अखेर 17 वर्षांनी न्याय झाला आणि काळवीट प्रकरणातील सलमान निर्दोष सुटला. निर्दोष असताना 17 वर्षे मनस्ताप सहन करावा लागला याची भरपाई सलमानला मिळावी याची कायद्यात काही तरतूद नसावी. असली तरी त्याच्या अमूल्य वेळाची आणि मनस्तापाची भरपाई पैश्यात मोजणे कठीणच.
पण या निमित्ताने आणखी एक प्रश्न जो नेहमीच डोक्यात येतो त्याने उसळी मारलीय. काळवीटाला काय एवढे सोने लागले असते जे त्याला जपले जाते. आता गटारीला लाखो कोंबड्या बकर्यांची कत्तल होईल, ईदला त्यापेक्षा जास्त बकरे मारले जातात, रानडुकरे आणि रानसश्यांची सर्रास शिकार होऊन त्यांना खाल्ले जाते. गोहत्येवर निर्बंध लादण्याआधी गायबैलही यातून सुटायचे नाहीत. सागरी जीवांबद्दल तर विचारायलाच नको. म्हणजे एकंदरीत जे प्राणी मुबलक आणि सहज उपलब्ध होतात त्यांना आपण खाण्यासाठी किंवा औषधी वा शोभेच्या, उपयुक्त वस्तू बनवण्यासाठी सर्रास मारतो मग काळवीटालाच का स्पेशल ट्रीटमेंट? नक्कीच यामागे कुठलीही भूतदया नसून कसलासा स्वार्थच असणार. बस तोच या निमित्ताने जाणून घ्यायचाय. जाणकारांनी प्रकाश टाकावा! धन्यवाद..
सीमंतिनी
सीमंतिनी
Pages