही? " एक सुस्कारा सोडत ती म्हणाली, " माझ्या आयुष्यात सरळ असं कोणी येतच नाही. मला वाटलं होतं दिवस बरे येतील. आपल्याला आधार सापडला. इथे तुम्हालाच माझा आधार पाह्यजे. " थोडावेळ थांबून ती म्हणाली, " जाऊ द्या झोपू या आपण. " लाइट बंद झाला काका त्यांच्या अंथरूणावर पडले. ती या सगळ्याचा काय विचार करीत असेल, या विचारानेच त्यांना झोप येईना........

बराच वेळ गेल्यावर तिने अंधारातून प्रश्न फेकला, " तुम्ही नरेश गडाच्या कामाला नाही का म्हणालात? निदान असलं धोकादायक वातावरण तरी नाही तिथे. ".... उत्तराची ताबडतोब अपेक्षा असल्याने तिने त्यांना झोपलात का? असं विचारलं. त्यावर ते " मला त्याचा ऍप्रोच आवडला नाही. "....... " हो, पण मी सांभाळून घेतलं असतं की, तसं मी म्हंटलं ही होतं. " आता ते काहीच बोलले नाहीत. भूतकाळातले निर्णय बदलू शकत नाही त्याच्या मनात आलं. आणि ज्या मार्गावर जायचं त्यावर तो आपोआप येतो हेच खरं. त्यांचं मन त्यांना कुरतडू लागलं. मग त्यांनी विचार केला, आहे त्या परिस्थितीचा विचार आपण केला पाहिजे. बाकीचे विचार ओसरल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. ती अजूनही जागी आहे का? त्यांनी मनात प्रश्न विचारला. मग पाणी पिण्याच्या निमित्ताने त्यांनी परत एकदा लाइट लावला. पण तिचे डोळे मिटलेले होते. पाणी पिण्यापेक्षा तिच्या जवळ बसून आपण तिला समजावलं तर? काय समजावणार? आपल्याला तिची जवळीक हवी आहे हा इतका वेळ दाबलेला हेतू उसळी मारून वर आला. उगाच समजावण्याचा मुलामा कशाला पाहिजे? किंबहुना आपल्या मनात हे घरातून निघतानाच होतं. अकरा वाजल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ शकत होतो. त्यांना तसेच उभे पाहून तिने डोळे उघडले. ती म्हणाली, " काय पाहताय? उठलातसे? काही हवंय का? " ताकाला जाऊन भांडं लपवल्यागत ते करीत असल्याचं तिने ओळखलं. तिने त्यांच्याकडे पाठ केली. ते चडफडले. घाबरट आहोत आपण. आपणच पुढाकार घेऊन तिचे पुढचे प्लान्स काय आहेत ते विचारायला हवेत.

थोडं स्पष्ट बोललं तर आपल्यालाही आशेवर बसायला नको. अजूनही वेळ गेली नाही. आतून पाणी आणावं आणि दिवा विझवण्यापूर्वी तिच्याजवळ बसावं. म्हणजे काहीतरी संवाद होईल आणि आपल्याला तिचा स्पर्शही अनुभवायला मिळेल. त्यांनी मनाला जास्त विचार करण्याची संधी न देता ते आतून पाण्याची बाटली घेऊन आले. आणि सरळ तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आपल्याकडे वळवीत ते बिछान्यावर बसले. तिला हे अपेक्षित होतच. त्यामुळे ती काही बोलली नाही. पण ती वळल्यावर म्हणाली, " झोपा आता, रात्र फार झाल्ये, उद्या बोलू. " त्यांना बोलायचं कमी आहे आणि सहवासात जास्त रस आहे हे तिने त्यांच्या डोळयात दिसणाऱ्या निराशा आणि राग यांच्या मिश्रणातून ओळखले. ती परकी असल्याचं त्यांना जाणवलं. रोहिणी असती तर असं बोललीच नसती. ते उठण्यासाठी मागे सरले, पण तिने ते नाराज होऊ नयेत म्हणून हात हातात घेऊन म्हणाली, " खरंच उद्या बोलू. " तिथेच तिने चूक केली. तिचा स्पर्श त्यांना पेटवून गेला.

उठण्याचा विचार बाजूला सारून त्यांनी तिचे दोन्ही खांदे धरले व तिचे चुंबन घेण्यासाठी ते खाली वाकले. हळुवार आवाजात म्हणाले, "साधना उद्या मला यायला मिळेल की नाही माहीत नाही. " आता तिने उत्तेजित होत त्यांना जवळ ओढले. उबदार श्वासात दोघांनाही वेळेचं भान राहिलं नाही. भर प्रकाशात मग दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. बाहेर पावसाची जोरदार सुरुवात झाली. थंड वारा दोघांनाही अविचारी बनवीत राहिला. पहिला बहर ओसरल्यावर तिच्या लक्षात आलं की दिवा विझवायला हवा. तिने अर्धवट सुटलेल्या कपडे सावरून त्यांना दिवा विझवायचा इशारा केला. तत्परतेने त्यांनी दिव्यालाही आराम करायला सांगितले. पुढच्या अर्धा पाऊण तासात ओल्या धुंद शब्दांनी बेडरूम भरून गेली. पावसाला मात्र वादळी रात्रीसारखा ऊत आला होता. केव्हातरी रात्री त्यांना झोप लागली................

तशी सकाळी उठण्याची त्यांना घाई नसली तरी साधनाला गजराबरोबर उठावं लागलं. कारण सोनाची शाळा होती. तिला उठवणं भाग होतं. आपण एकाच बेडवर आहोत हे लक्षात आलं ते सहाचा गजर झाल्याबरोबरच. साधना खडबडून उठली. तिने सोनाला उठवून घाईगर्दीने तिचा डबा वगैरे तयार केला आणि काका झोपलेले आहेत पाहून तिने त्यांना न उठवताच ती सोनाला घेऊन बाहेर पडली. पावणे सात होत होते. आजपर्यंत तिला उठायला इतका उशीर कधी झाला नव्हता. तिला स्वतःची च लाज वाटली. आपण इतक्या कशा बहकलो. असला निरुपयोगी विचार करीत तिने यांत्रिकपणाने रस्ता ओलांडला. समोरच्या फुटपाथजवळ उभ्या असलेल्या बसकडे सोनाचा हात पकडून ती धावत सुटली. सोनाला आत प्रवेश देणारा कंडक्टर म्हणाला, " अहो, तिला घेतल्याशिवाय बस जाईलच कशी, उगाचच धावत जाऊ नका. " बस खाजगी असल्याने हे शक्य झालं. ती वरमली. आणि सोनाला टाटा करून ती घराकडे परतली.

हातातल्या चावीने दार उघडीत ती एकदाची घरात शिरली. हलक्या पावसाने तिला थोडी का होईना भिजवली होती. छत्री न्यायला ती विसरली होती. आज हे असं काय होतंय? सोनाला दिलेली भाजी तिने चाखून पाहिली. त्यात मीठ अजिबात नव्हतं.......... काय चाललंय माझ? ती स्वतःशी च म्हणाली. मग ती बेडरूम मध्ये डोकावली. काका अजून झोपलेले होते. तिने आधी आजूबाजूचं आवरलं मग चहा ठेवला.स्वतः फ्रेश होऊन आली. आणि चहा घेऊन ती बेडरूममध्ये परतली. तिने आता मात्र काकांना हालवून उठवले. काका कपडे सावरीत उठले.

आत जाऊन थोड्यावेळाने परत आले. चहाचा कप हातात घेऊन ते तिच्या शेजारीच बेडवर अंतर ठेवून बसले. दोघेही स्तब्धपणे चहा घेत होते.पण नजरेला नजर भिडवण्याचं धाडस त्या दोघांना होत नव्हतं. मध्येच त्यांनी तिला विचारले, " साधना आज तुला जायलाच हवं का? आपण अजून पूर्णपणे बोललो नाही. मला तर आज तीन वाजेनंतर गेलं तरी चालणार आहे. "..... ती काहीच बोलली नाही. तिला त्यांचा किशा दादाशी आलेला संबंध अजिबात मान्य नव्हता. तिच्या भूतकाळात गेलेला किशा एखाद्या विहिरीतून प्रेत फुगून वर यावं तसा तिच्या मनात तरंगू लागला. आयुष्यातला हा योगायोग पाहून तिला आश्चर्य वाटलं. आणि भीतीही वाटली. पुन्हा आपले दिवस झाकाळणार का? या काळजीत ती बुडाली. तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालेली भीती पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. तिच्या मनात आलं. हे का आपल्या आयुष्यात आले? सगळं नीट आकारात येत होतं. नवरा गेलेला असला तरी आता तिची ती जखम खपली धरू पाहत होती. आणि मध्येच हे काय? तिची घालमेल तिच्या चेहऱ्यावर भीतीच्या स्वरूपात दिसत होती. यांना आपलं सगळं सांगावं का? इतकी जवळीक झाल्यावर असा विचार करणं कितपत योग्य आहे? विचार करायला आपण वेळ घ्यावा पण लवकरच काय तो निर्णय घ्यायला हरकत नाही. मग अचानक ती म्हणाली, "मला ऑफिसला जायलाच हवं. मीटिंग असतात. केसवर चर्चा कराव्या लागतात. बोलू आपण लवकरच. " ती बोलली खरी. पण तिला पुढच्याच क्षणी आपण फार रुक्षतेने बोललो असं वाटलं. तसा माणूस साफ मनाचा आहे........ थोडावेळ इकडे तिकडे करून ते म्हणाले, " मग मी निघू का? " त्यावर ती म्हणाली, " तीन नंतर जायचंय ना? मग जेवण करतेच आहे. जेवूनच जा ना. असे उपाशी पोटी कशाला जाता? "......... या प्रश्नासरशी त्यांना थोडी तरी आशा निर्माण झाली. काही तरी पण संवाद होईलच. मग ते म्हणाले, " ठीक आहे मी जेवून निघेन. " ती काही न बोलता नाश्त्याच्या तयारी साठी किचनमध्ये गेली. आणि ते पेपर उघडून बसले.

काकांचं लक्ष जरी पेपरात असलं तरी ते अर्धवटच होतं. त्यांचं जास्त लक्ष किचनमध्ये असलेल्या साधनाच्या हालचालींकडे होतं. त्यांना तिला सांगितलेल्या त्यांच्या भूतकाळाची आठवण झाली. साधनाने अजून तरी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. खरंतर त्यांना तिच्या भूतकाळातही तेवढाच रस होता. एकदा सगळा सारासार विचार झाला की त्यांना तिला लग्नाबद्दलचा निर्णय विचारता आला असता. पण ती नाश्ता बनवण्यात दंग होती. का, काही बोलायला नको म्हणून तिने नाश्ता बनवायला घेतला होता. कोण जाणे....... त्यांना काही सुचेना. बहुतेक सगळे निर्णय ते लवकर घेत. मग एखाद्या मोहात अडकले की इतके विचलित होत की त्याचा परिणाम संपेपर्यंत त्यांना काही सुचत नसे. तेही सगळं लवकरच व्हावं असं त्यांना वाटे. दुसऱ्या माणसानेही तितक्याच उत्कटतेने निर्णय घ्यावा अशी त्यांची अपेक्षा असे. एकूण ते भावनावश फार होत. पण सगळेच लोक तसे भेटत नाहीत. काहीजण वेळ घेतात, तर काही निर्णय कुजवून दुसऱ्याला जेरीस आणतात. आणि काही दुसऱ्याशी खेळत राहतात. पण साधना यापैकी नव्हती. तीही सामान्यच होती. सगळी सुरक्षितता पाहूनच मग निर्णय घेणं, तिचा स्वभाव होता. स्वस्थ आणि शांत आयुष्याची तिची अपेक्षा होती. ज्याप्रकारे तिचं पूर्वायुष्य गेलं, ते पाहिलं तर तिची ही अपेक्षा चुकीची नव्हती. ती पण किचनमध्ये हाच विचार करीत होती. तिचं अर्ध लक्ष नाश्ता बनवण्यात होतं. आता तिला वाटत होतं, आधी त्यांना बोलून द्यावं, त्याप्रमाणे ठरवावे. तरीपण एवढी जवळीक साधल्यावर नकारार्थी निर्णय घेणं कितपत योग्य ठरेल? असं तिला वाटू लागलं. ..... पण तिला काकांचा किशाशी असलेला संबंध आठवला आणि तिचं मन गरम तव्याचा चरका बसल्यासारखं मागे सरलं. तिला त्याचे आणि नवऱ्याचे संबंध आठवले. म्हणजे पुन्हा मनस्ताप. .... जाऊ दे. आपण बरे आणि आपली सोना बरी. तिने इडली सांबार केलं होतं. विचारांच्या आंदोलनात तिने नकळत सांबारात परत मीठ घातलं. तिच्या ते लक्षात आलं नाही. तिचं मन डळमळत राहिलं. विचार बंद करण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला................
पण मनातली गळती थांबेना. मनाने परत एकदा प्रयत्न केला. हा माणूस मूळचा वाईट नाही. आणि बदललेल्या परिस्थितीला त्याने स्वीकारलेलं आहे. खरंतर आपल्यालाही एकटं राहण्याची चांगली सवय झालेली आहे, पण मध्येच हे कसं काय निर्माण झालं? दुसरं म्हणजे सोनालाही ते आवडतात आणि सोनाही त्यांना आवडते. यांत्रिक पणे तिने नाश्त्याच्या ताटल्या ट्रे मध्ये ठेवल्या आणि ती हॉलमध्ये जाण्यासाठी वळली. पण मन तसं सोडायला तयार नव्हतं. सरळ आयुष्याचं आपल्यालाही आकर्षण आहे, मनाने उलटा घास घेतला. तिला येताना पाहून काकांनी परत पेपरात डोकं घातलं.
टीपॉयवर नाश्त्याच्या ताटल्या ठेवीत ती म्हणाली, " मी बारा वाजेपर्यंत आहे, तोवर सोना आलेली असेल. " काका तत्परतेने तिला बोलणं पुर करू न देता म्हणाले, " ती आल्यावरच मी जाईन. ..... " त्यांची थांबण्याची तयारी पाहून ती म्हणाली, " तुमची वेळ झाली की तुम्ही जायला हरकत नाही. शेजारच्या काकू रोज तिच्याकडे पाहतातच. आणि तिला घरी एकटं राहण्याची सवय आहेच. " थोडक्यात तुमची अडचण करून माझ्यासाठी काही करू नका, असं तिला सुचवायचं असावं, असं काकांना वाटलं. म्हणजे तिचे विचार अजूनही डळमळीत आहेत तर. मात्र ते काहीच बोलले नाहीत. अजूनही ती तिच्या दैनंदिन जीवनात आपल्याला हक्काने सामील करून घेत नाही. तसंच तिने तिची बाजू सांगितली नाहीच..... का???. आपण सगळं सांगण्याची घाई केली का? आपल्याएवढ्या तिच्या भावना उत्कट नाहीत. ती आधी फसली असल्याने एवढी सावधपणे वागत असावी, असं म्हणून त्यांनी मनाचं तात्पुरतं समाधान करून घेतलं. इडल्या खात खात ते म्हणाले " नाश्ता छानच झालाय. ", आपण तिच्याच बाजूने आहोत हे दाखवण्यासाठी सांबारात मीठ जास्त असूनही ते बोलले. साध्या साध्या कृतीमागे माणसांचे छुपे स्वार्थ असतात हेच खरं, तिच्या मनात आलं. नाहीतर सांबार खारट झालंय असं ते म्हणाले असते. खाणं संपूनही काही सेकंद ते आणि ती तशीच बसून होती. मग तीच सर्व उचलून आत जाण्यासाठी वळली. त्याबरोबर त्यांनी न राहवून तिला विचारलं, " तू काहीतरी सांगणार होतीस ना? म्हणजे..... " त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं. तिने त्यांच्याकडे पाहिलं, आणि ट्रे खाली ठेवून बसत म्हणाली, " खरं सांगू , मला सध्या काहीही ठरवणं, फार कठीण जातंय. आपण काही दिवस थांबलो तर? नंतर सांगते ना. " मग तिच्या मनात आलं, हे एवढी घाई का करतायत? पण काकांचा हा आठवडा निर्णायक होता. अभी नही तो कभी नही(सरकारी कामातली पैसे घेण्याची पॉलिसी त्यांना आठवली) असली आणीबाणी
त्यांच्या आयुष्यात निर्माण झाली होती, हे तिला कसं सांगणार? त्याच्या मनात आलं. आता त्यांना हलका हलका घाम फुटू लागला होता. त्यांचा आतला दबाव वाढू लागला. पुढच्या आठवड्यात आपण इथे असू की नाही? कोण जाणे, त्यांना एकदम असुरक्षित वाटू लागलं. त्यांच्या मुद्रेत झालेला बदल तिला जाणवला. खरी परिस्थिती तिला माहीत नव्हती, म्हणा. त्यांचा आक्रसत चाललेला चेहरा पाहून ती मृदू स्वरात म्हणाली, " फारच बाई काळजी करता तुम्ही...... " उगाचच चेहरा पुसून ते म्हणाले, " छे, छे, तसं काही नाही. " पण ते असच काहीतरी असावं, हे तिला जाणवलं. शब्द जुळवीत ती म्हणाली, " जाऊ द्या, मला जे काही सांगायचंय ते सांगतेच आता. काय अर्थ लावायचा तो तुम्ही लावा. " तिने त्यांच्याकडे न पाहता, जणू काही ते अस्तित्वात नाहीत असं समजून सुरुवात केली.

" काही वर्षांपूर्वी, मिस्टरांचा व्यवसाय तेजीत असताना आणि आमचं आयुष्य चांगलं चाललेलं असताना एक धमकीवजा फोन आला. फोन करणाऱ्याला त्यांच्या व्यवसायातली काही गुपितं कळली होती. तो त्यांना पैशासाठी ब्लॅकमेल करू लागला. प्रथम प्रथम त्यांनी त्याच्या मागण्या पुऱ्या केल्या. नंतर मात्र ते तणावाखाली वावरू लागले. त्यांच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम झाला. मी त्यांना पोलिसांची मदत घेण्यास सांगितले. पण त्यांनी त्याला नकार दिला. पोलिसांच्या मदतीशिवायच त्यांनी निस्तरायचं ठरवलं. त्यांच्या एका मित्राने गुन्हेगारी जगातल्या एकाचा नंबर दिला. तो "किशा " होता. एक कुख्यात गुंड. त्याने थोड्याच अवधीत ब्लॅकमेल करणाऱ्याचा छडा लावून त्याचा कायमचा बंदोबस्त केला. त्यासाठी त्याने मोठी रक्कमही घेतली. खरंतर आता सगळं ठीक असायला हवं होतं. पण तसं झालं नाही. किशाचं आमच्या घरी त्या कारणाने काही वेळा येणं जाणं झालं. धंदा परत रुळावर आला. फोनवरच्या धमक्या बंद झाल्या. पण ह्यांनी जो धसका घेतला तो कायमचाच. किशाने नक्की त्या माणसाचं काय केलं असावं, ही भीती त्यांना सतावू लागली. त्यांनी धंदा बदलायचं ठरवलं. फार काय मुंबई सोडून जाण्याचंही ठरवलं. ते नुसतेच त्याबद्दल तावातावात बोलायचे, पण त्यांना ते शक्या झालं नाही. एक दिवस ते असेच कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. काम नक्की किती दिवसात होईल हे सांगता येणं कठीण असल्याने ते लवकर येण्याची शक्यता जशी होती, तशीच त्यांना उशीर होण्याचीही शक्यता होती. पण मला त्याची सवय असल्याने त्याचं काही वाटलं नाही. सोना अगदीच लहान असल्याने तिचं तसं काही फार त्रासाचं रूटीन सांभाळावं लागत नव्हतं. सर्व ठीक होतं. पण एका रात्री तान्ह्या सोनाला झोपवून मी टीव्ही पाहत बसले असताना अचानक बेल वाजली. साधारण दहा साडेदहाची वेळ होती. ह्यांच्या येण्याची पण शक्यता असल्याने मी अपेक्षेने दरवाजा उघडला. दारात " कि शा" उभा होता.
दात विचकीत तो म्हणाला, " कहां गये मेहता साब? " ते बाहेर गेल्येत हे त्यालाही माहीत असावं. त्याने पूर्वी मला पाहिली असल्याने हा मोका साधण्याचं त्याने ठरवलं असावं. तोंडाला येणारा दारूचा भपका तोंडावर हात ठेवीत, कसातरी आवरीत त्याने एक पाय दरवाज्यात हळूच सरकवला. हे माझ्या लक्षात आलं नाही. हे घरी नाहीत असं सांगून मी दरवाजा लावायला गेले,. पण त्याच्या पायामुळे तो न लागता जोरात आतल्या बाजूला उघडला गेला. त्याने मला हाताने धक्का दिला. मी समोरच्या सोफ्यावर भेलकांडले. दरवाजा बंद करीत तो निर्लज्जपणे म्हणाला, " मुझे आपसेही काम है. आपके शोहरने पैसेकी भूख तो मिटा दी, लेकीन, ये भूख? इसका कोई इंतजाम नही किया. सालेको पार्टी देनेको कहा था मैने, वो भी नही दी...... कोई बात नही. आप तो है ना, " मग मला एकदम कवेत घेऊन माझ्या तोंडाशी तोंड आणीत तो म्हणाला, " आप तो बहोत हसीन है. " मग पुढचं सगळंच झालं. जवळ जवळ तासभर तो होता. माझं सर्व अंग ठणकत होतं. मोकळे सुटलेले केस, अस्ताव्यस्त कपडे, या अवस्थेत सोफ्याला डोकं टेकून रडत होते. जाताना तो हलकटपणे म्हणाला, " फिर मिलेंगे" ...... मला राग आलेला होता. तिथे पडलेले पाणी पिण्याचं भांडं मी त्याच्यावर भिरकावलं . ते त्याच्या हाताला लागलं. हात दाबून धरून म्हणाला, " फिर तो तुझे उठाके ले जाउंगा और ऐसी मजा चखाउंगा, की तू जिंदगीभर याद रखेगी. " दरवाजा जोरात आपटून तो निघून गेला. मी किती वेळ विव्हळत बसले होते कोण जाणे. मग बराच वेळ मी बाथरूम मध्ये घालवला. कितीही पाणी घेतलं तरी त्याचा स्पर्श आणि लंपट वास नाहीसा होईना. रात्रभर मी जागीच होते. दोनचार दिवसांनी मिस्टर घरी आले. त्यांना सांगितल्यावर ते किशाला उडवण्याची भाषा करू लागले. मी त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याचे सुचवले. पण ते तयार होईनात. निष्कारण पेपरात येईल, बभ्रा होईल आणि धंद्यावर परिणाम होईल, त्यापेक्षा आपला न्याय आपणच मिळवावा, असं ते म्हणाले. पण मी ते मानलं नाही. मी रीतसर तक्रार नोंदवली. तपास पूर्ण झाल्यावर किशा पकडला गेला. पेपरातही मोठ्या मथळ्याखाली बातमी आली. काही महिला स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी मला येऊन भेटल्या. पण त्यांना माझ्या न्यायापेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीची काळजी जास्त दिसली. त्यांनी माझ्या जाहिराती केल्या. मला ते आवडलं नाही. मी त्यांना हाकलून दिलं. कोर्टात केस चालू झाली. आमच्या कोर्टाच्या फेऱ्या चालू झाल्या. मी हे पाऊल उचलल्याने ह्यांनी माझ्याशी अबोला धरला. दोन वर्ष केस चालली. बलात्कार सिद्ध झाला नाही. पण घरात जबरदस्तीने घुसून बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध झाला. त्याला जन्मठेपेची शिक्षा होईल असं वाटलं होतं . फक्त चारच वर्षांची शिक्षा झाली. माझ्याबरोबर पोलिसांचीही निराशा झाली. एसीपी वागळे तिथे होते. ...... केसचा निकाल लागल्यावर मात्र मिस्टर माझ्याशी नेहमीसारखे वागू लागले. सोनाही हळूहळू मोठी होत असल्याने आम्ही यावर घरात चर्चा बंद केली........ थोडावेळ थांबून ती म्हणाली, " आणि आता तो सुटून आलाय. " तिने काकांकडे प्रातिक्रिये करिता पाहिलं . .......
पहिल्यांदा तर ते वागळेंचं नाव ऐकून घाबरले. त्यांची चौकशी त्यांनीच तर केली होती. आणि रेडलाही ते आले होते. त्यांची मान उगाचच खाली गेली. मग अचानक त्यांना किशाचा इतका राग आला, की ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, " मी किशाला जिवंत सोडणार नाही. " त्यांचा आवेश पाहून ती म्हणाली, " असंच माझे मिस्टरही तेव्हा म्हणाले होते. पण त्यांनी काहीच केलं नाही. मी त्यांना दोष देत नाही. "
तिने काकांकडे परत पाहिलं. ते काय करणार आहेत तिला कळेना, पण आता ते लग्नाचा प्रस्ताव नक्कीच ठेवणार नाहीत असं वाटून ती ट्रे घेऊन उठली. काकांजवळ नक्की अशी काही योजना नव्हती की जिच्या योगाने ते किशाला संपवू शकतील. तसंच त्यांना अजूनही तिला बँकेवरील दरोडा आणि त्यांचा त्यातील सहभाग, याबद्दल काही सांगावंस वाटलं नाही. तिला धीर द्यायला हवा. म्हणून बहुतेक ते बोलले असतील असं तिला वाटलं. त्यांना किशा सारख्या नालायक माणसाला आपण मदत का करायची. आपण निष्कारण भारताबाहेर का जायचं ? तेही खोट्या कागदपत्रांवर? किशा खरोखरीच नालायक आहे. असं सर्व वाटू लागलं. मनाने त्यांचं मत बदलावं म्हणून प्रयत्न करून पाहिला. त्याने तुला नोकरी केलेली आहे, एवढंच नाही तर तुला त्याच्या धंद्यांपासून दूर ठेवलेलं आहे. मग तो खरोखरीच नालायक आहे का? मनाने वस्तुस्थिती दाखवली. परत तू त्याला त्याने केलेल्या गुन्ह्यावरून नालायक ठरवतोय. तुझ्या लायकीचं काय? साधनाला सगळं सांगितलं नाही तरीही तिने विश्वास ठेवलाय. त्याची त्यांना जाणीव झाली. मग ते, कोणत्याही माणसाबाबत कुठलेच मत कायमचे ठरवू नये या अनुमानाला पोहोचले. साधनाला भीती वाटणं स्वाभाविकच आहे. आपल्या आयुष्यात तरी तसं कोण आहे? त्यांना निराशा घेरू लागली. आयुष्य अजूनही स्थिर होत नाही याची त्यांना खंत वाटली. ते किचनमध्ये आले. साधनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तिच्या मनात आलं, यांच्यामुळेच तर आपल्या आयुष्यात किशा परत आला, आणखीन काय काय भोगावं लागणार आहे कुणास ठाऊक. पण काकांना ती आवडत होती. ते म्हणाले, "माझ्या निर्णयात फरक पडणार नाही, तुझी तयारी आहे ना? " ..... ती आवराआवर करीत म्हणाली, " नंतर बोलू, मला जेवण बनवून ऑफिसला जायचंय. " ते काही न बोलता हॉलमध्ये आले. त्यांच्या खिशातला मोबाईल फुरफुरला. फोन किशाचा होता. " एक बजे तक यहां आईये, आपके नये बेटेका पता बताना है, जाकर मिलीये उसको, वो भी देखेगा उसका नया बाप कौन है. श्रीपतका सबक भी तो आपको देखनेको मिलेगा. " बारा वाजत आले होते.

त्यांना आज सूर्याच्या ऑफिसमध्ये जाण्याचा कंटाळा आलेला होता. त्यांना साधनाकडे राहायचं होतं. त्यांना आता रमेश नीता नको होते, तसंच किशा आणि त्याची टोळीही नको होती. परिस्थितीत त्यांना जादूसारखा बदल हवा होता. पण सध्यातरी यातून सुटका होण्याची चिन्हं दिसत नव्हती...... ते परत किचनमध्ये आले . साधना कामात होती. तिने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही असं त्यांना वाटलं. त्यांनी तिला हात लावला, तेव्हा कुठे ती त्यांच्याकडे वळून म्हणाली, " मला ना आत्ता अजिबात वेळ नाही हो, माझी अजून अंघोळ सुद्धा व्हायच्ये. प्लीज लवकर बोला...... " मग ते म्हणाले, " मला सुद्धा एक दीड वाजेपर्यंत जावं लागेल. मी जेवणार नाही. " त्याबरोबर ती वैतागून म्हणाली, " हे कोणासाठी केलंय? आता असं करा डबा घेऊन जा". असं म्हणून ती कपडे गोळा करून बाथरूम कडे वळली. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचीही तिला जरूर वाटली नाही. ती थोडी नाराज दिसली. ते पुन्हा हॉलमध्ये आले. काही तरी करून आपल्याला हे सुधारता येईल का? त्यांनी स्वतःला विचारलं. त्यांना नको असलेलं सगळं घडत होतं. त्यांचे विचारच थांबले. कसे तरी साडेबारा वाजले. आता डबा नेऊन खाणार कुठे? साधना पण समजून घेत नाही. त्यामानाने रोहिणी फारच समजूतदार होती. खरंतर ते असं उगाचच म्हणत होते. ते अकारण हॉलमधल्या वस्तू निरखून पाहू लागले. आवडणाऱ्या स्थितीतून दुसऱ्या न आवडणाऱ्या स्थितीत जाणं ही त्यांच्यासाठी शिक्षाच होती. त्यांना सुरक्षित वाटणारी स्थिती ते कवटाळून बसायचे. म्हणूनच सुटून आल्यावर त्यांना रमेश नीताच्या वागण्यामुळे तुरुंग जवळचा वाटू लागला. खरंतर रोहिणी ही त्यांच्यासाठी एक अशीच सुरक्षित स्थिती होती. ती जिवंत नव्हती तरी ते रोहिणीचा विचार सोडू शकत नव्हते. अशा लोकांना निलंबित अवस्थेत असल्यासारखं नेहमीच वाटतं. नवीन कोणताही बदल त्यांना नकोसा वाटतो. काका असे होते खरे. त्यामुळे अवती भोवती घडणाऱ्या घटनांकडे ते लक्ष देत नसत. मध्येच त्यांचा मोबाईल फुरफुरला. नीताचा फोन होता. " सध्या कुठे असाल तिथून तुम्ही घरी याल का? श्रेयाला फार ताप आहे. " .... ते विचार न करता येईन म्हणाले. पुन्हा नवीन स्थिती. या स्थितीचा फायदा घ्यावा की काय करावं? त्यांनी स्वतःला विचारलं.

ते दादाला फोन करण्याच्या विचारात असतानाच सोना आली. दरवाजा उघडा असावा. तिला काका दिसले. तिला प्रथम आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आता तर त्यांनी फोन करण्याचा विचारच रद्द केला. साधना त्यांचा डबा घेऊन बाहेर आली. तिला सोना दिसल्यावर जरा बरं वाटलं. डबा टीपॉयवर ठेवीत ती अंघोळीला जाते म्हणाली. म्हणजे अजून तिची अंघोळ व्हायची होती तर, काकांच्या मनात आलं. एक वाजायला आला. आपल्याला साधनाने बाजूला काढल्यासारखं त्यांना वाटलं. खरंतर तसं काही नव्हतं. आपण जेवायला हवं होतं.. कदाचित तेच कारणं असावं. ते उगाचच इकडे तिकडे करीत राहिले. त्यांचा विचार साधना बरोबर निघण्याचा होता. तेवढ्यात आतून सोना कपडे बदलून आली आणि म्हणाली, " चला ना आपण चेस खेळू. " आत्ता काकांचा मूडही नव्हता. ते नाही म्हणाल्यावर ती कुरबुरत म्हणाली, " खेळा ना. आजच्या दिवस दांडी मारा हवं तर...... " त्यांची फारशी तयारी न दिसल्याने ती परत म्हणाली, " खेळा ना काका, प्लीज. मम्मी दांडी मारते कधी कधी" मग मात्र ते म्हणाले, " आज मम्मीलाच सांग ना, मला तरी आज महत्त्वाचं काम आहे. " ..... आतून तयार होऊन साधना बाहेर आली. तिने मारलेला सेंट काकांना ढवळून गेला. सोना रागावून आत गेली. तशी साधना म्हणाली, " तुम्ही जाणार होतात ना? एक वाजून गेलाय. " त्यांनी फारसं उत्तर दिलं नाही. त्यावरून ती समजली. त्यांना आपल्या बरोबर बाहेर पडायचंय. दीड वाजेपर्यंत ते दोघे बाहेर निघाले. अर्थातच सोनाला सगळं समजावून सांगूनच. सोना जातानाही काकांशी बोलली नाही. तिने साधनाला टाटा केला, पण त्यांना नाही. मग काकांना एकदम सुचलं. आपण ऑफिसमध्ये वातावरण पाहू, फारच त्रासदायक असेल तर श्रेयाच्या तापाचं कारण सांगून निघू. जाता जाता ते रागावले असावेत असं समजून साधनाही काही बोलली नाही. तिने त्यांना फोन करायचं ठरवलं. उतरताना काकांची नजर सहज आजींच्या फ्लॅटकडे गेली. तटस्थपणाने दरवाज्याला धरून कुलूप लटकत होतं. म्हणजे दरवाजा अजून बंद होता. त्यांना आता खात्री झाली की या लोकांनी आजींचा खून केलाय. आपण कशा कशाला जबाबदार ठरणार आहोत, कोण जाणे. या विचाराने भीतीची एक लहर त्यांच्या अंगातून गेली. रस्त्यावर त्या दोघांचे मार्ग भिन्न झाले. काहीही संभाषण न करता ते दोघेही वेगवेगळ्या बस स्टॉपवर जाऊन उभे राहिले. काकांना हे फारसं आवडलं नाही. तिने निदान निरोपाचे दोन शब्द तरी बोलायला हवे होते. त्यांनी रागात तिचा फोन आला तरी न घेण्याचं ठरवलं. तेवढ्यात बस आली आणि नीताचा फोनही. बस मध्ये कसेबसे चढत त्यांनी नीताला लवकर येण्याचे आश्वासन दिले. आणि काही चौकश्या करण्याच्या आतच फोन बंद केला. आज अशा आड वेळेलाही बस मध्ये गर्दी होती. काकांना उभे राहावे लागले.

ऑफिसमध्ये शिरल्या शिरल्या काकांना दादाने आत बोलावले. त्यांना जरा रागच आला. थोडावेळ बसल्यावर बोलावलं असतं तर बरं झालं असतं, असा विचार करीत आणि आलेला घाम पुशीत ते केबीन मध्ये शिरले. त्यांना पाठमोरा बसलेला सोल्या दिसला. दिसला म्हणजे त्यांनी त्याच्या हॅटवरून ओळखलं. समोरच्या भिंतीशी श्रीपत आपले दोन्ही हात पोटाशी धरून रडत विवळत उपडा पडला होता. त्याच भिंतीवर रक्ताचे काही शिंतोडे उडलेले दिसत होते. काकांना पाहून दादा म्हणाला, " अरे काकाजी, ये श्रीपतको कुछ समझाओ. उसे लगता है, हम उसे मार डालेंगे. सोल्याने थोडी मस्करी की और , ये रोने लगा. " ते ऐकून श्रीपत त्याला आणि सोल्याला शिव्या देऊ लागला. तेवढ्यात दादाने सोल्याला परत खूण केली.. जखमी माणसाचं लक्ष कावळ्यासारखं असतं. श्रीपत अतिशय सावध होत मागे सरकला. आणि मोठयाने ओरडून तो म्हणाला, " ए, मेरेको हाथ मत लगाना, मै पेरियर को बोलके तुम दोनोंको सजा दिलवाऊगा. कुत्ते साले. " असं म्हंटल्यावर सोल्याला राग आला आणि उभा राहून त्याच्या खांद्यावर हाताची पकड ठेवीत म्हणाला, " कुत्तेका काम तू करेगा और हमको कुत्ता कहेगा, तेरी जबानही खीच लेता हूं. " असे म्हणून त्याने दुसऱ्या हाताने त्याचे डोके पकडले. दादा त्याला थांबवीत म्हणाला, " सोल्या, जर दम खाना. इसको हम अब छोडनेवाले तो है नही. " सोल्या त्याला सोडून पुन्हा खुर्चीत बसत त्याला शिव्या देत राहिला. मग काकांकडे वळून दादा म्हणाला, " अरे काकाजी, आपको तो रहम आयी होगी. लेकीन ऐसे सबक की जरूरत सबको होती है. मै तो कहूंगा की सोल्यासे सबका एकेक हाथ थोडा थोडा छीलके लेना मंगता है, ट्रेनिंग के तौरपर. जाने दीजिये, मैने आपको इसलिये बुलाया है. " असं म्हणून त्याने ड्रॉवरमधून एक पाकीट काढले. त्यांच्या हातात दिले. त्यांनी विचारले, " ये क्या है? " त्यावर तो म्हणाला, " अपनी जगह पर जाकर खोलके देखिये. सब समझ जाओगे. और ये काम कल शाम तक होना चाहिये. " जाईये आप. असं म्हंटल्यावर काका झटकन वळले. त्यांना या वातावरणात फार काळ राहण्याची इच्छा नव्हती. त्यांनी दरवाजा उघडण्या आधीच सूर्या आत आला. त्यांच्याकडे संशयाने पाहत तो दादाकडे गेला. आता मात्र काका झटकन केबीन बाहेर पडले. आत आलेला सूर्या दादाच्या कानाशी लागून काही वेळ पुटपुटला. मग म्हणाला, " हम दोनो थोडी देरमे मीटिंग लेंगे मै और ज्यादा कुछ कहना चाहता हूं " दादा म्हणाला, " मुझे लगता है तुम्हे कोई गलतफहमी हो रही है. " मग सूर्या बाहेर गेला. त्याला काण्याला भेटायला जायचं असल्याने तो काकांकडे न पाहता बाहेर पडला. त्याला आता काका अजिबात आवडेनासे झाले होते. काकांनी त्याच्याकडे लक्ष न देता दादाने दिलेले पाकीट फोडले. आत एका कागदावर एक नाव होतं आणि पत्ताही. इतरही माहिती दिली होती. म्हणजे त्यांच्या नवीन मुलाला मदत करणारा कोण आहे वगैरे.
"संजीव दिनानाथ जांभळे
नगरकर रोड, रूम नं ३२ लहेरी चाळ,
भायखळा (पूर्व) मुंबई.
फोन नं. २३७८४४९९"

आता या माणसाला फोन करावा, मगच जावं म्हणजे नक्की ही बिल्डिंग कुठे आहे हे कळेल आणि केव्हा जावं हेही. त्यांनी मग दादाला आत फोन करून निघण्याबद्दल विचारलं. तो हो म्हणाला. ते लगेचच निघाले. त्याचा निर्णय फिरला तर पंचाईत नको. रस्त्यावर आल्यावर त्यांनी संजीव जांभळेला फोन केला. पण तो त्याचा घरचा नंबर होता. एका स्त्रीने घेतला. तिने तो संध्याकाळी सात नंतर भेटेल असे सांगितले. आत्ता जेमतेम चार वाजत होते. ते घरी निघाले, श्रेयाची तब्येतही ठीक नव्हती. त्यांच्या मनात आलं ह्याला जर नाही भेटलं तर ? तसंही दादाला कळणं कठीण आहे. पण त्याचं जाळं घट्ट असणारं. आणि शेवटी आपल्यालाच ठरवायचंय दुबईला जायचं की नाही. दादा जरी तिथे गेला तरी तो फार काही करू शकेल असं नाही. काका विसरत होते, की सगळी टोळी बाहेर जात नव्हती तर फक्त दादा जाणार होता. म्हणजे सूर्या आणि इतर इथेच राहणार होते. आपली सुटका तशी सहज होणार नाही. दिलेल्या पत्त्यावर जाऊन तर पाहावं. विचारांच्या घेऱ्यात ते घरी पोहोचले. रमेशला लवकर आलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. तोही आज खुशीत दिसत होता. त्यांना पाहून तो म्हणाला, " आजचा दिवस फारच चांगला लागलाय. मी येत्या शुक्रवारी रात्री कॅनडाला जाणार आहे. तिकिट व्हिसा, आणि इतर कागदपत्रही मिळाली आहेत. सध्या तरी एक महिन्याकरताच जाणं होईल. काका सोफ्यावर बसले. ते बसल्याबरोबर रमेशने उठून नमस्कार केला. त्यांना आश्चर्य वाटलं. आपल्याशी फटकून वागणारा रमेश एकदम नम्रतेने कसा काय वागतोय. त्याने नमस्कार केल्यावर ते त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, " आज रोहिणी हवी होती रे. फार वाट पाहिली बिचारीने, दिवस पालटण्याची, पण नशिबात नव्हतं. " डोळ्यात आलेलं पाणी त्यांनी हाताने पुसलं. त्यांना एकदम भरून आलं. जरा वेळ भावनेत जाऊन देऊन रमेश म्हणाला, " दिवस असतात एकेक, हेच खरं. पण आता तुमची जबाबदारी वाढली. तुम्हाला या दोघींना मी येईपर्यंत सांभाळायचंय. लवकर घरी येत चला. जर माझं राहणं कंपनीने वाढवलं तर मी या दोघींचाही व्हिसा काढून घेऊन यांना घेऊन जाईन. कदाचित तुम्हीही पुढेमागे येऊ शकाल. " काका त्यावर काहीच बोलले नाही. हा आठवडा त्यांच्या दृष्टीने आयुष्याला कलाटणी देणारा होता. साधनाबरोबर लग्न, दरोडा आणि त्यातले पैसे पोचवण्याची त्यांची जबाबदारी, टोळीतली इतर माणसं ह्याने त्यांचा चेहरा ढगाळला. रमेश आणि नीता केव्हाच आत गेले होते. श्रेया मात्र समोर खेळत होती. ह्याला आपण कधी सांगणार, की साधनाशी लग्न करणार आहोत ते? या सगळ्या गोष्टी अशा अपरिहार्य का झाल्या? आपण फार सुरुवातीलाच हे काम सोडायला हवं होतं. आता फार फार उशीर झालाय. आता फक्त काय चांगलं करता येईल, ते पाहावं आणि यात राहूनही यापासून लांब कसं राहावं , ते ठरवावं. हे सगळं समजल्यावर रमेशची प्रतिक्रिया काय असेल कोण जाणे. ती नक्कीच चांगली असणार नाही..... ते जडपणे उठले, यांत्रिक पणे त्यांनी कपडे बदलले आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. घरात आनंदी वातावरण असलं तरी त्यांची रात्र तणावाखाली गेली.

******** ********* ********** ********* ***********

त्याच दिवशी दुपारी दोन वाजता कापसे बाई आणि साठे मामा दोघेही पोलिस स्टेशनला गेले. कापसे बाईंचे मिस्टर नाही म्हणत असतानाही त्यांचं न ऐकता त्या तक्रार नोंदवायला गेल्या. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की आजी जर आपल्या भावाकडे गेल्येत तर राहिल्या असतील जास्त दिवस, याचा अर्थ त्या गायब झाल्या असा होत नाही. न जाणो त्या परत आल्या आणि त्यांना कळलं तर निष्कारण त्यांचा आपल्या बद्दल गैरसमज होईल. पण त्यांचं न ऐकता त्या तक्रार करायला गेल्या होत्या. मागच्या प्रमाणे ड्यूटी ऑफिसरकडे न जाता ते दोघे कुणालाही न विचारता इन्स्पे. श्रीकांतांच्या केबीन पाशी कोणाकडे जावं या विचाराने घोटाळले. बाहेर कोणीतरी असल्याची जाणीव होऊन श्रीकांतांनी बेल वाजवली. ती ऐकून त्या दोघांना हटकण्याचा विचार करीत असलेला सखाराम प्रथम केबीन मध्ये शिरला. त्याला बाहेर कोण घोटाळतायत त्यांना आत पाठवायला सांगून आणि त्याचं लक्ष कुठे आहे त्याबद्दल झापत श्रीकांतांनी परत फाइलमध्ये डोके घातले. बाहेर येऊन सखारामने कापसे बाई आणि साठे मामांना आत भेटायला सांगितले, आत ते शिरल्या शिरल्या श्रीकांतांनी चिडखोरपणे त्यांना विचारले, " काय काम आहे? इथे घोटाळताय कशासाठी? " घसा साफ करीत साठे मामा म्हणाले, " अहो मिसिंगची तक्रार नोंदवून घेत नाहीत, त्यामुळे सीनियर ऑफिसरला भेटावंसं वाटलं, यात काय चूक आहे? " स्वतः"वर ताबा ठेवीत त्यांनी विचारलं, " का नोंदवून घेत नाहीत? खरंतर त्यांना अशा भांडखोर म्हाताऱ्यांचा राग यायचा. त्यांना बसायला सांगितलं. तक्रार नोंदवून न घेणाऱ्या कॉन्स्टेबलला त्यांनी बोलवून घेतलं. तो येईपर्यंत मामांनी इत्थंभूत माहिती सांगितली. त्यात आजींचे सोसायटीचे पैसे बाकी असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. हे मात्र कापसे बाईंना आवडलं नाही. "आता सांगा या म्हाताऱ्या बाईंचा फोटो आम्ही कुठून देणार? एक तर फ्लॅटला कुलूप आहे आणि कोणाकडेही चावी नाही, नेहमी यांच्याकडे त्या चावी ठेवतात..... निदान तक्रार नोंदवून घ्यायला काय हरकत होती? पुन्हा वेळेवर तक्रार केली नाही, म्हणून आम्हीच जबाबदार ठरणार. " मामांनी थोडा दम खाल्ला. शक्यतोवर सगळं बोलून झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते..... तेवढ्यात केबिनचं दार ढकलून कॉन्स्टेबल आत आला. त्याला पाहताच मामा जरा घाबरले. कारण माहीत असूनही, श्रीकांतांनी त्याला थोड्या रागात विचारलं. " यांची तक्रार नोंदवून घ्यायला काय झालं? " मामांना पाहून त्याला मागचा प्रसंग आठवला. मग त्याने सर्व सांगितलं. ते ऐकून श्रीकांत म्हणाले, " अहो, तसं पाहिलं तर बरोबर आहे, कशाच्या आधारावर तक्रार नोंदवून घेणार? तुमच्याकडे काही तपशील नाही, फोटोही नाही कसा तपास करणार? एकदा अशा तक्रारी नोंदवून घेतल्या की तुम्ही लोक चौकश्या करण्याचे थांबणार आहात का? " त्यांनी कॉन्स्टेबलला जाण्याची खूण केली. मामा म्हणाले, " मग आम्ही करायचं तरी काय? तुम्ही तुमच्या अधिकारात कुलूप फोडूनही पाहू शकता. "...... त्यांना मध्येच तोडीत इन्स्पे. म्हणाले, " कोणत्या संशयावर आत पाहायचं. हरवलेला माणूस कुलूपबंद असतो का? " मग थोड्या मृदू आवाजात म्हणाले, " असं करा त्या बाईंचं वर्णन वगैरे मला देऊन ठेवा काही संदर्भ लागलाच तर उपयोग होईल. पण असं कारणाशिवाय कुलूप तोडून आत जाता येणार नाही. " मामांची निराशा झाली. आता फक्त पेपरवाल्यांकडे जाऊन या प्रकाराला वाचा फोडायची असं ठरवीत ते उठले. अचानक श्रीकांतना आठवण झाली. सोसायटीचे पैसे बाकी आहेत म्हणाले. त्यांनी मामांना विचारले, "त्यांचे सोसायटीचे पैसे कोणीतरी त्यांना पाठवीत असतील ना? त्यांना शोधून काढा. नक्कीच काहीतरी सुगावा लागेल. " मामांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही. तरीपण विचारणार कोणाला? आजींशिवाय कोण सांगणार आहे. ते तसेच दरवाज्याकडे वळले. पण ते साठे मामा होते. सोसायटीच्या सेक्रेटरी पदाचा उपयोग करून त्यांनी कमिशनर साहेबांना पत्र पाठवण्याचे ठरवले व त्यात इथे वाटाण्याच्या अक्षता कशा लावतात हे लिहिण्याचेही ठरवले. कापसे बाईंनाही हे पटले.
ते गेले, पण इन्स्पे. श्रीकांतांचे डोके हवेत फिरू लागले. त्यांना कधीही सांगितलेले काम नीट न करणाऱ्या सावंतची आठवण झाली. सावंतला मिळालेली बांगडी आणि त्याने काढलेला कुणातरी स्त्रीच्या अपहरणाचा निष्कर्ष याचा त्यांना अंधुक असा संबंध वाटू लागला. तेही अपहरण किशाच्या टोळीने केलेले. त्यांनी परत परत डोकं खाजवून पाहिलं. पण त्यांना पटेना. किशा कशाला जाईल एखाद्या म्हातारीचं अपहरण करायला? जिचे सोसायटीचे चार्जेस दुसरी माणसं भरतायत. तिच्याकडून त्याला काय मिळणार? पण एक न जुळणारा दुवा म्हणून आपल्या अनॉफिशियल केस डायरीमध्ये लिहून ठेवायला काय हरकत आहे? कल्पना जुळणारी असली तरी तर्काला न पटणारी होती. हे काम पेरियरचं तर नसेल? त्यांना विचार करावा तो तो पेरियरचाच संशय येऊ लागला. . पण पुन्हा जसा किशाला पैशाचा काही फायदा नाही तसा पेरियरला तरी कसा असेल? एकदम खंडागळे साहेबांकडे जायचं कशाला? आपण डायरीत लिहिण्यापेक्षा आपल्याजवळ लिहून ठेवावं हे बरं. एकदा प्रश्न कुंडली पाहिली पाहिजे. आपणच प्रश्न विचारावा. ते जागेवरून उठणार एवढ्यात फोन वाजला. नक्कीच खंडागळे साहेबांचा फोन असणार, म्हणजे परत काहीतरी नवीन किटाकीट नाहीतर कुठली तरी रेड मागे लावणार. आत्ता पाच वाजत होते. त्यांना आज लवकर घरी जायचं होतं. त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस होता. नाहीतरी फोन आलाच आहे तर साहेबांची लवकर जाण्याची परवानगी तरी घ्यावी, असा विचार करून त्यांनी फोन उचलला. तो होता चिमणलालचा फोन. "श्रीकांत साबजी, एक खबर है, ये हफ्तेमे किशा कौनसा तो भी बहोत बडा हाथ मारनेवाला है ऐसा सुना है. " इन्स्पे. श्रीकांत चिडून म्हणाले, " पक्का और डीटेलमे खबर बोलो, फालतू बात मत करना. " त्यावर तो म्हणाला, " साब एक दो दिनमे पक्का खबर बोलता है, लेकीन उसपर ध्यान देना. जलदीही बताउंगा " त्याने फोन बंद केला. चिमणलालच्या खबरी खऱ्या असतात, पण मागे एकदा खबर पक्की नसल्याने त्याच्यावर विश्वास ठेवायला डिपार्टमेंट तयार नव्हतं. पण इन्स्पे. श्रीकांतनी त्याला धरून ठेवला होता. तो पेरियरच्या टोळीत फार पूर्वी असल्याने त्यांना जास्त महत्त्वाचा होता. ते पुन्हा निराशेने खाली बसले. खंडागळेंचा फोन असता तर काम होण्याची काहीतरी आशा होती. स्वतः हून त्यांना फोन करणं म्हणजे "ये रे बैला आणि........... शिंग " तसला प्रकार झाला असता. त्यांच्या मनाची ओढाताण होऊ लागली. एकदा कामावरून लवकर जायचंय, हा विचार मनात आला, की सरकारी नोकरीत तरी, समोरच्या फायलीमधला इंटरेस्ट नाहीसा होतो....... मग त्यांच्या मनात आलं.. खरंच किशा काय करण्याच्या बेतात आहे ? बिनकामाच्या सावंतलाच हे काम द्यावं असं वाटून ते चहा घेण्यासाठी उठले. खरंतर जागेवरून उठण्याची त्यांच्यासारख्या सीनियर लेव्हलच्या इन्स्पेक्टरला परवानगी नव्हती. मग ते पुन्हा बसले. कोणी सांगावं याच्या पुढचाच फोन सायबाचा असेल. आशा मोठी चिवट असते.

सहा वाजले तरी इन्स्पे. श्रीकांतची सुटका झाली नाही. मग मात्र त्यांनी खंडागळेंना भेटायचं ठरवलं. काहीतरी तपासातला तुकडा पुढे ठेवायचा आणि आपलं काम साधता येतंय का पाहायचं असं त्यांनी ठरवलं. मागच्या जीवनरामच्या केस मध्ये त्यांच्याकडे मिसिंगची तक्रार नोंदली गेली, पण ती त्याच्या घरच्या लोकांकडून नाही तर, पेरियरकडून. त्यांना आश्चर्य वाटलं. पेरियर सारखा मध्ये का येतोय त्यांना कळेना. की पेरियर कोणाला तरी लपवीत होता, हे शोधणं जरूरीच होतं. त्यांनी सावंतला बोलावणं पाठवलं. पण तो अजून ड्यूटीवर आलेला नव्हता. मग त्यांना अचानक प्रश्नकुंडलीची आठवण झाली. सहा वाजून गेले असल्याने प्रश्नकुंडली मांडता येणं शक्य नव्हतं, अशी पद्धत ते शिकले होते. म्हणजे आता हे उद्यावर गेलं तर. धड काहीच काम करता येत नव्हतं आणि घरी जायलाही मिळत नव्हतं. खंडागळेंना काय खाद्य द्यावं म्हणजे ते आपल्याला जायला परवानगी देतील, याचा विचार करून ते केस फाइल्स बघू लागले. मग आपण आपल्या कामाकरिताच भेटायला जावं असं त्यांनी ठरवलं. मग मात्र त्यांनी वेळ न दवडता, साहेब मोकळे आहेत की नाहीत ते पाहून घेतलं. खरं कारण घेऊन जाणं हे खोटं कारण घेऊन जाण्यापेक्षा कठीण असतं असं त्यांना साहेबांच्या केबीन जवळ आल्यावर जाणवलं. खऱ्याच्या बाजूने गोतावळा निर्माण करता येत नाही, या उलट खोट्याचे गोतावळे मन कसं पटकन तयार करतं हे त्यांना लक्षात आलं. ते दबकतच आत शिरले, अत्यंत नम्रतेचा आव आणीत त्यांनी केबिनमध्ये प्रवेश केला. खंडागळे चिडखोर असले तरी माणूस ओळखण्यात वाकबगार होते. आत आल्या आल्या, ते श्रीकांतकडे पाहून मंद हसले. म्हणजे त्यांचा मूड बरा असावा असा अंदाज करीत श्रीकांतनी तोंड उघडलं.. " सर, एक रिक्वेस्ट आहे, आज माझी वेडिंग ऍनिव्हर्सरी आहे, जरा लवकर जायचं होतं. " एका दमात बोलून ते प्रतिक्रियेसाठी साहेबाच्या तोंडाकडे पाहत राहिले. साहेब म्हणाले, " अहो, तुम्ही आत बिनकामाचे आलात तेव्हाच मी ओळखलं. काहीतरी पाहिजे तुम्हाला. " अचानक साहेबांचा बरा मूड पाहून ते म्हणाले, "मग मी आत्ता निघालो तर चालेल? " साहेबांनी मानेनेच रुकार दिला. मग जरा थांबून साहेब म्हणाले, " श्रीकांत तुम्ही, ज्योतिष बघता, त्यावर माझा विश्वास अजिबात नाही, पण त्या बाबतीतलं माझं एक काम करा. " श्रीकांत उत्सुकतेने म्हणाले, " हो, सांगा ना सर. " थोडं अधिक रुंद हसून ते म्हणाले, " काय आहे की मला नात झालेली आहे, तर एक दोन दिवसात, माझ्या घरी येऊन तेवढं बारशासाठी मुहूर्त काढून द्या. आमच्या मिसेस तुम्हाला लागणारी माहिती देतीलच. येत्या रविवार पर्यंत काम करा. मी सांगतोच, नक्की केव्हा ते. " श्रीकांतनी सरांना सलाम ठोकला. आणि ते बाहेर आले. छातीवरचं मोठं ओझं उतरलं होतं. ते उत्साहात स्वतःच्या केबिनकडे आले. ताबडतोब बॅग भरली, आणि ते निघाले. बाहेर जाता जाता त्यांना सावंत भेटला. त्याला त्यांनी उद्या सकाळी आल्या आल्या त्यांना भेटायला सांगितलं. एकदाचे ते बाहेर पडले, त्यांचे एक जाणते सहकारी सांगत, अशी लवकर जाण्याची सवलत घेतली, की ताबडतोब निघावं, नाहीतर काही ना काही कारणाने जाणं रहित होतं, आपलं खातं असच आहे. त्यांना ते पटलं होतं.

इन्स्पे. श्रीकांत दुसऱ्या दिवशी स्टेशनला लवकरच आले. त्यांना सावंतला भेटायचं होतं. अकरा वाजत आले तरी सावंतचा पत्ता नव्हता. त्यांना आता राग यायला सुरुवात झाली. बरोबर बाराच्या ठोक्याला सावंत आला. तो थेट त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला. खरंतर ते त्याला झापणार होते. पण प्रथम त्याला त्याने जे मागे किशाच्या बाबतीत सांगितलं ते तपशिलात ऐकणं जरूर होतं. सावंतने कोणताच आडपडदा न ठेवता घटनेच पूर्ण वर्णन केलं. स्वतःचे आडाखे सांगायलाही तो विसरला नाही. आता त्यांना चिमणलालने सांगितलेली बातमी, साठे मामांनी तक्रार नोंदवण्यासाठी धरलेला आग्रह, आणि सावंतचा अनुभव, सावंतला सापडलेली बांगडी, जी सूर्याने काढून घेतली, या सगळ्याचं महत्त्व वाटू लागलं. ते सावंतला उत्तेजन देत म्हणाले, " सावंत आता तू पो. कॉन्स्टेबलचं काम करतोयस. गुड. असं कर किशावर करडी नजर ठेव. आणि एकदा या आजी राहतात त्या बिल्डिंगमधल्या लोकांकडून किंवा आणखी कोणाकडूनही आजींबद्दल काय माहिती मिळते ती काढून आण. तो सलाम करून बाहेर गेला. सावंतला आज प्रथमच पोलीस खात्यात शिरल्याचा अभिमान वाटला. आपणही महत्त्वाचं काम करू शकतो. आजपर्यंत आपल्या हे लक्षात कसं आलं नाही? तो जरा हळहळला. आजपासून कामाला लागायचं. अचानक त्याचा चेहरा प्रसन्न पाहून सखाराम म्हणाला, " पावण्यानू आज एकदम खुशीत दिसता? सायबान इंक्रिमेंट दिलान काय? " त्याला चूप करून सावंत थोडा फुगलेल्या अवस्थेत बाहेर निघून गेला............... इन्स्पे. श्रीकांतच्या टेबलावरचा फोन खणखणला. ते परत परत पेरियरची, किशाची आणि जीवनरामची फाइल वाचीत होते. फोनच्या घंटेने थोडे दचकले. त्यांनी फोन घेतला. "साबजी, (तो चिमणलाल होता) पक्की खबर है. किशा कौनसे तो भी बैंकका लफडा करनेवाला है. इस बार एकदम पक्का साब. ज्यादा जानकारी जलदीही दे दूंगा. " श्रीकांत काहीतरी बोलणार तेवढ्यात फोन बंद झाला. बातमी मिळाली असली तरी अर्धवट होती. आणि आत्ताच जमा झालेल्या विरळ दुव्यांमध्ये कशी फिट बसणार त्यांना कळेना. तरीही त्यांनी लिहून ठेवलं. आता त्यांना त्यांच्या प्रश्नकुंडलीची आठवण झाली. त्यांनी घड्याळाकडे पाहून प्रश्न विचारला, " हे दुवे नक्की काय सांगतात ". वेळेवरून त्यांनी त्रिकोण कुंडली मांडली. वेगवेगळ्या न जुळणाऱ्या ग्रहांच्या गटामुळे त्यांना काही सुचेना. शनी माथ्यावर, डावीकडे मंगळ उजवीकडे क्षीण गुरू मध्ये नेप्च्यून. मग त्यांनी अर्थ लावला. शनी म्हणजे हा किशा, मंगळ म्हणजे पेरियर, क्षीण गुरू म्हणजे आपलं पोलीस खातं(सावकाश कारवाई करणारं ) आणि नेप्च्यून म्हणजे म्हाताऱ्या आजी. शनी मंगळ युती म्हणजे नक्कीच काहीतरी उत्पात. या आठवड्याच्या शेवटी नक्कीच काहीतरी उत्पाती घटना घडणार. पण आजी आणि किशा किंवा पेरियर यांचा संबंध त्यांना ठरवता येत नव्हता. ते पुन्हा पुन्हा जोड्या आणि घटनांचा क्रम लावू लागले. तशा घटना त्यांना फारशा माहीत नव्हत्या. अचानक पणे त्यांचं भविष्य वेड वास्तवतेला दुरून का होईना स्पर्श करू लागलं. त्यांना अर्थातच त्याची कल्पना आली नाही त्यामुळे अजूनही काही रिकाम्या जागा भरायला हव्या होत्या असं त्यांना वाटलं. . पण कल्पनेपुढे भलेभले हरतात. त्यांचीही तीच अवस्था झाली. पुन्हा एकदा फोन खणखणला. ते जागे झाले. आता मात्र खंडागळे साहेबांचा फोन होता. त्यांना फारशी भीती वाटली नाही. कदाचित त्यांनी घरी कधी यायचंय याबद्दलच बोलावलं असावं. ते कोणतीही फाइल न घेता निघाले.

******** ******** ********* ******** ********** ********

संध्याकाळची सहाची वेळ काका निवांत बसले होते. आता या जांभळे कडे जायला हवं. आत्ता बाहेर जाणं त्यांच्या जिवावर आलं होतं. पण ते अनिच्छेने तयार झाले. फारसं काही घरात न बोलता ते जरा जाऊन येतो म्हणून सांगून निघाले. त्यांनी भायखळा पूर्वेला जाणारी बस पकडली. संध्याकाळची गर्दी इतकी होती, की त्यांना दारावरच लटकावे लागले. वाहतुकीच्या विलंबामुळे वीस एक मिनिटात जाणाऱ्या बसला जवळ जवळ पाऊण तास लागला. हे मुंबईत राहणं म्हणजे बेकार आहे असा नकारात्मक विचार करीत त्यांनी बिल्डिंग शोधली. ती राणी बागेच्या आस पास होती. परत एकदा फोन करावा का असा विचार करून ते थांबले. पण न करण्याचा निर्णय घेऊन ते बिल्डिंगमध्ये शिरले. रूम नं. ३२ तिसऱ्या मजल्यावर होती. दरवाज्याशी पोचल्यावर त्यांनी प्रथम नेमप्लेट पाहिली. ती कुणा सरस्वतीबाई जांभळे यांच्या नावाची होती. काकांनी बेल वाजवली. एका गहूवर्णीय स्त्रीने दरवाजा उघडला. तिच्या हातावर एक दीड दोन वर्षांचा मुलगा होता. समोरच एका भिंतीवर एक जुन्या वळणाच्या वयस्क स्त्रीचा फोटो लावलेला दिसत होता. तिने नऊवार लुगडे नेसले असावे. तिच्या गळ्यातली बोरमाळ आणि जगदंबेसारख्या कुंकवामुळे ती जुनी स्त्री वाटत होती. तिला हार घातलेला दिसत होता. ती बहुतेक गेलेली असावी. सरस्वतीबाई की कोण , तीच ती असावी असं काकांना वाटलं. दार उघडणाऱ्या स्त्रीने त्यांना कोण हवंय विचारलं. मग काका म्हणाले, "संजीव जांभळे इथेच राहतात का? मी दुपारी फोन केला होता. " त्या स्त्रीला आठवलं. ती त्यांनी आत यावं म्हणून बाजूला झाली. ते आतल्या सोफ्यावर कमीतकमी जागा व्यापून बसले. परकेपणाचा वास वातावरणात होता. मग आत गेलेल्या स्त्रीचा कोणाशी तरी बोलण्याचा आवाज आला. काही वेळातच एक रमेशच्या वयाचा तरुण बाहेर आला. आपणच सुरुवात करणं बरं म्हणून काका म्हणाले, " मी रामचंद्र कामथे....... " प्रतिक्रियेसाठी ते थांबले. त्या तरुणाने त्यांचे नाव स्वतःशी उच्चारले आणि काहीतरी आठवून म्हणाला, " अरे हो, बरोबर, तुम्हाला पाठक साहेबांनी पाठवलं असेल ना? " ते हो म्हणाले. दादाच्या चिठ्ठीत योग्य ती सर्व माहिती असल्याने काकांना काही अडचण आली नाही. तो पुढे म्हणाला, " पाठक साहेबांनी सगळं जुळवून आणलंय, म्हणून माझं काम होतंय, याची जाणीव आहे मला. नाहीतर एवढे पैसे तयार करणं आणि परदेशी जाण्याची कागदपत्रं तयार करणं मला कठीण गेलं असतं. मी आपला पण आभारी आहे. आपणही तयार झालात. आपल्यासारखी आणि पाठकसाहेबांसारखी चांगली माणसं (आणि किशा दादासारखी पण, असं म्हण असं काकांच्या मनात आलं) आहेत म्हणून तर माझं काम झालंय. " ..... थोडावेळ थांबून काका म्हणाले, " मला आता तुला बाबा म्हणावं लागेल, कारण तुला माहीत आहेच. तसंच तुझी बायको माझी आता सून झालेली आहे. निदान आपल्यात तरी असंच नातं ठेवावं लागेल. बाहेर मात्र कोणालाही कळता कामा नये. कारण तुझी वस्तुस्थिती आजूबाजूच्या लोकांना चांगलीच माहीत आहे. " साधारणपणे किती तारखेला जावं लागेल? " त्यांनी विचारलं. " पुढच्या आठवड्यात गुरुवारी जावं लागेल. मी सगळं करीन. तुम्ही फक्त तुमचं सामान घेऊन कुठे याल ते सांगा. मला वाटतं, थेट विमान तळावर आलात तर बरं होईल. इथे येऊन, इथून जाण्यापेक्षा ते बरं राहील. मला माझ्या बायकोला समजवावं लागेल. मी करीन ते. तिला हे सगळं फारसं आवडलेलं नाही, पण काय करणार, परिस्थितीच तशी आहे. असो. " तो खरोखरीच गंभीरपणे बोलत होता. आतून त्याची बायको हातात दोन चहाचे कप घेऊन आली. मग चहा पान झालं. आणि काका उठले, "ठीक आहे तर, मी ठरल्याप्रमाणे येईन. साधारणपणे रात्री साडे बारापर्यंत पोचलो तरी चालण्यासारखं असेल. " तो ठीक आहे म्हणाला. " जर काही अडचण आलीच तर मी तुम्हाला, कळवीनच. तुमचा फोन नं. तेवढा देऊन ठेवा. " मग फोन नंबर्स दिले गेले. आणि काका निघाले.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chan jala ha pn bhag .....pudcha bhag yeu dya lvkr....