रतनगड ट्रैक स्टोरी _टाइगर ट्रेकर्स

Submitted by किरण भालेकर on 31 October, 2015 - 05:46

२२ नोव्हेंबर २०१३ दिवस माझ्या आयुष्यातला एक यादगार दिवस म्हणता येईल .रतनगड ट्रैकच्या निमित्ताने एक अतिशय दुर्गम असा ट्रैक आम्ही पार पाडला .टाइगर ट्रेकर्सचे ग्रुप लीडर वैभव भालेकर आणि इतर सभासद त्यामध्ये संतोष भाताडे,सचिन भातरे ,नितेश पांचाळ ,चेतन टेंकाळे आणि मी. अवघे ६ जण .परंतु दुर्दैम्य इच्छाशक्ती ,धाडस 'आणि चिकाटी या जोरावरती हा ट्रैक पार करणाऱ्या या माझ्या मित्रांना सलाम करतो. आणि या ट्रेकच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करण्याचा हा छोटासा प्रयत्न ........

अंधेरीमध्ये (सीप्ज) साई संघवी स्टार प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे.आता ती बंद आहे पण आजही साईबाबांच मंदिर तेथे आहे.या कंपनीमध्ये आम्ही त्यावेळी कामावर होतो.ग्रुपमधील सर्वजण कोकणाकडचे असल्याने आमची एकमेकांशी छान मैत्री झाली होती.आणि अशातच आमचं पिकनिकनला जायचे ठरले.रतनगडला भाऊ वैभव जावून आलेला असल्यामुळे त्याला तिकडची सर्व माहिती होती.तोही आमच्याबरोबर कामाला होता.त्यामुळे बेसिक प्लानपासून अगदी फाइनल प्लॅनिंग सर्व त्याने केल होत.म्हणजेच गाडीच वेळापत्रक ,मॅप,कालावधी वैगरे सर्वकाही..... अगदी मिनिटांचा हिशोब काढला होता.अर्थात त्याला बेस्ट प्लानरचा किताब दिला पाहिजे असा माणुस.

२२ नोव्हेंबर २०१३ तारीखला शुक्रवारी संध्याकाळी आम्ही सर्व छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे एकत्र जमलो.कारण आम्हाला रात्रीची महानगरी एक्सप्रेस पकडायची होती.गाडीसाठी प्रचंड रांग असल्यामुळे थोडी मनामध्ये धाकधुक होती. एक्सप्रेसला दोनच जनरल डबे आहेत.गाडी आली तशी भैया लोकांची दादागिरी चालु झाली.वेळेवर येवून सुद्धा बसायला जागा मिळणे मुश्कील झाले.थोडीशी दादागिरी करणे भाग होते.कारण अख्या डब्यामध्ये मराठी चेहरे फक्त आम्हींच होतो.बसायला पुरेशी जागा करून घेतली .अशारीतिने आमच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.४ तासाचा प्रवासात करमणूक म्हणून उस्ताद वैभवने ढोलकी बाहेर काढली.तासभर मराठी अभंगात भैया लोकांचा डबा रंगून गेला.मघाशी आमच्याशी सीटवरून भांडण करणारे आता टाळ्यांची साथ देत होते. इगतपुरी स्टेशनला आम्हाला उतरायचे होते.ईगतपुरी येईपर्यन्त ४.३० वाजले होते.आम्हाला शेंडी गावाला जाणारी बस पकडायची होती.इगतपुरी बसस्टैंडलाच आम्ही रात्र काढली आणि सकाळी ५.००पहिली बस पकडून शेंडीला निघालो.अफाट थंडी पडली होती.बसचा मार्ग अतिशय खडतर होता आणि रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते.बरोबर ७ वाजता आम्ही शेंडी गावच्या फाटयावर उतरलो.कारण तिथून आम्हाला रतनवाडी गडाचा पायथा जवळ करायचा होता.

रतनवाडीतून रतनगडला जायचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे भंडारदरा डॅम ९ किमी होडिने किंवा रस्त्याने ट्रॅव्हल्स गाडीद्वारे शेंडी गावात उतरल्यावर पाच मिनिटे सरळ पुढे चालत गेल्यावर भंडारदरा डॅम हे इंग्रजकालीन मोठे धरण आहे.या भागाला पिकनिक पॉइंट असे म्हणतात .ईथे आम्ही फोटोग्राफीची हौस भागवुन घेतली.

भंडारदरा जलाशय...

IMG_20131026_064023.jpg

बोट फेरींची सोय नसल्यामुळे आम्ही ट्रॅव्हल्स गाडी बुक केली.दोन वेळेच्या येन्याजाण्यासाठी गाडी असणार होती.आणि अशारीतिने ट्रॅव्हल्स गाडीद्वारे आम्ही निघालो अतिशय खाचखळग्याचा रस्ता आहे.प्रवासामध्ये रंगत भरण्यासाठी आम्ही आमच्या बरोबर आणलेली ढोलकी काढली आणि आमच्या भजनाला सुरुवात झाली.माझा भाऊ वैभव हा उत्कृष्ट ढोलकीपटु असल्यामुळे कार्यक्रममध्ये अतिशय रंगत आली. १.३० तासाच्या प्रवासानंतर आम्ही रतनवाडीला पोचलो.

रतनवाडीला अमृतेश्वर हे शिवशंकराचे प्रसिद्ध स्थान आहे.हेमांडपती बांधकाम शैलीतले हे मंदिर अत्यंत प्राचीन असावे.आम्ही मंदिरात पोचलो त्यावेळी मंदिराच्या गाभार्यामध्ये पाणी होते.शिवपिंडी पूर्ण पाण्यात होती. दरवाज्यासमोरचा काळ्या पाषाणातील नंदी आपल स्वागत करतो.मंदिराच्या आवार सुशोभित करण्याचे काम चालू होते.अमृतेश्वर मंदिराजवळील प्राचीन तळे अतिशय मनोहर आहे.अमृतेश्वर देवाची पूजा करुन आम्ही मोहिमेला सुरुवात केली.

अमृतेश्वर देवस्थान...

FB_IMG_1446798092432.jpgप्राचीन तळे
FB_IMG_1446798121488.jpg

आमचे सुदैव असे कि गावातील काही मंडळी गडावर पर्यटकांची व्यवस्था करण्यासाठी चालली होती त्यामुळे आम्हाला वाटाड्याची गरजच उरली नाही.सरळ रस्ता संपून जंगल चालू झाले होते.सह्याद्रीचच जंगल ते निबिड घनदाट .हिंस्त्र श्वापदांची तेथे काहीच कमी न्हवती.जंगलामध्ये खुप फसव्या वाटा आहेत त्यामुळे पुरेशी माहिती असल्यशिवाय जाने धोक्याचे आहे.पर्याच्या काठाकाठाने वाट जाते.आणि येथील निसर्गसौंदर्य तर अवर्णनीय आहे.
आमच्या सोबत असणाऱ्या गावातील मंडळीना गडावर जाण्यासाठी घाई असल्यामुळे त्यांच्याकडून वाटेची पुरेशी माहिती घेतली आणि त्यांना निरोप दिला.चालता चालता सूर्य डोक्यावर कधी आला ते कळलेच नाही .उभ्या चढनीमुळे सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहु लागल्या होत्या.वाटेच्या जवळच मोठा पर्या वाहत होता आणि आमची अंघोळही झाली न्हवती.मग काय एक छानशी जागा अंघोळीसाठी निवडली. पाण्यात पाय घातला आणि काय अंगावर काटा आला .बर्फापेक्षा थंडगार पाणी आणि तेही भरदुपारी १२ वाजता आयुष्यात पहिल्यांदा पाहत असेन.पाण्यामध्ये यथेच्छ अंघोळीवर ताव मारला .आणि आम्ही मार्गक्रमित झालो.सह्याद्रीची सफर फक्त तिघेच करू शकतात .१)वारा२)वाघ ३)मराठे.... या वाक्याची जर प्रचिती घ्यावयाची असेल ना तर ईथे यावे.रतनगडचे प्रस्तररोहण उभ्या चढणीचे आहे.दर एक तासाने विश्रांती घ्यावी लागत होती.बरोबर आणलेल्या काकडी ,गाजर यांचा एव्हाना फन्ना पडला होता.अगदी पेपरमिटची एक गोळीसुद्धा वाचली नाही.एक डोंगर संपला की आता गड येईल अशी आशा वाटत होती पण गड काही नजरेत येत न्हवता.माझे सर्व मित्र काकुळतिला आले होते.

सह्याद्रीचा तडाखा खाऊन मेटाकुटीला आलेले मित्र पहिल्या शिडीजवळ पोहोचले तेव्हा काकडी,गाजर यांचा फन्ना उडवताना ...

IMG_20131026_112327.jpgकिरण भालेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users